The Importance of Having Complete Faith in the Sadguru ("एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा")

1,426 views
Skip to first unread message

Samirsinh Dattopadhye

unread,
Oct 7, 2012, 8:34:02 AM10/7/12
to saithegui...@googlegroups.com
Bapu, in his discourses (both Marathi and Hindi) on January 9, 2012 had mentioned that this year - 2012 - is the year in which we must reaffirm and reinforce our faith in our Sadguru, for this is what will protect us in the troubled times to come. He recited the verse (verse 74 of Chapter 19) from the Sai Satcharita “…Ek vishwaas asaava purta, karta harta Guru aisaa ("एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा").” What is required is steadfast faith in the Guru; for it is only He who is the Doer, the Protector and the Destroyer of all obstacles that come in our lives and in our path of bhakti

Suneeta Karande

unread,
Oct 9, 2012, 1:08:18 AM10/9/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम दादा. 
ह्या वेळेला तुम्ही discussion साठी दिलेला विषय खुपच सुंदर आहे. The Importance of Having Complete Faith in the Sadguru ("एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा") सदगुरु चरणांशी संपूर्ण श्रद्धा , अनन्य भावाचे, एकनिष्ठ होण्याचे महत्त्व. परम पूज्य बापूंनी ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रथमच आम्हां सर्व श्रद्धावानांना एक अत्यंत ऊचित संकल्प दिला -"एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा". सदगुरुतत्वालाच आपल्या लेकरांचा मनापासून कळवळा असतो, त्यांच्या कल्याणाची चिंता असते,आणि तोच खरा एकमेव आपल्याला कधीही दगा न देणारा, सहज, अगदी अनंत जन्मांमध्येही प्रत्येक पावलावर साथ देणारा एकमेवाद्वितीय असा आधार असतो. पण हे मनाला पटण्यासाठी सदगुरु चरणी दृढ श्रद्धा, विश्वास असावा लागतो. श्रीसाईसच्चरितातील २३व्या अध्यायातील साईंच्या परम भक्त काका दीक्षितांच्या मुखीचे हे बोल त्याचीच साक्ष पटवितात - 
बाबा आपुलें अमृतवचन।धर्मशासन ते आम्हां।। १७०।।
आम्ही नेणूं दुजा धर्म।आम्हां नाहीं लाज शरम।। गुरुवचनपालन हेंच वर्म। हाच आगम आम्हांतें।।१७१ ।।    
किती खरें आहेत काकांचे हे बोल, आज बापूंमुळेच खरा धर्म आम्हांला कळला, नको त्या पूर्वापार चुकीच्या रुढी, अवास्तव कल्पना, खोट्या अंधश्रद्धा ह्यांच्या दलदलीतून आज बापूंनी बाहेर काढले आणि खरा धर्म शिकविला, मनावर रुजविला. सामान्य जीव तर अध्यात्माच्या पासून दूर , दूर पळतो  ते अवजड शब्दांच्या, कठीण संकल्पनानी हे जाणुन बापूंनी किती सोप्या,सहज भाषेत अध्यात्म शिकविले. वेद, उपनिषदे, ग्रंथ , पुराणे हे न वाचताही आज केवळ बापूंच्याच प्रवचनामुळे ह्या अगणित गोष्टींचे भांडार आम्हांसाठी मोकळे झाले, मग आमच्या लाडक्या बापूंचेच शब्द, वचन हेच आमच्यासाठी धर्मशासन आणि बापूंचे बोल हाच आमचा वेद झाला , तर त्यात नवल ते कोणते? 
आम्ही बापूंच्या सर्व वचनांना तंतोतंत नाहे पाळू शकत , कोठेतरी चुका ह्या घडतात , तरी बापूच आम्हां लेकरांचा टवाळूपणा ही आईच्या मायेने पोटात घालून आम्हांला बोट धरुन पुढे नेतात. 
म्हणुनच आम्हां तो एकचि ठावें । आपुले नाम नित्य आठवावें ।  स्वरुप नयनीं साठवावें । हे लक्षात घेउन प्रत्येक भक्ताने त्याच्या चरणांशी स्वत:ला घट्ट बांधण्याचा प्रयास करावा , शेवटी बांधून ठेवणाराही तोच आहे आणि त्याने शब्द दिला आहे की मी तुम्हांला कधीच टाकणार नाही. म्हणजे आता विश्वास ठेवणे हेच आणि तोही अढळ विश्वास हे आपलेच काम आहे, ही श्रद्धा , हा विश्वास बापूराया तुझ्या चरणी दृढ होवो हीच तुझ्या चरणी प्रार्थना ! 
दादा , तुम्ही बापूंच्या आवाजातले recording  उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनंत श्रीराम ! बापूंचे बोल ऐकले की मनाला नव्याने उभारी मिळते, जोश संचारतो की माझा देव , माझा सदगुरु बापू माझ्या प्रत्येक पावलावर  माझ्या बरोबर उभा आहेच, आणि हे बापूंचे बोलच तो एक विश्वास अजुन अजुन दृढ आणि दृढ करतात की YES  , काही झाले अख्खे जग जरी विरोधात गेले तरी माझा आणि फक्त माझा बापूच माझ्याबरोबर सदैव होता, आहे आणि असणारच आहे, ह्याच नव्हे तर प्रत्येक जन्मातच!!!!     
श्रीराम.    

sunil bahl

unread,
Oct 9, 2012, 5:35:34 AM10/9/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om Dada: Many thanks for this very apt topic for discussion. If you consider it, the Sadguru is a phenomenon in the lives of those who are
fortunate. To  my mind, there are many verses in the Sai Satcharit which provide answers to the dimension of the importance of having
faith in the Sadguru. I  humbly quote some verses as below:

 

(1)      Only when the merit of crores of births is accumulated, will one meet the saints and it is only then that one enjoys the happiness of the company of the saints, which fosters devotion.

 

(2)      Only after laborious efforts do rare privileges of guru-naam, guru’s holy company, his grace and the sweetened milk washed off his feet, guru-mantra and the opportunity to stay in gurus abode come your way.

 

(3)         Grace of God is a matter of previously accumulated merit and it leads to the meeting with the Sadguru, which, in turn, brings the disciple a blissful joy of Self-rejoicing.

 

(4)         Guru’s company is the pure water of the Ganges, which purifies others, washing away all their impurities.

 

(5)      The guru will give you the bliss of the Brahman to drink.

 

(6)        Guru is the guide in worldly life‑ a guide in pilgrimages and vows, in renunciation, dharma and adharma and detachment. He is the expounder of the Vedas and Shrutis.

 

(7)        Know that there are eight places of God's worship, such as the idol, the sacrificial altar and others. But among them, guru is the greatest of all.

 

 (8)       When you surrender at the feet of the Sadguru in act, speech and thought, then dharma, artha, kama and moksha (the four ends of human life) come into the hands automatically.

 

(9)        What does the devotee do by his own efforts? It is the Sadguru who facilitates whatever he does. For the devotee does not know his own difficulties and it is the guru who helps him overcome them, though he does not know it.

 

(10)      If compared to the Kalpatru, that wishing tree of Indra’s heaven satisfies only what the devotee desires but Gururaya gives to him the most unimaginable state of Nirvikalpa or Superconsciousness

 

(11)      Kamadhenu, the wish fulfilling cow instantly gives whatever is wished for but far greater than her is the Guru, the Divine cow, the giver of the inconceivable

 

(12)      Chintamani will give you what you asked for; Kalpatru will grant the wishes of your heart; Kamadhenu produces the thing you desire. But it is only Guru, the Mother, who gives you what you had never even thought of.

 

(13)      With that same feeling, when the devotees surrender whole-heartedly to the Sadgurunath, seeing their steadfast devotion, he also gives his power to the devotees.

 

(14)    Only when the guru bestows favour will the worldly life be happy. Things will happen which would never have happened normally and in half a second He will take you to the shore beyond

 

(15)    The Sadguru is a unique father different from the biological father. The father makes his son worthy of worldly pleasures, while the guru gives his disciple the joys, not only of this world but even of the next.

 

(16)      Hence surrender your Being at the feet of Sai, offering up to Him all the material objects of worldly life. He will then bless you. However, such desire will not arise without Gods’ grace. But when God is pleased to bestow His grace, the fondness, the desire to listen will arise at once.

 

(17)      When you surrender at the feet of the Sadguru in act, speech and thought, then dharma, artha, kama and moksha (the four ends of human life) come into the hands automatically.

 

(18)      If there is no implicit faith and courage and patience, spiritual progress cannot be made in the least.

 

(19)      Hence the great significance of the Guru. He is the very image of Brahma, Hari, and Vishnu. Blessed is he in all the three worlds who realises this important position of the Guru.

 

Blessed are we to have our beloved Bapu with us!

 

Hari Om

 

Sunilsinh Bahl

Mohan A

unread,
Oct 9, 2012, 2:18:08 PM10/9/12
to saithegui...@googlegroups.com

 

 Hari Om!

It must be noted that of all the faculties a human being is endowed with, the ability to think is unique and powerful.  It can be harnessed to lead an individual to any path, either right or wrong. But acquiring control over the mind and channelizing it on the right course is an arduous task, but certainly not impossible, when we have the blessings and guidance of our Sadguru.   It is important that one is aware of the power of one’s mind and seek consciously and diligently to refine it.    It is easy for us, the average human being, to slide into depths of ignorance, feel depressed and wretched, thinking of one’s limitations, faults and incompetence.   Repeatedly giving vent to such thoughts can easily lead us into believing that what we think is true.  Such a miserable state is equal to being in hell.   Here comes the importance of having complete faith in the Sadguru.

Not everyone is destined to be in the blissful company of a Sadguru.  It requires or perhaps is the result of having plenty of punyakarma in your account from several past births.   Once in the proximity of the Sadguru, the transformation is quite gradual but certain.  But how does that transformation take place?  I think, based on my experience, the transformation takes place as under:

  1. By making you part of a prayer group and thus bringing you in the company of shradhavans, He initiates you into bhakti marg. This is how He commences the “pulling” process towards Him. The upasana, paduka poojan, slokas, chanting, namasamkirtan, etc. clears the path and cleanses you internally. Gradually, there grows a bond which you realize, is the bond between our Sadguru and His shradhavans.
  2. Feels protected. Once in the Sadguru’s fold, He becomes our mother turtle who constantly graces us with His eternal Glances! The invincible protection! The strong belief and faith that when the Mother’s protective glances are over and around us, what harm can befall on us?
  3. Tend to do only sakarmas. Over time, you realize that nothing can escape from His Omniscience and Omnipotence. The feeling that you are under constant watch and the fact that you are the window of your Sadguru through which the world assesses and evaluates your action make you restrained, and tend to do nothing that tarnishes His images and teachings.
  4. He is the doer – You now realize that you are only an instrument. He is the string puller and whatever is coming in your way is His wishes. The “I” is removed, and its all now thanks to “Shree Ram”!
  5. Everything happens for a reason – Nothing occurs by chance in life! It is destined and predetermined. Everyone who walks in your life is for a purpose, for a reason and one must treat them with respect and love.
  6. Disappointment fades away – because He gives you what is appropriate for you. We want anything and everything and the wants are never ending and never get satisfied either. Yet, we do not know what is appropriate for us. It is He who knows it all. Being in the company of Sadguru, we come to know that what is not good for you will not come to you! The Sadguru filters everything as does the ozone layer, giving us only the harmless ‘RAYS’ (Requirement Assessed Yet Sufficient).
  7. Teaches that you are the cause and effect. You are your own destiny maker by the law of karma. Does it not control our actions, thoughts and deeds?
  8. Experience is created. Everyone experiences His grace, compassion and love in one way or the other. At times, it could be in the form of a surprise visit by someone whom you thought of, a phone call by someone whom you just remembered, an unsolicited support or someone just appearing from nowhere to offer you a helping hand to save you from a life threatening disaster, and so on..
  9. He foresees calamities, bad times, turbulent days and makes you prepare for it. By then your faith on Him is paramount and 108%!
  10. Full surrender – You are now ready to surrender at His lotus feet. 
  11. Miracles do happen – And when there is full surrender, miracles do happen.

 

Hari Om to all!

Mohan A

Muscat

 

Suneeta Karande

unread,
Oct 11, 2012, 1:08:05 AM10/11/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम. सुनीलसिंह आणि मोहनसिंह अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे कि श्रीसाईसच्चरितातील भक्तांचे आचरित हेच आपल्याला शिकविते की एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा.
हेमाडपंतांनी अनेक ओव्यांमधूनच नव्हे तर संपूर्ण श्रीसाईसच्चरितातूनच ही अंतरीची खूण पटविली आहे - गुरुचि सत्य माता-पिता| अनेकां जन्मींचा पाता त्राता | तोची हरिहर आणि विधाता | कर्ता- करविता तो एक || 
घडो तुझे नामस्मरण | व्हावी न इतर आठवण | यावे मनासी निश्चलपण | चंचलपण नातळो|| 
बरी वाईट क्रिया सारी |  ईश्वर तेथींचा सूत्रधारी|  तूचि तारी तोचि मारी |  कार्यकारी तो 
एक | | 
आपण भीमाजी पाटीलांच्या कथेत पाहातो की नानासाहेब चांदोरकर किती अनन्य भावाने भीमाजींना पत्राद्वारे कळवितात कि माझ्या साईनाथांचे पाय घट्ट धरा त्याशिवाय तरणोपाय नाही. 
उत्तरी कळविती एकचि उपाय |  साईबाबांचे धरावे पाय |  हाचि केवळ तरणोपाय |  बाप माय तो एक | | तीच कनवाळू सर्वांची आई |  हांकेसरशी धावत येई |  कळवळूनि कडिये घेई |  जाणे सोई लेकरांची | |  क्षयरोगाची कथा काय |  महारोग दर्शनें जाय |  शंका ना धरी तिळप्राय |  घट्ट पाय धरीं जा | | जो जें मागे त्यास तें देई |  हें ब्रीद ज्याने बांधिले पायी |  म्हणोनि म्हणतों करीं गा घाई |  दर्शन घेई साईचें | | भयामाजीं मोठें भय |  मरणापरिस दुजें काय | घट्ट धरीं जा साईंचे पाय | करील निर्भय तो एक | |    
तुम्ही सर्व उपाय करुन थकला असाल पण हा एकमेव उपाय म्हणजेच सदगुरुंना शरण जाणे हे करुनच पहा. नाना ही ग्वाही सुद्धा देतात कि माझ्या गुरुंच्या नुसत्या दर्शनानेच महारोगही बरे होतात, तर ही व्याधी काय आहे? काय जबरदस्त आत्मविश्वास आहे नानांचा आपल्या साईंवर !!!!! म्हणजेच आपला आपल्या सदगुरुंवर एवढा अनन्य विश्वास असायला हवा की एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता बापू (गुरु )ऐसा .
माझाही असाच दृढ विश्वास माझ्या बापूंवर असायला हवा की माझा कर्ता, करविता, हर्ता , सर्व काही हा एकच आहे, दुजा कोणीच ह्यासम नाही आणि एवढेच नव्हे तर हे माझ्या मनाला, बुद्धीला एकदा पटले की मला इतर लोकांना ते ठामपणे पटवुन देता आले पाहिजे, हेच तर त्याचे खरे गुणसंकिर्तन आहे. 
येथे समीरदादांनी सांगितलेली औरंगाबादची गोष्ट प्रकर्षाने आठवली की बापूंचे औरंगाबादला प्रवचन झाले आणि त्याला खूपच चांगल्या प्रमाणावर भक्तांचा प्रतिसाद मिळाला. दादांनी येथे एक गोष्ट नमूद केली होती की ह्या एवढ्या मोठ्या कार्याचा आढावा घेताना दादांच्या लक्षात आली कि ही अवाढव्य जागा प्रवचनासाठी मिळवण्यासाठी बापूंचे केले गेलेले गुणसंकिर्तन कामी आले आणि ते ही कसे तर त्या मैदानाच्या मालकांकडे न्हाव्याचे (केस कापणारा) काम करणार्‍या माणसाने त्यांना सांगितले बघा तर आमच्या बापूंना प्रवचनाला तुमची मैदानाची जागा देउन , तुमचे किती भले होईल? किती साधे शब्द , पण त्याचा बापूंच्या चरणी असलेला भोळा अनन्य भावच येथे काम करुन गेला.   
म्हणूनच आद्यपिपाही आपल्याला त्यांच्या अनेक अभंगातून हेच सत्य प्रतिपादीत करतात - 
नको येरझार्‍या बहू मुर्तीपाशी | अनिरुद्ध एकचि भार वाहे ||    
बांध माझ्या मना घट्ट तुझ्या पदा | सर्व ये त्यागतां ना तुला ना तुला |
धरलेले सोडु नको रे | जोडलेले तोडु नको रे | पकडलेले टाकु नको रे | तळमळ माझी जाणुन घे रे || 
सर्व जगी आम्हां बापुचा आधार | नाही मोडणार संकटात | प्रारब्ध आणेल जरी कळिकाळ | आम्ही जरी नेणु तरी प्रतिपाळ || पिपा म्हणे टाळण्या प्रारब्ध | बापू म्हणा || 
नानांच्याच मुलीच्या प्रसुतीसममयीची गोष्ट आपण ३३व्या अध्यायांत वाचतो, उदी संपली आहे , मुलगी प्रसुती वेदनेने विव्हळत आहे आणि घरात नवचंडीचे हवन ही मांडले आहे , पण नाना साईंचा धावा करतात आणि मग आपण वाचतो कि चमत्कार घडतो रामगीर बुवा गोसावी अचानक गावी जायला निघतात आणि साईनाथांच्या आज्ञेने ते नानांसाठी उदी व माधव अडकर लिखित आरती घेउन जातात. पण शेवटी ती अकारण कारुण्याने ओतप्रोत भ्ररलेली साई माउली, नटनाटकी साई माउली चक्क टांगेवाल्याच्या रुपात घोडागाडी घेउन धावत जाते. येथे नानांचा अनन्य भावच बाजी मारतो. दुसर्‍य़ा नानांच्याच कथेत आपण वाचतो कि पायाखालची रस्त्यावरची माती साईंचे स्मरण करुन एका तिसर्‍या अन्य व्यक्तीला लावुन देखिल उदीचेच महान कार्य करते , हाच तो नानांचा साईंवरचा अनन्य विश्वास की एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा. मग सांगा बरे अशा भक्तांसाठी कासवीच्या नजरेने प्रेम पान्हा पाजणारा साईमाउली का बरे धावत येणार नाही ? 
बापू १७ मे २०१२ च्या त्यांच्या प्रवचनात म्हणाले होते कि जगातील सर्वात श्रेष्ठ मंत्र काय तर गुरु हा शब्द. गुरु व गुरुचे प्रेम हे तुमच्या कल्पनांमध्ये कधीच बसू शकणार नाही. गुरुची ताकद किती आहे हे तुम्ही कधीच जाणू शकणार नाही.
आम्ही दु:खी का असतो? तुमच्या मनात हे भय तुलनेतून निर्माण होत असते. मानवाचे मन हे चुंबक आहे. जसं आमचे मन असते ते तशाच प्रकारच्या गोष्टी आकर्षित करून घेत असते.
जर मनात आनंद असेल तर ते बाहेरूनही आनंदच खेचून घेणार जर मनात दु;ख असेल तर ते दु:खच खेचून घेणार. पण आम्ही सामान्य माणसे आहोत. आमच्या जीवनात अनेक दु:खे असतात.दुसर्‍याला चांगले देण्याने माणसाचा अहंकार पण तो चांगला अहंकार, आत्मविश्वास खूप strong होतो.
भले तुम्हांला सांसारिक दु:ख असले तरी त्याही परिस्थितीत तुम्हांला जेवढे चांगले वागता येईल तेवढे वागा. त्यातून तुमच्या मनात जो आनंद निर्माण होईल तो मग ह्या विश्वातला आनंद तुमच्याकडे खेचून घेईल.
जर हे असे करणे जमत नसेल आपण सामान्य माणसे आहोत दु:खामध्येही सुखी राहणे कठीण वाटू शकते तर मग अशा वेळी तो जो एक आहे, जो आंम्हाला फक्त आनंद द्यायला बसला आहे, त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या कार्यात, सेवेत सहभागी होण्याचा प्रयत्न करा.
सुंदरकांण्डात एक ऒवी आपण वाचतो...
प्रबिसि नगर कीजे सब काजा, ह्रुदय राखि कोसलपुर राजा
गरल सुधा रिपु करहिं मिताई, गोपद सिंधु अनल सितलाई,
लंकिनी महाबली हनुमंतास सांगते, तुझ्या अंत:करणात प्रभू रामचंद्रांना ठेवून काहीही काम कर मग विषच अमृताचे काम करेल.
सद्‌गुरुतत्त्व काय करते तर विषचाचेच अमृत बनवते. जो शत्रू असतो तोच मित्र बनतो. जे काही कोणी तुमच्यासाठी वाईट करण्याचा प्रयत्न करत असेल तेच तुमच्या फायद्याचे ठरते. 
तो तुमच्यासाठी जे जे काही अहितकारक आहे ते ते हितकारक बनवतो. पण कधी? प्रबिसि नगर कीजे सब काजा... हा जो राम आहे त्याला हृदयात धारण केले तरच.
"एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऎसा..." 
येथे पुन्हा श्रीसाईसच्चरितच दाखविते ती २३व्या अध्यायातील काका दीक्षितांची बोकड कापण्याची कथा आणि माधवरावांची सर्पदंश झाल्यावरची कथा !! काकांचा आध्यात्मिक मृत्यु असो वा शामाचा शारिरीक मृत्यु , हे दोघेही साईंचे परम भक्तही विचलित होत नाहीत कि डगमगत ही नाहीत.त्यांना पूर्ण विश्वास  असतोच कि माझा साई मला कधीच टाकणार नाही, तोच माझा तारणहार आहे. 
तसेच डोळे आलेल्या भक्ताला ही जेव्हा बाबा बिब्बा डोळ्यांत चिणून भरतात तेव्हांही तो भक्त असाच अढळ विश्वास ठेवतो साईंच्या चरणीं !! एकदा साईंना भेटून गेलेले नारायणराव जानी त्यांच्या मित्राला वृश्चिकदंश होतो (विंचू चावतो) तेव्हा ह्याच विश्वासापोटी साईंच्या तसबिरीसमोरील जळत्या उदबत्त्तीची कोजळी (राख), साईंचे नामस्मरण करुन, उदीच मानून लावतो आणि वेदनांचे शमन होते.
गुरु म्हणजे काय? तर ज्याला काही गरज नसताना, स्वत:चे सामर्थ्य न वापरता, जे त्याला जराही लागू होत नाहीत ते सर्व नियम तो स्वीकारतो... तोच एकच गुरु.
गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे काय? तर माझे माझ्या गुरुशी असणारे नाते. क्षेत्र म्हणजे शेत व शेत कोणाला पिकवावे लागते तर स्वत:लाच.
एवढा strong विश्वास आमचा असला पाहिजे. असे जेव्हा असेल तेव्हा आमच्या सर्व गरजा कुठेही भीक न मागावी लागता पूर्ण होतील. 
खरेच माझ्या बापूंना आमचा किती किती कळवळा आहे म्हणुनच तर ते प्रत्येक प्रवचनातुंन ही अटाटी करतात कि आपला विश्वास कोठेही डळमळू नये, ढेपाळो नये. आपला सदगुरु जाणतो कि कलियुगाच्या ह्या तडाख्यांनी माझी लेकरे घाबरतील, त्यांचा विश्वास ढळू शकतो , ती लडखडू शकतात, म्हणुनच तर ते ही काळजी स्वत:च घेतात.
बापूराया तूच आम्हांला हा अनन्य भाव शिकव, हा अढळ विश्वास दे !!!!!
श्रीराम. 

