साईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व./The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

1,050 views
Skip to first unread message

Samirsinh Dattopadhye

unread,
Aug 15, 2012, 7:36:38 AM8/15/12
to saithegui...@googlegroups.com
॥ हरि ॐ ॥
आज शिवरात्री. दर शिवरात्रीला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन होते. दर महिन्याला होणारे हे पूजन पुरोहित करतात. मात्र आज श्रावणात येणा-या या शिवरात्रीला मी पूजन करायचे असे सद्गुरु बापूंनी सांगितले आहे.
दरवर्षी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे वालुकेश्वराचे म्हणजे वाळूने बनवलेल्या शिवलिंगाचे पूजन करतो. अवधूतचिंतन उत्सवात आपण शिवलिंगांचे पूजन केले. सद्गुरु बापूंनी आपल्याला परमशिव, सदाशिव व नित्यशिव ह्या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत्.
आज ’साईसच्चरिता’च्या  या फोरममध्ये आपला पहिला विषय असेल - साईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व.

Hari om
It is Shivaraatri today. Every month on the day of Shivaraatri, the 'Shreemahadurgeshvar poojan' is offered at the Shreeaniruddha Gurukshetram. It is normally the purohits who perform the poojan every month. However, today is the Shivaraatri of the month of Shravan and Sadguru Bapu has instructed me to offer the poojan.

Every year at Shreeharigurugram we all offer the Valukeshvar poojan i.e. the poojan of the Shivalinga made from sand. The Avadhootchintan festival too was marked by the poojan of the Shivalinga. Sadguru Bapu has already explained to us at length, the concepts of Paramshiva, Sadashiv and Nityashiva.

Today on the launch of the forum based on the Saisachcharit our very first theme will be 'The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva', the references to Shiva contained in it and the significance of all these'.

suhas dongre

unread,
Aug 16, 2012, 3:52:53 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om Dada,
 
This forum of Sai - The Guiding Spirit is going to be a very interesting jouney towards exploring  Saisachcharit. As realised by Shri Hemadpant, every Sai devotee had experienced and understood Sai in different way; similarly we all Shradhavans will have differnt views, angles , thoughts about different themes of this forum.
 
When we hear about the very first theme of forum i.e. ' The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva', the first thing which comes to our mind is story of Shiv Bhakta Megha who then recognised that Sai is nothing but his Shiva. Baba also gives him lots of love. When Megha dies, Sai breaks into tears and HE does all the rituals as Megha was not having any realtive. Its touching...Let us explore more and more to make of Bhaki strong at the louts feet of Sai Aniruddha.

Suneeta Karande

unread,
Aug 16, 2012, 4:20:58 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om, Dada. Today is Shivratri and on the launch of the forum based on Shree Saisachcharit our very first theme is 'The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva', the references to Shiva contained in it and the significance of all these'. What an APT theme!

On the very first page of SHREESAISACCHARIT, we read the very first OVI -
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ।।1 ।।
The meaning is very significant and all of us are familiar with it. 
In the very first Adhyay of SHREESAISACCHARIT, Hemandpant narrated his bhav from Ovi that my Sadguru SAINATH , Himself is UMESH i.e. UMAPATI , Lord SHIVA as well as RAMESH (VISHNU) and SAVITRISH (BRAHMA) for me. 
हे साईनाथ स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधीक्ष । सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच ।।१९!! 
When SAINATH and His SHIVA Swaroop , topic is seen first thought comes to mind is of great ardent devotee Megha , who dedicated himself to the lotus feet of his benevolent Sainath considering SAINATH as Shankar ,as Umanath only. Megha's beloved deitee was Shivashankar. When he first time arrived there was vikalpa in his mind about Sainath as his guru Ravabahadur Sathe told him that someone call SAINATH as AVINDH (YAVAN) as He sits in Mosque( MASJID). Being Brahmin, Medha was confused to accept Saibaba as SHIVA and offer Him GANGODAKSNAN. But during his first meeting only he saw SAI'S UGRA SWAROOP of SHIVA. Hemandpant described very beautifully that My SAI started His Leela. 
उग्र स्वरूप धारण केलें । पाषाण हातीं घेउन वदले । खबरदार पायरीवर पाउल ठेविलें ।यवनें वसविलें हे स्थान ।। १३८ ।। (अध्याय २८) 
तें कातावलेपणाचें रूप । दुजें प्रळयरुद्राचें स्वरूप । पहाणारांस होत थरकांप । चळी तव कांपत तव मेघा ।।१४० ।। 
Then we further read that though SAINATH was furious at first sight, actually He was very kind and generous to Megha. How Sainath removed his vikalpa , doubt of crist and creed and real bhakti was cultivated in Megha's mind. This ovi shows how my SAI makes a sculpture i.e. SHILPA out of a stone, by removing unwanted portion . really His SHIVA form He bears to destroy our wrong doubts, our evil thoughts, so as to start pure and pious flow of real BHAKTI in our mind. 
मेघा आधींच शंकरभक्त । होतां साईपदी अनुरक्त । शंकरचि भावी साईनाथ । तोच उमानाथ तयाचा।।१४७।।
करीं मेघा अहर्निश । साईशंकर- नामघोष । बुद्धिही तदाकार अशेष । चित्त किल्मिष्विरहित ।। १४८।।
My Sadguru Sai, has converted Megha's mind into Chitta and that too without any doubt, fault, He filled it with NAM . For Sadguru , any name whether you call Him as Shiva or Vishnu, doesn't make any difference. That's why HE is TRIVIKRAM i.e. HARIHAR swaroop for his devotee. Sadguru Bapu explained us this Sadguru's Harihar Swaroop as TRIVIKRAM and hence also established TRIVIKRAM in our SHREEANIRUDDHA GURUKSHETRAM. 
I bow to the lotus feet of my SAI ANIRUDDHA's this SHIVA swaroop , who poured a vast knowledge about NITYASHIVA, SADASHIVA and PARAMSHIVA swaroopa through His agralekha and also gave us opportunity to perform pooja of SHREEMAHADURGESHWAR as PARAMSHIVA form. 
Shreeram Dada, for giving us nice opportunity to discuss and share our thoughts via this Discussion Forun plateform .

Reshmaveera Narkhede

unread,
Aug 16, 2012, 4:47:03 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
श्रीराम दादा...फोरमची अशी दमदार सुरुवात करण्यासाठी...फोरमचा विषय हा अत्यंत सुंदर आहे. साई सच्चरित्रातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व. हा विषय दिल्याबरोबरच मला मेघाची कथा आठवली.
मेघा आधींच शंकरभक्त । होतां साईपदी अनुरक्त । शंकरचि भावी साईनाथ । तोच उमानाथ तयाचा।।१४७।।
करीं मेघा अहर्निश । साईशंकर- नामघोष । बुद्धिही तदाकार अशेष । चित्त किल्मिष्विरहित ।। १४८।।
मेघा हा कट्टर शिवभक्त होता आणि तो साईपदी देखील तितकाच स्थिर होता. आणि हे त्याच्या साईशंकर अखंड चालणार्‍या जपावरुन दिसून येते.

Reshmaveera Narkhede

unread,
Aug 16, 2012, 5:20:39 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
मेघा हा एक गुजराती ब्राह्मण होता आणि रावबहादूर साठ्यांच्या पदरी त्यांनी नोकरी स्वीकारली होती. साठे साईभक्त असल्याने मेघाचाही साईंशी संबंध आला. मेघा हा मूळ शिवभक्त मात्र केवळ तो चांगल्या संगतीत असल्याने तो सदगुरुतत्वाकडे येऊन पोहचला.
असो मेघांचे संचित मोठें। लाधले रावबहादुर साठे। तेव्हांच तो लागला परमार्थ वाटे। नेटेंपाटे तयांच्या ।१२६॥
पुढे साठ्यांच्या मनात बाबांना गंगोदकस्नान घालण्याचे मनात येते आणि ते मेघाला शिरडीस पाठविण्याचा विचार करतात. मेघाप्रती त्यांना स्नेह असल्याने सदगुरु चरण मेघासही लाभतील असा त्यांचा मानस होता. मात्र हा साईनाथ यवन असल्याने मेघा मनातून खट्टू होतो. त्याला जायचे नसते पण तो नायलाजाने जावे लागते.
पुढे मेघा शिरडीस आल्यावर मशिदीत आला. पण मशिदीची पायरी चढू लागल्यावर बाबांनी उग्र रुप धारण केले..
इतके मला माहित आहे...याच्या पुढील कथा नीट माहित नाही.

Nikhil Bhalwankar

unread,
Aug 16, 2012, 5:51:42 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om Dada,

This forum of Sai - The Guiding Spirit will really help all of us to understand Saisacharit in more detail. Shreeram for starting this forum.


Nikhilsinh Bhalwankar

Dr.Namita Joshi

unread,
Aug 16, 2012, 6:02:55 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ॐ दादा, 

'साई - द गाईडिंग स्पिरिट'  हा फोरम म्हणजे सर्व श्रद्धावानांसाठी खरच एक अनमोल भेट आहे . ह्या फोरम द्वारे श्री साई सच्चरित हे विविध मार्गाने समजुन घेण्यास नक्कीच मदत होऊ शकेल . 

श्री साई सच्चरितातील शिवाच्या संदर्भातील सर्वप्रथम गोष्ट आठवते ती शंकर भक्त मेघाचीच. 
अध्याय २८ - " मेघा आधींच शंकरभक्त । होतां साईपदी अनुरक्त । शंकरचि भावी साईनाथ । तोच उमानाथ तयाचा।।१४७।। "
तसेच पहिल्याच अध्यायात हेमाडपंत सांगतात , "साईनाथ स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधीक्ष । सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच ।।१९!! 

Sailee Paralkar

unread,
Aug 16, 2012, 6:07:18 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम दादा, 
फोरम सुरु झाल्यामुळे अतिशय आनंद झाला. यानिमित्ताने आमच्याकडून श्री  साईसच्चरिताची पुन्हा एकदा उजळणी होईल. 

रेश्माविरा मेघाच्या  पुढील कथेत हेमाडपंतानी असे सांगितले आहे कि मेघा मशिदीत आल्यावर बाबांनी अतिशय उग्र रूप धारण केले. हातात दगड घेऊन त्याला मशिदीत येण्यास अडविले व बाबा म्हणाले "तू उच्च जातीचा ब्राम्हण आहेस आणि मी  तर यवन आहे तू मशिदीत आलास तर तुझा विटाळ होईल." बाबांचे हे रौद्र रूप पाहून मेघ आतिशय घाबरला आणि त्याला प्रश्न पडला कि हा माझ्या मनातला विकल्प बाबांना कसा काय कळला? मला हा प्रश्न पडला तेव्हा मी तर खेडा जिल्ह्यात होतो. मग बाबांना एवढ्या दूर घडलेली घटना कशी काय कळली. 
   यावरून हेमाडपंत आपल्याला पुन्हा दाखवून देतात कि आपण केलेली प्रत्येक कृती, आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार आपल्या देवाला, बाबांना कळतो. 

हरी ओम 

Yogesh Joshi

unread,
Aug 16, 2012, 6:07:35 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम 
श्री साई सचचरित मध्ये भगवान शिवाचा उल्लेख चटकन आठवतो तो लाडका साई भक्त श्री मेघाच्या संदर्भात. त्याशिवाय हा संदर्भ येतो अध्याय ३१ मध्ये......ज्यात विजयानंद नावाचा एक सन्यासी मद्रासहून मानस सरोवराकडे जाण्यासाठी निघालेला असतो. हिंदू मान्यतेनुसार कैलास पर्वतावरील मानस सरोवराला श्री शंकर आणि पार्वतीचे निवासस्थान समजले जाते. ह्याच अध्यायामध्ये दरवेशी जे वन्य क्रूर प्राण्यांचे खेळ करून स्वत:ची उपजीविका करतात त्यांचे शिर्डीत आगमन होते. त्यांच्यासोबत असलेला वाघ जो जर्जर झालेला असतो त्याचे देहावसान झाल्यानंतर साईनाथ त्यास शंकराच्या देवळातील नंदिजवळ पुरण्यास सांगतात. ह्या अध्यातील सदर घटनेचे महत्व श्री हेमाडपंत अधोरेखित करतात कारण ह्या व्याघ्र घटनेनंतर सातच दिवसांनी श्री साईनाथांनी सुद्धा देह ठेवला होता. श्री राम.

Reshmaveera Narkhede

unread,
Aug 16, 2012, 6:28:12 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
योगेशसिंह अगदी बरोबर तुम्ही दिलेला संदर्भ अगदी बबर. यावरुन मला अजून एक संदर्भ आठवला.
अकराव्या अध्यातील हाजीच्या गोष्टीतला...
आधीं न घेतां नंदीचे दर्शन । शंकर होईल काय प्रसन्न।
इथे नंदी असे बाबांच्या लाडक्या शाम्याला संबोधले आहे तर शंकर हे श्री साईनाथांना संबोधले आहे. साई शंकर वेगळे नाही हे स्पष्ट सांगितले.

