साथ,सोबत संगत...

2 views
Skip to first unread message

sachin sonawane

unread,
Oct 12, 2010, 9:40:45 AM10/12/10
to jay jadhav, Santosh Jadhav, Sudhir Jadhav, Vidyaniketan Group, vishal kushare, victor_d...@yahoo.com, mdu...@yahoo.in, Ganesh Thakur, Gurpreet Mann, Anand Ghatole


 


॥  फेब्रुवारी २०१० ॥
ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या
घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला
लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा
पोकळी असते.
तर, ही भिंत तोडताना त्य माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल
अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय
चिणला गेला आहे.त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं
कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन
बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल
जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत
हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली? जे जवळजवळ अशक्य होतं.
त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसला,
की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की
तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या
खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक
झाला,गहिवरला. कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल
आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता !
एक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची
अशा प्रकारे काळजी घेतो,तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू
शकतो.तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी
आधार द्या-जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते,तेंव्हा. "तुम्ही" म्हण्जे
त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.कोणतीही गोष्ट (नातं,
विश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु
जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं

 




--

With Warm Regards,
Sachin Sonawane



--
Kal Ho Na Ho !!!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages