
होळी पौर्णिमा
समानार्थी शब्द : `होळीला महाराष्ट्रात `शिमगा' म्हणतात, दक्षिणेत
`कामदहन' म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो.
`हुताशनी', असेही होळीला नाव आहे.
स्थान : देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी फाल्गुन
पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी
करतात.
कृती : मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात.
त्याच्या भोवती गोवर्या व लाकडे रचतात. होळी पेटवण्याकरता जो अग्नी
आणतात, तो चांडाळाच्या घरचा आणायचा असतो ! नंतर व्रतकर्त्याने स्नान करून
`ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं समस्तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनं अहं
करिष्ये ।', असे म्हणून व नंतर `होलिकायै नम: ।', हा मंत्र म्हणून होळी
पेटवायची. त्यानंतर होळीची प्रार्थना करायची.
वंदितासि सुरेंद्रेण, ब्रह्मणा शंकरेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि, भूते भूतिप्रदा भव ।।
अर्थ : इंद्र, ब्रह्मदेव, शंकर यांनी तुला वंदन
केले आहे. अशा हे देवी, तू आमचे रक्षण करून आम्हाला ऐश्वर्य दे. होळी
पेटल्यावर त्या होळीला प्रदक्षिणा करायची आणि पालथ्या हाताने शंखध्वनी
करायचा, म्हणजे बोंब मारायची. मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा
विधी आहे. दुसर्या दिवशी पहाटे होळीच्या राखेला वंदन करायचे. ती राख
अंगाला लावायची आणि स्नान करायचे, म्हणजे आधी-व्याध यांची पीडा होत नाही.
(आधी म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व व्याधी म्हणजे रोग !)
पुराणांतील कथा
१. ढुण्ढा राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. रोग व व्याधी
निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरता लोकांनी खूप प्रयत्न
केले; पण ती जाईना. अखेरीला तिला बीभत्स शिव्या आणि शाप दिले. ती प्रसन्न
झाली आणि गावाबाहेर पळून गेली. (भविष्य पुराण)
२. उत्तरेमध्ये ढुण्ढा राक्षसीऐवजी
पुतनेला होळीच्या रात्री पेटवतात. होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला
पाळण्यात निजवतात व त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पुतनेचे
दहन करतात.
३. दक्षिणेतील लोक कामदेवाप्रीत्यर्थ हा उत्सव करतात. भगवान
शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधीत होते. त्या वेळी मदनाने त्यांच्या
अंत:करणात प्रवेश केला. आपल्याला कोण चंचल करतो आहे, म्हणून शंकरांनी डोळे
उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. त्या मदनाचे दहन होळी
पौर्णिमेला दक्षिणेत करतात. होळी म्हणजे मदनाचे दहन आहे. या मदनाला
जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.
होळीच्या सणात शिव्या देण्याचे चुकीचे मानसशास्त्र : होळीच्या
सणामध्ये आणि त्याच्या दुसर्या दिवशी वाईट शिव्या देतात. ते काही
आधुनिकांना बरे वाटत नाही; पण यात मानसशास्त्र आहे. शब्दांचा मनावर एक
प्रकारचा फाजील ताण असतो, तो निघून जातो आणि मन स्वच्छ होते. घाण पाण्याला
गटारे करून वाट देतात, तसे माणसातल्या पशूप्रवृत्तीला धर्मशास्त्राने
होळीच्या निमित्ताने एक दिवस वाट काढून दिली आहे. होळीच्या सणामध्ये आणि
दुसर्या दिवशी वाईट शिव्या !... आणि ती बीभत्स वागणूक !! हे विष आहे. रोग
बरे करण्याकरता विषाची अत्यंत अल्प मात्रा हवी. अल्प म्हणजे किती तर
सुईच्या अग्रावर मावेल एवढी; म्हणजे रोग बरा व्हावा, याकरता विषारी औषधाचा
अत्यल्प अंश द्यायचा आणि तोदेखील मोठ्या युक्तीने घ्यायचा, बेताने
घ्यायचा!' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, वर्ष दुसरे, अंक १)
होळी
देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून
पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा
उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा, कोकण व
महाराष्ट्रात शिमगा, होळी व हुताशनी महोत्सव, होलिकादहन आणि दक्षिणेत
कामदहन अशा संज्ञा आहेत. याला `वसंतोत्सव' अथवा `वसंतागमनोत्सव' म्हणजे
वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येईल. होळीच्या
सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पहाता ध्यानी येते की, हा सण
मूलत: अगदी लौकिक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या
लोकांकडून कितीही धार्मिक व सांस्कृतिक विधी-विधानांची भर पडली असली,
तरीही या सणाचे लौकिक स्वरूप मुळीच लोप पावलेले नाही. होलिकोत्सव,
धूलिकोत्सव आणि रंगोत्सव हे तीन पदर तर सहज उठून दिसतात.

होळी
संकलक : शिमग्याच्या दिवशी काही ठिकाणी लहान मुलांचा शिमगा करतात.
पहिल्या वर्षी बालकाला पांढर्या रंगाचे नवीन कपडे शिवतात. त्याला हे कपडे
घालून त्याच्या कपाळाला गुलाल लावतात व गळयात साखरेची माळ घालतात. या
पूर्ण विधीमागील शास्त्र काय ?
एक विद्वान : होळी म्हणजे ब्रह्मांडातील एक तेजोत्सवच
आहे. तेजोत्सवातून, म्हणजेच विविध तेजोमय लहरींच्या भ्रमणातून ब्रह्मांडात
अनेक रंग आवश्यकतेप्रमाणे साकार होऊन त्या त्या घटकाच्या कार्याला पूरक व
पोषक अशी वातावरण निर्मिती करतात. `शिमगा' हा शब्द `लीला' या अर्थी आहे.
शिवाच्या लीला, म्हणजेच शिमगा. शिमग्याच्या माध्यमातून चैतन्याच्या
संस्करणातून जिवाच्या जीवनातील प्रत्येक कृतीला शिव-शक्तीचे तेजोमय
अधिष्ठान प्राप्त करून देणे, हा शिमग्यामागील उद्देश आहे.
१. पांढर्या रंगाचे कपडे : पहिल्या वर्षी बालकाचा
शिमगा साजरा केला जातो. शिमगा, म्हणजेच शिवाला आवाहन करून त्या दिवशी
ब्रह्मांडकक्षेत भ्रमण करत असणार्या तेजोकणांना सामावून घेणारे पांढर्या
रंगाचे वसन धारण करून त्याच्या स्पर्शाने मणिपूरचक्राला जागृती देऊन
त्यातील पिंडबिजात शिवाला, म्हणजेच जीवनात प्रत्यक्ष क्रिया करून
घेणार्या पुरुषाला स्थान देणे. पांढरा रंग हा सर्वसमावेशक असल्याने तो
बालकाच्या प्रकृतीप्रमाणे त्या त्या स्तरावरील ब्रह्मांडातील तेजोलहरी
वसनात सामावून घेऊन बालकाला त्याचा लाभ मिळवून देतो. बालकाच्या मनावर
संस्कार कमी असल्याने या अवस्थेत बालक ब्रह्मांडातील चैतन्यमय लहरींना
चटकन प्रतिसाद देऊन स्वत:त सामावून घेऊ शकते.
२. साखरेची माळ : गळयात अनाहतचक्रापर्यंत येणारी
साखरेची माळ घातल्याने वसनाच्या स्पर्शाने तीही भारीत होऊन साखरेतील
आपाच्या साहाय्याने वायूमंडलात तेजोकणांचे प्रभावी प्रक्षेपण करून
बालकाभोवती संरक्षण कवच बनवते.
३. गुलाल लावणे : आज्ञाचक्रावर गुलाल लावणे, हे
पिंडबिजातील शिवाला शक्तीतत्त्वाची जोड देण्याचे प्रतीक आहे. गुलालातून
प्रक्षेपित होणार्या पृथ्वी व आप तत्त्वाच्या लहरींमुळे देहाची सात्त्विक
लहरी ग्रहण करण्याची क्षमता वाढते. आज्ञाचक्रातून ग्रहण होणारे शक्तीरूपी
चैतन्य संपूर्ण देहात संक्रमित झाल्याने बालकाची वायूमंडलात भ्रमण
करणार्या चैतन्यलहरी ग्रहण करण्याची क्षमता वाढते. या विधीमुळे जीव
चैतन्याच्या स्तरावर जास्त संस्कारक्षम बनतो. लहान मुलांमध्ये या विधीतून
एक प्रकारे शिव-शक्तीरूपाचे संस्करणच केले जाते. (सौ. अंजली गाडगीळ
यांच्या माध्यमातून, २६.२.२००६, सकाळी ११.०९)
संकलक : होळीच्या दिवशी पुरणावरणाचा नैवेद्य का
दाखवतात ? काही ठिकाणी होळीमध्ये नारळही टाकतात, ते का ?
एक विद्वान :
१. होळीमध्ये नारळ टाकणे : नारळाच्या माध्यमातून
वायूमंडलातील त्रासदायक स्पंदनांना खेचून घेऊन त्यानंतर तो होळीच्या
अग्नीत टाकला जातो. यामुळे नारळात संक्रमित झालेली त्रासदायक स्पंदने
होळीतील तेजोमय शक्तीच्या साहाय्याने नष्ट होण्यास मदत होऊन वायूमंडलाची
शुद्धी होते.
२. पुरणावरणाचा नैवेद्य : पुरणावरणाच्या नैवेद्यात
वापरलेले घटक हे तेजोमय लहरींना चटकन स्वत:त सामावून घेऊ शकतात व स्वत:तून
प्रक्षेपित होणार्या सूक्ष्म वायूतून जिवाच्या शरीरातील पंचप्राणांना
जागृती देऊन त्याच्या प्राणदेहाची शुद्धी करून देतात. होळीदेवतेला आवाहन
करून तिला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून भक्षण केल्याने जिवामध्ये
तेजोमय लहरींचे संक्रमण होऊन सूर्यनाडी कार्यरत होण्यास मदत होते.
सूर्यनाडीमुळे कार्याला बळ प्राप्त होते. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या
माध्यमातून, २६.२.२००६, सकाळी ११.२९)