Sandeep Mahajan

unread,
Oct 11, 2012, 3:56:23 AM10/11/12
to saithegui...@googlegroups.com
I am posting Sudhirsinh Naik's comments as due to a technical glitch he is unable to do from his machine:
 
Quote
 
‘Tell a man there are 300 billion stars in the universe and he'll believe you. Tell him a bench has wet paint on it and he'll have to touch it to be sure - Murphy's Law’.
 
To see a living proof of Murphy's law. Look at me.
 
For years together I kept myself away from Bapu, remained on the sidelines, because my EGO kept demanding proofs that He is SUKH KARTA. And He kept providing me with that proof. Time and time again!
 
But that was not enough. Whenever I was anxious, in a state of utter panic, I shamelessly sought His help. And He obliged. He proved beyond the shadow of doubt that He is also Dukkh Harta.
 
I had forgotten the maxim that to get light, one needs to press the switch/ button. To get Prachiti, one needs to have Vishwas!! But to His credit and compassionate that He is, He kept giving me Prachiti - experiences. Small and big, every day even though my Vishwas was miniscule or just not there!!!
 
And then I realised the simple technique. A kitten has to only say meow. The mother emerges from wherever she is. The kite (Ghaar) is looking at it's young ones, from the sky above. The mother tortoise too is constantly looking back and keeps reassuring her young ones with her glances.
 
We too need to tell ourselves - He is there. And we are here because He is there! Hari Om!
 
Sudhirsinh Naik, Muscat
 
Quote

Roopalivira Kadam

unread,
Oct 11, 2012, 7:19:55 AM10/11/12
to saithegui...@googlegroups.com
आमचा बापू हलूहलू आमच्यासाठी सगळ कही नीट करत आहे. 

Pramod Bankapure

unread,
Oct 11, 2012, 12:57:57 PM10/11/12
to saithegui...@googlegroups.com

____  हरि ॐ

        इतर देव सारे मायिक गुरुचि शाश्वत देव एक ।

        चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर मेख मारीतो ॥

***************************************************************

        साईसच्चरितातील अध्याय १० मधील चवथी ओवी आहे ही. या ओवीतूहेमाड्पंतांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य भक्तांसा्ठी अत्यंत बोधप्रद असे मार्गदर्शकेले आहे. सद्गुरुचे विशे्षत्व सांगितले आहे आपण नेहेमीच्या जीवनात पाहतो की प्रत्येक माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात अनेक अडचणी येत असतात संकटे येत असतात आणी या अडचणींमधून संकटामधून बाहेर पड्ण्य़ासाठी ती व्यक्ती तीच्या बुध्दीच्या क्षमतेनुसार प्रयत्न करीतच असते अशा या प्रयत्नांमधे एखाध्या देवाला नवस बोलणे गंडेदोरे करणे बुवाबाजीच्या नादी लागणे हे प्रकारसुध्दा घड्तच असतात त्यातून ती व्यक्ती थोडीफार बाहेर येतेसुध्दा, पण पुन्हा पुढे दुसरे संकट आ वासून उभेच असते,संकटांची मालिका सुरुंच असते.परिस्थितीशी मुकाबला करता करता तो अगदी गांजून गेलेला असतो ,

जीवनात शांती नसते अतृप्तता असमाधान असते याचे कारण म्ह्णजे त्याला सद्गुरुचे पाठबळ नसते त्याला त्याच्या प्रारब्धकर्मामुळे अजुन सद्गुरु भेटलेला नसतो किंवा त्याने बुवाबाजीच्या नादी न लागता खऱ्याखुऱ्या सद्गुरुचा स्वीकार केलेला नसतो.

        सद्गुरुसारख्या कुशल नावाड्याच्या हाती जीवन नौका सोपविल्याशिवाय माझ्या जीवनाचा प्रवास ह्या भवसागरातून स्थीरपणे शांतपणे कसा बरे होऊ शकेल?

        या जीवनाच्या प्रवासात कितीही वाद्ळे जरी आली , महासागर खवळला तरीही सद्गुरुसारखा नावेचा कप्तान असल्यावर भितीचे काहीच कारण नाही कारण पैलतीरावर अलगदपणे सुखरुपपणे तो नेणारच असतो.

         तेहेतीसकोटी देवांमध्ये सद्गुरुचे स्थान सर्वोच्च आहे सर्वात वरचे आहे कारण सद्गुरु हाच ब्रम्हा विष्णु आणि महेश आहे सद्गुरु म्हणजे्च साक्षात परमात्मा आहे त्यामुळेच हा चिरंतन आहे शाश्वत आहे आणि त्याच्या चरणी आश्रय घेतल्याने निश्चितच शाश्वत चिरंतन निश्चिंतता मिळ्णार आहे.

         जेंव्हा मी सद्गुरुला पूर्ण शरण जातो तेव्हा सद्गुरु मी जसा आहे तसा, माझ्या सर्व गुणदोषांसकट माझा स्वीकार करतो.

         सद्गुरुचरणीं मी जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा नितीच्या मार्गाने पुढे घेऊन जाणारी सद्गुरुंची दॄष्टी मला धर्म व पुरुषार्थ मार्गावर स्थिर करते व त्याचवेळी यज्ञेन दानेन तपसा या मार्गाने सद्गुरू माझा जीवनविकास साधून

देतो आणि माझ्यावर कृपा करून मला बल बुद्धी व पुरुषार्थ प्रदान करतो

         जर मला एखादी गोष्ट हवी आहे तर सद्गुरू मला ती गोष्ट उचित असेल त्यापासून भविष्यात मला  काही त्रास नसेल तरच देतो आणि ते सुद्धा उचित वेळ आल्यावरच देतो आणि ती उचित वेळ येईपर्यंतच्या खडतर काळात माझे रक्षणही तोच करत असतो

   ---याठिकाणी गुरुशिष्याची एक गोष्ट सांगावीशी वाटते

          शिष्य आपल्या आयुष्याचा प्रवास बघत असताना जेव्हा त्याच्या आयुष्याचा चांगला काळ असतो त्यावेळी त्याठिकाणी त्याला चार पावले उमटलेली दिसतात शिष्य खुश होतो की माझ्या दोन पावलाबरोबर माझ्या गुरुचीपण दोन पावले आहेत म्हणजे माझा गुरु माझ्या सोबतच आहे पण जेव्हा तो त्याच्या जीवनाच्या खडतर काळाचा प्रवास बघतो तेव्हा केवळ दोनच पावले दिसतात शिष्याला वाईट वाटते तो गुरुना विचारतो माझ्या जीवनाच्या खडतर प्रवासात तुम्ही माझ्याबरोबर नव्हता का, तेव्हा गुरु म्हणतात, अरे नीट बघ ती तुला दिसलेली दोन पावले माझीच आहेत, त्या खडतर प्रवासात मी तुला उचलून खांद्यावर घेतले होते, शिष्याला आपली चूक उमगते व त्याचा ऊर प्रेमाने भरून येतो.

तर असा हा सद्गुरू असतो  लाभेवीण प्रेम करणारा

       माझ्यासाठी उचित वेळ येईपर्यंत सद्गुरू मला काही देत नाही घडवत असतो पण योग्य वेळ आल्यावर मुक्तहस्ताने कृपेची बरसात करतो आणि सद्गुरे जे देतो ते आयुष्यभरासाठी पुरणारे असते आणि ज्यापासून चिरकाल टिकणारे समाधान मिळेल असेच तो मला देत असतो .

       सद्गुरुचरणी धृढ होण्यासाठी केलेले प्रयास म्हणजेच भक्ती, आता भक्ती करायची म्हणजे यामध्ये सद्गुरूचे नामस्मरण,त्याचे ध्यान, स्तोत्र पठण, गुणसंकीर्तन या गोष्टी येतात, सद्गुरूचे नाम घेता घेता एकदा का सद्गुरूची गोडी लागली, सद्गुरूचा छंद जडला की इतर घातक छंद आपोआपच दूर होतात सद्गुरूचे नाम घेण्याची इच्छा होणे हि सुद्धा त्याचीच कृपा आहे साईनाथ म्हणतात “तुझी जिज्ञासा हीच माझी कृपा “ सद्गुरू भेटण्यासाठी जेवढे नामस्मरण आवश्यक आहे तेवढेच तो भेटल्यावर सुद्धा आवश्यकच आहे कारण ह्या नामरूपी सेतूवरूनच हा सद्गुरू माझ्यामध्ये येत असतो हळूहळू चित्तशुद्ध व्हायला लागते मनातील इतर विचारांची गर्दी कमी व्हायला लागते मन सद्गुरुचरणी रमू लागते सद्गुरूच्या विरहाची भावना मनात निर्माण व्हायला लागते, जगातील अत्यंत सुंदर अशी ही गोष्ट आहे हि, “सद्गुरूच्या चरणांचा विरह” आणि त्यामुळे निर्माण होणारी भावोत्कटता, सद्गुरूच्या चरणाची आसक्ती, डोळ्यातून बाहेर येणारे सद्गुरूच्या प्रेमाचे विरहाचे अश्रू, मन बेभान होते, रोमारोमात फक्त सद्गुरुचेच अस्तित्व असते आणि अशा व्याकूळ अवस्थेत त्याला घातलेली प्रेमाची साद ही सर्व भक्तीचीच रूपे आहेत अशी ही भक्ती जेव्हा माझ्याकडून होऊ लागते तेव्हा माझ्या मनाचा ठाम निश्चय बनतो की माझा सखा माझा सोबती माझे सर्वस्व माझा परमेश्वर सर्व काही हा सद्गुरूच आहे धृढ विश्वास निर्माण होतो आपण त्याच्या चरणी अनन्य शरणागत होतो  न अन्य अनन्य तुझ्याशिवाय कोणीही नाही फक्त तूचि रे देवा, आता माझ्या जीवनाचा सूत्रधार तूच आहेस

            एक विश्वास असावा पुरता | करता हर्ता गुरु ऐसा ||

        अशी स्थिती बनते तेव्हा आपला सद्गुरुसुद्धा दाखवून देतो की “ होय मी तुझ्या सोबतच आहे तुझ्या चोहोबाजूंनी मी आहे आणि प्रचीतीपण देतो की

                || मी तुला कधीच टाकणार नाही ||          

                         

                                     || हरी ओम ||

 

 

 

 

 

vedashree takalkar

unread,
Oct 13, 2012, 5:46:52 AM10/13/12
to saithegui...@googlegroups.com
एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा | ही ओवी वाचयला जितकी सोपी तितकीच आचरणात आणायला अवघड आहे.ही ओवी आपल्यासारख्या प्रत्येक श्रद्धावानाला प्रेरक  ठरते.इथे माधवराव देशपांडे यांची विंचू दंशाची कथा आठवते.या मध्ये 'चाल निघ जा खाली उतार'  हे बाबांचे शब्द पण आपल्या हिताचे आहेत ह्या विश्वासाने त्यांनी त्या शब्दांचे पालन केले. इतक्या वेदनेत  पण त्यांनी असे प्रशा विचरले नाहीत की "बाबा मला असे का बोलले? मी तर बाबांचा भक्त असून पण मला जवळ घेण्या ऐवजी माझ्यावर कृपा करण्या ऐवजी मला असे का दूर बसवले व माझ्यावर ओरडले?" हे विचार येणा म्हणजेच मी माझ्यात व माझ्या सद्गुरू मध्ये मोठ्या भिंती बंध्ण्यासारखा आहे.माझ्या पण आयुष्यात विंचू दंशारूपी अडचणी या येताच असतात.त्या विंच दंशारूपी अडचणीमुळे मला वेदना ह्या होताच असतात.त्या वेळी नेमका माझ्या मनात "बापू लक्ष आहे का?" असा प्रश्न निर्माण होतो.म्हणजेच माझा विश्वास दोलायमान होतो.मला शाम्याच्या कथेतून हेच शिक्याला मिळते की त्या सद्गुरूची कुठलीही  क्रिया,शब्द हे फक्त आपल्या भल्यासाठीच आहे.मला फक्त  माझ्या बापूंवर पूर्ण विश्वास ठेवता आला पाहिजे.
 हा विश्वास वाढवा,त्या करिता मला माझ्या प्रयासना नामस्मरण,नियमित उपासना आणि गुणसंकीर्तन याची जोड दिली पाहिजे.आपण कोणी  संत नाही.आपल्या मनात विचारांरूपी सागर लाटा येतच असतात पण या विचारांरूपी लाटांना पण हे गुनासंकीर्तानाचे श्रवण ,उपासना व नामस्मरण थोपवू  शकतात.ह्या गोष्टी करताना मला  अपोआप सद्गुरू बद्दल प्रेम वाटू लागते व त्यांच्यावरचा  विश्वास  बळावतो.गुणसंकीर्तन करणं किवा ऐकण्याने माझ्या मनातील हा विश्वास वाढतो आणि मग मला कसलीच काळजी  उरत नाही,अशक्य चे शक्य पण माझा बापू करतो फक्त या विश्वासापोटी,प्रेमापोटी.आपल्याला ह्या सद्गुरू वर ठेवायची तो फक्त निस्सीम भक्ती भाव!बाकी त्यांना आपल्या कडून काहीच अपेक्षित नाही."आमचे बापू आमच्यासाठी हळू हळू सगळे काही नीट करत आहे",हे पूर्ण विश्वासाने म्हंटले असता काहीही अशक्य उरत नाही हे बापूनी प्रवचनातून सांगितले आहेच.मला संकटातून वाचवणारे फक्त माझे बापूच आहेत.संकट कितीही मोठे असले तरी माझे बापू त्याच्या पेक्षा मोठे आहेत हाच विश्वास महत्वाचा!नानासाहेब चान्दोर्कारांची मुलगी प्रसूत होत असताना तिला खूप त्रास होत होता.पण त्यांचा ठाम विश्वास होता की साई  बाबा आहेत व तेच या संकटातून आपली सुटका करतील व म्हणूनच बाबांनी ती उदी त्यांच्या पर्यंत पोचवली.
" साई साई नित्य म्हणाल सात समुद्र करीन न्याहाल| या बोला विश्वास ठेवाल | पावाल कल्याण निश्चये | "
माझ्या बापुना पण माझ्याकडून हेच अपेक्षित आहे....एक विश्वास असावा पुरता..ही ओवीच माझ्या ऑस्याचे ध्येय बनायला हवे कारण माझ्या बापुना फक्त हेच हवाय म्हणून!
हरी ओम
वेदश्री टाकळकर
पुणे

vedashree takalkar

unread,
Oct 13, 2012, 5:48:57 AM10/13/12
to saithegui...@googlegroups.com

Tejas Gokhale

unread,
Oct 15, 2012, 3:16:27 PM10/15/12
to saithegui...@googlegroups.com
"एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा"