Message has been deleted
Message has been deleted
Message has been deleted

Shilpa Gaikwad

unread,
Aug 16, 2012, 7:25:39 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
२८ अध्यायात हेमाड्पंतांनी आपल्याला एक गोष्ट सागितली आहे. मेघा हा कट्टर शंकर भक्त होता. बाबा हे यवन असल्यामुळे त्याच्या मनात बाबांविषयी विकल्प होता. असेच एके दिवशी तो तापाने फणफणला व अंथरुणाला खिळून राहिला तेव्हा जो त्याला बाबांचा ध्यास लागला व तो बाबांचा अनन्य भक्त झाला. श्री साईनाथ म्हणजेच शंकर ह्यावर त्याचा दृढविश्वास बसला. व मेघा अहर्निश साईशंकर-नामघोष करित राहिला.
Message has been deleted

sangita vartak

unread,
Aug 16, 2012, 7:29:26 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ॐ दादा,
आम्ही सर्व जण आतुरतेने वाट बघत होतो तो फोरेम तुम्ही सुरू केला... काल श्रावणातील शिवरात्री होती आणि त्याच दिवशी तुम्ही फोरमवर पहिला विषय शिवाचाच दिलात......खूप खूप श्रीराम त्याबद्दल.... आम्हा सर्वांना या फोरमचा फारच उपयोग होणार आहे आणि आम्ही तो नक्की करून घेऊच.... पण फोरम सुरू व्हायची वाट बघताना तो आल्यावर त्यावर कसे आणि काय पोस्ट करायचे याचा विचारच केला नव्हता... काय टाकावे यातच खूप वेळ झाला.... शेवटी म्हटले काही तरी नक्कीच टाकले पाहीजे.... म्हणून ठरविले आणि सुरु केले.... साईचरित्रात शिवाचा उल्लेख झाला......
एकाचे नाव घ्यावे आणि आपसुकच दुसरे नाव यावे तसे मला तरी साईचरित्रातील शिव म्हटले म्हणजे शिवाचा कट्टर भक्त मेघा याचेच नाव आले.
आणखी एक कथा आठवली ती म्हणजे त्रिपुंडाची कथा ज्यात....
दादांसमवेत पंडित गेले। दादांनी बाबांचे पूजन केलें मग दादा बाबांचे पुजेस निघाले। येतां का विचारिलें तयांसी॥५२॥ दादांसमवेत पंडित गेले। दादांनी बाबांचे पूजन केलें। कोणीही न तोंवर लावाया धजलें। गंधाचे टिळे बाबांस ॥५३॥ कोणी कसाही येवो भक्त। कपाळीं गंध लावू न देत। मात्र म्हाळसापती गळ्यासी फांसीत। इतर ते लावीत पायांतें॥५४॥ परी हे पंडित भोळे भाविक। दादाची तबकडी केली हस्तक। धरूनिया श्रीसाईंचे मस्तक। रेखिला सुरेख त्रिपुंड॥५५॥ - साईचरित्र अध्याय - ११
या कथेत पंडीत बाबांना त्रिपुंड काढतात आणि त्रिपुंड हे शिवाचे नाम आहे इतकेच मला महित आहे आणखी कोणी मला याबद्द्ल माहीती देऊ शकाल तर कृपया द्यावी.....
हरि ॐ.....

Shilpa Gaikwad

unread,
Aug 16, 2012, 7:37:24 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
याच अध्यायात पुढे अजुन एक गोष्ट येते बाबां मेघाला पहाटे दृष्टांत त्यात बाबा त्याला म्हणतात 
” मेघा त्रिशूल काढीं रे” बाबाचे ते शब्द ऎकून मेघा जागा होतो तेव्हा त्याला बिछान्यावर अक्षता पड्लेल्या दिसतात वाड्याची दरे बंद असताना अक्षता कुठुन आल्या. मेघा बाबाकडे जातो व बाबांना विचारतो तेव्हा बाबा त्याला म्हणतात 
"माझिया प्रवेशा नलगे दार। नाहीं मज आकार ना विस्तार। वसें निरंतर सर्वत्र॥१९९॥
टकूनिंया मजवरी भार। मीनला जो मज साचार। तयाचे सर्व शरीरव्यापार। मी सूत्रधार चालवी"॥२००॥
हरि ओम

Sailee Paralkar

unread,
Aug 16, 2012, 7:42:09 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
शिवलिंगाची अजून एक कथा हेमाडपंतानी सांगितली आहे. एके दिवशी मशिदीत रामदास नावाचे भक्त बाबांना शिवलिंग अर्पण करतात. ते शिवलिंग बाबा मेघाला देतात. मेघा अत्यानंदित होऊन ते शिवलिंग घेऊन काकासाहेब दिक्षित यांच्या वाड्याकडे निघतो आणि इकडे दिक्षित नुकतेच स्नान आटोपून साईनाथांचे स्मरण करीत बसलेले असतात.  स्मरण करीत असताना त्यांना अचानक शिवलिंगाचे दर्शन घडते. त्यांना अतिशय आश्चर्य वाटते कि आज अचानक कसे काय दर्शन झाले ? एवढ्यात मेघा आनंदाने दिक्षित यांच्याकडे पोचतो व त्यांना बाबांनी त्याला दिलेले शिवलिंग दाखवतो. ते पाहून दिक्षित अतिशय उल्हासित होतात कारण ज्या शिवलिंगाचे दर्शन काकांना घडते अगदी तसेच्या तसेच शिवलिंग मेघा बाबांना दाखवतो. 

Poorva Kulkarni

unread,
Aug 16, 2012, 7:46:19 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
Hari om all!! I agree that the theme brings Megha's story to the mind. So why not start our discussion with this story? Yes Megha was an ardent Shiva bhakta and for him, Sai was no different from Shiva. The verse 169 of chapter 28 begins with beautiful words that I find very touching as they express the merger, the oneness of the two forms in Megha's mind. The reference to Shiva in this story is not just the form of the parmatma that Megha connected with, it is the form assumed by Megha's love, it is the 'bhaav' of Megha's mind that he offers to Shiva-Sai.  The words I am referring to are "Gangodake Sais snaan".... "Bathing Sai with the waters of the Ganga (Gomati/Godavari)"!!!!!. For Megha, Sai is Shiva and the Ganga as we know has its source, its origin in the tresses of Shiva. This sacred river springs down from the top of Shiva's head and travels to the earth and her water, her goodness, her sanctity and purity becomes available to one and all and then the ganga is called the bhagirathi (the river travelled to the earth thanks to the efforts and austerities of Bhagirath). Bapu uses the word 'bhakti-bhagirathi' in the Matruvatsalyavindanam. That is what I feel Megha's act of bathing his 'Shiva-Sai' in the waters of the Ganga indicates. Where does love originate essentially? We have love in our hearts because we are part of 'His' creation, because He is love, because 'He' Sadguru Bapu dwells inside of us. We owe the love in us to Him, to the Sadguru Parmatma. The ganga signifies the connection that He has with us, His love that comes to us from Him. Our bhakti, is also essentially love and I believe that we owe our bhakti too, to our Sadguru's love for us. Now Megha is bathing Sai in the waters of the Ganga!!!!!!!!! He is 'drenching' completely the Sadguru Parmatma, or Shiva-Sai in his bhakti-bhagirathi!!!! The bhagirathi is nothing but the ganga is it not? I feel the remaining part of the story (where Sai's body is drenched but not His head) is consistent with this thought?
The theme that Sameerdada gives us also includes 'the significance of the references to Lord Shiva in the Shreesaisachcharit'. On the background of the aspects discussed above could my friends help me develop my thoughts?   
Message has been deleted

pallavi kanade

unread,
Aug 16, 2012, 8:03:13 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
श्रीराम दादा.. for opening of this forum ................ relating to given topic 1 story of dasganu which as follows:

हरी ॐ अध्याय ४ मध्ये दासगणुना प्रयाग स्नानासाठी जाण्याची इच्छा उत्पन होते व त्या करता ते बाबांकडे परवानगी घेण्याकरता जातात तेव्हा बाबा म्हणतात कशाला कुठे जायला हवे आणि जेव्हा दासगणु बाबांच्या चरणांवर मस्तक ठेवतात तेव्हा त्यांना गंगा जमुना वाहताना दिसते व त्यांच्या तोंडून साईंच्या अगाध शक्ती अघटीत लीला यांचे वर्णन निघते ज्यात साईच शिव आहेत साईच कृष्ण आहेत सर्व रूपे साईची आहेत हेच त्यांना जाणवते .सर्व रुपात साईच भूमीवर वावरत आहेत हे त्यांना कळून येते. 

अगाध शक्ती अघटीत लीला तव सद्गुरुराया | जडजीवते भावी ताराया तू नौका सदया||
वेणी माधव आपण होऊन प्रयाग पद केले | गंगा यमुना द्वय अन्गुष्टी  प्रवाह दाखविले ||
कमलोद्भव कमळावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती | तूची होऊनी साई समर्था  विचारसी भूवरती ||.......................

Yogesh Joshi

unread,
Aug 16, 2012, 8:07:50 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम 
३१ व्या अध्याव्यातिरिक्त  अजून काही संदर्भ आठवतात ह्या अनुषंगाने ते म्हणजे  शामाच्या सर्प दंश कथेमध्ये विरोबाच्या देवळाचा उल्लेख येतो. हे विरोबाचे देवूळ म्हणजेच शिर्डीतील ग्रामदैवत श्री शंकराचे स्थान. त्याच प्रमाणे श्री साई नाथांचे साई असे जे नामकरण झाले ते खंडोबाचे ठिकाण म्हणजेसुद्धा श्री शंकराचेच स्थान. तसेच पोथीमध्ये श्री हेमाडपंत उल्लेख करतात - 
दोन हाथ एक माथा
स्थैर्य श्रद्धा अनन्यता 
न लागे दुजे साई नाथा
एक कृतज्ञता ते व्हावी 
ह्या ओवीतून हेमाडपंत बिल्व पत्राचा उल्लेख करतात  जे देवास प्रिय असते आणि 
आपल्याला अर्पण करायचे असते श्री वाळुकेश्वर आणि त्रिविक्रमास .

ह्याशिवाय ११वा अध्याय म्हणजे तर साक्षात रुद्राध्याय --- 
हेमाडपंत म्हणतात --- घडेल येणे सगुण ध्यान | हे एकादश रुद्रावर्तन | पंच भूतांवर सत्ता प्रमाण | बाबांचे महिमान कळेल ||
..श्री राम 

Preeti Potnis

unread,
Aug 16, 2012, 8:37:52 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
Shreeram Dada

The opening of our Forum"Sai the Guiding spirit" is definitely going to introduce many ways in our journey towards "Sainath  "and thereby towards our Sadguru P.P.Bapu.........
The topics that will be discussed in this Forum will now make it all the more easy to appear in the "Panchasheel Exams...and thereby  will help each and every Shraddhavan to understand "Sainath" more easily ....and make our pathway of  Bhakti and Shraddha all the more Firm at the LOTUS FEET of our Sadguru Bapu

Shreeram ,Hari om

Suneeta Karande

unread,
Aug 16, 2012, 8:45:27 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम. रेशमावीरा, अगदी बरोबर. साई आणि शंकर वेगळे नाहीत हे हेमाडपंत अगदी पहिल्या अध्यायांत ही सांगतात "साईनाथ स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधीक्ष । सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच ।।१९।। माझा साई हाच माझ्यासाठी गणाधीक्ष ,सावित्रीश (ब्रम्हा), रमेश (विष्णु) आणि उमेश (शिव) आहे.

ह्याच विषयाशी निगडीत चर्चेदरम्यान, आशावीरा कुळ्कर्णीनी मला हे ध्यानात आणुन दिले की हेमाडपंत पुढे जाउन स्वत:च्या घराण्यात शिव-भक्तिची बीजे कशी रुजविली गेली होती ते सांगतात की -

आतां वंदूं सदाशिव। पितामह जो पुण्यप्रभाव । बदरीकेदारीं दिला ठाव । संसार वाव मानुनी।।३२।।

पुढे वंदूं निजपिता । सदा सदाशिव आराधिता। कंठी रुद्राक्ष धारण करिता। आराध्यदेवता शिव जया ।।३३।।

हेमाडपंताच्या घरी त्यांचेच आजोबा हे शिवभक्तीत तल्लीन होउन, संसारातुन अलिप्त होउन बदरीकेदारी ठाव देउन होते, एवढेच नव्हे तर हेमाड्पंताचे वडिलांचीही आराध्यदेवता शिवच होती, जे सदा सदाशिवाची आराधना करत आणि गळ्यात, कंठी रुद्राक्षही धारण करीत.