१. साधकांची प्रार्थना व नामजप यांमुळे होळीतून चैतन्य प्रक्षेपित होणे (ईश्वरी स्पंदने होळीपर्यंत पोहोचत असणे)
२. ही होळी बनवण्यामधल्या साधकांच्या भावामुळे होळीतून भाव प्रक्षेपित होणे
३. प्रार्थना आणि नामजप देवापर्यंत पोहोचणे
४. दैवी चैतन्य होळीपर्यंत येणे
५. होळीतून चैतन्य प्रकाशमान होऊन प्रक्षेपित होणे
६. होळीतील सात्त्विकतेमुळे तिच्यातून शक्ती प्रक्षेपित होणे व काळी शक्ती नष्ट होणे
७. चैतन्य व शक्ती होळीमध्ये मध्यभागी उभ्या केलेल्या झाडाच्या खोडाकडे वरच्या बाजूला जाणे
८. होळीच्या वरच्या टोकातून चैतन्य व शक्ती यांचे प्रकाशमान होऊन प्रक्षेपण होणे
९. चैतन्यदायी होळीमुळे वाईट शक्ती अस्वस्थ होणे व त्यांना होळीवर हल्ला करायचा असणे
रचलेल्या होळीतील मध्यभागी असलेल्या झाडाच्या खोडाच्या
झावळयांसारख्या पानांमुळे त्यांकडे वाईट शक्ती आकर्षित होणे; पण होळीची
पूजा सुरू केल्यावर व अग्नी पेटवल्यावर त्या निघून जाणे : होळीमध्ये
मध्यभागी रचलेल्या झाडाच्या खोडाला असलेल्या झावळीसारख्या पानांच्या
आकारामुळे वाईट शक्ती तिकडे आकर्षित होतात. पानांमधील ही काळी शक्ती
नंतर पसरते व त्यामुळे तेथे त्रासदायक स्पंदने पसरतात; पण पूजा सुरू
झाल्यावर ही काळी शक्ती हळू हळू कमी होत गेली.
होळीमध्ये अग्नी प्रज्वलित केल्यानंतर वाईट शक्ती झपाट्याने निघून
गेल्या.

१. होळीसाठी रचलेल्या वस्तूंमुळे प्रकाशमान शक्ती प्रक्षेपित होणे व त्या पदार्थांच्या शुद्धतेमुळे अधिक सात्त्विकता प्रसारित होणे
२. चैतन्य प्रक्षेपित होतांना ते प्रकाशमान होणे व सात्त्विकता पसरणे
३. मंत्रांमुळे चैतन्य प्रक्षेपित होणे
४. शक्ती व चैतन्य वहाणे
५. पूजेच्या वेळी होणार्या मंत्रपठणामुळे ईश्वरी शक्ती होळीकडे येणे व तिच्याकडून प्रक्षेपितही होणे
५ अ. ईश्वरी शक्ती प्रक्षेपित झाल्यामुळे चैतन्यही पसरणे
६. मारक शक्ती
७. तेज (अग्नी) तत्त्व व पूजाविधी यांमुळे मारक तत्त्व प्रक्षेपित होणे व त्यामुळे सभोवतीचे काळे आवरण नष्ट होणे

१. पूजा चांगल्या रितीने करता येण्यासाठी साधक-पुरोहितांच्या दिशेने ईश्वराकडून सात्त्विकता येणे व तिचा लाभ पुजार्यालाही मिळणे
२. मंत्रपठण होत असतांना ईश्वरी तत्त्वाशी जोडले जाणे, ईश्वराची
शक्ती मंत्रपठण करता यावे म्हणून साधक-पुरोहितांकडे येणे आणि त्यामुळे
पूजाविधीलाही चांगली शक्ती मिळणे
३. यजमान साधकाची पूजेतील एकाग्रता व सेवाभाव
४. यजमान साधकाची देहशुद्धी होणे व त्याच्या भोवती चांगली शक्ती जाणवणे
५. साधक-पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रपठण होणे
६. मंत्रपठण व सेवा यांमुळे भाव निर्माण होणे
७. पूजेतील शक्तीमुळे होळीच्या भोवती शक्तीची स्पंदने असणे व
त्यामुळे होळीचा लाभ मिळणे, तसेच वातावरण शुद्ध होणे व रक्षण होणे यांसाठी
होळीभोवती चैतन्यपसरणे
८. प्रार्थना व गुरुकृपा यांमुळे साधक सेवा करू शकणे व त्यांना सात्त्विकतेचा जास्त लाभ होणे
९. मंत्रपठण व होळीमध्ये रचलेल्या योग्य झाडांच्या फांद्या यांमुळे साधक-पुरोहिताकडून शक्ती प्रक्षेपित होणे

अ. `होळी पेटवल्यावर वायूमंडलावर होणारा परिणाम
१. ब्रह्मांडमंडलातून होळीमध्ये निर्गुण तत्त्व आकृष्ट होणे व स्थिर वलय निर्माण होणे
२. होळी उभारण्यासाठी वापरण्यात येणार्या वस्तूंमध्ये चैतन्य आकृष्ट होणे व त्याचे होळीमध्ये कार्यरत वलय तयार होणे
३. होळी पेटवल्यावर शक्तीच्या वलयांचे वातावरणात प्रक्षेपण सुरू होणे
४. वातावरणात मारक शक्तीचे वलय कार्यरत होऊन त्यातून शक्तीच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होणे
५. वातावरणात दूरवर व दीर्घकाळ तेजतत्त्वात्मक कण कार्यरत रहाणे
६. वातावरणात शक्तीचे प्रवाह प्रक्षेपित झाल्यामुळे वातावरण व पाताळ येथील सगुण-निर्गुण स्तरावरील अनिष्ट शक्ती दूर जाणे
७. अनिष्ट शक्तींच्या प्रवाहांचे विघटन होणे
८. कालांतराने वातावरणाची शुद्धी झाल्याने सत्त्वप्रधान कण वातावरणात पसरणे'

१. पुजेतून मंत्रशक्ती प्रक्षेपित होणे
२. खूप मारक शक्तीयुक्त तेज (अग्नी) तत्त्वाचे प्रक्षेपण होणे व ते भोवर्याप्रमाणे जोरात फिरत
सगळीकडे पसरणे
३. शक्तीने प्रवाहीत होऊन सगळीकडे पसरून काळया शक्तीचा नाश करणे
४. तेज (अग्नी) तत्त्व, चक्राकार शक्ती व मारक शक्ती फिरत फिरत काही वेळा वेगाने, तर काही वेळा सावकाश सगळीकडे पसरणे
५. दैवी सगुण चैतन्य सगळीकडे मदतीसाठी पसरण्यासाठी जलद गतीने येणे
६. दैवी शक्ती येणे
७. अग्नीतत्त्वाने सगळीकडे पसरत काळया शक्तीचा नाश करणे
८. काळी शक्ती नष्ट होणे, काही वाईट शक्तीही नष्ट होणे व काही दूर पळून जाणे
यावरून `होळी पेटवल्यावर शक्ती वातावरणात सगळीकडे पसरते', हे लक्षात येते.