सोडुनिया लाख चतुराई, स्मरा निरंतर साई साई l
बेडा पार होईल पाही संदेह काही न धरावा ll

वरील ओवी आपल्याला आगदी सोप्या वाक्यात बेडा पार होण्याचा मार्ग दाखवते.
लाख चतुराई: आमच्या आयुष्यात आम्हाला भगवंताची कृपा हवी असते पण आम्ही ती मिळवण्यासाठी भगवंतानेच दिलेला मार्ग चालताना लाख चतुराई करतो.
वेग वेगळ्या पळवाटा काढतो. नित्य उपासना, दिवसातील २४ मिनिटे, भक्ती, अशा अनेक गोष्टी आम्ही करत नाही मात्र भगवंताकडून अपेक्षा करताच राहतो.

स्मरा निरंतर साई साई :(करता, हरता गुरु ऎसा)
स्मरा निरंतर म्हणजे आम्ही आमचा काम धाम सोडून साई साई करायचं का तर नाही. तर या उलट आमच्या कामामध्ये, नित्य कर्म मध्ये साई आणायचा... साई स्मरायचा..

बेडा पार होईल पाही:
हे जर केले तर आयुष्याच कल्याण होणारच.. कारण हे साईनाथांच वाक्य आहे. 

फक्त अट एकाच संदेह काही न धरावा = एक विश्‍वास असावा
संदेह काही न धरावा : सर्वात महत्वाचं वाक्य इथे येतं कि संदेह काही धरू नका.
आज माझ्या आयुष्यात जे काही घडते ते परमेश्वराच्या इचेनेच. हा विश्वास दृढ करावा लागतो कारण एखादी घटना  आपल्यासाठी आपल्याला जरी नको वाटत असली तरी तो एकमेव सद्गुरूच त्या घटनेचे महत्व जाणतो आणि तो ती घटना आपल्या आयुष्यात घडवून आणतोच (जर आपण त्याचे खरे भक्त असू तर).
आणि अशी घटना जेव्हा आमच्या आयुष्यात घडते तेव्हा आम्ही इथेच चूक करतो ती म्हणजे परमेश्वराला का विचारतो. आणि इथेच संदेह आला.
सद्गुरुवर ठाम विश्वास असावा लागतो मग तो तुम्ही कुठे हि असलात तरी तुमच्या मदती साठी धावून यायला तयार असतो.
कुठेहि असा काहीही करा, एवढे मात्र सदैव स्मरा
कि तुमच्या कृतीच्या इथंभूत खबरा मज निरंतरा लागती ल
ती गुरुमाउली आमच्यावर कासाविच्या दृष्टीनी पोसत असते.
नावाडी बनून पैलतीरावर नेऊन सोडण्यास येते पण आम्ही जर "त्या"ने दिलेला हात धरलाच नाही तर पैलतीरावर पोहोचणार कसे?
आणि इथेच आम्ही काठावर तरी अडकतो नाहीतर पाण्यात तरी बुडतो.

आणि म्हणूनच बापू आपल्याला वारं वर सांगतायत कि बाळांनो :
"एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा"
याचा अर्थ असा कि येणारा काळ कठीण आहे. परीक्षेचा आहे.. यात तोच तरु जाईल जो शेवटच्या श्वासापर्यंत सद्गुरूचा हात धरून ठेवेल.
कारण मरण आले तरी त्याने सांगितलंय की दोन्ही कडे तुमचा जन्मच आहे.
१ विश्वास ठेवू कि सद्गुरू जे सांगेल ते माझ्या हिताचे असेल मग भले ते मला वाटत नसेल तरी बेहेत्तर..

कारण साइंनी सांगितलाच आहे मी माझ्या वचना करणे मारून जैन जीवे प्राणे ll
आणि जेव्हा तो ग्वाही देतो तेच त्याची ग्वाही इतकीच ठाम असते "मी तुला कधीच टाकणार नाही"



हरी ओम!
तेजससिंह विजयसिंह गोखले
सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, पुणे.



--------------------------------------------------------------------------------------------

Harshada Kolte

unread,
Oct 18, 2012, 10:09:03 AM10/18/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम
साईसचरित हा ग्रंथ च मुळी साईंच्या सान्निध्यात आलेल्या भक्तांचे चरित्र आहे, तेच मुळी एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरू एसा ह्या आश्वासक शब्दांवर , आधारीत . अगदी मंगलाचरणा पासून . उगम कथे मध्ये बाबा आम्हाला शिकवतात की जर सद्गुरू वरील विश्वासाचा खुंटा ठोकून घट्ट केला तरच श्रद्धा आणि सबुरीच्या तळीतून एका श्रद्धावानाच्या जीवनाचा विकास होतो. हेच त्या प्रत्येंक भक्ताचे चरित्र...साईसचरित .. ..........
आपल्या गुरू वारीला विश्वासाचे आणि प्रेमाचे नाते समजावताना बाबा म्हणताता, माझ्या गुरूंनी माझ्या कडे दोन पैसे मागितले आणि मी ते लागेच देऊन टाकले. " तू मजकडे अनन्य पाही , पाहीन तुजकडे तैसाचा मीही" हे अनन्य पणे पाहणे म्हणजेच फक्त तू एक ...हाच विश्वास .हे अनन्यपणे पाहणे म्हण जेच कुठलेही मुखवटे न धरता त्याच्या च समोर आहे तसे जाणे , मग आपल्या जीवनाचा करता हरता गुरू होतो हे साईसचरीतातील अनेक भक्तांच्या चरीतातूना जाणवतं. अशा ह्या साई सागरातील प्रत्येक भक्ताचे चरित्र अभ्यासून , त्याचे गुण सं कीर्तन करुन आपण विश्वासाने त्याच्याकडे पाउल टाकत त्याच्या कडे अनन्यपणे पाहायला हवे तरच " एका विश्वास असावा पुरता , करता हरता गुरू ऐसा ही ओवी माझ्या जीवनात खर्या अर्थाने उतरेल .
हरी ओम
हर्षदावीरा कोलते

vinaya...@gmail.com

unread,
Oct 19, 2012, 10:44:02 PM10/19/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om Dada

Vinaya Pasarnikar

unread,
Oct 19, 2012, 11:43:58 PM10/19/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम दादा,

"एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा "

साई सत्चारित्र मधील या ओवीचे महत्व  आज मला परम पूज्य बापुंमुळे कळले आहे. जशी जशी पंचशील परीक्षा देणे सुरु केले आहे तस तसे साई नाथाना तेव्हा लोकांना काय पटवून द्यायचे होते ते समजते आहे. त्या चरित्रातील भक्तांचे बाबांबाबत्चे प्रेम अवर्णनीय आहे. त्यांच्या सारखे प्रेम मला करता आले पाहिजे आणी ते माझ्याकडून माझे बापू नक्की करून घेणारच.१०८% . त्यासाठीची सर्वप्रथम तयारी बापू पंचशील परीक्षेमधून करून घेत आहेत. माझा प्रवास प्रथमा पासून चतुर्थी पर्यंत असा सध्या पूर्ण झाला. आता पंचमी. परंतु आतापर्यतच्या बापूनी माझ्याकडून करून घेतलेल्या प्रयासामधून साई चरित्र कसे वाचायचे, ते आपल्या जीवनात कसे उतरवायचे आणी ते करत असताना म्हणजेच उतरवताना आपल्याला सद्गुरू आणी भक्त यात कसल्याही प्रकारचे अंतर नसते तर सद्गुरू आपल्या अवतीभोवती किंबहुना आपल्या मध्येच असतो हे मी शिकले. 

"नाही सोडावे दारा नाही सोडावे घर तरीही पावावे परमार्थ अनिरुद्ध नावे 
अर्थ अनर्थ मी न जाणतो योग्य अयोग्य न ओळखतो चरण तुझे मी धरतो सांभाळी आता." 

बापुंच्यामुळेच आज माझ्या जीवनात माझा देव खऱ्या अर्थाने कार्यान्वित झाला आहे. आतापर्यंत काही समजत नव्हते ते आज स्वतः समजून घेवून दुसऱ्याना पण समजावून सांगता येवू लागले आहे. श्री राम.  बापू वारंवार आपल्या भक्ताला कोणताही त्रास होऊ नये या त्यांच्या वात्साल्यापोटी  आपल्या  जन्मदात्याच्या ही पलीकडे आपली काळजी घेत   आहेत. हे फक्त आणि फक्त सद्गुरूच करू शकतो जे त्या काळी साई बाबांनी केले. कलियुगात प्रत्येकाला प्रारब्धाचे भोग भोगावे लागणार आहेतच पण बापुंमुळे आज त्याची झळ आम्हाला जाणवत ही  नाही . आता तर बापूनी सांगितलेच आहे की आमचा  दोन्हीकडे जन्म  आहे . माझा बापू त्याच्या लेकरांची किती सोय करतो आहे खरच!!! कोण करेल एवढे सांगा? आज आम्ही बापूंकडे आहोत यासारखे दुसरे समाधान नाही.  योग्य दिशेने कसे जगायचे ते बापूने मला शिकवले. जीवन जगताना कितीही संकटे आली तरी सर्व संकटआन्पेक्षा माझा बापूच मोठा आहे हे माझ्या मनात खोलवर बापुनीच रुजवले आहे. 

दादा, तुम्ही सुरु केलेल्या या ब्लोगमुळे तर आता साई सत्चारित्र अजून छान कळू लागले आहे. श्री राम.

विश्वास म्हणजे नक्की काय? तो  ठेवायचा कसा? त्याने कोणते बदल आपल्या जीवनात घडतात? हे फक्त तो ठेवल्यावरच कळतो हे मात्र बापुंमुळेच कळले.

साई-अनिरुद्ध माझ्या जीवनात सदैव कार्यरत राहो त्याच्या चरणांच्या शिवाय मला दुसरे काही नको हीच सद्गुरू बापू चरणी मनोमन प्रार्थना..

"तुझ्या चरणांची धूळ हेच आमचे धर्म कुल 
चरणाच्या सेवेसाठी मना लागे तळमळ मना  लागे तळमळ." 

श्री राम. 

Yogesh Joshi

unread,
Oct 20, 2012, 12:12:38 PM10/20/12
to saithegui...@googlegroups.com

हरी ओम 


अध्याय ३१ मध्ये श्री बाळाराम मानकारांच्या कथेमध्ये श्री साई नाथ त्यांना दर्शन देताना म्हणतात  - "साडेतीन हाताचीया घरा | शिरडीबाहेर नव्हतो तुज ". येथे आपल्याला बोध होतो ओमकाराच्या "एकोस्मी बहुस्याम"चा. जसे बाबांचा साडेतीन हाताचा स्थूल देह आहे तसेच ह्या सगुण प्रणवाचे स्थान आहे साडेतीन शक्ती पीठे. येथे साई नाथ आपल्या सर्वसाक्षीपणाची ओळख करून देतानाच सर्वांसाठी महत्वाची शिकवण देतात की - माझे सगुण साकार रूप असो कि निर्गुण अवतार , माझ्यावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे त्याच्या हाकेला मी धावून येतोच येतो. मग तेथे भौतिक अंतर किती आहे ह्याचा हिशेब नसतो. जो परमात्मा शिरडीत आहे तोच त्या मच्छिंद्र गडावर आहे. ह्यासाठी फक्त आवश्यक आहे तो भक्ताचा एकमात्र विश्वास कारण ह्याचा क्रम जातो श्रद्धा -- विश्वास -- प्रचीती ह्याच मार्गाने. आज आपणास सदगुरू बापूनी ह्यावर्षी एकाच टार्गेट दिले आहे आणि त्याचा अभ्यास करताना आपला विश्वास एवढा बळकट होत जातो कि माझी सदगुरू माउली जे माझ्यासाठी करणार ते उचितच असणार ह्यापलीकडे जावून जे जे माझ्या आयुष्यात घडते आहे ते निव्वळ माझ्या सदगुरुच्या कृपेनेच ह्या स्टेज पर्यंत वाढत जातो. अशा वेळी आपणास एखादा लहानसा अपघात होतो ........ समजा घराच्या घरी उंच टेबलावरून पडलो ......... तर मी देवाला दुषणे न देता उलट आभार मानायला शिकतो कि बापू राया हा अपघात जर माझ्या गाडीला झाला असता तर मला किती मोठी दुखापत झाली असती त्या ऐवजी त्या मोठ्या संकटाचे रूपांतर तू अलगदपणे लहान व मला झेपेल अशा गोष्टीत केलेस. हा विश्वास श्री माधवरावांकडे होता म्हणून तर त्यांना साक्षात शाबरी मंत्राने आपत्ती निवारण करून साई नाथानी जीवदान दिले गेले. आज सुद्धा आपण "कृपासिंधु" मधून कित्येक भक्तांचे अनुभव वाचून आश्चर्य चकित होतो कि हे कसे शक्य झाले. कारण जे वाचले ते मानवी पातळीवर निव्वळ अशक्य गोष्टी होत्या. साई नाथ सुद्धा अमीर शक्कर साठी थंड, ओबड धोबड व अतिशय कष्टाची जागा त्याच्या संधीवाताच्या उपचाराच्या वेळेस आराम करण्यासाठी देतात. ह्यात आपण पाहतो कि त्याचा विश्वास थोडासा ढळला तर त्याच्यावर कसा बाका प्रसंग येतो..... आणि तेच पुन्हा पूर्ण विश्वासाने सदगुरूचे नाव घेतले तर कसे कठीण प्रसंगातून अलगद निवारण होते. ह्या सर्व गोष्टी म्हणजे फक्त त्याचे अकारण कारुण्य आणि म्हणून घडवलेली "लीला". मात्र ह्या सर्व कथांमध्ये एक गोम ठळकपणे अधोरेखित केली जाते - " एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरू ऐसा " आणि ह्याचे अतिशय सुंदर उदाहरण आपण पोथीमध्ये पाहतो ते अध्याय ४० मध्ये श्री हेमाडपंत आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या घरी झालेले बाबांचे आगमन. श्री राम ||

Anjana Mahajan

unread,
Oct 26, 2012, 12:15:03 PM10/26/12
to saithegui...@googlegroups.com
''Ek Vishwas asava purta karta harta Guru aisa.'' This is this year 2012's mantra Bapu gave to all of us. Even Suchitdada had told us ''ek tari ovi anubhavavi'' from Saisatcharit and to keep giving Saisatcharit exams. Bapu told us ,who love Bapu, should believe firmly in this mantra .
 
''Aata karu sadgurusmaran ,preme vandu tayache charan ,jau kayavachamane sharan,buddhi sfurandata jo'' ch-1 ovi 43.
In Mangalacharan Hemadpant says'' Om namo Sadgururaya charachya visaviya adhishthhan vishwa awaghiya asasi sadaya Tu ek ''-ch 1 ovi 45.
 
As in Adhiveshan 2011 while giving the discourse Bapu had told Baba's words '' Kuthe hi asa kahihi kara evdhe purna sadaiv smara ki tumchya ityanbhut krutichya khabra maj nirantara lagati'' in front of Sadgurutatva destiny is a small thing and our Sadguru can take away our problems in one go .Bapu had told us that we should believe in our Sadguru as His Chandika Ma  has chosen Him . Those who do not believe in Sadguru their all work go wrong. So we should believe in Hemadpanta's words
 
-''Tumhich amhate sadguru ,Tumhich bhavnadi che taru, amhi bhakta tyantil utaru pail paru davije''
 
''Tan man dhan sarva bhave ,Sadgurupayi samarpave ,akhand aayushya venchave ,Guruseve laguni''
 
Adhibhoot ani adhyatmik,tisre dukh te adhidevik ,taruni jati bhakta hota navik Sadguru,taru jata lokik sagara ,vishwas lage navdiyavar ,tohi taravaya bhavsagar nijguruvar thevava.''
 
''Jo majlagi ananya sharan vishwasyukta kari madbhajan,majhe chintan majhe smaran,tyanche udharan brid majhe.''
 
''jethe Sadguru karnadharu tenchi tanru pailparu ,neuni utaru lavil.''
 