Badarinath Dham is considered as one of the most sacred centres of pilgrimage situated in the lofty Himalayan heights in the Garhwal hill tracks (Uttarakhand).

Lord Shiva manifested in the form of Jyotirlingam or the cosmic light. Kedarnath is highest among the

12 Jyotirlingas. This ancient and magnificient temple is located in the Rudra Himalaya range.

म्हणजेच आजोबांसाठी महाविष्णू आणि परम शिव हे गुरुतत्व एकच होते आणि तीच भक्ती वडिलांकडे प्रवाहित झाली होती.

मेघाच्याच कथेत पुढे बाबा त्याची मकरसंक्रातीच्या दिवशी शंकराला आवडते म्हणुन साईंना गंगोदकाने स्नान घालण्याची इच्छाही पुरवितात, पण त्यात ही स्वत:ची अंतरीची खुण पटवुनच ना - फक्त शिरावरच इवलेंसे जळ घालीं हे साईंचे बोल अमोघ ठरतात, जरी मेघा अत्यानंदाने, प्रेमाने अख्खा कलश

हर गंगे म्हणुन सबंध अंगावर ओततो... किती अगाध लीला आहे ना माझ्या साईमाउलीची !!! 

Message has been deleted

Srijaneeveera

unread,
Aug 16, 2012, 8:47:03 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om Dada,
Shree Ram for starting this forum. I am really looking forward to deepening my understanding of the Sai Satcharit through the discussions here, and hopefully a constant and regular discussion thus, would better enable all of us to imbibe the learnings from the Satcharit in our lives.

The main thing that comes to my mind when I think of the reference of Lord Shiva in the Sai Satcharit, is the story of, Megha, who was a great Shivbhakt and found Shiv in Sai Baba.

DeVesh DeSai

unread,
Aug 16, 2012, 10:42:20 AM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
 Dear Dada Hariom,
 
Keeti Sundar BLOG aahe.Very happy to receive this. My babas Gunsankirtan....by such loving shrddhawans. I am really enjoying. Hariom...
 
Mala watat...
The whole saicharitra is PARAM-SHIV and every flow of words is GANGA...which was made available ot us by "BHAGIRATH" prayas of shri Hemadpant....
Any "apavitrata" gets vanished SAI blesses everyone with UDI. = Pavitra...
I recall ...31 chapter of Sai_Charitra...
not only Human but SAI gave moksha ( upliftment from the khichad of sins, sorrows,wrong path to ....divine ishwari path...)
MY sadgure has "signed" on very page of this. Hence it is most dear page and addhya for me.
I recall...
SANTA DEKHATA DEH TYAGEEETEE | TAYA NAHI PUNRAVRUTI | TEECH SARVA PAPANCHI NISHKRUTI| uDDHAR GATI PAVALA || 150 ||
ANKHAGRA SANTAVLOKAN | kARITA KARITA JE DEH PATAN| TAYA KAI MHANAVE MARAN ||
NEEJ UDDHARAN TAI SACHE| PAHU JATA POORVAVIDHAAN MIRAVOO JATA VIDDHYA BHIMAAN |
PAVALA AVAMAAN HARIBHAKTA| TAYACHIYA SHAAAPA PASOOONEEE | LABHALA HEE KRUR YONI|
USHHAP YOGE LAGALAA CHARANI | ABHINAAV KARANI BHAKTAANCHI ||
WATE TYA ZAHALA USSHAP SAI DARSHANE JALALE PAAP |
TUTALE BANDHA SARALE TAAAP | ZAAALA AAAPAP UDDHAR ||
...then baba orders darveshi;s as
TYA TAKIYACHI PALIKADE |"SHANKARACHE" DEOOOL JEEKADE| NEOOON PURA TIKADE | NANDI NEETAK DYA GATI ||161 ||
 
HARI BHAKTAAN CHA "AVAMAAN"  TE...."NANDI" HARI BHAKAANCHA SANT-SANGU ....HA PRAVAAAS GHADWOOON AANANAARA HA PARAM-SHIV SAINAAATH...DAKHAWA DAKHAWA AISA KONI...!!!!!!
HEY SAINAATHA .....TUZHYA KADE EKACH PRARTHANA...
CHARAN -RAJAN ( hARI BHAKT ) TALEEEE DYAWA VISAWA....!
PIPA LOLAT HOTA MALEEEE TYASI UDDHARE LE ZAAANI !....BASS HECH DE !...
AAJ MAZHYA SAI-ANIRUDDHA NE "GURU KSHETRAM" GURU MANTRA....MAZHYA LING-DEHAWAAAR LIHOOON ..MAZHA KAYAM CHA UDDHAR KELA NAHI KA....!

जोहार मायबाप जोहार
तुमच्या महाराचा मी महार

बहु भुकेला झालो
तुमच्या उष्ट्यासाठी आलो

बहु केली आस
तुमच्या दासाचा मी दास

चोखा म्हणे पाटी
आणिली तुमच्या उष्ट्यासाठी

 

Suneeta Karande

unread,
Aug 16, 2012, 2:17:05 PM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम. ३० व्या अध्यायांत नाशिक येथील वणीच्या सप्तशृंगी देवीचे उपाध्ये काकाजीच्यां कथेत उल्लेख येतो तो त्र्य़ंबकेश्वराचा ! देवी दृष्टांतात बाबा (शिरडीच्या) भेटावयास सांगते काकाजींना , परंतु ते स्वत:ची बुद्धि चालवुन बाबा म्हणजे त्र्य़ंबकेश्वर असावे असा ग्रह करुन घेतात. आणि मग नाशिकला जाउन पोहचतात. त्र्यंबकेश्वर म्हणजे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक. येथील ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट म्हणजे एकाच ठिकाणी भगवान शिव, भगवान विष्णु, आणि भगवान ब्रह्मा ह्यांचे वदन (चेहरे) एकत्रित स्वरूपात आढळतात. 
१० दिवस रहातात, नित्य प्रात:स्नान करुन लिंगावर रुद्रावर्तन ही करतात, संततधार अभिषेक ही करतात. पण ना त्यांच्या मनाची दुश्चितता जात, ना चंचलता शमत. मला वाटते हाच तो खेळ परमशिव, सदाशिव आणि नित्यशिव तत्वाचा असावा.    

Aniketsinh Gupte

unread,
Aug 16, 2012, 2:24:08 PM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम,
साई पंथावरून चालण्यासाठी सुरवात करताना सर्वात पहिला अध्याय तो पण कुठला? तर त्या परम शिवाचा. ब्रम्हा-विष्णू-महेश ह्या हिंदू संस्क्रीतीतले अत्यंत वंदनीय असे हे तिन्ही देव. ज्यांना ह्या 
श्रुष्टी ची रचना करण्याची जबाबदारी देण्यात आली त्यात महेशचे म्हणजेच परम शिवाचे स्थान खूपच म्हत्वाचे.  
साई सत्चारित्र मध्ये परम शिवाचा उल्लेख आपणास मेघा च्या कथेतून येते. तसेच हेमाडपंत ह्यांनी अगदी पहिल्याच अध्याय मध्ये नोंद केलीच आहे.
पहिलच ओवी - गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: II १ II   तर पुढे ह्याच अध्याय मध्ये 
हे साईनाथ स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधीक्ष । सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच II १९ II म्हणजेच सर्व साई भक्तांना साई हेच गणाधीश तर साई हेच शिवाचे हि रूप. असे अनेक उल्लेख 
आपल्याला परम शिवाचे ह्या साई सत्चारितामध्ये येतात. 

पंचशील परीक्षा सुरवात झाली आणि साई-सत्चारित्र मधील कथा, भक्तांचे अनुभव ह्याचे आपल्या आजच्या आयुष्यातल्या घटनांशी जोडून घेण्याची सुरवात झाली. नाही. ती बापूंनी करून घेतली. जसा मेघा साठी शंकर काय आणि साई काय तर एकाच, तसेच आज आपल्याही आयुष्यात नेमका हेच घडत असते. अगदी आपल्या नकळत सुधा. साधी गोष्ट सांगायची तर आमच्या ऑफिस च्या दरवाझा मध्ये एक सुंदर सुबक श्री गणेशाची मूर्ती आहे. सकाळी कामाला जाताना गणेशा समोर जाताना आपोआप हाथ जोडले जातात आणि नकळतपणे अगदी सहज तोंडातून शब्द बाहेर पडतात - "हरी ओम बापू". हीच अवस्था साईचरणी लीन झालेल्या प्रत्येक भक्ताची आहे. मग तो मेघा सारखा शंकरचा उपासक असो किवा रामावर अपार प्रेम करणारी ती भजन-मंडळी मधली बाई असो. हीच प्रेमगंगा शिवाच्या जटातून निघून साई च्या चरणी प्रगत झाली आणि अखंड पणे वाहू लागली.

हरी ओम.

मागे उभा मंगेश I पुढे उभा मंगेश II 
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे II  

Harshada Kolte

unread,
Aug 16, 2012, 4:12:23 PM8/16/12
to saithegui...@googlegroups.com
 हरी ओम दादा,

श्री साई सत्चारीतातील ज्या ज्या ठिकाणी* बाबांचा क्रोध* दिसून येतो , तो जणू साई बाबांचा शिव अवतारच जाणवतो. शिव नेहमीच चुकीच्या गोष्टीना नाही म्हणायला शिकवतो, नाही म्हणायला
लावतो, नाही म्हणायला भाग पाडतो.  आणि त्याची सुरवात होते ती अगदी मंगलाचरणा पासून. जिथे साई आणि शिव  वेगळे नाहीत हे हेमाडपंत सांगतात. त्याचा बरोबर दळण्याच्या  देखाव्यात कॅअरा बायकांवर क्रोध धारण करून गावातील महामारीला वेशी बाहेर काढतात . जणू प्रत्येक भक्ताच्या मनातील वाईट विचारांचा भरडा, अर्थात चुकीच्या गोष्टीना सदैव वेशी बाहेर म्हणजेच आपल्या मना बाहेर टा कून  विश्वासाचा खुंटा घट्ट करतो. बाबांची क्रोध धारण करण्याची कृती ही कधी  भक्ताची आकृती तयार करण्यासाठी तर  कधी प्रारब्धाच्या विल्ख्यातुना त्याला सोडवण्यासाठी  होती. साई सत्चारीतातील  अकरावा अध्याय तर रुद्र अध्याय आहे. ह्याच अध्यायात  डॉक्टर पंदितांची त्रीपुंदाची  कथा ही आम्हाला  देव भावाचा भुकेला आहे  , अशा वेळी रुद्र अवतार धारण करणारा शिव कसा बोल्या भावाला भुलून भोलानाथ होतो ह्याची प्रचिती येते, तर आपल्या लाडक्या भक्ता साठी  त्याचे रक्षण करण्यासाठी  तो रुद्र अवतार घेतो. मेघा सारख्या शिव भक्ताच्या मनातील विकाल्पाच्या लहरी भस्म करतो, तर दुसर्या क्षणात त्याच्या कडून त्रिशूल काढून घेतात. एकदा तर पुण्याचा  रामदास नावाचा भक्त बाबांना शंकराची लिंग अर्पण करतो , तेव्हा बाबा मेघाला ती देतात आणि म्हणतात ," हा शंकर आला | सांभाळी याजला तू आता| " . , बाबांनी केलेला प्रत्येक तांडव हा भाक्तातीला अनुचित गोष्टींचा त्याग करायला लावणारा होता. मीना वैनी म्हणतात ,'' वैनी म्हणे तांडव नृत्ये दाखवी , हे आपुलीच खुण, असा असे हा माझा देव तांडवात करी तारण. " पण  हे अनुभवण्या करिता भक्त ही हवा तसाच. माधवराव देशपांडे सर्पदंश होऊन देखील , सरल बाबांकडे आले, पण  बाबा  ते  येताच बाबा
त्याना म्हणाले ' चढू नकोस भातुर्ध्या वर" , पण माधवराव मात्र तिथेच उभे राहिले. असे असंख्य भक्त ज्यांनी बाबांच्या क्रोधातच  आपले हित आहे हे जाणून त्यानी खर्या अर्थानी श्रद्धा आणि सबुरीने साई शंकराला अपेक्षीत असे बिल्वपत्र वाहिले.
दादा ह्या फोरम मुळे साईनाथांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक भक्ताचा खूप खूप हेवा वाटायला लागलाय, ह्या सगळ्यांशी नातं अधिका धिक दृढ करण्याची संधी मिळतीये, दादा खूप खूप श्रीराम.
 

niranjansinh

unread,
Aug 17, 2012, 12:33:56 AM8/17/12
to saithegui...@googlegroups.com
hariom

Moushami Prasade

unread,
Aug 17, 2012, 3:09:16 AM8/17/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम दादा, हा फोरम, आमच्यासाठी पुन्हा एकदा साईसत्‌चरितातील गोष्टींचा नव्याने अर्थ उलगडून दाखवणार आहे, यात शंकाच नाही. प. पू. बापूंनी सांगितल्याप्रमाणेच, जितक्या वेळा यातील गोष्टी वाचल्या जातील, त्या प्रत्येक वेळेस नवीन अर्थ उलगडला जाईल. आणि यातून आम्हालाच पुन्हा पुन्हा आनंद मिळणार आहे. श्रीराम....
मेघाच्या कथांमधून बाबांनी शंकराचे महात्म्य दाखवून दिले आहे. बाबा आणि शंकर वेगळे नाहीत हे भक्तांच्या मनावर ठसविले आहे. त्रिशूळ काढायला सांगणे किंवा मेघा बाबांनी दिलेला त्रिशूळ घेऊन काकासाहेब दिक्षितांना दाखवायला घेऊन येतो, पण याआधीच बाबांनी काकांना त्याच शिवलिंगाचे दर्शन दिलेले असते, यावरुन बाबांची म्हणजेच सद्‌गुरुंची सर्वव्यापकता ठळकपणे जाणवते.