१. होळी पेटवतांना त्या अग्नीमधून शक्ती प्रक्षेपित होऊन तेजतत्त्व
चमकदार कणांच्या रूपात पसरणे व त्या वेळी पूजाविधीमधील मंत्रांची शक्तीही
होळीभोवती फिरत असणे : जेव्हा साधकाने पूजाविधी झाल्यावर ती होळी
अग्नीद्वारे पेटवली, तेव्हा त्या अग्नीतून शक्ती प्रक्षेपित होत होती व
मंत्रांची शक्तीही होळीभोवती
वहात होती. होळी पेटवल्यावर तेजतत्त्व प्रवाहासारख्या चमकदार कणांच्या
रूपात पसरत होते.
२. अग्नीमधून प्रक्षेपित झालेली शक्ती, तेजतत्त्व, पूजाविधीतील मंत्रशक्ती आणि चैतन्य रचलेल्या होळीकडे जाणे
३. होळीत अग्नी प्रज्वलित करतांना त्या अग्नीतील शक्ती साधकाला मिळणे
४. साधकाभोवती शक्ती, तेजतत्त्व व चैतन्य यांचे संरक्षककवच तयार होणे व त्याच्या भोवतीचे काळे आवरण काही प्रमाणात नष्ट होणे
५. चैतन्य व शक्ती अधिक सगुण रूपात येऊन त्यांचे सगळीकडे प्रक्षेपण होणे (हे प्रक्षेपण कधीकधी जलद गतीने असते.)
६. तेजतत्त्व व मारक शक्ती यांच्या प्रक्षेपणाने वातावरणातील काळी शक्ती नष्ट होणे
७. अग्नी प्रज्वलित करतांना ईश्वराशी अनुसंधान झाल्यामुळे त्याच्याकडूनही शक्ती व चैतन्य येणे
८. ईश्वराकडून आलेली शक्ती व चैतन्य रचलेल्या होळीपर्यंत पोहोचणे
९. शक्ती सगळीकडे पसरणे
१०. शक्ती व चैतन्य यांचे वरच्या दिशेने व जमिनीकडेही प्रक्षेपण झाल्याने सगळीकडची काळी शक्ती दूर होणे
११. शक्ती सगळीकडे, तसेच साधकांकडेही पसरल्याने त्यांच्यावर उपाय होणे

१. साधकाची प्रार्थना व नामजप ईश्वरापर्यंत पोहोचणे
२. ईश्वराची शक्ती व चैतन्य साधकापर्यंत पोहोचणे
३. `बोंब मारणे' या क्रियेचा लाभ होण्यासाठीही ईश्वराची शक्ती व चैतन्य साधकापर्यंत पोहोचणे
४. `बोंब मारणे' ही क्रिया होतांना शक्ती व चैतन्य निर्माण होऊन ते चक्राकार फिरणे
५. चैतन्य तेजस्वी किरणांच्या स्वरूपात प्रक्षेपित होणे
६. चैतन्य शक्ती कणांच्या स्वरूपातही प्रक्षेपित होणे व त्या कणांबरोबर चैतन्यही असणे
७. मारक शक्तीही पसरणे
८. वाईट शक्ती दूर फेकल्या जाणे
९. ध्वनीच्या लहरींसोबत पृथ्वी, वायू व आकाश ही तत्त्वे शक्तीच्या स्पंदनांबरोबर प्रक्षेपित होणे
१०. पेटलेल्या होळीतील अग्नीमुळे बोंब मारतांना उपाय होऊन त्या साधकावरील काळे आवरण किंवा शरिरातील काळी शक्ती दूर होणे

१. मारक शक्ती (तेज /अग्नी तत्त्व) प्रकाशमान होऊन ती हळू हळू पसरणे
२. जेव्हा साधकांनी राखेला नमस्कार केला (प्रार्थना केली), तेव्हा दैवी शक्ती राखेकडे
आली.
३. दैवी शक्ती येणे
४. दैवी शक्ती चैतन्यासहित येणे
५. शक्ती प्रकाशमान होऊन पसरणे
६. चैतन्य प्रक्षेपित होऊन सगळीकडे पसरणे
७. तेज(अग्नी)तत्त्व पसरणे
८. चैतन्य पसरणे
९. शक्ती पसरणे
दुर्दैवाने सद्यकाळात या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. शास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे करावेत, असे धर्म शिकवतो. साहजिकच सण-उत्सव यांच्या वेळी होणारे गैरप्रकार व अशास्त्रीय कृती रोखणे, हाही धर्मपालनाचाच भाग ठरतो. गेली अनेक वर्षे सनातन होळी व रंगपंचमी या उत्सवांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अभियान राबवत आहे. आदर्शरीत्या होळी व रंगपंचमी साजरी केल्यामुळे , तसेच होळीतील गैरप्रकारांच्या वेळी सूक्ष्मातून कसे परिणाम होतात, याबद्दल युरोपमधीलक एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया यांनी रेखाटलेली सूक्ष्म-चित्रे व सूक्ष्म-परीक्षण व हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत. यावरून आदर्श होळी व रंगपंचमी साजरी करणे का आवश्यक आहे, हे आपल्याला समजेल.

१. `अहं, स्वभावदोष व वाईट व्यक्तीमत्त्व
२. तामसिक वागण्यामुळे तामसिक शक्तीचे प्रक्षेपण
३. दोष, अहं व काळी शक्ती यांमुळे मायावी स्पंदने आकर्षित होणे
४. चक्राकार काळी शक्ती व्यक्तीभोवती आकृष्ट होऊन पसरणे व मन दुराचरणाकडे झुकणे
५. मायावी शक्तीने काळया शक्तीशी संबंधित वाईट वागण्याचे विचार मनात घालणे व व्यक्तीभोवती खूप मोठे काळे आवरण असणे
६. काळी कंपने वाढणे
७. काळया आवरणामुळे मन-बुद्धीवरही आवरण येणे, अनेक विचार मनात येणे व दुसर्यांवर रंग फेकावासा वाटणे
८. अधिक काळी शक्ती आकृष्ट होऊन `दुसर्यांना त्रास द्यावा, त्यांची
गंमत करावी', असे वाटणे व काही लोकांना ही गंमत वाटली, तरी तो मायावी भ्रम
असणे
८ अ. कनिष्ठ प्रतीचा मायावी आनंद वाटणे
९. व्यक्तीभोवती रजोगुणी शक्ती निर्माण होणे
९ अ. व्यक्तीने हातात घेतलेल्या रंगामध्येही तिच्यातील रजोगुण, तामसिकता आणि काळी शक्ती येणे

१. रंग फेकणार्या तामसिक व्यक्तीमुळे रंगामध्ये आलेली काळी शक्ती रंग फेकलेल्या दुसर्या व्यक्तीवरही प्रक्षेपित होणे
२. रजोगुणी शक्ती त्या व्यक्तीमध्येही येणे
३. मन-बुद्धीवर रज-तम पसरल्याने ती अस्वस्थ होणे
४. अहं जागृत होऊन राग येणे
५. रंग फेकणार्या व्यक्तीबद्दल राग येणे
६. रागामुळे काळी शक्ती ठिणग्यांप्रमाणे बाहेर पडणे
७. दोष, अहं, राग व फेकलेला रंग यांमुळे तमोगुण निर्माण होणे
८. रजोगुणी स्पंदने तयार होणे
९. फेकलेल्या रंगामुळे काळी शक्ती पसरणे
१०. काळी शक्ती प्रक्षेपित होणे
११. कलीयुगामुळे सर्वसाधारण, दुर्बळ व कनिष्ठ स्तराच्या व्यक्ती
यांना `आपणही जबदस्तीने रंग उडवण्याचा आनंद लुटावा', असे वाटण्याची शक्यता
असणे : रंग फेकण्यात आलेल्या व्यक्तीच्या मनातही `ही गंमत आहे', असे
वाटून `त्याचा आनंद लुटावा', असे विचार येऊ शकतात; कारण मायावी व काळी
शक्ती यांची
स्पंदने व्यक्तीला कलीयुगाप्रमाणे वागायला लावू शकतात. हे सर्वसाधारण,
दुर्बळ व कनिष्ठ स्तराच्या व्यक्ती यांबाबत घडू शकते.'