Our Sadguru is our God .Bapu told when he sees His children not doing bhakti ,He feels sad .Bapu also told that we can never oversmart our sadguru,as nothing is hidden from Him.He is Trikaldarshi,omniScient and omnipotent .Bapu does not want saints ,wise men,mahatmas fom us but the one who loves Him the most and tries to improve himself,the one who remembers Him and His help to him .We should learn to say ''Bapu's wish'' in everythig we do and we get .
 
''Je je majha sathi uchit te tu mala deshil khachit ,nahi takrar raghava'' He is the doer .Our sadguru is our mother ,His anger is also for our benefit .So we should always be grateful to our Sadguru and His help given to us .Bapu said further that the one who prays to God with the feeling of gratefulness for Him ,then He keeps balance in all activites of his life.We have to say to Bapu'' how much You love me Bapu ,whatever is happening in my lie is because of your wish and grace ,and keep saying Him 'I love You Bapu '' then His love and grace will make us cross this ocean of life smoothly . Bapu had also told us to say ''Amcha Bapu halu halu amchyasathi sagra kahi neet karat ahe '' and ''Ek vishwas asava purta karta harta Guru aisa ''We have to be firm in His faith.'' Nahi maj dusara jap nahi maj dusare tap,avloki ek sagun roop ,shuddha swaroop Sainche''.
 
In Adhiveshan 2011 Samirdada had said to do Gurubhakti and follow the path of Hanumanta.We should do Guruseva ,this is only Gurubhajan .As in Saisatcharit Haemadpanta says
  ''Guru nam ani Guru sahavas Guru krupa ani Guru charan payas  ,Guru mantra ani gurugruha vaas ,mahtyas praptihi''.
Sameerdada also emphasised on bhajan kirtan and Sadguru guna sankirtan to be learnt from Dasganu ,Nanasaheb Chandorkar,Hemadpant ,how they became excellent bhaktas .In Saisatcharit we see
how due to gunasankirtan Ratanji Wadia ,Lala Lakhmichand  Cholkar came to Baba ,believing on Saibaba's bhakta Dasganu, how Kakasaheb Dikshit told Nanasaheb Chandorkar to tell to Baba to cure the lameness of his mind ,and how Kakasaheb Dikshit becomes great devotee of Baba .Dikshit and Nana Chandorkar's gunasankirtan brings Hemadpant to Baba and then Hemadpant becomes firm to Bab's feet and gets Anugraha of writing 'aporusheya grantha ''Saisatcharita'by Baba's grace .
We see in Saisatcharit those who were grateful to Baba lived happily as Meenavaini said in her abhang '' Je ale te taruni gele je na ale te tasech rahile,aniruddhacha jo jahala to sukhat urla duja dukhat rudala'' .
Sameerdada explained that showing our love to others 'Uchchar'.expression of our feelings of our love for our Sadguru is Gunasankirtan .
At every step of our life we should learn to be grateful to our Sadguru like Hanumanta
 ''So sab tav pratap Raghurainath na kauhu mori prabhutai''.
Sameerdada told Sadguru's  'Aanand daan ,we should share with  less priviledged also,this is the best 'Daan'  ''Ek vishwas asava purta karta harta Guru aisa '',as who believes Bapu as doer and destroyer  'this faith',whoever has should increase more and more number of believers of this faith on Sadguru in society ,then only the world can be saved from the ill effect of Kalipurush  or else we will also have to face another Mahabharata .
Bapu's ,our Sadguru's gunasankirtan is the true service .Now by Bapu's grace we are seeing our Sadguru's dream of Ramrajya is progressing towards a reality  as all Vanarsainiks are working towards this goal ,'Krupasindhu ,information through website ,audio-video experiences sharing on internet,Facebook,E-books on net ,Abhangas n gajars site ,Om Manasamarthyadata site,Bapu's 13 points programmes,Granthas, new books releases,Strotras n uapasanas available to all on internet,Pratyaksha daily newspaper,Panchasheel exams on saisatcharit,Disaster management etc and the most important Sameerdada's blog . All these are latest and positive tools for gunasankirtan of our Sadguru Bapu to tell all the Shraddhavaans  ''Ek Vishvas asava purta ,karta harta guru aisa''.
 Once we hold Bapu's finger then He will take us on right path.As Bapu has said ''Me tula kadhich taknar nahi''. Firm faith on Bapu's vachan ,  develop our bhakti and seva and spread his word to all to give everyone His 'Aadhar' should be goal of every vanarsainik.In Matruvatsalyavindanam  we all have seen In this kaliyug ,how Kali is ,what his wrong intentions are ,so it's our duty to do gunasankirtan of our Sadguru our ultimate saviour Bapu and bring shraddhavans to Bapu's protection to save this world from Kali's bad impact.it's Bapu's wish to pull devotees towards Him ,we have to just keep doing our part of doing gunasankirtan .Even in Sundarkand  we see by gunasankirtana of Hanumanta of Rama Bhaktirupini Sita also forgets her sorrowsand says to Hanuman ''Kahau tat asa mor pranama ,sab prakar prabhu purankama ,deendayal biridu sambhari harahu nath mam sankat bhari ''
So we have to make this ovi from Saisatcharit firmly in our heart ''Ek vishwas asava purta karta harta Guru aisa''.As Bapu also told to the students of 10th and 12th in his pravachan in 2011 ,''Life is an exam but if you have  your Sadguru's grace it becomes an everyday event '' ,this can only be done by our Sadguru Bapu .  ''Om Mana Samarthyadatya Shree Aniruddhay namaha''.  Shree Ram!
 
 
 
 

vivek pawar

unread,
Oct 26, 2012, 1:48:30 PM10/26/12
to saithegui...@googlegroups.com

हरि ओम

 एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||

परमपूज्य बापूंनी या नववर्षाच्या सुरवातीस आपल्या सर्व श्रध्दावानांसाठी हा निश्चय करावयास सांगितला. आपण नववर्षाचे म्हणून किती निश्चय करतो व ते कसोशीने पाळतो किती हा आपल्या चिंतनाचा विषय नाही. परंतू जेव्हा परमपूज्य बापू आम्हांस हे सांगत आहेत तेव्हा आम्ही नेणू दूजा धर्म | आम्हा नाही लाज शरम | गुरुवचन पालन हेच वर्म | हाच आगम आम्हाते | ह्या काकासाहेब दिक्षितांच्या भुमिकेत शिरण्याचा प्रामाणिक प्रयास हेच ह्या निश्चयामागील खरे बळ होय हयाची खात्रीच संपूर्ण साईसत चरितातून आम्ही अनुभवतो. परंतू त्यासाठी मात्र एकच गोष्ट नितांत आवशयक आहे ती म्हणजे

असावे निर्मळ श्रद्धाबळ | वरी प्रज्ञेचे बळ प्रबळ |

सबुरीची जोड अढळ | परमार्थ सबळ तयाचा |

निर्मळ श्रद्धाबळसबुरीची जोड या दोनं पायांवरच आमचा विश्वाश अढळ राहू शकतो कारण मनात येणाऱ्या शंका-कुशंकांना, संकल्प-विकल्पांना, जीवनात येणाऱ्या नानाविध अडचणी व संकटांना पुरून उरणारा म्हणजेच या सर्वाना हार न जाता त्यांवर मात करणारा विश्वासच आम्हांस कर्ता हर्ता गुरु ऐसा याची प्रचिती देतो. कसोटीच्या क्षणी विश्वास ढळतो किंवा अशा क्षणी आम्ही कमी पडतो कारण परिस्थितीवश झाल्यामुळे किंवा त्याक्षणी मनाची चंचलता प्रबळ ठरल्याने आम्हाला विश्वास दृढ ठेवणे कठीण जाते परंतु हा विश्वास दृढ करणे म्हणजे कर्ता हर्ता गुरु ऐसा ह्यालाच आमच्या जीवनाचे सूत्र बनविणे त्यासाठी सदगुरू साईनाथ आम्हांस स्पष्टपणे सांगतात कि,

तुम्ही आपले कार्य करा | मनी यत्किंचितही न कचरा |

विश्वास पूर्ण मद्वचनी धरा | निर्धार करा मनाचा |

मी माझ्या जीवनातील सर्व कर्मे करताना मग ती व्यावहारिक असो, प्रापंचिक असो किंवा अगदी पारमार्थिक असो त्या सर्वांमध्ये एकच समान सूत्र कार्यरत असते आणि ते सूत्र म्हणजे सदगुरू आणि म्हणूनच या प्रत्येक कृतीमधील माझी भूमिका म्हणजे

प्रयत्न करणे माझे काम | यशदाता मंगलधाम |

अंती तोची देईल आराम | चिंतेचा उपशम होईल |

हीच असणे म्हणजे एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||

हा दृढ विश्वास मनात कायम करणे आणि त्या साठीच त्याचा शब्द प्रमाण हा विश्वास मनात दृढ करण्याचा निर्धार हेच माझे काम. हे कार्य करताना यत्किंचितही कचरू नका फक्त विश्वास पूर्ण मद्वचनी धरा हाच मनाचा निर्धार पक्का करा ही सदगुरू साईनाथांची इच्छा आमचे कल्याण साधणारे आहे. ह्याचा पूर्ण विश्वास म्हणजेच साईसच्चरित व त्यातील भक्तांच्या कथा.

 

      श्री साईसच्चरिता सारखा अनमोल ठेवा आपल्या सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध करून देणारे हेमाडपंत वयाची साठ वर्षे उलटल्या नंतरही इतके सुंदर सदगुरू गुणसंकीर्तानाचे कार्य करतात कारण त्यांचा सुस्पष्ट एकच विश्वास

समर्थ साईंची निजस्थिती | यतार्थ वर्णाया कोणा गती |

स्वयेच भक्तार्थ कृपा करती | तरी ते वदविती स्वयेची |

वाणीची जेथ नं चाले धाव | तेथे मी का बांधिली हाव |

ऐसे बोलावायासी वाव | ठेविला न ठाव कवणाते |

उचलली जेव्हा हाती लेखन | बाबांनी हरिले माझे मी पण |

लिहिती आपली कथा आपण | ज्याचे भूषण त्याजला |

 

हा विश्वास म्हणजेच कर्ता हर्ता गुरु ऐसा ह्यांची हेमाडपंताना आलेली सुंदर प्रचिती.

साईसच्चरिताच्या सातव्या अध्यायात आम्हाला भेटतो एक भोळा भाविक भक्त ज्याचे डोळे सुजून लाल झालेले रक्तबंबाळ बुबुळे घेवून बाबांकडे येतो  आणि बाबा चक्क बिब्बे ठेचून त्याचे गोळे त्या भक्ताच्या डोळ्यात घालतात .डोळयासारखा नाजूक अवयव व बिब्यासारखा जहाल पदार्थ किंबहुना पूर्णपणे विपरीत असा बाबांचा उपाय परंतु कोणताही विकल्प वा भितीशिवाय भोळा भाविक भक्त हा उपचार करवून घेतो कारण कर्ता हर्ता गुरु ऐसा हा त्याचा भोळा भाव अश्या अवघड प्रसंगालाही पुरून उरला आणि म्हणूनच त्याला निर्मळ डोळे पुन्हा प्राप्त झाले.

जोगाई जाखाई मरीआई | शनि शंकर अंबाबाई |

मारुती खंडोबा म्हाळसाई | ठायी ठायी शिरडीत|

परि अवघड प्रसंग येता | कामी पडेना एकही ग्रामस्था |

तयांचा तो चालता बोलता धावता | संकटी पावता एक साई |

हा सकल शिर्डीवासीयांचा विश्वासच प्रचंड वादळी पावसाचा सामना करताना कामी आला आणि त्यातून त्यांनी आश्रय घेतला तो समर्थ साईनाथांच्या द्वारकामाईचा .व त्यातूनच आम्हा सर्व श्रद्धावानांना ते स्पष्टपणे शिकवितात कि माझ्यावरील संकटांपेक्षा माझा देव मोठा आहे मग अशी अनेक वादळे येतील आणि जातील कारण त्यांना पुरून उरणारा एकच विश्वास म्हणजे कर्ता हर्ता गुरु ऐसा.

उत्तरी कळविती एकाच उपाय | साईबाबांचे धरावे पाय |

हाची केवळ तरणोपाय | बाप माय तो एक |

या नानासाहेब चांदोरकरां सारख्या खऱ्या आप्ताचा सल्ला शिरोधार्य मानून बाबांच्या चरणी धावून येणारा व केवळ बाबांचा शब्द प्रमाण | तेची औषध रामबाण | या सच्च्या विश्वासाने भीमाबाईच्या घरी निशंक पणे राहणारा भिमाजी पाटील दुस्सह्य प्राणांतिक व्यथेतूनही तरला अगदी राहण्याची जागा ओली विकाल्पास्पद असली तरीही कारण नानासाहेब चांदोरकर या श्रद्धावान आप्ताचा सल्ला प्रमाण मानून साईनाथांचा आपल्या जीवनाचा तारणहार म्हणून त्यांनी बाबांचा केलेला मन:पूर्वक स्वीकार म्हणजेच कर्ता हर्ता गुरु ऐसा हा पूर्ण विश्वास हिवतापाने त्रस्त बाळा शिंपी मोठा भाविक भक्त आणि म्हणूनच

परि औषध तो संतांचा शब्द | देतील तो जो मानी प्रमाण |

तया न अगद आणिक | याचे उत्तम उदाहरण |

कारण बाबांचा शब्द |

हेच या प्रमाण नुसार दहीभाताचे कवळ काळ्या कुत्र्यास लक्ष्मी आईच्या देवळासमोर जाऊन घालतो व हिवताप मुक्त होतो तो याच विश्वासातून कर्ता हर्ता गुरु ऐसा. हा विश्वास हेच खरे औषध जे आपल्याला सर्व प्रकारच्या व्याधीतून मुक्त करू शकते. साईसच्चरीतामध्ये याची अनेक उदाहरणे आपणास योग्य दिग्दर्शन करतात त्यातील काही मोजक्या भक्तश्रेष्ठांच्या उदाहरणातून हयाची सत्य प्रचिती जाणून घेतल्यास हे सदगुरू घरचे गारुड समजावून घेण्यास मदत होईल.

१.       काकासाहेब दीक्षित :- जल्माने ब्राम्हण, आजन्म अहिंसापालन, सत्वशील श्रद्धावानभक्त. आज्ञा किमर्थ हे मनी नानू | प्रतीपालनू कर्तव्य तसेच आम्ही आपल्या आज्ञेचे दास | योग्यायोग्य नानू मनास | वेळी वेचू जीवितास | परि गुरुवाचानास प्रतिपाळू | ह्या ठाम सदगुरुंवरील विश्वासातून जे एखादा यवनही करू धजला नाही ते बोकड मारायचे कार्य केवळ गुरुआज्ञा प्रमाण ह्या भावातून हा ब्राम्हण नि:संकोचपणे नुसता करावयास तयार झाला नाही तर प्रत्यक्ष कृतीसाठी सुर उगारता झाला. आजवर सांभाळलेले अहिंसा व्रत पणास लावून आपल्या अध्यात्मिक जीवनाचा मृत्यू समोर दिसत असूनही केवळ गुरुआज्ञा पालन हा एकमेव धर्म जाणणारे काकासाहेब दीक्षित म्हणजेच तावून सलाखून निघालेले बाबांचे बावनकशी सोने. ह्या प्रसंगातही चमकले ते एकाच विश्वासातून

होऊ सुखी अथवा कष्टी | परिणामावर नाही दृष्टी |

घडेल असेल जैसे अदृष्टी | परमेष्ठिला काळजी |

हा विश्वास म्हणजेच आम्हासी तारक सदगुरूचरणू हयाची १०८ टक्के असणारी खात्री म्हणजेच एकाच ठाम विश्वास कर्ता हर्ता गुरु ऐसा.

 

२.      नानासाहेब चांदोरकर :-बरी वाईट क्रिया सारी | ईश्वर तेथीचा सूत्रधारी |

तोची तारी तोची मारी | कार्यकारी तो एक |

हा दृढ विश्वास फक्त स्वजीवानासच नाही तर इतर आपदग्रस्त वा अडल्या नडलेल्यांचा जीवनातही समानपणे लागूच असतो आणि म्हणूनच ह्या सर्वांवर एकच रामबाण उपाय साईबाबांचे धरावे पाय | हाची एक तरणोपाय | हीच दृढ निष्ठा म्हणजेच नानासाहेब चांदोरकर. भिमाजी पाटलांसारखा व्याधीग्रस्त, जगण्याची इच्छा संपलेला मित्र असो कि ठाणे शहरीच्या स्टेशनावर ज्वरग्रस्त मुलीच्या पित्यांचा उदीसाठी निरोप घेऊन येणारा मित्र असो सर्वांवर उपाय एकच साईनाथ व त्याची उदी आणि हा दृढ विश्वासच मातीची उदीही करतो व स्वस्त्रीच्या माथी लावलेला मातीचा टीळा ज्वरग्रस्त मुलीसाठी उदीचा टीळा ठरतो कारण नानांचा एकच विश्वास कर्ता हर्ता गुरु ऐसा जो मार्गाची माती ही उदी करतो कारण भावनेपोटीच अनुभव आणि इथे तर नानासाहेबांचा दृढ विश्वास एकच कर्ता हर्ता गुरु ऐसा हाच दृढ विश्वास नानासाहेबांच्या कामी आला तो त्यांच्या दु:सह्य प्रसूती वेदनेने अडलेल्या आपल्या मुलीच्या कठीण प्रसंगात कारण अश्या भक्तांसाठी स्वत: साईनाथच कार्यरत होतो व आरती व उदी पाठवतो टी रामगीर बुवांमार्फत कीजे गठीत फक्त दोन रुपये व मनात तू स्वस्थ जाई | लागेल तुझी सर्व सोई | हा बाबांनी दिलेला विश्वास घेऊन प्रवासास निघतात हाच साईचरणांवरील विश्वास  कर्ता हर्ता गुरु ऐसा हयाची सुंदर प्रचिती रामगीर बुवांना देतो.