Ajitsinh Padhye

unread,
Aug 17, 2012, 4:18:55 AM8/17/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ॐ दादा. हा फोरमचा उपक्रम सुरू करून तुम्ही आम्हा सर्वांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. श्रीसाईसच्चरिताबद्दल परमपूज्य सदगुरू बापू नेहमीच भरभरून बोलत असतात. दर गुरुवारी बापूंचे हिंदी प्रवचन हे श्रीसाईसच्चरितावरच आधारित असतं. शिवाय श्रीसाईसच्चरिताच्या ११व्या, २२व्या आणि ३३व्या अध्यायाची परमपूज्य सुचितदादांच्या आवाजातील ध्वनीफितही संस्थेने सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. साक्षात परमपूज्य नंडाईंनी ’ॐ साई श्रीसाई जय जय साईराम’ ही आरती लिहीली आहे आणि ती दर गुरुवारी हिंदी प्रवचनानंतर घेतली जाते. ह्या व्यतिरिक्त दर गुरुवारी उपासनेला घेतला जाणारा ’ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नम:’ हा जप, पंचशील परीक्षा, इ. अनेक उदाहरणांवरून दिसून येते की श्रीसाईनाथ आणि श्रीसाईसच्चरित्र हे सर्व श्रद्धावान बापू भक्तांच्या भक्तीमार्गावरील आधारस्तंभ आहेत...आणि म्हणूनच हा फोरम सर्वदृष्ट्या श्रद्धावानांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

पहिला विषय बघितल्यावर मला श्रीसाईसच्चरितातील शिवभक्त मेघाची एक गोष्ट आठवते. एकदा मकरसंक्रांतीच्या दिवशी मेघाला साईनाथांना गोदावरीच्या पाण्याने स्नान घालण्याची इच्छा होते. सुरुवातीला ह्यास राजी न होणारे साईनाथ मेघाची अढळ भक्ती व त्याने अतिशय तळमळीने आणि कष्टाने आणलेले गोदावरीचे पाणी पाहता त्यास संमती देतात. पण साईनाथ त्याला विनंती करतात की "मला फक्त माझ्या शिरावर थोडे पाणी घाल. माझ्या शिरावर ओतलेले पाणी हे पूर्ण स्नान घातल्यासमानच आहे." पण बाबास स्नान घालण्यास अतिशय उत्सुक असणारा मेघा बाबांचे शब्द विसरतो आणि उत्साहाच्या भरात अख्खी घागर बाबांच्या अंगावर पालथी घालतो. हे केल्यावर मात्र त्याच्या लक्षात येते की पूर्ण घागर पालथी करूनही बाबांचे फक्त शिरच तेवढे ओले झाले आहे आणि बाकी सर्व अवयव सुके ठाक आहेत. मेघाला बाबांची खूण पटते. इथे हेमाडपंतांनी लिहीलेली एक ओवी ही सर्वसमर्पक आहे, ’तुझ्या मनीं घालावें स्नान। जा घाल तुझ्या इच्छेसमान। त्यांतही माझ्या अंतरींची खूण। सहज जाण लाधसील॥’ हे सदगुरुतत्व असंच असतं. श्रद्धावानांची भोळीभाबडी इच्छा पुरविताना सुद्धा "त्याच्या (सदगुरुच्या) इच्छेनेच" सर्व गोष्टी घडतात ही गोम पटवून देतं. श्रीराम.

Subhu

unread,
Aug 17, 2012, 5:51:42 AM8/17/12
to saithegui...@googlegroups.com
For me, the biggest love which Saibaba welcomed is the marking of tripundra on his forehead by Dr. Pandit. The innocent bhakti of Dr. Pandit is beautifully written in Shri Satcharitra.  Dada has also narrated in his voice this beautiful episode in his CD. Surprisingly, the page autographed by Bapu in my book of Indira Kher is this very same page and the very same para where Baba says that his Guru is a Bramhin and different person, still Dr Pandit never felt any inhibitions and doubts in his mind while praying to me and wholeheartedly won me over.  I do not have the book right now to exactly quote the stanza.  But I clearly remember this is what is marked by Bapu with his signature on the top of the page. Shreeram

Mayur Sheetal

unread,
Aug 17, 2012, 6:48:08 AM8/17/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ॐ, श्रद्धावानांची भोळीभाबडी इच्छा पुरविताना सुद्धा "त्याच्या (सदगुरुच्या) इच्छेनेच" सर्व गोष्टी घडतात. हे सत्यवाकाय आहे , आपली इच्छा सुद्धा पुरवणार ते सुद्धा कोणताही नियम न मोड़ता. पण आम्ही मात्र नेहमी त्याचा  इच्छा विरुद्दा वागत असतो. तसेच " आधी न घेता नंदिचे दर्शन शंकर कैसा होइल प्रसन्न " ही ओवी सुद्धा साईनाथ रूपी शंकराची जाणीव करून देते. नंदी हा महादेव पर्यंत पोचन्याचा एक मुख्य मार्ग आहे. अपना सुद्धा हा समीर दादानी ओपन केलेल्या ब्लॉग चा काहीसा नंदी म्हणून एक मार्गदर्शक म्हणून उपयोग करून स्वताची अधत्मिक प्रगतीची एक एक पायरी अनिरुद्ध गति ने पुढे पुढे नेवुया . " हरी ॐ" 

Poorva Kulkarni

unread,
Aug 17, 2012, 1:39:39 PM8/17/12
to saithegui...@googlegroups.com
Hari om Harshadaveera!! Since megha's story is the first to come to our mind, I feel we should talk about it. The story is very obviously an indication of Megha's bhakti for Shiv but also for Sai. For him one is not different from the other. Could you elaborate on the points u mention? दिलेल्या विषयाच्या संदर्भाने विचार करता ही कथा अधिकच सुंदर वाटू लागली आहे. मेघासाठी साई आणि शिव एकच होते. मेघा आधीपासूनच शिवभक्त होते त्यांच्यासमोरचा "फ़ॉर्म" बदलला, त्यांचा भाव तोच होता. ते शिव ह्या भावानेच साईंची भक्ती करत होते. पण साई आणि शिव हे मेघासाठी एकच होते हे सांगणाऱ्या खूप सुंदर ओव्या आहेत. I am sure u must have read those verses (146-150). And the incident about the poojan of Lord Khandoba on the background of these verses explains it all, dont you think? 

Harshada Kolte

unread,
Aug 17, 2012, 3:21:22 PM8/17/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om Poorvaveera, I agree with you. Verses 146 - 150  from chapter 28 actually tell us that Sai and Shiv were same for Megha. But regarding Khandoba Poojan I think that inspite of Sai and Shiv the same...Megha feels bad as he could not offer Bilva patra to Lord Khandoba...कारण  जो पर्यंत मेघा शिर्डीत होता तेव्हा आधी सर्व ग्राम्देवाना पुजून मग दुपारी मशिदीत आरतीला जात असे. एके दिवशी हा नित्यक्रम चुकला कारण  खंडोबा मंदिराचे दारच उघडले नाही. जेव्हा मेघा बबन कडे जातात तेव्हा बाबा स्वत: हून मेघाला विचारतात  की तुझी पूजा सगळ्या देवांना पोचली मात्र एक राहिला . तेव्हा मेघा सांगतात दार उघडलेच नाही. तेव्हा बाबा म्हणतात दार आता उघडे आहे , मेघा लागलीच जाऊन खंडोबाची पूजा  करून येतात. इथे बाबांनी आपल्या भक्ताचा नित्यक्रम हि  चुकू दिला नाही  त्याच बरोबर ग्रामदेवताला वाहिलेले बिल्वपत्र हे शेवटी जाउन त्या परमात्म्यालाच  जाऊन पोचत ह्याची प्रचीती दिली.पण एरवी सहज उघडणारे मंदिराचे दार तेव्हाच न उघडता , बाबांनी सांगताच कस उघडत? हे खरोखरच विचार करयला लावणारा मुद्दा आहे.  पुर्वाविरा ह्यावर आपल्याला काय वाटत? हरी ओम.
.

Yogesh Joshi

unread,
Aug 17, 2012, 10:51:35 PM8/17/12
to saithegui...@googlegroups.com
अध्याय ४७ - सर्प बेडूक कथा 

तेथे एक महादेवाचे | मोडके देवूळ कधी काळाचे ||
तयाचिया जीर्णोद्धाराचे | आले सर्वांचे मनात || ७६ ||
--------------------------------------------------------------
ह्या कथेचे महत्व म्हणजे हे सर्व बोल बाबांच्या मुखातील आहेत , साई नाथ स्वत: ही कथा सांगताहेत आणि सदर कथेत श्री शंकराच्या देवळाच्या उल्लेखासह त्यासंबधी तेथील गुरव , मूळ जमीन मालक व इतरांच्या मनाचे कांगोरे उलगडून दाखवताना वैर - हत्या - ऋण कधी संपत नाही हे दिसून येते.
त्याच बरोबर ह्या ३ गोष्टींची इतिश्री करण्यासाठी सदगुरुची मध्यस्थी आवश्यक असते हे सुद्धा कळून येते. 

ह्या शिवाय हेमाडपंत ४थ्या अध्यायात शिर्डीचे महत्व सांगताना म्हणतात -

शिर्डीच आम्हा पंढरपूर | शिर्डीच जगन्नाथ द्वारकानगर ||
शिर्डेच गया कशी विश्वेशर | रामेश्वरही शिर्डीच || ५९ ||
शिर्डीच आम्हा बद्री केदार | शिर्डीच नाशिक त्र्यंबकेश्वर |
शिर्डीच उज्जयनी महाकालेश्वर | शिर्डीच महाबळेश्वर गोकर्ण || ६० ||

ह्यामध्ये साईनाथांचे हरी हर हे एकत्रित स्वरूप म्हणजेच पूर्ण सदगुरू तत्व स्पष्ट होते.



pramod shankar

unread,
Aug 18, 2012, 2:37:02 AM8/18/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम समीरदादा ,
हा फोरम सुरु केल्याबद्दल खूप खूप श्रीराम.
पंचशील परीक्षेच्या माध्यमातून बापूंनी आम्हाला साईसत्चारीत्राची  गोडी लावली.आणि हा आपण सुरु केलेला फोरम
म्हणजे दुधात साखरच जणू!
शंकरची भावी साईनाथ  | तोचि उमानाथ तयाचा |
मकर संक्रांति च्या दिवशी मेघाने साईशंकराला भक्तिरूपी गंगा स्नान घातलं आणि हा भोला शंकर त्याला प्रसन्न
झाला .
डॉक्टर पंडितांनी साई शिवाच्या भाळी त्रीपुंद्रू रेखाटल  आणि त्यांच्या मनीचा भाव जाणून साईनाथांनी ते प्रेमानी
स्वीकारलं .
म्हाळसापती खंडोबाचा म्हणजे शिवाचाच भक्त असल्याने त्याने साईशिवाला ओळखले आणि पाहता क्षणीच ' आओ साई '
म्हणून स्वागत केले .
या श्रेष्ठ भक्तांनी भाव-भक्तीच्या दोन नाण्यांनी सदगुरु साई शिवाला आपलंसं केलं .
'शं'  करोति इति शंकरः |
कल्याण करतो तो शंकर .
'शिव'  मधला ' ' हा गतीचा कारक आहे.अनिरुद्ध गतीने हा अनिरुद्ध शिव आपल्या लेकरांसाठी,त्यांच्या रक्षणासाठी
धावत येतो.याचा अनुभव आपण पावलो-पावली घेतच असतो.
'अनिरुद्ध रंगी रंगून जाणे' या सारखे भाग्य आम्हाला बापू-कृपेने मिळाले हे आमचे सौभाग्य..........
श्रीराम.......