मुंबईत गैरप्रकारांना उधाण
तोकड्या कपड्यांत धुलीवंदन
अंडी व फुगे मारणे
मद्यधुंद अवस्थेत एकमेकांचे कपडे फाडणे आदी गैरप्रकार
हिंदूंनो, अशा कलंकित हिंदूंना हिंदु तरी का म्हणावे !
मुंबई, ४ मार्च (वार्ता.) - शहरात या वेळी धुलीवंदनाच्या दिवशी रासायनिक
रंगाबरोबरच फ्लोरसंट रंगाचा वापर करणे, मित्र-मैत्रिणी यांच्यासह अनोळख्या
व्यक्तींवर अंडी, रंगीत पाण्याचे फुगे मारणे, मद्यधुंद अवस्थेत एकमेकांचे
कपडे फाडणे, प्रतिबंधित प्लास्टिकच्या छोट्या पिशव्यांचा पाणी भरून
फुग्यासारखा वापर करणे, पाण्याची नासाडी करणे, विक्षिप्त नृत्य करणे आदी
गैरप्रकार घडले.
(धार्मिक उत्सवात असे धर्मविरोधी गैरप्रकार करून उत्सवाचे मांगल्य नाहीसे
करणार्या हिंदूंनो, धर्माचे महत्त्व समजून घ्या. चंगळवादी संस्कृतीच्या
आधीन झालेले हे हिंदू, सणाच्या दिवशी ईश्वर भरभरून देत असलेले चैतन्य आणि
कृपा यांपासून वंचित होत आहेत. हिंदूंनो, उत्सवाचा आध्यात्मिक लाभ
मिळवण्यासाठी धर्माचरण करा व धर्मशास्त्र समजून घेऊन शास्त्रानुसार
धुलीवंदन साजरे करा ! - संपादक) घाटकोपर (प.) येथे काही ठिकाणी तरुण
अतिशय तोकडे कपडे घालून रंग खेळत होते. उघड्या अंगाला व तोंडाला रासायनिक
व फ्लोरेसेंट रंग लावून ध्वनीक्षेपकावर लावलेल्या बेताल गाण्यांवर हिडीस
नृत्य करत होते. काही मंडळी खेळून व नाचून थकल्यानंतर मंडळातील सार्वजनिक
ठिकाणी बिनधास्तपणे मद्यपान करत होती.
(धार्मिक उत्सवातील गैरप्रकारांना रोखण्याचे काम ना कुठलीही सामाजिक
संस्था करत ना हिंदुत्ववादी संस्था करत, ना शासन करत, ना शाळा किंवा
महाविद्यालये यांतून हे प्रबोधन केले जाते. यांमुळेच धर्महानी होऊन
धर्माला गालबोट लागले आहे. - संपादक)
एका ठिकाणी तर सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या वापरासाठी बांधलेल्या
पाण्याच्या टाकीत रंग टाकून त्यामध्ये आपल्या मित्रांना आणून बुडवले जात
होते. या मंडळींचे अनुकरण लहान मुले करत होती. सर्व पाणी रंगमिश्रित व
दुर्गंधीयुक्त केल्याने प्रसाधनगृहाचा वापर करणार्या नागरिकांना टाकीतील
पाणी वापरायला मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांना घरी जाऊन डब्यात पाणी
आणावे लागत होते. काही मंडळींनी तर प्रसाधनगृहाकडे फिरकणेच टाळले.
(जनतेसाठी ठेवण्यात आलेल्या सोयीसुविधांचा असा गैरवापर करून त्यांना त्या
मिळण्यापासून वंचित ठेवणारे हे हिंदू समाजद्रोहीच होत ! - संपादक)
काही ठिकाणी पाण्याचे फुगे मारण्यावरून शाब्दीक चकमकी व भांडणे होणे आदी
प्रकार घडले. एके ठिकाणी रंगाने माखलेले व मस्ती करून फाडलेले १२ ते १५
जणांचे शर्ट होळीच्या आगीत टाकले होते. मद्य जास्त प्रमाणात पिऊन
रस्त्याच्या कडेला पडलेले मद्यपीही आढळले. धुलीवंदनाचे निमित्त करून काही
तृतीयपंथी काही चाळीतील घराघरांतून व दुकानांतून ११ रुपये वर्गणी
जबरदस्तीने मागतांना आढळले. जे लोक पैसे देण्यास नकार देत वा कमी पैसे देत
त्यांना हे तृतीयपंथी नावे ठेवत.
(धार्मिक उत्सवात एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असतांना पोलीस काय
करतात ? धार्मिक उत्सवात जनतेला निष्कारण होणार्या त्रासाला आळा
घालण्यासाठी निष्क्रीय व कर्तव्यच्यूत पोलीस कधी प्रयत्न करणार ? -
संपादक)
धुलीवंदन खेळणारे घरी, त्रास लोकांच्या दारी
झोपडपट्टीमध्ये अनेक ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून रंगाने धुलीवंदन
खेळले गेले; मात्र हे खेळतांना रंगांचे फुगे धुलीवंदन न खेळणार्या
नागरिकांच्या घरात, दार व खिडक्य यांवर आदळत होते. त्यामुळे तेथील
घराघरांत रंग गेले. एवढेच नव्हे, तर घरात रंगांचा चिखल, पाणी व रंग
भरण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि फुगे यांचा साठा पडलेला
आढळला. घराच्या दरवाज्यांवर पडलेले डाग धुणे, पुसणे, घरासमोरील रंगमिश्रित
पाणी व कचरा झाडू मारून स्वच्छ करणे आदी फुकाचा उपद्व्याप धुलीवंदन न
खेळणार्यांना सहन करावा लागला. (जनतेला निष्कारण त्रास देऊन उत्सव साजरा करणार्या अशा जन्महिंदूंना कडक शासन करायला हवे ! - संपादक)
मंदिरात ध्वनीक्षेपकावर इंग्रजी गाणी व मंदिरासमोरच हिडीस नृत्य
एका
ठिकाणी श्रीगणेशाच्या प्रसिद्ध मंदिरात ध्वनीक्षेपकावर इंग्रजी गाणी लावून
मंदिरासमोर हिडीस प्रकारचे नृत्य करतांना काही `धर्मद्रोही' धुलीवंदन
साजरे करतांना आढळले. (अशा प्रकारे धार्मिक उत्सव साजरे करणार्या हिंदूंवर ईश्वराची कृपा कधी तरी होईल
का ? - संपादक)
सनातन सांगत असलेला वाईट काळ तो हाच !
पुणे, ४ मार्च (वार्ता.) - होळीच्या निमित्ताने मौजमजा करण्याच्या
उद्देशाने पुणे येथून ४० कि.मी. दूर सींगूर गावातील जंगलामध्ये शनिवारी
रात्री १२ च्या सुमारास २५१ तरुण-तरुणींनी `पार्टी' आयोजित केली होती.
यामध्ये या तरुणांनी सोबत कफिन, अफू, चरस, ब्राऊनशूगर आणि कॉलिफॉनिर्या
ड्रॉप इत्यादी करोडो रुपयांचे अमली पदार्थ आणले होते. हे तरुण-तरुणी
नशेमध्ये धुंद होऊन अर्धनग्न अवस्थेत नाचत होते. या प्रकाराची पुणे
पोलिसांना कुणकूण लागल्यावर पोलिसांनी या `पार्टी'वर धाड टाकली. इतका
प्रकार घडल्यानंतरही तरुण-तरुणींना शुद्ध नव्हती. या तरुणांमध्ये २२
विदेशी तरुण व २९ विदेशी तरुणींचा समावेश होता. (तरुण-तरुणींमध्ये नैतिकतेचा ऱ्हास
होणे आणि भावी पिढी अराजकतेच्या मार्गावर जाणे हे भारतीय संस्कृतीवर
पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण किती मोठ्या प्रमाणात झाले आहे, हेच
दर्शवते. पुरोगामित्त्वाचा विचार मांडणारे तथाकथित सुधारणावाद्यांना
याबाबत काय म्हणायचे आहे ? - संपादक) मुंबई, चेन्नई व दिल्ली येथून
आलेली ही मुले माहिती तंत्रज्ञान व वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थी
असून त्यामध्ये काही तरुणी हवाईसुंदरी आहेत. पोलिसांनी या जागेवरून ४५
चारचाकी महागड्या गाड्या व २९ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. या ठिकाणी एक
अज्ञात महिला तीन कोटी रुपयांचे दीड हजार `कॉलिफोनिर्या ड्रॉप' हा नशिली
अमली पदार्थ घेऊन येणार होती. तिचा पोलीस शोध घेत आहेत. ही सर्व मुले २०
ते ३० या वयोगटांतील असून पोलीस त्यांची वैद्यकीय चाचणी करणार आहेत. यांना
किमान ७ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे समजते.
पुणे, ४ मार्च (वार्ता.) - पुण्यातील खडकवासला धरणाच्या जलाशयामध्ये धुलीवंदनांच्या दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने मोहीम राबवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. रंग खेळून स्नान करून पाणी दूषित करू नये, यासाठी पुणेकरांना या पत्रकातून आवाहनही करण्यात आले होते. त्याप्रमाणे आज दुपारी दोन वाजल्यानंतर पोलिसांनी खडकवासला जलाशय परिसरामध्ये येऊन जलाशयात उतरलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि जलाशयात उतरण्यास मज्जाव केला. (दुपारी दोन वाजल्यानंतर पोलीस काय नावापुरते मोहीम राबवण्यास गेले होते का ? राजकारण्यांप्रमाणे केवळ आश्वासने देणारे निष्क्रीय व कर्तव्यच्यूत पोलीस प्रशासन जनतेचा विश्वास कधी तरी संपादन करू शकेल काय ? - संपादक) पोलीस या परिसरामध्ये आल्याने सर्व युवक-युवतींनी जलाशयाच्या बाजूच्या रस्त्यावर येऊन रंग खेळण्यास सुरुवात केली; मात्र काही तरुण तरीही जलाशयात उतरण्याबाबत पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचे दिसत होते. या वेळीही साधरण ६ ते ७ पोलीस उपस्थित असून त्यामध्ये वाहतूक पोलीस आणि होमगार्ड यांचाही समावेश होता. (पोलिसांनी अधिक कुमक पाठवणार असे काल जाहीर केले होते, त्याचे काय झाले ? - संपादक) दुपारनंतर खर्या अर्थाने पोलिसांनी मोहीम राबवली असली