 

३.      माधवराव देशपांडे :- मशीद माझे माहेर घर | मी साईंचे पोटचे पोर | हा दृढ विश्वास अगदी जीवन मरणाच्या सीमेवरही अढळ ठेवून साईनाथ हाच माझ्या जीवनाचा कर्ता हर्ता ह्या दृढ भावाने सर्प दंशाने प्राणांत ओढवलेला असतानाही अन्य सर्व उपाय नाकारून त्यांनी उदीच घेतली ती साईनाथांच्या कडेच आणि जेव्हा बाबा म्हणाले

चढू नको भटुरड्या वर | चाढशील तर खबरदार | चल निघ जा खाली उतर तेव्हा माधवरावांची अवस्था होते कशी तर

देवही जेव्हा रागास आले | माधवराव अंतरी भ्याले |

वाटले उपायाची सर्व हरले | जेव्हा अव्हेरिले बाबांनी |

म्हणजेच सर्प दंशाने प्राण जाण्याची वेळ येऊनही न घाबरलेले माधवराव खरे घाबरले ते बाबांच्या अव्हेरण्याला कारण बाबांचे अव्हेरणे हेच खरे मरण आणि म्हणूनच ह्यावर अन्य उपाय नाही हे जाणणारे माधवराव जगण्याची आशाच सोडून देतात. इतके आपल्या साई माऊलीशी वात्सल्याने जोडला गेलेला बाबांचा लाडका भक्त म्हणजेच शामा बाबांचा शब्द ऐकतो राही निर्भय निश्चिंत मानस |ठेवी मजवरी विश्वास | त्यामुळे अशा प्राणांतिक अवस्थेतूनही माधवराव देशपांडे सहीसलामत बाहेर पडतात कारण त्यांचा दृढ विश्वास कर्ता हर्ता गुरु ऐसा. माधवरावांचे बंधू बापाजी यांच्या पत्नीस ज्वराने ग्रंथी आलेला प्रसंग जिवावरचा व त्या काळी त्वरित उपचार मिळण्याची परिस्थिती नाही अशी सर्व परिस्थिती तसेच माधवरावांना काही औषधी झाड पाल्याची माहिती असल्याने बापाजीने रातोरात माधवरावांकडे धाव घेतली व घडला प्रकार सांगितला परंतू

प्रसंग बरवा वा बिकट | कार्य असो इष्टानिष्ट |

आधी साईस पुसावी वाट | परिपाठ हा धोपट शिरडीत |

मग ते जैसे जैसे कथिती | आचरावे तैसे स्थिती |

तेच भक्तसंकट निवारिती | वर्णावे किती अनुभव |

ह्या नित्य पाठानुसार माधवराव तडक जातात ते बाबांकडे कारण त्यांना पूर्ण ठावूक होते कि, एका साईकृपेवीण | औषधीस गुण नाही | म्हणूनच बाबांचा शब्द प्रमाण मानून नि:शंकमनाने बापाजी बरोबर उदी पाठवून देतात व बाबांची आज्ञा घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळीच बापाजीच्या घरी जातात व ते पाहतात तर काय बापाजीची बायको चुलीजवळ काम करते आहे अगदी अवघड अश्या ह्या प्रसंगातही त्यांचा बाबांवरील दृढ विश्वास अढळ राहिला कारण एकच कर्ता हर्ता गुरु ऐसा हा पूर्ण विश्वास. संपूर्ण साईसच्चरितात खरे म्हणजे हाच दृढ विश्वास अनेक प्रसंगातून आपणास हेच स्पष्टपणे प्रतीत करतो कि

एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा |.

शेतातील सर्व धान्य साईचरणी अर्पण करून त्यातील बाबा देतील तेवढेच धान्य आपले मानून त्यावर आपली गुजराण करणारा बाळाजी पाटील नेवासकर व त्याचाच विश्वासाच्या पुढे चालणारी त्याची पत्नी आपल्या पतीच्या वर्षश्राद्धास अंदाजापेक्षा जास्त माणसे आल्यावर शिजवलेले अन्न कमी पडू नये म्हणून मुठभर उदी शिजवलेल्या अन्नात टाकून संपूर्ण चिंता सदगुरू बाबांच्या चरणी समर्पित करून निश्चिंत झाली ती एकाच विश्वासातून कर्ता हर्ता गुरु ऐसा. अशा अनेक कथा साईसच्चरितात आपणांस स्पष्टपणे एकच गोष्ट सांगतात कि जया मनी जैसा भाव | तया तैसा अनुभव | हा भोळा भावच सिद्धीस जातो म्हणूनच पुढे येण्याऱ्या कठीण काळास आम्हांस सामना करता यावा ह्यासाठीच परमपूज्य बापू आमच्या कडून ह्या निश्चयाची अपेक्षा करतात कि एकच भाव असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा | कारण हा एकच भावच सदगुरूंना आमच्या जीवनात कार्यरत करतो, आमच्या जीवनाच्या सूत्रधार बनवतो म्हणून

एकदा त्याची धरत्या कास | पायी ठेवित्या पूर्ण विश्वास |

मग शिष्यांची चिंता तयास | नलगे सायास कराया |

सर्वथैव वाहून घ्या पायास | भय नाही मग त्यास |

केवळ तोच तयाचा आत्मविश्वास | परिश्रमास लाववी |

हे पूर्ण ध्यानात घेऊन कर्ता हर्ता गुरु ऐसा हा आत्मविश्वास दृढ केल्यास चिंतेचे कारण उरतच नाही कारण आता सर्व काळजी तोच घेत असतो. म्हणूनच अश्या कठीण प्रसंगात आम्ही विचलित होवू नये, डगमगून जावू नये, विश्वास कमी होवू नये म्हणून आम्हांस सुस्पष्टपणे ग्वाही दिली आहे कि, मी तुला कधीच टाकणार नाही ही सदगुरुंची ग्वाही म्हणजेच आमचीच श्रद्धा अधिकाधिक दृढ होण्यासाठी बापूंनी दिलेली खात्री तसेच श्रद्धेसोबत हवी असते ती सबुरी, मनाची चंचलताच आमच्यातील सबुरी डळमळीत करते मनात विकल्प उत्पन्न करते, शंका निर्माण करते परंतू आपण जरी सामान्य असू तरी आमचा बापू मात्र हे पूर्णपणे जाणूनच त्यावरही उपाय करतो आणि आमच्यासाठी मंत्र स्वरुपात ग्वाही देतो कि, आमचा बापू हळूहळू आमच्यासाठी सगळं काही नीट करत आहे.

ह्या दोन स्पष्ट ग्वाहीतून हा परम कनवाळू सदगुरू आम्हांस स्पष्ट पणे सांगत आहे कि, तुमचा मी भर वाहीन सर्वथा, नव्हे हे अन्यथा वाचन माझे म्हणूनच उगाचच मी पणाचा भार वाहून व्यर्थ कपटी होण्यापेक्षा सोप्यातला सोपा उपाय आचरण्याचा प्रयास करू कारण त्यासाठी नलगे साधन्संपन्नता | नलगे षटशास्त्र चातुर्यता | एकची विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा |

Vrinda Takalkar

unread,
Oct 26, 2012, 1:54:49 PM10/26/12
to saithegui...@googlegroups.com
एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा 
लहानपणापासूनच आपले आई आणि वडील सकाळी उठल्या बरोबर आपल्याला देवाला नमस्कार करायला सांगतात.पण हा नमस्कार का करायचा,हा नक्की कोणापर्यंत  पोचतो हे लहान वयात आपल्याला आणि अर्थातच सर्व देवांच भक्ती करणाऱ्या आपल्या आई-वडिलांना हि बहुदा माहित नसतच.साइसत्चरित्र वाचून आत्ता कुठे आपण हे समजून घेऊ शकत आहोत कि या सद्गुरू तत्वापुढे कोणीच मोठ व श्रेष्ठ नाही.मातृवात्साल्याविन्दानाम या ग्रंथात पण असच उल्लेख आहे.आपण ज्यांना देव म्हणून देव्हाऱ्यात ठेवतो व नित्य पूजा कतो ते सर्व शिवात्मे आहेत आणि त्यांना परमात्म्याने त्यांच्या कार्याची दिशा व मर्यादा घालून दिल्या आहेत म्हणूनच साई सत्चारीत्रातील ओवी मनोमन पटते. 
"इतर देव ते सारे माईक | गुरूची शाश्वत देव एक | चरणी ठेवीत विश्वास देख | रेखेवर मेख मारी  तो ||"
पण हा विश्वास निर्माण होण्यासाठी भक्ती आणि भक्तीच आवश्यक आहे.पूर्ण प्रेमाने त्या परमात्म्याचे केलेले स्मरणाच आपल्या मदतीला येते.अशी भक्ती करण्यासाठी आपल्या कडे कोणतीही चातुर्यता,साधन संपन्नता
लागत नसून फक्त प्रेम पूर्वक विश्वास आवश्यक असतो .कोणत्याही संकटा पेक्षा माझा बापू मोठा हे तत्व संकटातून बाहेर पडल्यावर तर कळताच पण त्यातून पार पडत असताना हि माझा सद्गुरू माझ्या बरोबर आहे या विश्वासाने मनात कोणतीच भीती राहत नाही.माझ्या संकटाशी लढायला मला तो कधीच  एकटा सोडत नाही.उलट तो माझा कवच बनतो,तोच युद्ध करतो,संकटातून बाहेर पडल्यावर कवतूक हि करतो.माझा मायबाप बापू माझ्या बरोबर आहे या एकाच विश्वासाने मनाला सामर्थ्य येते.किती तरी आपल्या ताकदीच्या बाहेरची कामे आपण सहज करू शकतो.त्यात यशस्वी होतो पण त्या यशामागे खरे कर्तृत्व   माझ्या सद्गुरूंचे असते.श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज असेच सांगतो कि हा परमात्मा मला हि ताकद पुरवत असतो म्हणून कोणत्याही कार्याच्या सुरवातीला,कार्य चालू असताना,व कार्य संपल्यावर ते सर्व फक्त "त्याच्या" चाराणापाशीच  मला समर्पित करायचे आहे.
नाहं कर्ता हरी कर्ता ,हरी कर्ता हि केवलं,ओम हरी ओम तत्सत.
हरी ओम.
वृंदा केदार टाकळकर
पुणे  

Samirsinh Dattopadhye

unread,
Nov 2, 2012, 2:01:24 PM11/2/12
to saithegui...@googlegroups.com
The stories and incidents depicted in the Shree Saisachcharit root the bhakta's faith ever more resolutely and his bhakti at the Sadguru's feet, ever more firm and intense. Numerous such blessed moments, such instances of grace form part of the lives of Sadguru Shree Aniruddhabapu's bhaktas too. Many of these 'special moments' have appeared in the Special Issues and many more are regularly published in the 'Krupasindhu' magazine. Some can even be watched on 'Aniruddhabapu videos' – the Youtube channel. The narrations of these blessed moments are not just guidance for the shraddhavaan, they serve above all, to anchor firmly, the bhakta's faith and endurance at the Sadguru's feet.

And faith and endurance are in fact fortitude, which in turn, is nothing but an indication of the firmly anchored bhakti of a bhakta.

The grace of Sadguru Sainath cured Saibhakta Dr. Pillai of the guinea worms and Sadguru Bapu's grace cured Bapubhakta Dr. Rajiv Karnik of his lung cancer. We realize that a parallel can be drawn between these instances; they are similar and comparable. So it is with the incident where Sadguru Sainath rescued the ironsmith's child from the fire by putting his hand in the burning flames and the one where Mrs. Animaveera Shettigar's son fell down from the 3rd floor and was yet safe, totally unhurt. Sadguru Sainath in His own way, forewarned Shree Balasaheb Mirikar and saved him from a snake bite and Bapu forewarned Shree Ankushsinh Choudhary that he ought to stay away from water during his stay in Thailand which saved this Bapubhakta from a grave mishap.

Now, I wish that we study and discuss on the forum, the value "May we have the one firm and complete faith that the Sadguru alone is the Doer; He alone, the Protector" (Ek vishvas asawa purta, karta harta guru aisa) in the context of the similarity that we draw between the moments of grace that the bhaktas of Sainath had been blessed with and those that Bapubhaktas have been blessed with.

Samirsinh Dattopadhye

unread,
Nov 2, 2012, 2:02:09 PM11/2/12
to saithegui...@googlegroups.com
श्री साईसच्‍चरितामध्ये अनेक भक्तांच्या गोष्टी येतात ज्यामुळे भक्तांची श्रध्दा दृढ होत जाते आणि सद्‌गुरुचरणी भक्तीही दृढ व्हायला लागते. सद्‌गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या भक्तांना असे अनेक अनुभव आलेले आहेत. अनेक अनुभव विशेषांकामधून आले आहेत आणि अनेक अनुभव कृपासिंधुमध्येही येतात. त्याशिवाय हे अनुभव आपल्या "अनिरुध्द बापू व्हिडीयोज" युट्युब चॅनलवर देखील पहायला मिळतात. हे अनुभव प्रत्येक श्रध्दावानाला मार्गदर्शक तर असतातच शिवाय सद्‌गुरुचरणी श्रध्दा आणि सबुरी दृढ करणारेही असतात.

ही श्रध्दा व सबुरी म्हणजे धैर्यशीलता, भक्तांच्या दृढ झालेल्या भक्तीचे प्रतीक असते. श्रीसाईसच्‍चरिताच्या अभ्यास करताना आपल्या लक्षात येते की साईभक्त डॉ. पिल्लई यांचा नारू सद्‌गुरू साईनाथांच्या कृपेने बरा होणे व बापूभक्त डॉ. राजीव कर्णिकांचा फुप्फुसाचा कर्करोग सद्‌गुरू बापूंच्या कृपेना बरा होणे यात साम्य आहे. तसेच श्री साईसच्‍चरितातील लोहारणीच्या पोराला सद्‌गुरू साईनाथांनी आगीच्या भट्टीत हात घालून वाचविणे व बापूभक्त श्रीमती अनिमावीरा शेट्‍टीगार यांचा मुलगा ३र्‍या मजल्यावरुन पडूनसुध्दा सद्‌गुरु बापूंच्या कृपेने काहीही इजा न होता सुखरुपपणे वाचणे यात देखील साम्य आहे. श्रीसाईसच्‍चरितातील साईभक्त श्री. बाळासाहेब मिरीकर यांना सद्‌गुरु साईनाथांनी पूर्वसांकेतिक सूचना देऊन संर्पदंशापासून वाचविणे व बापूभक्त श्री. अंकुशसिंह चौधरी यांना त्यांच्या थायलंड दौर्‍यादरम्यान पाण्यापासून लांब राहण्याची पूर्वसांकेतिक सूचना देऊन बापूंनी नौका अपघातातून वाचविणे यातसुध्दा साम्य वाटते.

या आपल्या फोरममध्ये माझी अपेक्षा अशी की आता आपण साईनाथांच्या भक्तांना आलेले अनुभव आणि बापूभक्तांना आलेले अनुभव यांची सांगड घालत, "एक विश्वास असावा पुरता, करता हर्ता गुरु सा" हे तत्व सुस्पष्ट करुया.
Message has been deleted
Message has been deleted

Madhuriveera Parkar

unread,
Nov 5, 2012, 8:45:34 AM11/5/12
to saithegui...@googlegroups.com
,हरि  ओम 
एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरू ऐसा .....
 
बापूंनी आपल्याला दिलेला हा संकल्प...सद्गुरू वरचा  दृढ विश्वास हा भक्ताचं कल्याण करतो.
साई -सच्चं रित्रा तील सर्व भक्तांनी सद्गुरू साई नाथांवर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे .सद्गुरू माझ्या साठी जे करतील तेच 
योग्य.आणि बाकी सर्व अयोग्य आणि म्हणूनच ते श्रेष्ठ भक्त -श्रेष्ठ श्रद्धावान ठरले.

माझ्या आयुष्याचा कर्ता -करविता माझा सद्गुरूच आहे .माझ्या आयुष्यात जे जे घडते ते त्याच्याच इच्छेने ..

जे जे मजसाठी उचित  ।तेची तू देशील खचित ।
हे मात्र मी नक्की जाणीत ।नाही तक्रार राघवा ।।

९व्या अध्यायात आपण बघतो , ज्या ज्या भक्तांनी साई -नाथांवर पूर्ण विश्वास ठेऊन त्यांची आज्ञा मानली 
त्यांचे कल्याण झाले .

आणि म्हणूनच सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेऊन आपला जीवन प्रवास सुखाचा होतो. 