Suneeta Karande

unread,
Aug 18, 2012, 2:44:23 AM8/18/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om, Harshadaveera. You have correctly pointed out that in one of Megha's story Baba asked him to retun back to Khandoba's temple and perform the pooja, before offereing pooja to Him(Sai). I think Baba wanted to show that whatever our daily routine things we do regularly may be of Bhakti or related to any thing, are  due to Sadguru's Krupa only. But we don't realize His Akaran Karunya behind it. Here , in this Megha's story , Megha is daily doing pooja at all temples of other GramDeities and finally used to offer pooja to Sainath. Since this has become daily practise, Megha did not realize that due to Sai's Krupa Megha was able to perform pooja of all deities without any difficulty or without any break. One day when Megha found door of Khandoba's temple was closed , he could not perform pooja. So he left that pooja. But BABA showed that his nityakarma also requires His ( Sadguru's ) blessings and without His intervention , no thing in life can be completed. only Sadguru , Parmatma can give us completion to our any act. He fulfills our every act with Trupti, Anand and satisfaction. 
Pooravaveera ,may I request you to guide me whether this is correct or not.    
Suneetaveera Karande 
Shreeram !!!!!!!

Suneeta Karande

unread,
Aug 18, 2012, 3:26:44 AM8/18/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम. ३० व्या अध्यायांत नाशिक येथील वणीच्या सप्तशृंगीच्या मंदिरातील काकाजी नामक उपाध्यबुवा उर्फ पुरोहितांची गोष्ट आपण वाचतो. त्यात मनाची चंचलता शमविण्यासाठी, दुश्र्चित्तता घालविण्यासाठी सप्तशृंगी देवी काकाजींना बाबांकडे जाण्यासाठी स्वप्नात दृष्टांत देते. परंतु, काक, स्वबुद्धीने त्र्यंबकेश्वरी जातात. अर्थात, त्र्यंबकेश्वरी जाउनही काकांना मनोल्लास लाभत नाही, ना त्यांना मनाला शांती लाभत, ना चित्ताची चंचलता जात. वास्तविक पहाता, त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगा पैकी एक आणि जेथे ब्रह्मा, विष्णु, महेश एकत्रित रुपाने विलसतात. मग असे का बरे होते? मला वाटते की ज्योतिर्लिंग असले तरी ते निर्गुण-निराकाराचे प्रतिकच ! वणीची आई हे मोठ्ठ्या आईचे रूपच , ते भक्ती मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी काकाजींना पाठवु इच्छिते शिरडीचे साईबाबा ह्यांच्याकडे म्हणजेच नित्य शिव रुपाकडे - आपल्याच परमात्मा ह्या कनिष्ठ पुत्राकडे - सगुण -साकारा कडे ! कारण आम्हां माणसांसाठी तोच शांतिदाता आहे, बनु शकतो. म्हणुनच, हेमाडपंत ११व्या अध्यायांत आधीच हे सगुण - साकाराच्या भक्तीचे मर्म उलगडुन दावितात- 
पूजक जेथवर साकारु । देहधारीच आवश्यक गुरु ।निराकारास निराकारु । हा निर्धार शास्त्राचा ।।१० ।।
न करितां सगुणाचे ध्याना । भक्तिभाव कदा प्रकटेना । आणि सप्रेम जंव भक्ति घडेना । कळी उमलेना मनाची ।।११ ।।   
मला वाटते की काकाजी जरी परमशिव स्वरुपाची आराधना , पूजाअर्चा रोज करीत होते तरी भक्ति मार्ग सुकर बनविण्यासाठी आवश्यक सदगुरुंचा परिस स्पर्श त्यांच्या जीवनाला झाला नव्हता आणि म्हणुनच ते साधण्यासाठीच साईनाथांकडेच त्यांना जावे लागते.
आपण हाच खेळ संत नामदेवांच्या आयुष्यातही पाहतो की साक्षात परब्रम्ह विठ्ठल त्यांच्याशी बोलयचे, त्यांच्याकडुन नैवेद्य भरवुन घ्यायचे तरीही संत मुक्ताई त्यांना कच्चे मडके म्हणते म्हणजेच सगुण साकार सदगुरु हाच मानवाचा समग्र जीवनविकास घडवु शकतो. हा परिस स्पर्श बापू कृपेने आपल्या जीवनी झाला आहे आणि समिर दादा ह्याची जाणिव आपल्याला सदैव करवुन देतात कि ह्याचे सदोदित, सदैव भान ठेवा कि एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता बापू ऐसा .
श्रीराम .
सुनीतावीरा करंडे    

pramod parkar

unread,
Aug 18, 2012, 3:49:05 AM8/18/12
to saithegui...@googlegroups.com

Keshav Narsikar

unread,
Aug 19, 2012, 12:17:32 PM8/19/12
to saithegui...@googlegroups.com
Pujya Sameerdada, Many polite regards.We all feel  very lucky to have such a blog and forum. Discussions guided by you in this forum will certainly take every Shraddhavan towards “Shreyas” or “Abhyuday”.
 Shraddhavans are posting their views and feelings with full enthusiasm and thoughtfulness.
As per given topic everyone has aptly pointed Medha story. I just want to add a few lines.
                               Medha means Buddhi in sanskrit .
                               Shiv means complete Purity,Shuddhi,Pavitrya.
This story at our Dehantargat level depicts efforts done by Buddhi to gain such Shuddhi.As Medha walks bare foot on hills and jungles to fetch Godajal or Bilva patra for Sadguru poojan ignores his physical stress ,Buddhi has to ignore physical suffering to bring about such purity  to his body,mind and intellect –‘TRISHUDDHI”.
           This makes BABA happy.
           This makes BAPU HAPPY.
BABA did not want to have a bath at that time.For the sincere efforts put by Medha  for the purity BABA bows down (HAARIS AALE) and accepts THE BATH,shows him HIS control over JALMAHABHUT-as a reward.(HE is always following bhaktas with HIS  DUDHACHI WATI !) 
Let us pay attention to verse 60 of Chapter 37.
पूर्ण श्रद्धा आणि धीर /  हेचि मूर्त उमा महेश्वर'/ 
मस्तकी नसता यात्कृपाकर /दिसे न विश्वंभर र्हिद्य्स्थ// 
And verse 53 of chapter 19 
धैर्य तीच गे बाई सबूरी /सांडू नको तिजला दूरी/ 
प डता केव्हाही ज्ड भारी /हीच परपारी नेईल// 
Here we learn Shraddha and Saburi to be Uma and Shankar. This Dhairya or Shiv with shraddha takes one out of Bhavsagar. Hence, Samarth Ramdas Swami says,   कृपाळुपणे अल्प धारिष्ट्या पाहे., illustrating necessity of shraddha and saburi for aatmaram darshan. 

Message has been deleted

Vishakha Joshi

unread,
Aug 20, 2012, 5:34:51 AM8/20/12
to saithegui...@googlegroups.com
।। हरि: ॐ।।

पूज्य समीरदादा, ह्या फोरमच्या निमित्ताने आपण आम्हा श्रद्धावानांना श्रीसाईसच्चरिताचा पुन्हा एकदा आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करायची संधी दिल्याबद्दल आपले आभार.
’साईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व’ असा ह्या फोरमचा पहिला विषय आहे. सगळ्यात आधी इथे आठवण होते, ती श्रीसाईसच्चरितातल्या 11व्या अध्यायाची- श्रीसाईमहिमावर्णन नावाचा हा अध्याय "रुद्राध्याय' म्हणून ओळखला जातो.
"शिव' ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. शिव- शुभ, मांगलिक, सौभाग्यशाली (संदर्भ- संस्कृत-हिन्दी कोश- वा. शि. आपटे). इथे शिव शब्दाचा आणखी एक अर्थ प्रकर्षाने आठवतो, जो परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी म्हणजेच बापूंनी अनेक वेळा प्रवचनांमधून सांगितलेला आहे- "शिवं ज्ञानोपदेष्टारं'.
"ज्ञानोपदेष्टारं' म्हणजे ज्ञानाचा उपदेश करणारा. जो ज्ञानाचा उपदेश करतो, तो अज्ञानाचा निरास म्हणजे नाश करतोच हे वेगळं सांगायलाच नको. सद्‌गुरु परमात्मा साईनाथ "दिग्दर्शक गुरु' आहेत. दिग्दर्शक म्हणजे उचित दिशा दाखविणारे आणि उचित दिशा फक्त तोच दाखवू शकतो, जो  अज्ञानाचा नाश करतो आणि ज्ञान देतो.
।।हरि: ॐ ।।

Samirsinh Dattopadhye

unread,
Aug 21, 2012, 8:48:35 AM8/21/12
to saithegui...@googlegroups.com
साईसच्चरित्रातील शिवाचे संदर्भ, शिवाच्या गोष्टी आणि त्याचे महत्त्व हा विषय देऊन फोरमला सुरवात केली आणि खरच सगळ्यांनीच या डिस्कशनमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. शिवाचे अनेक संदर्भ प्रत्येकाने दिले. मेघा हा प्रखर शिवभक्त आहे व त्याच्याकरिता साईनाथ शिवस्वरुप आहेत.

शिव हा लय करणारा आहे आणि अकराव्या अध्यायामध्ये आपण साईनाथांचा क्रोध भक्तांच्या कु प्रारब्धाचा लय करताना आपण बघतो. विशाखावीरा जोशी, महेश नाईक यांनी अकराव्या अध्याय "रुद्र अध्याय" असल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर योगेश जोशी यांनी नमूद केलेली अध्याय ४७ मधली सर्प-बेडूक यांची पुनरजन्माची कथा.. यातही शिव आहे. सदर कथेमध्ये शिवाचा उल्लेख दोन तीन ओव्यांमध्ये नाही तर संपूर्ण कथा ही शिव आणि शिवाचे कार्य - लय करण्याचे कार्य यावर फिरते. श्रद्धावानाचे ऋण-वैर-हत्या यांचा लय करण्यासाठी एका जन्मात दिलेले वचन साई सदगुरु, साई सदाशिव त्या श्रद्धावानाच्या दुसर्‍या जन्मातही पाळतो. मेघाच्या कथे इतकाच स्पष्ट साई-शिवाचा संबंध या कथेत दिसून येतो. इथेच महादेवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संदर्भ येतो.

योगेश जोशी, अनिकेत गुप्ते, हर्षदावीरा कोलते, पुर्वावीरा, सुनीता कारंडे, सुहास डोंगरे, पल्ल्लवी कानडे यांनी खुप छान संदर्भ दिले आहेत. असाच प्रयास पुढे सुरु रहावा.

साईसच्चरितामध्ये मेघाच्या गोष्टी येतात. त्याच्या मनातील संकल्प आणि विकल्प त्या गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळतात.

त्याचा भक्ती मार्गावरचा प्रवास आपल्याला बघायला मिळतो. ह्या त्याचा प्रवास आपल्याला अनेक गोष्टी शिकवू शकतो. त्याचा मृत्यू ही आपल्याला अनेक गोष्टी शिकवितो. आपल्या ह्या "साई - द गायडींग स्पिरिट" मध्ये मेघा एक निष्ठावान साई भक्त आणि त्याचा भक्तिमार्गावरील प्रवास आता आपण फोरममध्ये डिस्कशनला घेऊया. 