तरी सकाळपासून जलाशयामध्ये रंग खेळणार्यांची आणि स्नान करणार्यांची संख्या लक्षणीय होती. आज सकाळी ११ वाजल्यापासून ते १ वाजेपर्यंत एकही पोलीस कर्मचारी चौपाटीवर उपस्थित नव्हता आणि रंग खेळून येणारे युवक-युवती मोठ्या संख्येने जलाशयामध्ये उतरून स्नान करणे, गाड्या धुणे, असे करत असल्यामुळे जलाशयाचे पाणी दूषित होत होते. (धार्मिक उत्सवांत गैरप्रकार करून उत्सवांना गालबोट लावणार्या युवक-युवतींनो धर्मशिक्षण घ्या व हिंदु धर्मातील सणांचे अनन्यसाधारण महत्त्व जाणा ! - संपादक) मद्यपान करणे, मुलींची छेडछाड करणे, गाड्या वेगाने चालवणे इत्यादी गैरप्रकारही पोलिसांच्या अनुपस्थितीत सर्रास सुरू होते. शासन आणि पोलीस प्रशासनाची प्रामुख्याने जबाबदारी असूनदेखील हिंदु जनजागृती समितीने गेली ६ वर्षे या ठिकाणी होणार्या गैरप्रकारांना आळा घालून `खडकवासला जलाशय रक्षण मोहीम' १०० टक्के यशस्वीपणे राबवली होती. रंग खेळून जलाशयात उतणार्यांना पोलिसांनी हुसकावले; मात्र दुपारपर्यंत जलाशय परिसरामध्ये गैरप्रकारांना ऊत यंदाच्या वर्षी समितीने पोलीस प्रशासनाला जादा कुमक पाठवून हे गैरप्रकार रोखण्यासाठी आवाहन केले होते; मात्र शासन आणि पोलीस प्रशासन केलेल्या विलंबामुळे आज दुपारपर्यंत जलाशय परिसरातील चित्र न बघण्यासारखे झाले होते. (कुठे कोणतेही अधिकार नसतांना केवळ कर्तव्य म्हणून सहा वर्षे १०० टक्के यशस्वी मोहीम राबवणारी हिंदु जनजागृती समिती आणि कुठे सर्वाधिकार असलेले कर्तव्यहीन पोलीस प्रशासन ! - संपादक)
पोलिसांचे गैरप्रकारांकडे दुर्लक्ष
फोंडा, ४ मार्च (वार्ता.) - गोव्यात काल व आज होलिकोत्सव ठिकठिकाणी
साजरा करण्यात आला. यंदा राज्यात होलिकोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी
रस्त्यांवर तरुण मुले घोळक्याने उभी राहून येणार्या-जाणार्यांवर
जबरदस्ती रंग व रंगाचे पाणी मारत होती. काही ठिकाणी जागरूक नागरिकांनी
पोलिसांना संपर्क करून कळवले असता पोलिसांनी गस्त घालून गैरप्रकार बंद
केले; परंतु पोलिसांची पाठ वळताच पुन्हा या गैरप्रकारांना सुरुवात होत
असे. (होलिकोत्सवाच्या
निमित्ताने गैरप्रकार करणार्यांवर पोलीस वचक ठेवू शकत नाहीत, ते सशस्त्र
दहशतवाद्यांपासून जनतेचे रक्षण कसे करणार ? - संपादक) काही ठिकाणी पोलिसांना कळवल्यानंतरही पोलिसांनी गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केले.
(असे पोलीस काय कामाचे ? या पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा व
त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करा ! - संपादक) मागील काही
वर्षांपासून होलिकोत्सवामध्ये वाटमारी, जबरदस्तीने रंग लावणे आदी
गैरप्रकारांचा शिरकाव झालेला आहे. या गैरप्रकारांना पूर्णपणे आळा
घालण्याच्या हेतूने सनातनने इतर समविचारी संस्था व नागरिक यांच्या
सहकार्याने मागील सात वर्षांप्रमाणे यंदाही `होलिकोत्सव जनजागृती मोहीम'
राबवली. या मोहिमेच्या अंतर्गत २६ फेब्रुवारी रोजी गैरप्रकार
रोखण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. याच्या प्रती पोलीस
महानिरीक्षक, राज्याचे मुख्य सचिव व अबकारी आयुक्त यांना देण्यात आल्या.
विशेष म्हणजे गैरप्रकारांची संभाव्य स्थळे शासन व पोलीस यांना देण्यात
येऊनही यंदा गैरप्रकार झाले. (गैरप्रकारांबाबत
पूर्वकल्पना देऊनही ते रोखू न शकणारे प्रशासन काय कामाचे ? आता जागरूक
नागरिकांनाच या संदर्भात काहीतरी करावे लागेल ! - संपादक) तसेच
याविषयी भित्तीपत्रके तसेच प्रसारमाध्यमांतूनही नागरिकांचे प्रबोधन
करण्यात आले होते. यंदा डिचोली, साखळी, मये, आमोणा, बिठ्ठोण, खांडोळा व
सावईवेरे यांठिकाणी वाटमारीचे प्रकार घडले, तर हणजुणे, हडफडे, म्हार्दोळ,
कुंभारजुवे, फोंडा, बोरी, शिरोडा व सावर्डे यांठिकाणी लोकांना अडवून
जबरदस्तीने रंग लावण्यात आला.
जळगाव, ४ मार्च (वार्ता.) - होळीच्या दिवशी महापालिकेच्या अखत्यारीतील स्मशानभू्मीतून लाकडाची विक्री करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जनतेतर्फे करण्यात येत आहे. (हिंदूंच्या धार्मिक उत्सवातील गैरप्रकार किती पराकोटीला पोहोचले आहेत, याचे आणखी एक उदाहरण ! उत्सवाचे व्यावसायीकरण करून त्याचे पावित्र्य व मांगल्य घालवणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी होत ! - संपादक) जळगाव येथील `वैकुंठधाम' स्मशानभूमीत अग्नीसंस्कारासाठी लाकडे पुरवण्याचा ठेका एका ठेकेदाराला देण्यात आला आहे. या ठेकेदाराने होळीच्या दिवशी स्मशानातच `खास होळीसाठी लाकूड ६० रु. मण', अशी पाटी लावून लाकडाची विक्री केली. लाकडे घरपोच नेण्यासाठी गाडीचीही व्यवस्था करण्यात आली होती. ही विक्री करतांना त्या ठेकेदाराने दुकानाच्या कायद्यानुसार तात्पुरते दुकान लावायची महापालिकेची परवानगी घेतली होती का, याबाबत जाणून घेण्याची तसदी एकाही व्यक्तीने घेतली नाही. (अशा अवैध घटना घडतांना त्यांचे काहीही सोयरसुतक न बाळगणारे हिंदू हिंदु म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहेत का ? इतर धर्मीय त्यांच्याबाबतीत असे काही होऊ देतील का ! - संपादक)
कांदिवली येथील ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राजस्थानी सेवा समितीतर्फे पाण्याचा टँकर मागवण्यात आला होता. तेथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्यात आला, तसेच ध्वनीप्रदूषण होणारी यंत्रणा बसवून त्यावर चित्रपटगीते लावण्यात आली होती. त्याचबरोबर तरुण-तरुणी अंगविक्षेप करत नाचत होते. सर्वत्र मद्यविक्रीच्या दुकानांवर गर्दी झाली होती. लालबाग येथे सनातनच्या रुग्णवाहिकेवर रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे मारण्यात आले. त्यामुळे रुग्णवाहिकेवर लावलेले प्रबोधनपर फलक खराब झाले. भांडुप येथे काही तरुण नागरिकांवर अंडी फेकून मारत होते. काही ठिकाणी इमारतींतून पाण्याचे फुगे रस्त्यावरील नागरिकांना मारत होते. (धार्मिक उत्सवांचे पावित्र्य घालवून हिंदूंना `नको ते उत्सव' असे वाटायला लावणारे असे जन्महिंदूच हिंदु धर्माला कलंक आहेत. धर्माभिमानी हिंदूंनो, हिंदु धर्मातील या अनिष्ट गैरप्रकारांना नष्ट करण्यासाठी धर्मशिक्षण घ्या व धर्मशिक्षण द्या ! - संपादक)
कोची
(केरळ), ५ मार्च (संकेतस्थळ) - मट्टानचेरी, कोची येथे होळी उत्सवाच्या
निमित्ताने हिंदु भाविकांकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुसलमान
युवकांनी अडथळा आणला. दोन मोटरसायकलींवरून आलेल्या या मुसलमान तरुणांनी
मिरवणुकीत घुसण्याचा प्रयत्न केला. (कोची भारतात आहे कि पाकिस्तानात ?
- संपादक)
हिंदु भाविकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना न
जुमानता इंजीनचा मोठा आवाज करून त्यांनी मिरवणुकीत व्यत्यय आणण्याचा
प्रयत्न केला. (हिंदूंनो, हाच प्रकार मुसलमानांच्या मिरवणुकीत हिंदूंनी केला असता, तर त्या हिंदूंचे काय झाले असते, याचा विचार करा ! - संपादक)
हिंदु भाविकांनी त्यांना परत विनंती केल्यावर त्यांनी भाविकांना होळी
उत्सव थांबवण्याचा आदेश दिला, तसेच शिवीगाळ करण्यासही सुरुवात केली. त्या
युवकांनी भ्रमणध्वनीवरून त्यांना मारहाण झाल्याचे उगीचच त्यांच्या इतर
मित्रांना सांगितले. (खोटारडे मुसलमान ! - संपादक) लगेचच आणखी ८
मुसलमान गुंड चार दुचाकींवरून त्या ठिकाणी हजर झाले व त्यांनीही भाविकांना
शिवीगाळ करण्यास, तसेच धमक्या देण्यास सुरुवात केली. अखेर हिंदु भाविकांना
हे सगळे सहन न झाल्यामुळे त्यांनी त्या मुसलमान गुंडांना `जशास तसे' उत्तर
देण्याचा प्रयत्न करत चोप दिला. (मुसलमानांना `जशास तसे' उत्तर देणार्या हिंदु धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! - संपादक)