माधुरीवीरा पारकर ,
पुणे 
Message has been deleted
Message has been deleted

anant Gonbare

unread,
Nov 5, 2012, 9:18:11 AM11/5/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ॐ दादा, तुमची पोस्ट वाचली..... आणि फ्लॅशबॅकमध्ये जावे तसे ८-९ वर्षापूर्वीचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले......बापू कृपेने त्यांचा सहवास तर लाभला होता.... पण मनात त्यांच्याबद्दल जो विश्‍वास दृढ व्हायला हवा तो काही झालेला नव्हता.. त्यावेळेस बापूंचे अनुभव जुन्या भक्तांकडून ऐकण्यास मिळत असत.. त्यातच आपल्या प्रविणसिंह वाघ यांचा अनुभव ऐकण्यास मिळाला होता.... आणि बापूंनी त्यांची पिशाच्चापासून केलेली सुटका आणि ती ही हॅपीहोम मध्ये काही श्रद्धावानांसमोर मिटींगमध्ये उपस्थित असताना...... एखाद्या नवीन भक्ताला ही गोष्ट पचनी पडण्यास कदाचित अवघड जाईल....पण मीे मात्र त्यावेळेस बापूच्या या अकारण कारुण्यामुळे भारावून गेलो होतो..... त्याचे कारण असे..... हा अनुभव ऐकण्याच्या काही दिवस आधीच माझ्या वाचनात श्रीसाईसच्चरितातील 'उपोद्धात' या सदराअंतर्गत काशिराम शिंपी या साईनाथांच्या परम भक्ताची एक कथा वाचनात आली (पान नं ३ ते ६)... ह्या कथेमध्ये या भक्तावर काही लुटारूंनी तलवार, कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला केला होता.... बाबांवर असलेल्या अतुट विश्‍वासामुळे हे भक्त त्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचले होते..... जेव्हा काशीराम यांची चोरांशी झटापट चालली होती  तेव्हा बाबांनी शिर्डीत आकांत करून सोडला होता.... एकसारख्या शिव्या, बोंबा मारणे व इतर क्षोभाचे प्रकार बाबांनी चालू केले होते...जवळ असलेल्या मंडळींनी ताबडतोब ओळखले होते की, कोणत्यातरी प्रिय भक्तावर अतिमहासंकट आले आहे.. व हा सगळा आकांत त्या संकटातून भक्ताचे रक्षण करण्यासाठीच आहे आणि तसाच प्रकार झाला. चोर हत्यारबंद असताना काशिरामने जिवंत सुटणे कोणालाही शक्य वाटले नसते; पण तारणार्‍यापुढे मारणार्‍याचे काय चालते....... अगदी हीच स्थिती मला प्रविणसिंहांच्या अनुभवामध्ये जाणवली... प्रविणसिंहांवर आलेले संकट (अतिमहासंकट)..... हॅपीहोममध्ये मिटींगमध्ये बसलेले बापू ... बापूंनी केलेला तांडव....आपल्या हातातील भिरकावलेली साखळी  मला काशिराम शिंपींचीच आठवण करुन देत होती......  आजही साईसच्चरित हाती घेतले की उपोद्धात वाचले जात नाही पण बाबांवर अतुट विश्‍वास असणारे काशिराम शिंपी आणि परमपूज्य बापूंवर अतुट विश्‍वास असणारे श्री प्रविणसिंह वाघ डोळ्यासमोर आल्यावाचून राहत नाहीत..... आणि इथेच खरंतरं बापूंवरील विश्‍वासाची मूहूर्तमेढ माझ्या आयुष्यात रोवली गेली हे मी ठामपणे सांगू शकतो..... आणि पुढे बापूंवरील विश्‍वास वाढला की नाही हे बापूच सांगतील..... पण दादा तुमच्या ह्या फोरमच्या निमित्ताने मला माझ्या आयुष्यात खर्‍या अर्थाने शिरलेला बापू तुमच्यासमोर मांडता आला.... ही सुद्धा त्याचीच इच्छा.... दादा तुमचे शतश: आभार..... बापू, आई, दादा आय लव्ह यू...... श्रीराम......

Sandeep Mahajan

unread,
Nov 5, 2012, 12:07:50 PM11/5/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om! Bapu has said that in the Kalyug man has the curse of forgetting what all He does for us. विस््मृती चा शाप.... And that's the reason that even after getting so many experiences He still has to remind us again and again Ek Vishvas Asava Purta karta harta Guru aisa..... In a beautiful narration of his experience Mr Vasudeo he shows how he comes out of a situation where he has lost his job by not only getting another one the very next day but a much much better one. Don't forget to watch the narration of Girindrasinh Vasudeo on MSD videos.

Here I can relate this to the Baba's words of assurance - Milel Melii tee nokri when Anna Chinchinikar expresses his concern for Hemadpant's meagre pension and his wanting a job.

What He wants is our Ek Vishwas......

Shree Ram

DRYOGESHKHANDALKAR

unread,
Nov 6, 2012, 1:00:22 PM11/6/12
to saithegui...@googlegroups.com
yes.shriram smairsinh.

Samirsinh Dattopadhye

unread,
Nov 7, 2012, 2:32:41 AM11/7/12
to saithegui...@googlegroups.com
श्री साईसच्चूरित में कई भक्तों की बातें आती हैं जिसकी वजह से भक्तों की श्रद्धा दृढ होती जाती है और सदगुरुचरणों में भक्ति भी दृढ होने लगती है । सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं । कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं । इसके अलावा यह अनुभव अपने "अनिरुद्ध बापू वीडियोस" यूट्यूब चैनल पर  (http://www.youtube.com/user/manasamarthyadatavid/videos?flow=grid&view=1) भी देखे जा सकते हैं । यह अनुभव प्रत्येक श्रद्धावान के लिए मार्गदर्शक होने के साथ साथ सदगुरुचरणों में श्रद्धा और सबुरी को दृढ करते हैं l

इस श्रध्दा एवं सबुरी अर्थात धैर्यशीलता (धीरज), भक्तों की दृढ भक्ति का प्रतीक होता है । श्रीसाईंसच्चरित का अध्ययन करने से यह बात समझ में आती है कि साईंभक्त डॉ पिल्लेजी  का नारू सदगुरु साईनाथजी की कृपा से ठीक होना एवं बापूभक्त डॉ राजीव कर्णिकजी के फेफड़ों का कर्करोग सदगुरु बापूजी की कृपा से ठीक होना इन में समानता है । इसी तरह श्री साईंसच्चरित की लोहारन के बेटे को सद्गुरु साईंनाथजी ने अग्नि में हाथ डालकर बचाना एवं बपूभाक्त श्रीमती अनिमावीरा शेट्टीगारजी का बेटा 3री  मंज़िल से गिरा फिर भी सद्गुरु बापू की कृपा से उसे कोई ईजा नहीं हुई और उसका कुशलता से बचना, इन में भी समानता है। श्री साईंसच्चरित में साईंभक्त श्री बालासाहब मिरीकरजी को सद्गुरु साईंनाथजी ने पूर्वसांकेतिक सूचना देकर सर्पदंश से बचाना और बापूभक्त श्री अंकुशसिंह चौधरीजी को उनके थाईलैंड यात्रा के दौरान पानी से दूर रहने की पूर्वसंकेतिक सूचना देकर बापू का उन्हें नौका दुर्घटना से बचने में भी समानता है। 

हमारे इस फोरम में मेरी अपेक्षा है की अब हम साईंनाथजी के भक्तों को आए हुए अनुभव और बापूभक्तों को आए हुए अनुभवों के संबंध जोड़कर "एक विश्वास रहे पूराकरता हर्ता गुरु सा" यह तत्व सुस्पष्ट करें ।

Sudhirsinh

unread,
Nov 7, 2012, 4:55:24 AM11/7/12
to saithegui...@googlegroups.com
Ek Vishwas Asaava Purata.
 
The line is beautiful. 108% true. But --
 
Let me honestly share an incident. My daughter who was studying in USA wanted to visit Bangla Desh as a part of her project on Poverty and Micro Finance.
 
She sent by courier, her passport to the Bangla Desh embassy in Delhi. After waiting for the mandatory period, she phoned to fnd out the status. She was told by the embassy that they had not received her passport. The phone was put down.
 
All of us panicked. Now how will she go back to USA? Her air tickets were booked.
 
How to raise 1.5 lakhs quickly? How to send her to Delhi alone with so much money? Where will she stay? With whom? So many questions !!!!  
 
I work in Muscat. I rushed to the Ambassador of Bangla Desh for help. He told me flatly: "Your daughter's passport is valuable because of the US visa. Ask her to go to Delhi with 1.5 lakhs and to plead. She may get her passport back" 
 
"MAY? Not WILL?" I asked.
 
"You Indians treat Bangla Deshis so badly that here is an opportunity for us to get back at you. She should have deposited the Passport in person. Not couriered it" the ambassador told me without any emotion..
 
I came back to my office totally defeated with perspiration on my face.
 
Mani, my secretary asked me " what happened Sir". I told him the whole saga..He must have sensed that I was shattered and close to tears.
 
BAPU WILL TAKE CARE. Mani said.
 
And Bapu did. 
 
The next day, when my daughter went to Delhi, she got  her passport without having to pay anything.
 
Why was I defeated and why did Mani have the confidence? Why did he believe in the maxim - Ek vishwaas asava purataa, karta, harta, guru aisa? He had never seen Bapu.
 
A few days before, Mani had come to me frantically and said. "Sir, my pregnant wife is in Kerala. She has completed 9 months of labour. The inuspicious fifteen days will start tomorrow. What shall I do if the baby is not born today?"
 
I looked at Bapu's photo on my table. I called Mani and my staff members. We held hands and I chanted Ghorkashttoddharanstotra for Mani's wife.
 
In half an hour, Mani came to my cabin, cheerfully with sweets and the news that his wife had delivered. And that both the baby and the mother were fine.
 
Mani has more faith than I have. I only have the ego, that I am a Bapu devotee.
 
I have to chant "Ek vishwaas asaava purata, kartaa, harta, guru aisa" many many more times. 
 
Hari Om!
 
 .
 
 
 
 
 
 

Sandeep Mahajan

unread,
Nov 7, 2012, 6:44:55 AM11/7/12
to saithegui...@googlegroups.com
Shree Ram,
 
Indeed Sudhirsinh.... Its not only with you but most of us- we are very confident about our Sadguru when it has to be told to others but when the calamity comes on us we run helter skelter and sometimes even have audacity to ask- Ka ho Baba aise kele? No wonder, Parampujya Bapu had to rake this up at the fag end of the year and remind us to engrave Ek Vishwas asava Purta, karta harta Guru aisa.
 
Why do we do this? Even Draupadi too panicked and went to so many others before she got reminded of Lord Krishna. We panic and the moment we panic our mind goes astray. If in real terms we are able to imbibe this sentence in ourselves we will take all problems, calamities as Bapu's wish which again gives us a forebearance that if He has given the problem He only will take care of that. And this I feel is our greatest support.
 
Kaka saheb Dikshit was told to approach Baba to get cured of lameness of his leg but Dikshit wanted his manacha Langadepana- fickleness of mind to be cured. And thats what Bapu wants us to get cured off when He requests us to say Ek Vishwaas asava Purta karta harta Guru aisa. Indeed....Bapu aisa!
 
 

Sudhirsinh

unread,
Nov 8, 2012, 3:47:20 AM11/8/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om!
 
Like Mani, who reaffirmed my faith (VISHWAS), there have been many such occasions in the past. Even in Muscat, Bapu's real devotees are always around us to reaffirm our Vishwas. 
 
Here is another experience.
 
Suhassinh Dongre helped us start Upasana in Muscat. He came, taped Ram Raksha for us, stayed with us for a few days. Sadhu sant yeti gharaa, tochi Diwali Dasaraa. We understood the meaning of that sentence.  
 
Though it was a holiday, my (tyrant!) boss insisted that I should be in the office. As Suhassinh's time to depart was nearing, I was constantly looking at my watch and furiously making presentations after presentations but my boss was not willing to let me go home. I told him I had a very important guest who needed to be dropped to the airport so that he could catch a plane. But he said "find him a taxi for him". At that response I lost my cool. I must have been really angry because he let me go immediately.
 
Driving like a mad man, I rushed home, picked up Suhassinh but was sure that he would be missing the plane.
With one hand I was driving at 110 plus km, with the other, I was trying to phone the airport manager to hold the plane back and delay the departure if possible. But no luck. Nobody was answering my frantic calls.
 
While all this was happening, Suhassinh was relaxed and smiling and just said "Kaalji nako, Bapu majaa baghat aahet". (Don't worry, it is our Bapu enjoying the fun!)
 
How could he say that? I wondered. How can he be so relaxed and cool?
 
We reached the airport. Even though we were late, as if waiting only for Suhassinh because of some invisible instructions, the airport officials handed him the boarding pass and closed the counter.  
 
Today I realise the maxim - EK VISHWAAS ASAAVA PURATA, KARTA, HARTA, GURU AISA!!
 
Shree Ram!

karan savur

unread,
Nov 11, 2012, 9:00:03 AM11/11/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om Dada,
A guru is one who selflessly guides us on the path of life and bhakti. A guru is like a beacon light which warns us about the shoals in our life. The necessity of a guru is discussed in the 2nd chapter of the Shri Sai Satcharita. When you are blind folded and left to walk on a road with pot holes and ditches it is the guru who holds our hand and guides us as to where we have to put our next step and where we shouldn't. In one of the pravachans P.P. Bapu had told us a story. Once a man questions god that in happier times i can always see two foot-prints walking with me and in sadness i just see my own foot-prints.why so??? that time god replies that in difficult situations it is not you who faces them but it is the Sadguru who faces it. HE hold you in times of difficulties and takes you across all the hurdles. Come what may a Sadguru stands by his Bhaktas 24x7. He is a true friend who is always with us through our ups and downs. Sadguru's love for his children cannot be measured, it is "Aniruddha Prem" which HE showers over his children. Here i am reminded of a verse from a song:
"Gururayachi Preet Nirali, Kahi na Gheta Sare Udhali"

This is what our Bapu does in real life. He does not expect anything from his children but in return has opened his treasure for his Shraddhavaan children. Bapu has always told us "Balanno majha Khajina loota". This "Khajina" is Bapu's true love for his children which will never cease to flow. But who can enjoy this??? The Shraddhavaan who has full faith in Bapu, and imbibes Bapu's principles. The only thing Bapu wants us to follow is 
 एक विश्‍वास असावा पूर्ता, 
करता, हरता गुरु ऎसा
Bapu's word must be "Brahma-Vakya"  for every Shraddhavaan. In this world it is only HE who is our true "Aapta". Bapu wants his children to win over every situation in life. And for this HE always stand by his Shraddhavaan children to guide them, to protect them and to destroy all the obstacles from their life.

Hari Om
Karansinh Savur
Pune Upasana Kendra
Message has been deleted

A. Mohan

unread,
Nov 11, 2012, 12:02:36 PM11/11/12
to saithegui...@googlegroups.com

Hari Om!

It is not just the Gopikas, but every being in Vrindavan craved for Lord Krishna’s captivating and mesmerising raas of flute. That music took them to a timeless zone.Time had frozen for them while they were endowed with the bliss of Godliness.   The banks of Yamuna too reverberated with its resonant music.

The discourses of our beloved Bapu do the same thing for us. There is nectar in every word spoken by Him. There is enough for every one in each and every discourse. That is dispersion of pieces of magnet on you. Being the centre of gravitation, He pulls you towards Him.  Every action of yours thus becomes accountable and answerable.  And there is sufficient pull to re-write the destiny and prarabdhas of our life.

 

As He asked during the Dussera discourse, how much have we imbibed  in ourselves that Guru is the doer, the giver, the one who protects from calamities, (EK VISHWAAS ASAVA PURTA, KARTA HARTA GURU AISA) that He knows, He understands what we do, understands what we think".

What are the ways one can imbibe  those guru mantras?

No business deal –  Don’t hold His feet for rupee appreciation, shares and property price appreciation,  promotion, lottery prize by earmarking a set “margin” or “profit” for Him.  That is your business! For that He has given you the freedom of choice of action, the consequences of which are entirely your own making.  But remember; when you believe that He is the doer and giver, and surrender your desires at His Lotus feet, He will make sure that you always get what is appropriate and necessary for you. There is no quid pro quo here.  He does not need your share or profit.  He needs only  our selfless love and affection which will be converted  into Universal Love.

Sadguru is not a magician to show or take you to a make-believe world.  The magic is in your hands in the form of freedom of choice and independent decision making powers.  But our hands and mind do not always do and form the right action and decision. However,  when you make the teachings, tenets and principles of  Sadguru as part and way of your life, you are not  stuck up, puzzled or unable to move forward. Your problems and worries become His problems and for Him nothing is a problem!  A solution, a right decision will be there soon, be assured! He knows all.

He is not a party to your prarabdha –  Stop complaining that Bapu does not do anything for you or else this misfortune or  pain would not have occurred to me.  Remember, the very fact that you have come into the Sadguru’s fold is an indication that He will ensure that every pain, misfortune, suffering and so on that you are destined to suffer due to your prarabdhas is made bearable.  They will happen only when you are able to withstand it  or when there are enough support mechanism available around. Every Bapu Bhakta will vouch for it! He (Bapu) understands!

He helps you clear your prarabdhas – That is the cardinal principle of Satguru tatva.  Sadguru facilitates cleanse your slate of prarabdhas.  That is possible only when you travel the path shown by Him and realise that nothing can be hidden from Him. We are ordinary human beings prone to make mistakes. The moment you realise and admit the mistakes, the cleansing takes effect.

Don’t make a fuss of it – Support the causes quietly.  Think that it is an opportunity given to  you to contribute for a cause.  Feel happy  that by getting this opportunity, you are getting an opportunity to wash your sin and thus settle the scores with your prarabdhas!  He is the giver!

Shree Ram!

A.   Mohan (Muscat)

karan savur

unread,
Nov 12, 2012, 1:13:54 AM11/12/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om,

Our P.P. Bapu's grace has always been with us. He stands by us always. even in the smallest of nuances in life we can feel his presence in our lives.  Bapu always says,"Mi tula Kadhich Taknar nahi" and this has always come true in each and every shraddhavans case. Here i am reminded of an anubhav of my brother Nayansinh Savur. We had been to Bangalore for a wedding where Nayansinh fell sick. So we took him to a doctor over there and the doctor told us to do his blood test and it came as a shock for all of us that his platelet count had come down to 17000, which otherwise in a normal person is somewhere between 125,000 to 150,000. So the doctors immediately told us that we have to shift him to the ICU. So my father (Shivanandsinh Savur) called Vaibhavsinh Karnik to inform him and seek Suchit Dada's guidance in this relation. In a unknown place where no one was around it was only Bapu who stood by us every second. And in the meanwhile P.P. Suchit Dada told us that after every blood test to keep him updated. Then Vaibhavsinh arranged someone from the Bangalore Upasana Kendra to send us Bapu's photo and Udi, when it we received the photo and the udi we felt that Bapu had assured us that,"Don't worry, I m with you". Then we immediately applied the Udi to Nayan's Forehead and told him to kept the photo under his pillow. Slowly his condition started improving and we informed this to P.P. Suchit Dada. Dada told us that we can shift him to Pune(where we reside) once his Platelet count touches 50000. The doctors warned us that it would be risky for Nayansinh to Travel in that condition but my Father was determined that it is Dada's words to shift him to Pune and hence we have to abide by it. So as soon as the figure touched 50,000 my Father made all the arrangements to get him back. And believe me in the entire journey Nayan didn't face any sort of difficulties. We landed safely and our Shraddhavan friends made all the arrangements so that Nayansinh can be admitted immediately to a nearby hospital. Soon Nayan's health started improving and within a week or so he was back to normal. This is all because of our P.P. Bapu. 
 Similarly Baba cured many People in this way, like in the case of Kaka Mahajani where he was suffering from Diarrhea and Baba gave him a handful of groundnuts to eat. Groundnut otherwise would have aggravated his problems but it happened the other way round, the diarrhea subsided. So here we come to realise that it is the Sadguru's words that cure all the diseases(prarabdha). We have to therefore trust our Sadguru's words and have complete faith that whatever he does is the best for us.

