२६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताजमहाल अतिरेक्यांचे लक्ष्य झाले. या हल्ल्यात ताजचे सर्वाधिक नुकसान झाले असले आणि ताजचे डझनभर कर्मचारी त्यात बळी पडले असले तरी ताज व्यवस्थापनाने मात्र ताजखेरीज इतरत्र झालेल्या हल्ल्यांत बळी गेलेल्या दुर्दैवी मुंबईकरांच्या कुटुंबीयांवरही मायेची पाखर घातली. गेल्या दोन वर्षांत द ताज पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट फंडाने दोन कोटींहून अधिक रक्कम मदतरूपाने अशा घराघरांमध्ये पोचवली आहे. दस्तुरखुद्द रतन टाटांनी घरोघरी जाऊन दु:खितांचे सांत्वन केले, विचारपूस केली. या संवेदनशील उपक्रमाचा
आढावा.. संकलित स्वरूपात!
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=115856:2010-11-19-10-59-17&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
प्रदीप परशुराम नेहे