मुंबई, १३ मार्च (वार्ता.) - होळीच्या पवित्र सणात रंगाचा बेरंग करण्याचा
अंनिसचा प्रयत्न सुरू असून त्यातूनच कचर्याची होळी करण्याचे व पोळी दान
करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अन्य मंडळी यांनी केले आहे.
केवळ हिंदूंच्या पारंपरिक व शास्त्रीय प्रथांना विरोध करून त्यांना विकृत
स्वरूप देण्याचा प्रयत्न करणार्या या मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी
हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच होळीसाठी केवळ सुकलेले वृक्ष व
फांद्या तोडून चांगल्या वृक्षांची तोडणी न करण्याचे व तोडलेल्या
वृक्षांच्या जागी नवीन वृक्षारोपण करण्याचे आवाहन समितीने केले आहे. होळी
म्हणजे लोकयज्ञाचा प्रकार असून तो शास्त्रानुसार करण्याऐवजी कचर्याची
होळी करण्यास सांगणे, हे अतिशहाणपणाचे व धर्मशास्त्रात ढवळाढवळ करणारे
आहे. उलटपक्षी कचर्यात रबर, प्लास्टिक यांसारखे अतीप्रदूषण करणारे पदार्थ
असल्याने कचर्याची होळी केल्यास धुरामुळे निर्माण होणार्या प्रदूषणाच्या
समस्येकडे हे सवंग घोषणा करणारे दुर्लक्ष करतात. त्यामुळे जनतेने या
घोषणांकडे दुर्लक्ष करून धर्मशास्त्रानुसारच होळी साजरी करावी, असे आवाहन
समितीने केले आहे. तसेच होळीत पोळीचा नैवेद्य अर्पण करण्यावरही काहींनी
आक्षेप घेतला आहे. होळीत लाकडे जाळण्यावर आक्षेप घेऊन दरवेळी हिंदूंच्या
सणांत नाक खुपसणार्या मंडळींना बेकायदेशीररीत्या वर्षभर सर्रास होणारी
जंगलतोड दिसत नाही का ? या मंडळींनी बांधकाम व्यावसायिकांनी तिवरांच्या
जंगलांची केलेली कत्तल व मोठमोठ्या हॉटेलांमधून दररोज होणारी अन्नाची
नासाडी, यांबद्दल आजवर कधीही मोहीम उभारलेली नाही. तसेच होळी जवळ आल्यावर
जागे होणारे हे समाजसुधारक या संदर्भात वर्षभर काय करत असतात, त्यांनी
किती ठिकाणी वृक्षारोपण केले, हेही त्यांना विचारायला हवे. गरिबांना
वाटण्यासाठी होळीतली नैवेद्याचीच पोळी कशाला ? त्यासाठी स्वतंत्रपणे पोळया
जमवण्याचे कष्ट न घेता पत्रकबाजी करून प्रसिद्धीचे डाव रचले जातात. यातून
या आवाहनांच्या मागील हेतूंबद्दल शंका येते. तेव्हा धर्मशास्त्राबाबत असे
प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला
आहे. बकरी ईदच्या एका दिवशी लाखो बकर्यांचा बळी दिल्याने त्यातून निर्माण
होणार्या कचर्यामुळे व घाणीमुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा
लागतो. मात्र हिंदूंच्या सणांच्या वेळी आवाज उठवणारे हे तथाकथित सुधारक
त्या वेळी कुठे अदृश्य होतात, ते कळत नाही. हिंदूंच्या सहिष्णुतेचा
गैरफायदा घेत त्यांना डिवचण्याचा हा प्रकार आहे. तेव्हा धर्मविषयक बाबींत
हस्तक्षेप करणार्यांवर कडक कारवाई करावी व अशी आवाहने करण्यावर शासनाने
तात्काळ बंदी आणावी, असे समितीचे राज्य प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या या विश्वरूपी शरीराचे हृदय म्हणजे आपली पृथ्वी. या पृथ्वीचे हृदय भारत आणि भारताचे हृदय महाराष्ट्र आहे. या विश्वरूपी शरीराला अध्यात्मरूपी शुद्ध रक्ताचा पुरवठा करण्याचे उत्तरदायित्व त्या जगत्नियंत्याने महाराष्ट्रावर सोपवले आहे. या महाराष्ट्ररूपी हृदयाचेच काम कसे विस्कळीत करता येईल, महाराष्ट्राच्या या ईश्वरदत्त कार्यात अडथळा कसा निर्माण करता येईल, याचाच सदैव विचार करणारी एक अंनिसरूपी दुष्ट शक्ती महाराष्ट्रात कार्यरत आहे. महाराष्ट्ररूपी हृदयाच्या कार्यात निर्माण झालेल्या या अंनिसरूपी अडथळयावर आता `शस्त्र'क्रियाच करायची वेळ आली आहे. या `शस्त्र'क्रियेपूर्वी अंनिसरूपी दुष्ट शक्तीचा थोडा `पर्दाफाश' (त्यांचाच आवडता पण धेडगुजरी असलेला शब्द) होळीच्या निमित्ताने करूया !
`होली
आई है, होली है', असे म्हणत हिंदी चित्रपटांतून रंगांची उधळण करणारी होळी
आपण पहातो; पण प्रत्यक्षात होळीच्या रंगाचा बेरंग करण्याची योजना अंनिसने
तत्पूर्वीच आखलेली असते. हिंदूंनी त्यांचे सण अध्यात्मशास्त्रीय पद्धतीने
साजरे केले, तर त्यांना त्यातून खूपच लाभ होईल, याची जाणीव या
अंनिसवाल्यांमध्ये असलेल्या दुष्ट शक्तींना असते. त्यामुळे हिंदूंना या
आध्यात्मिक लाभापासून वंचित करण्याचा डाव हे अंनिसवाले आखतात. होळीच्या
दिवशी ब्रह्मांडातून येणार्या तेजतत्त्वात्मक लहरींचे पृथ्वीच्या
वायूमंडळात आगमन होते. या दिवशी पृथ्वीवरील वृक्षवेली तेजकणांनी भारित
असतात. ब्रह्मांडातील तेजतत्त्व ग्रहण करून ते आवश्यकतेप्रमाणे प्रक्षेपण
करण्यात वृक्ष हे अग्रेसर असतात. होळीत प्रदीप्त ऊर्जेच्या साहाय्याने
अग्नीदेवतेला आवाहन करून वृक्षाच्या माध्यमातून पृथ्वीवरील वायूमंडळाची
शुद्धी करणे व मानवजातीचे रज-तम कणांपासून रक्षण करणे, हा उदात्तभाव
होळीच्या सणामागे आहे. हा उदात्तभाव माहीत नसणारे अंनिसवाले प्रतिवर्षी
होळीला सुरुवात होण्याआधी त्यांच्या कार्याध्यक्षांच्या अर्धवट ज्ञानाच्या
आधारे प्रसारमाध्यमांसमोर जाऊन प्रबोधन (?) सुरू करतात. प्रसारमाध्यमेही
अशा लोकांना प्रसिद्धी द्यायला गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली असतात !
`कचर्याची होळी करा, वृक्षांची होळी करू नका', अशा आशयाचे मुद्दे मांडत
अनेक हिंदूंच्या मनात त्यांच्या सणाविषयी विकल्प किंवा संभ्रम निर्माण
करण्यात हे अंनिसवाले बर्यापैकी यशस्वीही ठरतात. `कचर्याची होळी करा,
वृक्षांची होळी करू नका', असा प्रचार करणार्या अंनिसला हिंदु
धर्माभिमान्यांनी पुढीलप्रमाणे प्रश्न विचारायला हवेत.
रेटून खोटे बोलण्याचे अंनिसचे शास्त्र
१.
अंनिसवाल्यांनो, होळीत जाळण्यासाठी दरवर्षी किती वृक्षांची तोड होते, याचा
आपण काही शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे का ? कि हिंदूंचे सण आले की, आपण
`शास्त्रीय' अभ्यासाचा उदोउदो बंद करून, नेहमीचे रेटून खोटे बोलण्याचे
स्वत:चे असे `शास्त्र' प्रत्यक्षात आचरणात आणता ? आम्ही हिंदूंनी
गणेशमूर्तीविसर्जनाच्या वेळी आपल्या खोटारडेपणाचा अनुभव पुरेपूर घेतला
आहे. मूर्ती विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण किती होते, याचे आपण दिलेले
संदर्भशून्य आकडे आम्हाला आठवत आहेत. याउलट गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे
जलप्रदूषण होत नसल्याचा निष्कर्ष `सृष्टी इको रिसर्च इन्स्टीट्युट' या
पर्यावरणविषयक अभ्यास करणार्या संस्थेचे वरिष्ठ पर्यावरण अधिकारी श्री.
अमित नरेगलकर, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी कनिष्ठ
वैज्ञानिक श्री. जयेश रमेश वर्तक यांनी अभ्यासाद्वारे मांडला आहे.
हिंदु धर्माला `टार्गेट' !
२. अंनिसवाल्यांनो,
होळीशिवाय अन्य वेळी केली जाणारी वृक्षतोड आपल्याला दिसते का ? कि त्या
वेळी आपल्या दोन्ही डोळयांत `कचरा' गेलेला असतो ? अन्य वेळी केली जाणारी
वृक्षतोड पर्यावरणाच्या दृष्टीने किती भयानक असते, याचे एक प्रातिनिधिक
उदाहरण आपण पाहूया. ब्रिटीश लेखिका जे.के. रोलिंग हिचे `हॅरी पॉटर अँण्ड द
हाफ ब्लड प्रिन्स' हे पुस्तक जुलै २००५ मध्ये प्रसिद्ध झाले. या