Suneeta Karande

unread,
Aug 21, 2012, 5:56:02 PM8/21/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम. दादा ,आपण आम्हांला खूपच मौलिक मार्गदर्शन केले आहेत. आता पर्यंत अध्याय ४७ मधली कथा ही फक्त सर्प-बेडूक यांची पुनर्जन्माची कथा आहे असेच वाटत होते.आपण कथेत शिव आहे. सदर कथेमध्ये शिवाचा उल्लेख दोन तीन ओव्यांमध्ये नाही तर संपूर्ण कथा ही शिव आणि शिवाचे कार्य - लय करण्याचे कार्य यावर फिरते, हे सांगुन नवीन दिशा दाखविलीत. एका वेगळ्या दृष्टीकोनातुन आता ह्या कथेचाही अभ्यास करता येईल. 
सध्या आम्हांला discussion साठी दिलेल्या Topic वर लक्ष केद्रींत करु या. 
हेमाडपंत २८व्या अध्यायाच्या सुरुवातीला  बाबा कसे भक्तांच्या स्वप्नी जाउन त्यांना दर्शन देत हे सांगताना मार्मिकपणे हे ही रहस्य उलगडुन दावतात की बाबा हे सर्व करताना त्या , त्या भक्तांची अनेक सांकडी, संकटे टाळीत आणि त्यांना विवीध प्रकारे प्रबोधन करवुन निजपदी रमवित, "त्याच्या" चरणांची गोडी लावत. ह्या कथांची अपूर्वाई काही न्यारीच आहे, ह्या कथा ऐकणारा ही आणि गाणारा दोघेही धन्यच होतात. लालाजी उर्फ लखमीचंद, मेघा आणि बर्हाणपूरस्थ बाई ह्या ३ चिडयांच्या गोष्टी येतात , त्यात हेमाडपंत मोठ्या खुबीने सांगतात की दोघे समरसती ठायींचे ठायीं , आणि सौख्य तेही कसे तर अक्ष्य्य लाधले. मला वाटते की लखमीचंद आणि मेघा हे ते दोघे असावेत, जे जीवनाच्या अंतीम समयापर्य़ंत साईचरणी रमले होते आणि अक्षय्य सौख्य ही पावले होते. 
बाबांच्या स्वमुखीचे अमोघ बोलच दावतात त्यांची अजब लीला - " माझा माणूस देशावर |  असो कां हजारों कोस दूर |  आणीन जैसे चिडीचें पोर |  बांधून दोर पायांस |  
वास्तविक पहातां, मेघा हा गुजराती ब्राम्हण शिरडीला अवचितां म्हणजे अचानकपणे सेवेसाठी आला, जो सुरुवातीला रावबहादूर साठे ह्यांच्या पदरी चाकरी करीत होता , त्याच्या शुद्ध सेवेने ओतप्रोत भरलेल्या अंत:रंगामुळे त्याला शिरडीला बाबांच्या चरणांशी पायरी लाधली. (मेघाचे क्रियमाण)
शिरडीस ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे -  हे बाबांचे पहिले वचनच आहे, पण बापूंनी सांगितले तसे पहाता- शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी हे तर साईंचे आश्वासनदर्शक गुरुवाक्य !!! मग मेघा हा साईनाथांना आधीच शरण आला होता का? असा प्रश्न पडतो. पण वस्तुस्थिती पहाता तसे घडलेले आढळत नाही. हेमाडपंतच लगेच त्याचेही उत्तर देतात लगेच पुढ्च्याच ओवीत की ज्याला भक्तिप्रेमाची आवड आहे, त्याचे कोड, मनीची इच्छा स्वयं श्रीहरी , साक्षात परमात्मा पुरवितो. आता साई म्हणजे साक्षात ईश्वर , परमात्मा, श्रीहरी , त्याच्यांसवे ऋणानुबंध असल्यामुळे (मागील जन्मांचे - जे मेघाला माहित ही नव्हते , पण साईनाथ जाणत होते ) मेघा चिडीच्या पोराप्रमाणे खेचला जातो, थेट शिरडीत, साईंच्या चरणीं !!! 
रावबहादूर साठे हे खेडा जिल्ह्याचे प्रांत अधिकारी होते. त्यांनाही मेघा अवचित भेटल्यावर, त्यांनी त्याला स्वत:च्या घरी शिवालयाच्या नित्य पूजेसाठी तैनात केला. पुढे आपण आधीच १८व्या अध्यायांत वाचतो की परिस्थितीने गांजुन साठे शिरडीला उद्विग्न मन शांत करण्यासाठी साईनाथांची महती ऐकुन येतात. साठेंचे भाग्य उदयाला येते आणि त्यांना साई महाराज भेटतात व त्यांच्या चरणीं त्यंचे चित्त रममाण होते. येथे साठेंच्या घरी शिवालयात नित्य पूजा करणारा मेघा - त्याचे संचित मोठे असल्याने  परमार्थाच्या मार्गी लागतो, साठ्यांच्या प्रयत्नांनी ! साठेंनी मेघाची परवशता पाहुन ,त्याची कर्मभ्रष्टता पाहुन त्याला गायत्री उपदेश केला आणि त्याचा सन्मार्गावर प्रवेश करवुन दिला. साठ्यांच्या घरी सेवा करताना मेघाचा त्यांच्या ठायी आदर भाव वाढला आणि तो साठ्यांनाच गुरु मानुन त्यांच्या वर त्याचा लोभ जडला.असेच एकदा सहज बोलतांना साठे मेघाला निजगुरुंचा- साईंचा महिमा सांगताना , साई गुरुमाउलीवरील प्रेमात ओथंबुन जाउन स्व मनीची इच्छा सांगतात ती मह्ण्जे साईंना गंगोदकाने स्नान घालण्याची आणि त्याच कारणासाठी ते मुख्यत्वे मेघाला शिरडीस पाठवतात. आणि साठे मेघाला हे ही स्पष्टपणे सांगतात की तुझी अनन्य सेवा पाहुन माझ्या जीवाला वाटते की तुला ही सदगुरुंची भेट मिळावी आणि त्यांचे ठायी तुझा भाव जडावा, जेणे करुन तुझ्या ह्या देहाचे सार्थक होईल, या जन्माचे परम कल्याण होईल. साठेंना मेघा गुरुच मानीत होता म्हणुन साठे त्याला कळ्कळीने सांगतात की जा, जा काया, वाचा, मनाने सदगुरुंचे पाय धर. आता सुरु होतो तो मेघाच्या मनातला शंका- कुशंकाचा खेळ - मेघा साठेंना बाबांची जात विचारतो, वस्तुत: साठे ह्या विकल्पात स्वत: न पडले असल्यामुळे त्यांना त्याची जरुरी, गरज भासत नाही, आणि त्यामुळेच ते त्या फंदातही पडत नाही. एका गुरुचरित्राच्या पाठानंतर तत्काल साईंची कृपा संपादन करण्या एवढी साठेंची मनोभूमिका तयार असते म्हणुनच..
हेमाडपंत २३व्या अध्यायांत स्पष्ट च सांगतात की 
असतां शिष्याची भूमिका तयार |  सदगुरुसिध्दीसी नाहीं उशीर |  ते तों सदैव अनुग्रह्तत्पर |  एकाचि पायावर उभे ||१९४ | | 
येथे बापूरायानेच श्रीविद्यामकरंद गोपीनाथ शास्त्री पाध्येजींची गोष्ट आठवुन दिली की लोक वा मित्र काही म्हणोत बाबा मुसलमान आहेत, बाबा फकीर आहेत, बाबा भिक्षा मागतात, बाबा दक्षिणा (पैसे) मागतात. पण गोपीनाथ शास्त्री पाध्येंच्या मनात कोठेही विकल्पाला वाव च नव्हता मुळी , काहीही होवो ते माझे सदगुरु आहेत. काय अनन्य निष्ठा आणि दृढ , अढ्ळ विश्वास !!!!! 
तर पुढे पाहू या - 
परंतु बाबा मशिदींत बसत असल्यामुळे त्यांना काही लोक अविंध (मुसलमान) म्हणत. (विंध म्हणजे कान ज्याचे टोचले आहेत तो हिंदु आणि नाही टोचले म्हणजे तो मुसलमान असे त्या काळी वर्गीकरण होत असे, असे वाचले आहे). आणी येथेच मेघाचे मन आणखी कुशंकेने गढुळ होते , त्याच्या मनीं दुश्चित्तता येते की यवना सारखा दुसरा नीच नाहे, आणि मग त्या अशा माणसाची गुरुता कशी काय स्विकारायची बरे? म्हणतात ना मन चिंती ते वैरी ना चिंती - 
हनुमान स्तोत्रात ही आपण म्हणतो की आला गेला मनोगती |  मनासी ताकिले मागे गतीसी तुळणा नसे |   
परत मेघा पडला साठेंच्या गुरु शब्दात अडकुन - जाणार नाही म्हणुन ही सांगु शकत नव्हता कारण एका मनात साठे - म्हणजे त्याचे स्वत:चे गुरु रागावतील ही भीती होती, तर दुसरे मन सांगत होते हो म्हणुन जावे तर त्याने आपलीच दुर्गती होईल. अशा द्विधा मनाच्या अवस्थेत , कात्रीत सापडलेल्या मेघाला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती. त्याचे स्वत:चे मन झोपाळ्याप्रमाणे दोलायमान म्हणजेच अस्थिर झाले होते. मती चालत नव्हती आणि तो चिंतेने ग्रासुन गेला होता. परंतु साठ्यांचा फार आग्रह झाल्यामुळे साईंच्या दर्शनाचा निर्धार* करुन मेघा शिरडीस येतो. पण तो मशिदीच्या अंगणात येतांच , पायरी चढूं लागतांच बाबांनी लीला सुरु केली, उग्र स्वरुप धारण केलें , हातात पाषाण (दगड) घेउन म्हनाले खबरदार पायरींवर पाउल ठेविलें , हे स्थान तर यवनाने वसविले आहे, मेघा पहिल्यांदाच शिरडीत पाउल ताकत असला आणि त्याच्या दृष्टीने बाबांची आणि त्याची ओळख नसली तरी बाबा बोलतात तूं तर उंच वर्ण असलेला ब्राह्मण आहे आणि मी तर नीचांचा नीच यवन आहे, तुला माझा विटाळ होईल, माघारा जा परतोन. पण प्रत्यक्षात मात्र साईंनी जरी कातावलेपणाचें रुप धारण करुन प्रत्यक्ष प्रळयरुद्राचे स्वरुप दाखविले असले तरी त्यांच्या अंतरी दयेचा पूरच वहात होता मेघासाठी. तो राग वरवरचा होता. पहाणार्याचा थरकांप उडावा असे बाबा चिडले होते , त्यामुळे मेघा चळ्चळ कापूं लागला. मनांतुन तो आश्चर्यचकित झाला कि मी कोठे दूर खेडा जिल्ह्यात आणि बाबा कोठे अहमदनगरमध्ये, तरी ह्यांना माझ्या विकल्य- कल्पांनी भरलेले अंतर कसे काय कळले? त्याचे हे दृश्य मला बाबांनी दाखविले. बाबा जो, जो मारण्यासाठी धावत तसा तसा मेघाचें धैर्य खचत होते, आणि तो घबरुन त्याचे एकेक पाउल मागे मागे पडत होतेआणि तो पुढे बाबां जवळ जायला धजत नव्हता, घाबरत होता. तसाच काही दिवस तो राहिला, जमेल ती सेवा करीत गेला पण त्याचा दृढ विश्वास न पतल्यामुळे तो परत घरी गेला आणि ज्वरानें अंथरुणावर खिळला. पण बाबांच्या अकारण कारुण्याने, ज्वरामध्ये ही त्याची मनाची आर्तता बाबांसाठी वाढली, बाबांचा ध्यास लागला मनाला आणि तो परतोनि शिर्डीस आला.
ज्वर दर्शवितो प्रज्ञापराधात रोग:.   
बापू गुरुवाक्याबद्द्ल सांगताना म्हणाले होते कि तो साई एवढा प्रेमळ आहे कि तुम्ही शिरडीत आलांत ना तेव्हांच तुमचे शारण्य असो वा नसो, तो ते पहिले पाउलही शारण्यच मानुन घेतो. मेघाच्या बाबतींत हीच सत्यता निदर्शनास येते. 
विशाखावीरांनी शिवाचा जो ज्ञानाचा उपदेश करणारा, अज्ञानाचा निरास म्हणजेच नाश करणारा, उचित दिशा दाखवणारा अन्योन्य संबंध प्रतिपादन केला ,तेच येथे दिसते की साईनाथ मेधाच्या अज्ञानाचा नाश करतात आनि त्याला उचित दिशाच दाखवतात.  त्यावरुन अजुन एका पहिल्या अध्यायातील ओवीची आठवण होते ती म्हणजे -
शिवशक्ती पुरुषप्रकृती | प्राणगती दीप्दीप्ती | ही शुद्धब्रह्मचैतन्यविकृती | एकीं कल्पिती द्वैतता ||६७ ||
प.पू.बापूंनी ०९.०६.२०११ रोजी केलेल्या हिंदी प्रवचनात ह्याचे स्पष्टीकरण देताना संगितले होते की भगवान शिव गतिस्वरुप आहे तर अन्न्पूर्णा शिवा ही विचारस्वरुप आहे. शिव हा धैर्य आहे तर उमा ही श्रद्धा आहे. शिव हा निर्णय आहे तर पार्वती ही क्रियारुप आहे. शिव हा निश्चय आहे तर पार्वती ही कृतीस्वरुप आहे. शिव हा प्राण आहे तर उमा ही गती आहे. शिव हा स्थैर्य आहे तर शिवा ही गती आहे. परंतु ह्या दोघांना एकत्र ठेवण्याचे काम सदगुरु स्वरुपच करते. ही त्या सदगुरुंची लीला असते. सदगुरुला आपला सर्वात जवळचा bestest  friend  माना. शिवशक्ती पाहिजे  म्हणजेच श्रद्धा-सबुरी पाहिजे तर त्यासाठी सदगुरुंसारखा अन्य सखा , मित्र  दुजा कोणी नाही.  श्रद्धा-सबुरीच्या बळासंगेच प्रारब्धाशी लढण्यासाठी अस्त्र, शस्त्र,कवच , ताकद देणारा असा हा एकमेवा अद्वितीय म्हणजे फक्त आणि फक्त एकमेव सदगुरुच होय. 
* मेघाच्या गोष्टीत आपण पहातो की मेघाकडे साईंकडे जाण्याचा निर्धार आहे , निश्चय पण आहे तरी  
उमा म्हणजे भक्तीचे क्रियारुप वा कृतीरुप येत नाही. कारण ह्या दोघांना एकत्र ठेवण्याचे काम सदगुरु स्वरुपच करते. ही त्या सदगुरुंची लीला असते.आणि त्याच सदगुरुंना म्हणजेच साईंना स्विकारण्यास मेधाचे मन तयार नसते.       
हेमाडपंतानी श्रीसाईसच्चरित ह्या अपौरुषेय ग्रंथात हा सदगुरु साईबाबांचा अगाध महिमा वर्णिला आणि त्याच साई-अनिरुद्धाने तो आम्हांला शिकविला. अहोभाग्य आमचे !!!!!!! 
समीरदादा , तुम्ही दिलेल्या ह्या discussion forum मुळे पुन्हा पुन्हा नव्याने श्रीसाईसच्चरिताची अवीट गोडी चाखता येते, विस्मरणाच्या संदुकीत जाउ शकणार्या बापूंच्या बोलाची परत ,परत आठवण जागृत होते, आम्ही तुमचे अगदी अनंत वॆळा ॠणी आहोत म्हणणे ही चुकीचेच आहे त्यापेक्षा एवढेच म्हणते - 
ज्यांचेनि पावलों परमार्थातें | तेचि कीं खरे आप्त भ्राते | सोयरे नाहींत तयापरतें | ऐसें निजचित्तें मानीं मी || १४२||
केवढा तयांचा उपकार | करुं नेणें मी प्रत्युपकार | म्हणोनि केवळ जोडुनि कर | चरणीं हे शिर ठेवितों || १४३ ||
श्रीराम . 
सुनीतावीरा करंडे.         