Sudhirsinh

unread,
Nov 13, 2012, 5:38:30 AM11/13/12
to saithegui...@googlegroups.com
To all the experiences and comments, provided by Bapu's devotees, may
I add my learning from the time I caught Bapu's ( I am sorry, I should
say Bapu caught my) hand.

Whatever I used to set out to do, it used to have it's own share of
problems. Resistance, changes to assumptions, lack of resources, so on
and so forth.

Now I realise that projects get started on scale A. They get completed
on a much much bigger scale, faster and better. A square, A cube, A
times n.

Why? and How?

Because now they are not the projects of Muscat Upasana Centre. They are Bapu's projects. And
when they become Bapu's projects, new help rushes towards them, new
resources flow towards them, new ideas come about to complete the
projects faster. From where ? I really cannot tell.

After reading your experiences, now I think I know the answer.

Because now Karta is He! Not me, or any one devotee of Muscat Upasana Centre. If we are given the credit, we have learnt to say IDAM NA MAM. This credit is not mine. IDAM ANIRUDDHASY!
This credit goes to our Satguru Aniruddha!

Shree Ram

Seema Jogdeo

unread,
Nov 14, 2012, 6:03:44 AM11/14/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम  साईसच्‍चरितामध्ये पिशाच दूर केल्याचा अनुभव नाही पण बाबांचा अवतारच अंतर पिशाचाचा नाशासाठी 
झालेला आहे  म्हणून बाबा `नारायण तेली ' हा शब्द एका अन्तस्त वाईट वृतीला म्हणजे अंतर पिशाचाचा निराकरणासाठी 
साई रूप झाल .  म्हणून बाह्य  पिसाचाचा उल्लेख आणि अनुभव होऊन सुद्धा कटाक्षाने टाळले गेले.  हे त्या गुरुतत्वाचे 
कारण आहे .  पण आज सद्गुरू बापू ह्या अंतर पिशाच , बाह्य  आणि अंतर्गत पिशाच ह्या तीनही पिशाचाची कशी वाट 
लावायची हे सांगतात , त्यासाष्टी श्रीगुरुक्षेत्रेम मंत्र  , श्रीगुरुक्षेत्रम  येथे दर्शनाला यायचं  आणि मातृवात्स्ल्यविन्दानाम 
वाचत राहायचं  हेच ते उपाय सांगितलेत .  `मी तुम्हाला कधीच टाकणार नाही ' हि ग्वाही देत सर्व पिशाचाचा 
नायनाट करून काढून टाकीन 
ह्याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे  you tube  वरील अनुभव  ------
प्रवीणसिंह  वाघ  पुणे .........   प्रवीणसिंह  यांना झोंबलेले  पिशाच बापूनी कसे काढले  ह्याचे रसरशीत उदाहरण आहे .
येथे आपल्या लक्षात येईल  कि बाबा आणि बापू कशी सांगड घातली आहे .
सद्गुरू अनिरुद्ध बापू सांगतात :-    तीनही पिशाच झोंबली तरी ती परत काढीन, पण दवाखान्यात मात्र त्याचाच 
जावे लागेल . त्याचावर विश्वास हा ठेवावाच लागेल.

बाधेचे निवारण करणारा हा एकच  - माझे अनिरुद्ध बापू 

    " एक विश्वास असावा पुरता 
       कर्ता  हर्ता  गुरु  ऐसा  "

Keshav Narsikar

unread,
Nov 18, 2012, 6:07:39 AM11/18/12
to saithegui...@googlegroups.com
Dear Anantsinh ,
You have rightly compared Two Anubhavas .The two stories depict the importace of"Ek vishvas asava purta /karta harta guru aisa".  In Kashiram Anubhav some thieves were attacking
 Kashiram (human power) whereas in Pravinsinh's anubhav the attack was by superhuman evil power.Real Sadguru can defeat either, at 
ease.

Message has been deleted

Roopalivira Kadam

unread,
Nov 19, 2012, 12:38:08 PM11/19/12
to saithegui...@googlegroups.com
The attached file is written by my Mother Janabai veera Kadam
Sai_NEW_0001.pdf

Suneeta Karande

unread,
Nov 20, 2012, 2:14:32 PM11/20/12
to saithegui...@googlegroups.com
An experience of Hemantsinh and Manasiveera Kawle-  How devotee's VISHWAS at his Sadguru's lotus feet survives one's life from death tragedy .....EK VISHWAS ASAVA PURTA KARTA HARTA BAPU AISA!!!!! SAKSHAT KAL has returned back... Heart touching experience... giving experience of Ovi from ANIRUDDHA CHALISA BHAGAT NE JAB HI NAM PUKARA TAB HI BAPU DUKH NIWARA.....DATTATREYA is always known as SMRTUGAMI - the one who appears with SMARAN....My BAPU shows how SMRTUGAMI is SADGURUTATVA..... 
ECTOPIC PREGANANCY - an abnormal pregnancy that occurs outside the womb (uterus). The baby (fetus) cannot survive but survival of patient i.e. mother is also impossible.... Doctor's words ... prepare your mind ...patient's survival is impossible and just before operation when Hemantsinh expressed his 108% VISHWAS on BAPU .... situation dramatically turned by 360 degree.....2.5 to 3 litres blood in utreus, blood clotsof one full dish....chances of brain hammerage...SUCHIT DADA's promising words....don't worry at all (KAHI KALJI KARU NAKOS) .... and Manasiveera's miraculous escape from death's jaw..... 
Here reminds me a story from Shreesaisaccharit narrated in Adhyay 34 by Hemandpant  that a man from Prabhu Kayastha cast , staying at Mumbai, went to Shirdi to solve pregnancy problem of his wife, as advised by well-known Sai devotee " SHREERAMMARUTI" . On the delivery day , the passage of delivery was blocked and severe labor pains started .Neighbor women started calling SAIBABA and Baba's Udi dissolved in water glass made miraculous escape of that woman. Though child was born dead , she was escaped from death. 
In Hemantsinh's experience, Bapu's Udi was not offered to Manasiveera. But Hemantsinh's firm trust at lotus feet of BAPU - that Ek Vishwas -108% on BAPU played role of UDI and Manasiveera's life was saved.  
Really SADGURUTATVA is always one and Unique. Names may be different , dress may be different as per new era , but devotee's Trust proves that Ek Vishwas Asava Purta, KARTA HARTA GURU AISA..... 

Suneeta Karande

unread,
Nov 21, 2012, 11:55:48 PM11/21/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम.
सहज चाळताना लक्षात आले की मागच्या वर्षी परम पूज्य समीरदादांनी अधिवेशनाच्याच्या पहिल्या दिवशी (१३-११-२०११) श्रद्धावानांना अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन केले होते -पिल्लेंच्या गोष्टीतुन काय शिकायचे ते परमपूज्य समीरदादांच्या शब्दांत (अधिवेशनाचा काही भाग)
आमच्या जीवनात हे सदगुरुंबद्दलचे तर्क- कुतर्क २ प्रकारे काम करतात. 
१) भक्तीमार्गात नव्याने येणारा भक्त
२) भक्तीमार्गात स्थिरावलेला भक्त
दुसरा प्रकार म्हणजे भक्तीमार्गात स्थिरावलेला भक्त.  आपण श्रीसाईसच्चरिताच्या आधारे कसे ते पाहू या. 
Doctor  पिल्ले- हा तसे पाहिला गेले तर भक्तीमार्गात स्थिरावलेला भक्त आहे, वरच्या  पातळीवर गेलेला भक्त. Doctor  पिल्ले साईनाथांच्या अत्यंत जवळचे. बाबांबरोबर सततचा सहवास. बाबा त्यांना प्रेमाने भाऊ म्हणत. चिलीम ओढताना, विडी ओढताना बाबांना सतत भाऊ बरोबर लागे. भाऊशिवाय बाबांना करमत नसे. हे पिल्ले बसतात कोठे? कठड्याबाहेर बसायला जागा भाऊचीच. म्हणजेच सख्यभक्तीत बाबांच्या अगदी जवळ पोहोचलेला. पण नारु होतो. पराकोटीच्या वेदना - सहन होत नाही. मरण द्या, 
ताकद नाही सहन करण्याची , पुढचे १० जन्म येउ दे, भोग भोगीन. हा जन्म पुरे आता, पुढच्या १० जन्मात भोग भोगीन. साईनाथ निरोप पाठवतात. पिल्लेंची ही गोष्ट नीट बघा. काय विचारतात ते बाबांना - शुद्धाचरणे वर्तता , का मज ही अवस्था ? दुष्कर्माच्या वाटे न जाता , का मजही दु:खावस्था?
येथे साईनाथांना Doctor  पिल्ले प्रश्न विचारतात. का ?  साक्षात "त्या" ला  का ? हा प्रश्न आला. तरी देखील बाबा म्हणतात तु निर्भय रहा, निरोप पाठवितात आपण दोघे मिळोन भोगु. मोक्ष, स्वार्थ, परमार्थ देण्या मी समर्थ असतांना, हाच तुझा का पुरुषार्थ? ही माझी (पिल्लेंची) अवस्था का ?   हाच का तुझा माझ्यावरचा विश्वास? सख्य मार्गात राहूनही माझ्यावरचा विश्वास ढळला का?
नंतर साईनाथ (काऊची) गोष्ट घडवुन आणतात. येथे पिल्लेंच्या डोक्यात कळ गेली, ती आम्हांला दिसली. पण सगळ्यात महत्त्वाचे ( माझे) साईनाथ काय भोगतात (माझ्यासाठी) ? काय भोगले "त्या"ने? पिल्लेंची वेदना खुप वर गेली, कळ मस्तकात भिनली, पण साईनाथांनी काय भोगले?
अविश्वासाचे दु:ख !!!!!! हे सदगुरुला होते, तेच हे दु:ख, हा सदगुरुंवरचा भोग. साईनाथांची इच्छा नसतानाही हा प्रसंग घडवून आणावा लागला. ह्या जन्मात १०-१५ दिवस (अजुन) हा भोग भोगावा लागला असता - पण ती ( माझी ) ताकद संपली. कोठेतरी "त्या" च्यावरचा हा विश्वास ढळला
- हीच ती १ पाउली वाट - हाच भक्ताचा अनुभव स्वानुभव - "प्रमाण" बनतो, तेव्हाच कुशंकीत मन सुधारते. चंचल मन, कुशंकी मन ताळ्यावर येउन प्रगती होते. 
पिल्ल्यांचा आत्मविश्वास ढळला जातो, "त्या"लाच का हा प्रश्न विचारला जातो.
भक्ती ही बाभुळवनीची वांट कांटा टाळोनी टाका पाय - एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा - हीच ती एक पाउली बाभुळवनीची वांट !!!!
हे सख्य भक्तीचे उदाहरण- येथे शारिरीक व्याधी दूर करण्यास वेळ तरी आहे.
पण तशीच कथा आपण बापू भक्ताच्या आयुष्यात घडतांना पहातो - Doctor  राजीव कर्णिक ह्यांच्या रक्ताच्या कर्करोगाच्या अनुभवात. Doctor च्या पत्नीच्या मनात बापू चरणी भरपूर विश्वास आहे, पण Doctor  राजीव कर्णिक  ह्यांच्या पूर्व संस्कारांमुळे तसा विश्वास नाही, तरीही बापू मदतीला धावुन जातातच. हाच तो अकारण कारुण्याचा महासागर, बापू स्वत: त्यांना साक्षात आल्हादिनी नंदाईंना भेटायला पाठवुन निरोप देतात की तुला हे युद्ध जिंकायचे आहे, योद्धा बनुन fight दे. नंतर पुढे स्वप्नात जाउन बापू स्वत: मोठा झाडू घेउन फुफुत्से साफ करून आत्मविश्वास ही वाढवितात. 
एवढेच नव्हे तर पुढे गणपतीच्या वेळी घरी आलेल्या Doctor  राजीव कर्णिकांना प्रेमळ सल्ला देतात की पुस्तकांच्या मधील गोष्टींच्या पुढे जाउन ही काही घडु शकते, जेव्हा " त्या" ची यंत्रणा कार्यरत होते. 
येथे आपण शिकायला हवे कि आमचा आमच्या सदगुरुंवर, बापूंवर किती विश्वास आहे? 
आम्हांला विश्वासाची नितांत आवश्यकता आहे. नाही तर बापूंना वर्षाच्या सुरुवातीलाच हा संकल्प घालुन द्यावा लागलाच नसता - एक विश्वास असावा पुरता , कर्ता हर्ता गुरु (बापू )ऐसा. 
श्रीसाईसच्चरित आणि बापू भक्तांचे अनुभवातील साधर्म्य , सारखेपणा हेच शिकवितो कि बापू चरणी विश्वास घट्ट करु या , शेंडी तुटो वा पारंबी बापू तुला आम्ही कधीच विसरणार नाही, आमचा हा विश्वास बापू चरणी अढळ राहो हीच माय चण्डिकेच्या चरणी प्रार्थना !!!   माझ्या हातुन कधीही बापूंना का हा प्रश्न विचारला जाउ नये एवढी तरी काळजी मी नक्कीच घेउ शकतो, माझ्या देवाला, माझ्या सद्गुरुरायाला कधी मी त्यांच्या वर अविश्वास दाखवितो हे त्यांच्या काळजाला घरे पाडणारे वर्तन घडू नये ह्यासाठी हे नंदाई तुच आम्हांला जागृत ठेव आणि सावधपणाची मूर्तिमंत आकृती असणार्य़ा सुचितदादांनी आम्हांला वेळीच सावध करावे हीच परमात्मत्रयीच्या चरणी विनंती ...
मनापासून कोटी कोटी श्रीराम दादा , ह्या अनोख्या मार्गाने बापू चरणांशी आमची नाळ दृढ करण्यासाठी...   
    

Suneeta Karande

unread,
Nov 23, 2012, 9:17:25 AM11/23/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om. Sai's words - Promise ... wherever you may be , whatever you may be doing, I realize your every act at the same moment when it comes to your mind....SADGURUTATVA remains same apart from time /kal and Keeps HIS promise ....Though bhakta is from an
y state, she/he may be knowing different language …. There are no barriers for Bhakti on Devyan Path and once (SADGURU) HE decides , bhakta has to come to HIM somehow or HE pulls that bhakta towards HIM by tying a rope to legs of a sparrow child… 
In Shreesaisaccharit , in Adhyay 29, we read a story of Madrasi woman who took surrender at Sai’s feet and she got Darshan of Sakshat RAM PRABHU instead of SAIBABA… Very similar on these grounds we find that in tamil experience of Lataveera ( Bapu devotee)that she too realized that her BALAJI and BAPU are no more different..... BAPU devotee Samir from Mumbai informs about BAPU to Lataveera in her difficult time in 2002-03 … all sorts of traps like business tensions, personal problems ….Bhakti was there , devotion towards Balaji, Laxmi and Sarswati but no belief on BAPU as not seen personally ….. feeling of Someone is with me always and make my every act excellent … suddenly divine touch of SADGURU BAPU was realized and felt by herself in 2003 during her daily 2 minutes prayers….BAPU pulled her at HIS feet ….life changed totally and at last surrender at HIS lotus feet…. Tamil experience of Lataveera and story of Madrasi devotee of Saibaba ... both teaches us that firm trust on any GOD/Goddess  is finally accepted by PARMATMA or KESHAV , who is beyond any shape.... SADGURUTATVA is an ocean of AKARAN KARUNYA.... what is required?Only TRUST ... EK VISHWAS ASAVA PURTA KARTA HARTA GURU AISA ..... surrender at HIS feet and your life gets totally changed by 360 degrees .... Yes , because AMCHA BAPU HALU HALU AAMCHYASATHI SARV KAHI NEET (THIK) KARIT AAHE  and HIS PROMISE .... I WILL NEVER FORSAKE YOU... MEE TULA KADHICH TAKANAR NAHI...
Shreeram...  

Message has been deleted

Smitaveera Ghule

unread,
Dec 3, 2012, 5:42:35 AM12/3/12
to saithegui...@googlegroups.com
इतर देव सारे मायिक !
गुरूची शाश्वत देव एक !
चरणी ठेविता  विश्वास देख !
रेखेवारी मेख मारी तो !!

आपल्यावर येणारे प्रत्येक संकट हे आपल्याच प्रारब्धामुळे येत असते .जेंव्हा भक्त सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून सद्गुरूंना अनन्य शरण जातो , तेंव्हा सद्गुरू त्या भक्ताच्या खडतर प्रारब्धवरही काट  मारतो व मृत्यूलाही  रोखतो.
श्री साईसतच्चरीतात  १३ व्या अध्यायात आलेली भिमाजी पाटलांची कथा व मन :सामर्थ्यदातावीड  वर प्रकाशित झालेला डॉ .राजीव कर्णिकांचा अनुभव , या दोन्ही प्रसंगात आपल्याला सद्गुरूंची हि अतर्क्य शक्ती प्रत्ययाला येते.

१. सर्व उपचार करून थकल्यावर क्षयरोगाने पिडीत झालेले, मरणासन्न अवस्थेतील भिमाजी कळवल्याने परमेश्वरच धावा  करतात व त्यांच्या धाव्याने परमेश्वर गहिवरतो . भिमाजींच्या धाव्याला भगवंताने दिलेला प्रतिसाद म्हणजे भिमाजींना त्यांचे स्नेही नानासाहेब चांदोरकर यांना पत्र लिहिण्याची बुद्धी होते . साईभक्त नाना भिमाजींना साईनाथांना शरण जाण्यास सांगतात .
    डॉ . राजीव कर्णिकांना असाध्य असा ब्लड कॅन्सर   (Blood  Cancer ) झाल्यावर त्यांची पत्नी डॉ प्रिया हि बापूंचा कळवल्याने धावा करते , टाहो फोडते . डॉ प्रियाच्या हाकेला बापूंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे बापू तिला निरोप पाठवतात :- " मी आहे ".
दोन्ही ठिकाणी लक्षात येते कि भक्त जेंव्हा कळवळून सद्गुरूंना हाक  मारतो, तेंव्हा सद्गुरू त्याला प्रतिसाद देतातच !!