पुस्तकाद्वारे मुलांच्या मनावर हिंसा बिंबेल, असे अनेक मानसोपचार तज्ञांनी
म्हटले आहे. या पुस्तकामुळे भारतातील एक महत्त्वाचे जंगल नष्ट झाले. हे
जंगल आसाममध्ये तिन्सुकिया येथे होते. ६५२ पृष्ठसंख्येच्या या पुस्तकाच्या
लाखो प्रतींसाठी लागणारा कागद या जंगलातल्या झाडांपासून तयार करण्यात आला.
हे जंगल नष्ट झाल्याने ग्रेट हॉर्नबिलसारख्या पक्षांच्या अनेक जातींचा
नैसर्गिक निवारा नष्ट झाला आहे. एवढे मोठे जंगल नष्ट झाल्यामुळे जागतिक
तापमानातही वाढ होऊ शकते, असे अनेक पर्यावरणवाद्यांचे मत आहे. अंनिसने या
विषयावर कृती सोडाच, साधे भाष्यही केलेले नाही. या नष्ट झालेल्या
जंगलाच्या मुद्यावरून हिंदु धर्माला `टार्गेट' करता येणार नाही, हे तर
त्यामागील कारण नसावे ना ?
३. अंनिसवाल्यांनो, भारतात नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातही
नव्हे; तर ज्या पाच-पन्नास गावांमधून तुमचे टिवटिव करणारे दोन/चार
कार्यकर्ते आहेत, तेथे तुम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी वर्षभर कोणते
प्रयत्न केलेत ? अनाठायी होणारी किती वृक्षतोड तुम्ही रोखलीत ? किती नवीन
रोपटी तुम्ही वर्षभरात लावलीत ?
४. जो मुद्दा वृक्षतोडीचा तोच कचरा जाळण्याचा. वर्षातून एक
दिवस कचरा जाळून (तोही हिंदूंच्या मोठ्या सणाच्या दिवशी) असा कोणता फरक
पडणार आहे ? असे केले आणि वर्षभर कचर्याचे ढीग तसेच साचवून ठेवले; तर
अंनिसवाल्यांनो, ते तुम्हाला आणि समाजालाही चालणार आहेत का ? प्रतिदिनी
पहाटे उठून घर, अंगण आणि परिसर स्वच्छ करून सडासंमार्जन करून, रांगोळी
काढून आपले आवार स्वच्छ व सात्त्विक ठेवण्याची शिकवण हिंदूंना
पिढ्यान्पिढ्या देण्यात आली आहे. त्यामुळे आपोआप गावही स्वच्छ रहातो. किती
अंनिसवाले ते रहात असलेला परिसर, त्यांची गल्ली कचरामुक्त राखण्यासाठी
वर्षभर धडपडतात ?
अग्निदेवतेचा अपमान
५. श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी वाहात्या पाण्यात सोडण्यात
येणार्या निर्माल्याला `कचर्या'ची किंमत देऊन त्याचे खत करा, असे
सांगणारे अंनिसवाले होळीच्या वेळी जमवलेल्या कचर्याचे खत करा, असे का
सांगत नाहीत ? त्याचे कारण उघड आहे. त्यांना हिंदूंच्या अग्निदेवतेचा
अपमान करायचा असतो. या अग्निदेवतेच्या अपमानासंबंधी एक प्रसंग पाहूया. डॉ.
प.वि. वर्तक, पुणे यांनी `ब्रह्मर्षीची स्मरणयात्रा' या आत्मचरित्रात
मंत्राने अग्नी पेटवून दाखवणारे श्री. शिदोरे गुरुजी, मु. सुधागड, पाली
यांची माहिती (पृष्ठ क्रमांक ७७/७८) दिली आहे. श्री. शिदोरे गुरुजी
सप्तशतीतील एका मंत्राने अग्नी प्रज्वलित करतात, हे कळल्यामुळे डॉ. वर्तक
यांच्या पुढाकाराने पुण्यात हा प्रयोग करण्याचे ठरले. २०० लोकांच्या
उपस्थितीत सर्व वैज्ञानिक चाचण्या पूर्ण करून गुरुजींनी अजिबात धूर न होता
पुरुषभर ज्वाला उफाळलेला अग्नी प्रज्वलित करून दाखवला. त्यानंतर श्री.
शिदोरे गुरुजींनी मुंबईत केलेला असाच एक प्रयोग फसला. त्या प्रयोगात
सहभागी झालेला एक `शहाणा' डॉ. वर्तकांना नंतर भेटावयास आला आणि प्रयोग
अपयशी केला, असे प्रौढीने सांगू लागला. डॉ. वर्तकांनी त्याला विचारले,
प्रयोग अपयशी कसा केलात ? तो म्हणाला, `यज्ञासाठी लागणारी लाकडे ओली करून
ठेवली होती' ! आपतत्त्व आणि अग्नीतत्त्व यांच्या कार्याबद्दल मूलभूत
माहितीही नसलेल्या अंनिसच्या भाऊबंदांपैकीच हा `शहाणा' असणार ! शास्त्रीय
प्रयोग करतांना योग्य ते `साहित्य' प्रयोग करणार्याला पुरवायचे असते, हे
पाचवीतील विद्यार्थीसुद्धा सांगेल ! अंनिसवाले जिभेवर कापूर ठेवून तो
पेटवून दाखवण्याचा प्रयोग करत असतात. प्रयोगाआधी हा कापूरच कोणी पाण्याने
भिजवून ठेवला, तर तो पेटवून दाखवता येईल का ?
उपक्रमांना राजकीय आधार
६. अंनिसवाल्यांनो, तुमच्या
बाजूने जवळजवळ सर्व साखळी वर्तमानपत्रे, `चित्रलेखा'सारखे साप्ताहिक,
दूरदर्शन, तुमचे स्वत:चे मासिक एवढी प्रसिद्धीमाध्यमे आहेत. हे सर्वजण
तुम्ही सांगाल त्याची शहानिशा न करता कशालाही प्रसिद्धी द्यायला सिद्ध
असतात. असे असतांना तुमची चळवळ पुढे का सरकत नाही ? गणपतीमूर्तीच्या
विसर्जनाच्या दिवशी मोठ्या कष्टाने तुम्ही १०/२० मूर्ती `दान' मिळवल्या
असतांना शेकडो गावांतून हजारो मूर्ती दान मिळाल्याचे सांगता. तेवढेही खोटे
आकडे किंवा तुमच्या प्रबोधनामुळे वृक्षतोड थांबल्याचे (खोटे) प्रसंग
तुम्ही का दाखवू शकत नाही ? तुमच्या चळवळीची ही पुच्छ प्रगती नव्हे का ?
७. अंनिसवाल्यांनो, या सर्व गोष्टीत तुम्हाला वनमंत्र्यांचे
किंवा तत्सम राजकीय नेत्यांचे साहाय्य नेहमीच का लागते ?
दैत्यांचा अमृतावर डोळा
८. अंनिसवाल्यांनो, तुमचे सर्वच `सामाजिक' उपक्रम हिंदु सणांच्या
भोवती का अडखळत असतात ? ते उपक्रम स्वतंत्रपणे वाटचाल का करत नाहीत ?
होळीच्या पार्श्वभूमीवर गेली काही वर्षे तुम्ही `होळी लहान करा, पोळी दान
करा !' हा उपक्रम राबवता. याद्वारे होळीमध्ये पोळी अर्पण न करता ती
गरिबांना वाटायला तुम्ही सांगत आहात. तुम्हाला गोरगरिबांना पोळया
वाटायच्या असतील, तर त्या स्वतंत्रपणे जमा करा आणि वाटा. गणपति आले की,
तुम्ही निर्माल्य जमा करून खत करणार. होळी आली की, कचरा गोळा करून तो
होळीत टाकणार. सामाजिक कार्याची एवढी हौस आहे, तर रत्नागिरी व चिपळूण
येथील नगरपरिषदांना घनकचरा प्रकल्प मार्गी लावायचे आहेत, त्यात त्यांना
मदत करा. पोळया जमवण्याचाही तोच प्रकार ! स्वतंत्रपणे आवाहन करून अन्य
कोणत्याही दिवशी पोळया जमवता येणार नाहीत, म्हणून तुम्हाला हिंदूंच्या
सणांच्या आयत्या `पिठा'वर सामाजिक कार्याच्या `रेघोट्या' माराव्याशा
वाटतात ! आज तुम्ही देवतांना पोळी अर्पण करायला अडवताय, उद्या श्रीफळही
अर्पण करू नका म्हणाल ! देवतांच्या वाट्याला येणार्या `अमृता'वर डोळा
ठेवण्याची तुमची घातक सवय का जात नाही ? ते काही चालणार नाही. `मानवाने
दिलेला हविर्भाग अग्निदेव देवतांपर्यंत नेऊन पोहोचवतो', असे धर्मशास्त्र
आम्हाला सांगते आणि आम्ही हिंदु धर्मशास्त्राप्रमाणेच वागणार !
९. अंनिसवाल्यांनो, तुमच्या `गणेशमूर्ती दान करा' या
मोहिमेच्या वेळी महाराष्ट्रात आठ/दहा ठिकाणी तुम्ही मूर्तीदान घेण्यासाठी
उभे असता; पण होळीच्या ठिकाणी वृक्ष किंवा लाकडे जाळू नका, असे सांगायला
आपण का उभे रहात नाही ? तुम्हालाच उचलून होळीत टाकले जाईल, असे तर तुम्हास
वाटत नाही ना ?
होलिका राक्षसीचा कलीयुगातील अवतार !
`अग्नीपासून भय
नाही', असा वर हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला मिळाला होता. या वराने
उन्मत्त झालेल्या होलिका राक्षसीने तिच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला
बसवले आणि चितेत प्रवेश करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न पुराणकाळात
केला होता. त्यात भक्त प्रल्हादाला काहीच न होत तिचाच अंत झाला. असाच
प्रयत्न कलीयुगातील अंनिसरूपी होलिका राक्षसी पुन्हा एकदा करत आहे.
आपल्या मांडीवर प्रल्हादरूपी हिंदु समाजाला बसवून ती अग्नीमध्ये प्रवेश
करत आहे. ....आणि या वेळीही अग्निदेव त्याचे काम चोख बजावणार आहे !