                                                                  
Message has been deleted
Message has been deleted

KIRAN MADANE

unread,
Aug 22, 2012, 11:18:29 AM8/22/12
to saithegui...@googlegroups.com

मेघास अत्यंत आनंद झाला | माझा शंकर सचैल न्हाणिला | घडा रिता जै खाली ठेविला | पाहू लागला नवल तो ||१८०|| अध्याय २८

असा हं मेघा साईनाथा चरणी आपला घडा रिता करतो आणि साईंच्या चरणी ठेवतो. भरा काय भरायचा आहे ते त्यात. मग जे काय होणार ते बाबांच्या इच्छेनेच होणार.

बापू म्हणतात तसं , "मला तुमचा पाप द्या".  बापू सुद्धा आपल्याला आपला घडा रिता करण्यास सांगतात, जर घडा EMPTY केला नाही तर त्यात चांगला भरणार कसा.

कूच पाने के लीये कूच खोना जरुरी है.  मग पाप देवून चांगल तेच बापू देणार आहे. १०८ % कारण बापू फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच देतो

Aniketsinh Gupte

unread,
Aug 22, 2012, 3:02:11 PM8/22/12
to saithegui...@googlegroups.com
hari om and shree ram dada for starting such a wonderful forum. Just two topics old and we are witnessing the great treasures of Sai Satcharitra being unfold in front of us. During Panchsheel exams we have read Sai Satcharitra, understood the stories and interpreted the meaning as per his/her own knowledge. But with this forum in place now we can learn more and more. And more we learn about Sai and the life of his bhaktas, the thirst increases more and more. 

Sandeepsinh Mahajan - very aptly the life of Megha has been fit into the Panchsheel practical aboce. Shreeram for the same.

About Megha, i would just like to say that all things happen for a reason. And the reason is our Sadguru. The ties of every shraddhavan has been tied to his Sadguru for all the lifecycles. So how could Megha stay away from Baba? It was HIS LEELA that Megha came in contact with Sathe, a Sai devotee himself. But as Bapu says, " The path of Bhakti is not for weak-hearted" So initially there are doubts in Megha's mind about Sai staying in the masjid but eventually those are also cleared and Megha becomes an ardent devotee of Sai. The entire life of Megha then was devoted to Sai. Megha's story teaches us a very strong lesson. "Apna Takiya nahi chodna...", yes, once we put faith in our Sadguru we must never ever leave his path. "His leelas are beyond the human imagination". so very true. We just can't imagine to what lengths our Bapu goes to plan, to give us the best for us. This is pure love, which cannot be matched by any human. During his discourse on "Om Mantray Namah" on gurukshetram mantra, Bapu has clearly told that once you are admitted into Gurukshetram, it is very difficult for anyone to leave it and go. What holds us back? It is HIS love. Same as was of Sai for Megha... 

Suneeta Karande

unread,
Aug 23, 2012, 12:43:37 AM8/23/12
to saithegui...@googlegroups.com
Hari om. Suhassinh, you are absolutely right. a common man always makes mistake of putting Sadgurutatvaa in the frame which he wants, whereas He is beyond all types of frames. That's why when in P.P. Samirdada conducted a Shibir of Gunsamkirtan about P. P. Bapu, he insisted not to fit Bapu in frame of only Sadguru or God. He told us that for many people Bapu is best friend, for someone Bapu is best philosopher, for some Bapu is good sportsman, for some Bapu is good gymnasium, for some Bapu is teacher very good guide, for some Bapu is Marshal Art teacher and so on. Similarly in Shreesaisaccharit we also see Sainath has been viewed in different forms for differnet bhaktas.  For Ramopasak Doctor Sai gave darshan in Ram Roopa, for Madrasi woman Sai became her Neelotpan , dhanurdhari Ram, but sometimes Baba has given darshan in Vitthal roopa to 90 years old Gaulibua as well as Dasganu during Vitthal-nam Saptah. How Baba will apeear to some one , that totally depends on one's  BHAV. Hence great Saint Eknath Maharaj told BHAV TOCHI DEV. I think that's why Veda also described Him as NETI NETI - He is not like this , He is not like this. He can bear any Roopa.
As you said BAPU asked us to visualize Bhakta's acharit i.e his behaviour , his saburi and his  firm , unshakable trust and wholehearted Bhakti, in Medha's story , we find that his devotion for SHIVA i.e. Shankar was unshakable. When he listened about Sainath from his owner Ravbahadur Sathe , his mind was not in dual  situation. That time he was confused about Baba's religion , as he came to know that Baba stays in mosque and people consider Him as Yavan (muslim). But he did not think about leaving Shiva Shankar and accepting Sai as his God. later on when he realized his mistake of taking doubts about Baba, his bhakti was blossomed. He started looking Shiva-shanakar in SAI himself. In begining ,originally Megha was intense bhakta of Lord Shiva. But afterwards Sainath Himself become Shiva for him. The ovi clearly describes Megha's unweavering faith at Sai's feet -
मेघा आधींच शंकरभक्त । होतां साईपदी अनुरक्त । शंकरचि भावी साईनाथ । तोच उमानाथ तयाचा।।१४७।।
करीं मेघा अहर्निश । साईशंकर- नामघोष । बुद्धिही तदाकार अशेष । चित्त किल्मिष्विरहित ।। १४८।।
We must learn Megha's unbreakable trust and wholehearted bhakti for Sai. 
Shreeram!!!!!!!!!!

shantanu natu

unread,
Aug 23, 2012, 5:56:15 AM8/23/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम
सर्वप्रथम मेघा ह्या भक्ताच्या एका छोट्याश्या कथेचा reference मला द्यावासा वाटतो :
" जो पर्यंत मेघा शिर्डीत होता तेव्हा आधी सर्व ग्राम देवतांना पुजून मग दुपारी मशिदीत आरतीला जात असे.
एके दिवशी हा नित्यक्रम चुकला कारण  खंडोबा मंदिराचे दारच उघडले नाही. जेव्हा मेघा साई बाबांकडे जातो तेव्हा बाबा स्वत: हून मेघाला खंडोबाच्या देवळात जाऊन पूजा करून यायला सांगतात"
ह्या कथेमध्ये मेघा चा नित्यक्रम बाबा पूर्ण करून घेतात,

मला आठवतं आहे कि बापू पण एकदा प्रवचनात म्हणाले होते कि आपण आपल्या उपसानांचा नित्यक्रम कधीही चुकवू नये,
आपण नित्य नेमाने जे स्तोत्र म्हणतो, जी उपासना करतो, ती उपासना रोजच्या रोज केल्याने त्याचा effect आणि त्याचा आपल्यावरचा प्रभाव हळू हळू तयार होत असतो,

आपण तो नित्य क्रम जर एखादे दिवशी चुकवला, तर त्या उपासनेचा तो प्रभाव क्षीण होतो किंवा  नाहीसा  होतो .
साई चरित्रामध्ये आपण बघतो कि साई बाबा मेघा सारख्या चांगल्या भक्ताचा  नित्य नेम चुकायला  देत  नाहीत.
मेघाच्या  गोष्टीमधून  व  परमपूज्य बापूंच्या  शिकवणीमधून आपण ह्यातून हेच शिकायला हवे कि जी उपासना आपण करत आहोत किंवा आपल्याला जी उपासना दादांनी दिली आहे त्याचा नित्य (रोजचा) क्रम आपण चुकवता कामा नये.
हरी ओम

Madhuriveera Parkar

unread,
Aug 23, 2012, 6:03:16 AM8/23/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम पूज्य समीरदादा,
हा फोरम सुरु झाल्या पासून उठता बसता एवढंच नव्हे तर झोपायला गेले तरी शिवाची गोष्ट,मेघाची गोष्ट
यातच मन रमून गेलय,रंगून गेलय. मेघाची गोष्ट तर आपण प्रत्यक्षात जगतोय,अनुभवतोय ..... असच वाटतंय ------

                                                       मेघाच्या मनातील विकल्प
साठ्यांनी मेघाला साईनाथांकडे जायला सांगितले , तेव्हा मेघा पुसे तयाची जात .....
अविन्ध हा शब्द कानी    पडता|जाहली मेघाची दुष्चीतता |
ब्राह्मण असलेल्या मेघाच्या मनात विकल्प आला की ,अविन्ध असलेल्या साई नाथांकडे कसे जायचे ?
पण तरीही साठे रागावतील म्हणून दर्शनाचा निर्धार केला .....आणि मेघा शिर्डीला गेला.

माझ्याही मनात असाच विकल्प सुरवातीला येतो.कारण मनः संकल्प विकल्पातमका:|
पण बापूच त्यातून बाहेर काढतात.या चीडीच्या पायाला दोर लावून मेघाला साई माउलीने जवळ ओढले.
विकल्प दूर झाल्यावर  साईच  प्रत्यक्ष शंकर भावित |आणि साईच त्याचा गिरिजारमण |
अशी त्याची अवस्था झाली.
मेघाला बाबांचा ध्यास लागला आणि मेघा साई नाथांचा अनन्य भक्त झाला.....
मेघाच्या या प्रवासातून  श्रद्धावानाकडे कोणते गुण असणे आवश्यक आहे हे  हेमाड पंतांनी दाखवून दिले आहे.