२. धीर खचलेले ,  मरणासन्न अवस्थेतील भिमाजी जेंव्हा शिर्डीला येऊन मशिदीमध्ये बाबांना भेटतात , तेंव्हा बाबा त्यांना धीर देतात , " तू शिर्डीमध्ये , या मशिदीत पाय ठेवलास , तेंव्हाच तुझे सगळे भोग संपले . त्यामुळे तू आता खंत करू नकोस . एक - दोन दिवसांत तुला आराम पडेल ."
असाध्य अशा रक्ताच्या कर्करोगामुळे धीर खचलेल्या , निराश झालेल्या डॉ  कर्णिकांच्या मनात जेंव्हा आत्मघाताचे विचार येऊ लागतात , तेंव्हा बापू नंदाई जवळ त्यांना निरोप पाठवतात - " don't  worry . you  are  going  to  win  the  battle ."  बापू , नंदाई  व सुचितदादांकडून मिळालेल्या धीरामुळेच डॉ कर्णिक केमोथेरापिसारख्या खडतर उपचारांना धैर्याने सामोरे गेले .
श्री  साईसतच्चरीतातही म्हटले आहे -
धैर्य तीच गे बाई सबुरी !
सांडू नको तिजला दुरी !
पडता केंव्हाही जडभारी !
हीच परपारी नेईल !! (अध्याय क्र .१९ ओवी क्र .५३ )
खडतर प्रारब्धामधून  यशस्वीपणे  पार जाण्यासाठी आवश्यक असणारे धैर्यही सद्गुरूच आपल्या भक्तांना पुरवत असतात , हे दोन्ही प्रसंगातून लक्षात येते .

३. शिर्डीत बाबांच्या सांगण्यानुसार भीमाबाईच्या घरी राहिल्यानंतर भीमाजींना स्वप्न पडते . स्वप्नात त्यांच्या लहानपणीचे एक शिक्षक एक कविता पाठ करण्यासाठी त्यांना छडीने खूप मार देतात . तसेच , एक गृहस्थ त्यांच्या छातीचा पाटा  करून त्यावर खूप जोरजोराने वरवंटा फिरवतो . त्यानंतर दुसऱ्या  दिवशी पहाटे भीमाजी  जेंव्हा झोपेतून उठतात , तेंव्हा त्यांचे दुखणे बरे झालेले असते .
 डॉ कर्णिकांना स्वप्नात दिसते कि बापू झाडूने त्यांची छाती साफ करत आहेत.दुसऱ्या  दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर कर्णिकांना जाणवते कि बापूंनी स्वप्नात जणूकाही त्यांची फुफ्फुसेच साफ केली आहेत . याआधी कृत्रिम श्वासोछवासावर   असणारे कर्णिक नंतर मोकळेपणाने श्वास घेऊ लागतात .
 यावरून लक्षात येते कि , दोन्ही भक्तांचे प्रारब्ध बापूंनी स्वप्नामध्येच धूउन टाकले , नष्ट केले.

४. भीमाजींच्या अनुभवात भिमाजींचे स्नेही नानासाहेब चांदोरकर  यांना साईनबद्दल - स्वतः च्या सद्गुरुंबद्दल ठाम विश्वास असतो कि : केवळ एकमेव माझे साईनाथच भिमाजीची व्याधी पूर्ण बरी करू शकतात  व बाबा भिमाजीला नक्की बरे करणार .
 डॉ कर्णिकांच्या अनुभवात त्यांची पत्नी डॉ प्रिया हिला बापुंबद्दल  : स्वतः च्या सद्गुरुंबद्दल पूर्ण विश्वास असतो की, "केवळ बापूच माझ्या पतीला असाध्य अशा रक्ताच्या कर्करोगामधून पूर्णपणे बरे करू शकतात व बापू माझ्या पतीला नक्की बरे करणार ."
 दोन्ही अनुभवांमधील भक्तांचा आपल्या सद्गुरूंवर असणारा ठाम विश्वास दिसून येतो.
 सद्गुरूही आपल्या भक्ताचा विश्वास खाली पडू देत नाही व भिमाजी व डॉ कर्णिक दोघांनाही सद्गुरू बरे करतात . 

५. भीमाजींच्या क्षयरोगावर वैद्य , हकीम , डॉक्टर , देवदेवस्की असे सर्व उपचार केले गेले, पण कुणीच भीमाजीला बरे करू शकले नाही , सर्वांनी हात टेकले.
 जे इतरांना शक्य झाले नाही ते सैनाथांनी मात्र शक्य केले व भिमाजीचा दुर्धर असा क्षयरोग बरा केला.
 डॉ कर्णिकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी त्यांना पुढची ट्रीटमेंट देणे अशक्य वाटत होते. पण बापूंनी मात्र कर्णिकांचा ब्लड कॅन्सर पुरपणे बारा केला - जे अशक्य होते ते शक्य केले .

बापू म्हणतात :
" तू आणि मी मिळून शक्य नाही असे या जगात काहीही नाही." ( मी = सद्गुरूकृपा  ; तू = भक्ताचा विश्वास )
म्हणूनच भक्ताने जर सद्गुरूंवर पूर्ण विश्वास टाकला तर त्यासाठी अशक्य असणाऱ्या गोष्टीही सद्गुरू शक्य करतात .

६. शिर्डीत येण्यापूर्वी भिमाजी बाबांना ओळखत नसतात . पण दुर्धर अशा क्षयरोगातून बाबांनी बरे केल्यावर भिमाजींना साईनाथांच्या परमेश्वरी स्वरुपाची साक्ष पटते . व बाबांप्रती कृतज्ञ होऊन बाबांच्या भक्तीत कायमचे रममाण होतात .
    ब्लड कॅन्सर होण्यापूर्वी डॉ कर्णिकांना सद्गुरू बापूंच्या दैवी स्वरुपाची जाणीव नसते. पण जेंव्हा बापू त्यांना असाध्य अशा रोगातून बरे करतात ,तेंव्हा त्यांना बापूंच्या दैवी स्वरुपाची खात्री होते व बापुंप्रती कृतज्ञ होऊन ते बापूंच्या भक्तीत स्थिर होतात .
   दोन्ही अनुभवांवरून लक्षात येते की  सद्गुरूंनी भिमाजी व डॉ  कर्णिक यांचे गंडांतर तर टाळलेच , पण एवढेच नव्हे तर, मनुष्याजन्मासाठी सर्वात श्रेयस्कर असा जो भक्तिमार्ग , त्या भक्तीमार्गामध्ये दोघांनाही स्थिर केले . म्हणजेच त्यांचे वाईट प्रारब्ध केवळ  नाही तर वाईट प्रारब्धाचे रुपांतर चांगल्या  प्रारब्धामध्ये केले. हीच सद्गुरूंची सर्वश्रेष्ठ कृपा होय !! या कृपेचे कारण एकाच - त्यांचे अकारण कारुण्य !

सूर्य जसा सर्वांना समान प्रकाश देतो, पण ज्या घराची दारे, खिडक्या  उघडी असतात , त्या घरातच सूर्यप्रकाश पोचू शकतो . तसेच सद्गुरू सर्वांवर समानपणे कृपा करत असतात . पण ज्याच्या मनाची कवाडे कुतर्क , संशय , शंका - कुशंका यांनी बंद असतात त्याच्यापर्यंत सद्गुरूंची कृपा पोचू शकत नाही . 
सद्गुरूंची कृपा तर सदैव , प्रत्येक क्षणी  असतेच - प्रत्येकावर - समानपणे . पण ज्याचा सद्गुरूंवर पूर्ण विश्वास असतो ,  सद्गुरूंची कृपा स्वीकारू शकतो .
सद्गुरूंना कृपा करण्यासाठी भक्ताकडून मंत्र , जप , ताप , पूजा करण्याची किंवा इतर कोणत्याही साधनाची गरज नसते . पण भक्ताला मात्र सद्गुरूंची कृपा स्वीकारता येण्यासाठी " एक विश्वास " मात्र असावा लागतो. 
नलगे साधनसंपन्नता  !
नलगे षटशास्त्रचातुर्यता !
एक विश्वास असावा पुरता !
कर्ता  हर्ता  गुरु ऐसा !!  (अध्याय क्र .१९ , ओवी क्र .७४ )   
आमची शोकांतिका हीच असते कि सद्गुरूंनाच आम्हाला सांगायची वेळ येते - " राजांनो , विश्वास ठेवा, विश्वास पक्का करा ."
सद्गुरू बापूंनी सांगितल्या प्रमाणे या वर्षी म्हणजेच २०१२ साली आपल्याला सद्गुरुंवरचा विश्वास पक्का करण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे . आता शेताचा फक्त एक महिना राहिला आहे . पण तोही नसे थोडका !! या सुवर्नासंधीचे सोने व्हावे , हीच बापुचारणी प्रार्थना . यावर्षी जर आपला सद्गुरुंवरचा विश्वास पक्का झाला, तर पुढच्या काळात आमचे सहजपणे रक्षण  करून बापू आम्हाला २०२५ साली येणाऱ्या रामराज्यात घेऊन जाणार आहेत !!
गुरु जरी महा प्रबळ !
अपेक्षी शिष्यप्रज्ञाच केवळ !
गुरुपदी निष्ठा सबळ !
                                             धैर्यबळ सबुरी !! (अध्याय क्र .१९ , ओवी क्र .५८)
निष्ठा + सबुरी  = विश्वास 
सद्गुरुतत्व - मग ते श्री स्वामी समर्थांच्या रुपात असेल तर कधी साईनाथांच्या रुपात असेल किंवा सद्गुरू अनिरुद्धांच्या रुपात असेल - तो आहे एकच  आणि मला तारणारा किंवा मारणारा तोच एकमेव आहे हेच शाश्वत सत्य आहे !!

!! हरी ओम  !!

स्मितावीरा घुले 
पुणे 

Suneeta Karande

unread,
Dec 5, 2012, 4:03:30 PM12/5/12
to saithegui...@googlegroups.com
हरि ओम. साक्षीवीरा बेनखळे ह्या मस्कतला रहाणार्‍या श्रद्धावान स्त्री भक्ताच्या लहान मुलीच्या जीवावर बेतलेले प्राणघातक संकट बापूंनी कसे निवारण केले - 
साक्षात परमात्म्याचे बोलच ते , मग भले कोणत्याही काळातले का असेना,  ते अमोघ असतात, सत्यच ठरतात कारण ते असते एक चिरंतन सत्य, त्रिकालाबाधित सत्य.
आपण श्रीसाईसच्चरितात ४० व्या अध्यायांत श्रीसाईनाथांच्या मुखीचे हे बोल वाचतो - म्हणती "जया माझे स्मरण निरंतर । निरंतर आठवण मज त्याची ।।३१ ।। मज न लागे गाडीघोडी । विमान अथवा आगिनगाडी । हांक मारी जो मज आवडी । प्रकटें मी ते घडी अविलंबे ।। ३२ ।। खरे तर, बोल कसले ती असते आपल्या श्रद्धावान भक्ताला दिलेली ग्वाहीच ,वचनच ! साक्षीवीरांच्या मुलीसाठी अविलंबे धावत गेले ते माझे साईबापूच .....
परंतु ते चंचल मानवी मनच , ते संकट समयी स्मर्तुगामी बनुन धावत येणार्‍या करुणाघन गुरुमाऊलीला ओळखु शकत नाही. "दत्त" म्हणजे देऊन टाकलेला असा तो - माय चण्डिकेने तिच्या लेकरांसाठी ज्या तिच्या धाकट्या पुत्राला देउन टाकले असा तो -अनिरुद्ध गतीने धावत येणारा - त्याचे वचन पाळ्ण्यासाठी तो काळाच्या सीमांनाही ओलांडुन धाव घेतोच घेतो.
साईनाथ स्वत:च २८ व्या अध्यायात मेघाला हेच समजावितात कि " दृष्टांत म्हणूनि माझे बोल ।जातां काय कराया तोल। बोल माझे अर्थ सखोल । नाहीं फोल अक्षरही" ।। १९७ ।। खरेच सदगुरुचे शब्दच काय अक्षरही फोल नसतें. 
आपण पहातो कि साक्षीवीरा बेनखळे ह्या मस्कतला राहतात. प्रमुख सेवक सुधीरसिंह नाईक घरी नसल्यामुळे  बापूंना भेटायला नाही मिळाले, दर्शन घेता आले नाही म्हणुन नाराज झालेल्या साक्षीवीरा आणि त्यांना प्रेमाने ग्वाही देणारे त्यांचे पती कि बापू सगळीकडे असतातच. हाच तो एक विश्वास !!!
आणि मग तो येतोच हे पटविण्या " माझिया प्रवेशा नलगे दार । नाहीं मज आकार ना विस्तार । वसें निरंतर सर्वत्र ।। १९९ ।। होय, श्री. बेनखळेंचा विश्वास सार्थ करण्यासाठी बापू धावुन आला , हे पटविण्या आला कि मी सगळीकडे असतोच. टाकूनियां मजवरी भार । मीनला जो मज साचार । तयाचे सर्व शरीरव्यापार । मी सूत्रधार चालवीं ।। २०० ।। होय, प्राण गेले असे वाटत असतांनाही , पावणे दोन वर्षाच्या लहानुशा मुलीच्या मृतवत भासणार्‍या देहात फक्त सदगुरुच संजीवनी देउन प्राण परत फुंकु शकतो , कारण "तो एकच" जो माझ्या शरीराचा व्यापार चालवणारा सूत्रधार असतो म्हणूनच !!! 
पावलोपावली आम्हां भक्तांच्या हांकेला साता समुद्रां पार ही धाव घेणारा माझा बापूराया ... माझा अनिरुद्ध प्रेमळा । त्याला माझिया कळवळा । पुढे कसे आकस्मिक रित्यां श्री बेनखळेंना सकाळी जातांना पाहिलेले हॉस्पिटल योग्य वेळी आठवते - श्रीरामरसायन ग्रंथात आपण वाचतो कि गुरुतत्त्वाची रचना ही अशीच नेहमी संकटाआधीच सहाय्याची योजना करणारी असते - हीच त्याची साक्ष !!! आणि मग "त्याचा हस्त शिरावरी । आता उरेल कैची भीती । हया आद्यपिपांच्या शब्दांची जिवंत प्रचिती , अनुभव !!!!
३४व्या अध्यायांत इराण्याची लहान तान्ह्या मुलीला आंकडी येउन ती शरीराची धनुकली होउन बेशुद्ध 
पडत असे आणि त्यावर काही इलाज चालत नसे , तेव्हा बाबांची उदी काम करते. येथे तर साक्षात तो 
अकारण कारुण्याचा महासागर ओळंबला आणि स्वत:च दर्शन रुपाची आणि अभय हस्ताची संजीवनी उदी घेउन प्रकटला अनिरुद्ध गतीने अनिरुद्ध बनुन ....
दादा साईनाथांच्या भक्तांना आलेले अनुभव आणि बापूभक्तांना आलेले अनुभव यांची सांगड घालत, "एक विश्वास असावा पुरता, करता हर्ता गुरु ऐसा" हे तत्व सुस्पष्ट करण्यासाठी जी वाट आपण दाविली ती बापूचरणांवरचा विश्वास असाच सदा दृढ करो हीच बापूचरणीं प्रार्थना !!!!
श्रीराम.

kimaya manohar

unread,
Dec 17, 2012, 1:34:20 AM12/17/12
to saithegui...@googlegroups.com
Hari Om..
"ek vishwas asava purata... karata harata guru aisa!"
we all should blindly follow that Bapu is the sole doer, the creator, protector and the destroyer for everything that takes place.. the only wish Bapu has for us is that we place immense faith at His Feet.. without the trust in Him, we stand nowhere.. when we recite 'amcha Bapu halu halu amcha sathi sagla kahi neet karat ahe', the faith in Him is built up that yes, He is there.. always.. in any condition or situation my Bapu is going to see that His child is not caught up in any sufferings.. "je je maja sathi uchit, techi tu deshil khachit, he matra me nakki janit, nahi takraar raghava''..

in sai satcharitra, we come across many instances when Sai had always reached before His bhakta would call..the blacksmith's wife was near the fire with her child oh her lap.. when she got up, the child fell in the fire.. she called out to Baba, her saviour...and Baba, who was miles away yet saved the child from the burning fire.. all the lady showed here was complete faith in her Guru.. n Baba did not let her down.. He did not leave the child to its sufferings..and in shirdi, Baba had His hand burnt.. this is the undying love a Guru has on His children.. we remember Bapu only in times of sorrows.. we never call Him whenever we are at joy.. Kunti, the mother of the pandavas had prayed to Lord Krishna that may she get only sorrows throughout her life...in that manner atleast she would think of the Lord and chant His name.. 

Another story is of the devotee who suffered from sore eyes.. Baba inserted two balls of 'bibba' in his eyes n wrapped them up.. bibba leads to more burning of the eyes.. but just because of the complete trust and full-fledged faith in Baba, the devotee did not go against Baba's actions.. he knew that whatever Baba will do will be for my own good.. he will give me what i deserve.. and predictably, he of course got cured.. its this trust that plays the most crucial role... 

Bapu always says that i have a huge treasure kept for you... steal as much as u can.. its the treasure filled with love, happiness and satisfaction.. the year 2013 has been declared as a scary one.. but when our Bapu is with us, there is no fear and doubts in our minds.. bapu has said that "kharokharach balano sangto, me tumhala kadhich taknaar nahi''.. the faith exists that He is not going to leave me ever... but the matter of concern is that is my faith strong enough so that it wont lead to instability?? thus, our vishwas has to be so firm that there should be nothing at all beyond His word..

When Baba asked Kakasaheb Dixit to slay the weary goat, he did not think twice..he raised his knife without having second thoughts.. Baba's wish was his command.. this unconditional faith in Bapu is expected from us.. we all should surrender at His Feet... offering everything at His Charan.. everything is His, i belong to Him..He is the driver of my life... He is the only one who is going to carry me on this enormous road and will be with me throughout the journey, till the ultimate destination- His Charan.... His Charan are the only refuge to us all.. 


hari om..
kimayaveera manohar
pune upasana kendra

Reply all
Reply to author
Forward
0 new messages