                          मेघाचे गुण जे श्रद्धावानांसाठी आवश्यक आहेत ..............
नामस्मरण -
करी मेघा अहर्निश  |
साईशंकर नामघोष ||
मेघा सतत  नामसंकीर्तन करत आहे.साई शंकराचे रूप न्याहाळत, रुपसंकीर्तन सुद्धा करत आहे .
प पूज्य बापूंनी सांगितल्याप्रमाणे नामसंकीर्तन ,रुपसंकीर्तन,आणि गुणसंकीर्तन माझ्यासाठी महत्वाचे आहे.
  भक्ती
नवविधा भक्तीतली अर्चन भक्ती आणि पादसंवाहन भक्ती तो करत आहे.
३  सेवा
साठ्यांचे पदरी त्याने शिवाची सेवा केली आहे.पुढे शिर्डीत राहून साई बाबांची सेवा सुद्धा केली आहे.
४   श्रद्धा
साई नाथच माझा शंकर आहे अशी त्याची दृढ  श्रद्धा आहे .
५  सबुरी
साई नाथांनी स्नानाला परवानगी,आज्ञा देईपर्यंत मेघाने सबुरी ठेवलीच.
६ दृढ  निश्चय
साई शंकराला स्नान घालायचेच हा मेघाचा दृढ निश्चय आहे.
७  शिस्त  नियमितपणा
 दुपारची आरती करी तो नित | मेघाकडे शिस्त आहे,नियमितपणा आहे.
 ही शिस्त अधायात्मात फार महत्वाची आहे बापू आपल्याला रोज आन्हिक करायला सांगतात.
८  प्रेम
बाबांचे अपार प्रेम आहे.प्रेमे वंदावी बाबांची गादी आणि
शिरी ओतता प्रेमा दाटला |यावरून देवावरचे प्रेम कळते.
९  प्रयास
प्रयास , मेहनत करण्याची वृत्ती आहे अनवाणी निघालाय बेल आणायला.तेही आठ कोस दूर.. त्याच त्याला काहीच वाटत नाहीये.
१०  देवाला काय आवडते
देवाला काय आवडते ते त्याला देवाला अर्पण करायचे आहे..शंकराला आवडणारा बेल अर्पण करतोय. गंगोदके शंकर हरिखे |
म्हणून साई शंकराला गंगास्नान घालतोय...मला काय आवडतं यापेक्षा माझ्या देवाला काय आवडतं, हे महत्वाचं.
११  आज्ञापालन
आधी स्नानाची परवानगी बाबांकडून घेतल्यावर , आज्ञा घेतल्यावर मगच पाणी आणायला तो गेला आहे.
आज्ञापालन हा गुण सगळ्यात महत्त्वाचा.
१२  पादतीर्थ सेवन
 मेघा बाबांचं पादतीर्थ सेवन करतो आहे.गुरु चरण तीर्थापुढे अमृतही व्यर्थ....
गुरुचरण तीर्थाच महत्व मेघांनी जाणलंय.
१३   चित्तशुद्धी
शुद्धान्तार्याम तयाचे....सततच्या नामस्मरणाने चित्त शुद्ध झालं आहे.बुद्धीही तदाकार आहेच.चित्त किल्मिष रहित झालं आहे.
१४  गलीतभिमान  झालाय ....
अहंकार नाहीसा होणे , अहं चा सोहम होणे महत्वाचे. माझ्या सद्गुरूंच्या चरणी लीन होणे  महत्वाचे.

हे बापुराया , मेघाचा प्रवास जसा तू सफल संपूर्ण करून घेतलास ,तसा तुझ्या साऱ्या लेकरांचा प्रवास तुझ्या कृपेने तू पूर्ण करून घ्यावास हीच तुझ्या चरणी विनीत प्रार्थना ...
श्रीराम.....
 माधुरीवीरा पारकर
Message has been deleted

Suneeta Karande

unread,
Aug 23, 2012, 4:16:41 PM8/23/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om. Dada.
Madhuriveera has described our situation in exact words. Usually during Panchsheel exam. times while writing exam. papes we used to involve deeply in ShreeSaisaccharit . But since our forum started , it keeps us busy throughout the day and night , thinking about topic you have given us for discussion. Suhassinh also agreed on this opinion that because of forum , while sleeping also cycle of thoughts about SADGURUTATVA, BAPU and SAINATH continues. 
Lots of Shreeram to Dada!!!!!!!!!!!!
Now Megha is such an ardent devotee that his life guides us from various aspects. 
Sandeepsinh Mahajan has described Megha's journey from Kheda to Shirdi and his change of mind about Sai very nicely. He also clearly picurised the UGAM, PRAPAT and MUKH in Megha's life based on our practical approach of Samagra Jeevan Vikas  taught by P.P. Bapu. 
Anjanaveera Mahajan wrote about  funeral of Megha performed by Saibaba. Here ,we see that Baba showed His Bhaktasakhyatva. By Sai's grace , Megha was totally engrossed in Sai's bhakti. In 11th Adhyay i.e Rudradhyay of Shreesaisaccharit , Hemandpant told us GURUMAHIMA in very apt words.-
पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंती पूर्ण निष्काम । पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ।।१५२।।
We find Megha's death was not a normal death of common man. He achieved his ultimate aim of Mukti. There are 4 types of Mukti - Sayujya, sameepya, salokata and 4th one I don't remember exactly but may be salokya (described in Adhyay 50, Ovi 25) . But During his stay in Shirdi, Megha was blessed by Sai and he got opportunity of Baba's SAMEEPYA. 
Thus Baba satisfied Megha's ultimate desire , finally He made him completely Nishkam ( a situation where ther is no wish /will has to be fulfilled ramined in one's mind ). Ultimately Megha achieved SAAYUJYADHAM at his benevolent SAIBABA's lotus feet and thus he gained AKHANDA SAIRAM.    

Bapu told us that when Megha was expired , some people started gossips that there was nobody of Megha, no mother -father, no family , no relatives, no friends. So who was there who would cry for him , on his death. But once you surrender at His feet, He is yours and yours and take care of not only your Yogkshema, but of every thing. When Baba heard about these words , He proved by His aacharit that it was not possible that there was none for Medha. Baba Himself went to smashan taking all bhaktas with Him , He showered flowers on Megha. Not only this , but Baba cried for Megha and He performed rituals of funeral. Here Baba showed" MAYAMANUSHYAM HARI "  quality as described by Saint Tulsidas in SUNDARKAND. 
P.P. Bapu also showed us this during funerl of our beloved Meenavaini. Bapu walked on the roads with Pujya Meenavaini , He also went to Smashan bhoomi and also took all of us. Bapu also cried  alot and finally Bapu performed funeral rituals first time before Chetansinh. 
This shows that Parmatma when manifests in SAGUN form of a human being, He follows all rules laid by His mother Motthi Aai (Aadimata Mahishasurmardini)and  Dattgurubappa. He also expressed deep grief . He cries like a common man on death of His near ones and dear ones. 
Hemandpant described it in Ovi -
मेघा जेव्हां पावला पंचत्व । पहा तैं उत्तरविधानमहत्त्व । आणीक बाबांचे भक्तसख्यत्व । मेघा तो कृत्कृत्य आधींच ।। १२०।। (अध्याय ३१) 
होतां मेघाचे उत्तरविधान । सवें घेउन भक्त समस्त । स्मशानयात्रेस गेले ग्रामस्थ । बाबाही गेले स्मशानाप्रत । पुष्पें वर्षत मेघावर ।। १२१।।
होतां मेघाचे उत्तरविधान । बाबाही झाले साश्रुलोचन । मायानुवर्ती मानवासमान । शोकनिर्विण्ण 
मानस ।।१२२।।
प्रेमें बाबांनीं निजकरें । प्रेत आच्छदिलें सुमननिकरें  शोकही करुनि करुणास्वरें। 
मग ते माघारे परतले ।।१२३।। 
Actually SAINATH means Sakshat Ishwar, PARABRAHMA. This sadgurutattva is beyond limits of MAYA . But Baba was is human body form i.e. saguna , sakar.So here He cried , His mind was fully engrossed in sorrow on his beloved bhakta Megha's death. Here He showed us to express our sorrow, our feelings for our beloved ones. He never said that I am not affected by Maya. This is what MAYAMANUSHYAM HARI quality, that He follows human's rules. 
These things are very important for us. 
P.P. Bapu also asks in SHREEMADPURUSHARTHA GRANTHRAJ - to help other shraddhavans when death occurs in their family by all means. We must participate in funeral as well as all other types of helping hands must be forwarded for their moral support. BAPU also promised that when Shraddhavan walks with dead body of some shraddhavan to smashan bhoomi chanting RAMNAM, BAPU Himself also chants His Guru's nam with that shraddhavan.    
Thus  SAI and BAPU are no longer different for us. Meenavaini told this TRUTH to understand BAPU one must thoroughly study Shreesaisaccharit. 
Shreeram to my ACHINTYADANI GURUMAULI BAPURAYA !!!!!!!!!!!              

pallavi kanade

unread,
Aug 24, 2012, 7:11:07 AM8/24/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम  & Shri ram bcoz once again we are studying by your new topic which is teaches us the flow of ShriGurubhakti

मेघा या साईशिव भक्ताच्या आयुष्यात बाबा स्वतः प्रेमाने बदल घडवून आणताना दिसतात सगळ्यात सुंदर म्हणजे जेव्हा त्यांना स्वप्नात दृष्टांत कि त्रिशूल काढ म्हणून होतो त्या वेळी त्याच गोष्टी बद्दल बाबांकडून त्याचे सुंदर वर्णन कळते कि
तयास बाबांचे ऐका उत्तर | " माझिया प्रवेशा नलगे दार | नाही मज आकार ना विस्तार |  वसे निरंतर सर्वत्र  ||
टाकुनिया मजवरी  भार | मीनाला जो मज साचार | तयाचे सर्व शरीरव्यापार | मी सूत्रधार चालवी " ||
बाबा त्यांना इतक्या सोप्या सहज शब्दात समजावून सांगतात कि मी भक्तांच्या मागे पुढे चोहीकडे असतो. त्यांच्या भक्ताच्या बाबतीतली प्रत्येक माहिती सर्वात आधी त्यांना असते. 

खरोखर आज असंख्य श्रद्धावानंचे अनुभव कथन ऐकताना हीच गोष्ट वारंवार ध्यानात येते कि हि माउली कधी कुठेही भक्तांसाठी धावत येते ज्याप्रकारे मेघाचे आयुष्य घडवले तसेच आजही हि माउली सर्व श्रद्धावानांचे आयुष्य घडवत आहे.        

Yogesh Joshi

unread,
Aug 24, 2012, 2:21:45 PM8/24/12
to saithegui...@googlegroups.com

हरी ओम 

श्री मेघा यांच्या साई भक्ती बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे तरीपण हा थोडासा प्रयास करतो. मेघाच्या कथेत ते श्री साई नाथाना स्नान घालण्यास खूप पायपीट करून गोदावरीचे जल आणतात तसेच जंगलात हिंडून बिल्व पत्रे गोळा करतात. ह्या गोष्टींचा संदर्भ ११ वा अध्यायमधील हाजी फाळके यांची कथा आणि २१ वा अध्याय मधील नाणे घाट चढण्याच्या कथेत आढळतो. हाजींची भक्ती उधृत होते ३ प्रश्नांनंतर, त्यापैकी एक होता बिकट वाट चालून येणार काय ? तर नाणे घाट चढल्याशिवाय शिर्डीचे दर्शन नाही म्हणजे येथे ही आधी खडतर प्रवास करून मग भक्तीमार्ग दृढ करता येतो याचीच शिकवण दिली जाते. मेघा ही बिकट वाट आपल्या लाडक्या दैवतासाठी नित्य नेमाने आणि अगदी आनंदाने पार पाडत असे. म्हणजे तो पहिली ते दहावीपर्यंत परीक्षा एका झटक्यात आधीच पास झालेला होता आता प्रश्न होता तो त्याच्या पुढील परीक्षेचा आणि त्या अनुषंगाने त्याने साठ्यांचा निश्चय जो होता बाबाना गांगोदाकाने स्नान घालण्याचा तो पूर्ण करण्याचा निर्धार केला. ह्यावेळी त्यास एका यवनावर हे गंगोदक अर्पण करायचे आहे हे माहित झाले होते तरी साठेंना तो गुरुस्थानी मानत असल्याने तो ह्या गोष्टीस तयार झाला म्हणजेच गुरूचा शब्द हेच प्रमाण ह्याची शिकवण येथे दिसून येते. जेव्हा साई नाथांनी कोप धारण केला तेव्हा तो घाबरला म्हणजे त्याला आपल्यातील उणीव काय आहे ह्याची जाण होती आणि ती उणीव होती जो आपल्या गुरूचा सदगुरु आहे त्यास आपण आपला पूर्ण विश्वास अर्पण करू शकलेलो नाही. आणि भक्ती मार्गात म्हत्वाचे काय तर एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरू ऐसा आणि जेव्हा ही गोष्ट मेघा कडून साध्य झाली तेव्हा तो साई नाथांचा परम भक्त बनू शकला. ही त्याची भक्ती पराकोटीला पोहोचली जेव्हा त्याने साई आणि शिव स्वरूप ह्याचे अभिन्नत्व मान्य करून श्री साई नाथाना स्नान घालण्यास परवानगी मागितली. येथे त्याच्या मनातील "का?" हे प्रश्न चिन्ह कायमचे संपले. कालच प.पू. बापुंनी ह्या "का" बद्दल सांगितले कि कोणता का विचारायचा आणि कोणता नाही विचारायचा आणि कोणता "का" मनातसुद्धा नाही आणायचा. ह्या तीनही पातळीवर मेघा येथे उत्तीर्ण होतो. जेव्हा प्रश्न आणि उत्तर ह्यातील भेदच संपून जातो तेव्हा भक्ती करण्यासाठी शरीराची गरजच उरत नाही आणि मेघाच्या मृत्यू नंतरसुद्धा तो निरंतर साई भक्तीत रममाण होवून जातो. 


Reply all
Reply to author
Forward
Message has been deleted
This conversation is locked
You cannot reply and perform actions on locked conversations.
0 new messages