मनुष्य हा तेजोपासक आहे. होळी हा तेजाचा उत्सव ! `मानवी जीवन तेजस्वी
बनवणे', हा या उत्सवाचा उद्देश असल्याचे संतमहात्मे आपल्याला सांगतात; पण
संतांची शिकवण आज कोणीच विचारात घेत नाही. शास्त्रात काय सांगितले आहे, हे
कोणी अभ्यासायला जात नाही. आजची काही बाजारू वृत्तपत्रे `होळी कशी साजरी
करायची ?', याबाबत सिनेमातील नट-नट्या, खेळाडू व कलाकार यांची मते छापतात.
या सर्वांचा परिणाम म्हणजे हिंदु समाज खरी होळी विसरत चालला आहे. होळी
साजरी करण्याच्या विविध पद्धती आपणास देश-काळानुसार पहावयास मिळतात. समाज,
राष्ट्र व धर्म यांना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता शास्त्रात
सांगितल्याप्रमाणे `होळी' साजरी करावी. नैवेद्यासाठी पुरणपोळी, नारळ, दूध,
तूप आदी पदार्थ आणावेत. वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
कापराच्या साहाय्याने होळी प्रज्वलित करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.
राष्ट्र व धर्म यांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करावी. थोरामोठ्यांनी
समाजप्रबोधन करावे. होळी पेटून पूर्ण झाल्यावर तिला दूध व तूप शिंपडून
शांत करावे.
प्रतिकात्मक होळी नकोच !
काही ठिकाणी कचरा
एकत्र करून त्याची होळी करणे, त्यातून स्वच्छतेचा तथाकथित संदेश समाजाला
देणे, असे हल्ली काही संघटनांकडून केले जाते. याव्यतिरिक्त भ्रष्टाचार,
अनाचार, अत्याचार, गरिबी यांची रूपे देऊन प्रतिकात्मक होळी साजरी केली
जाते; पण या प्रतिकात्मक होळीला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होत नाही.
भ्रष्टाचार, गरिबी यांची प्रतिकात्मक रूपे जाळत बसण्यापेक्षा या वाईट
गोष्टी संपवणारे धर्मपालक समाजात निर्माण होणे आवश्यक आहे !

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) - शहर व उपनगरे येथे यंदाही विविध ठिकाणी होळी व धुलीवंदन हे सण साजरे करतांना गैरप्रकार घडले. या गैरप्रकारांच्या विरोधात सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्यातर्फे शहरात विविध ठिकाणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे पोलीस, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व नागरिक यांनी कौतुक केले, तर काही ठिकाणी नागरिकांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला. या मोहिमेच्या अंतर्गत शहरात ठिकठिकाणी हा सण साजरा करतांना दुखापत होणार्यांना प्रथमोपचार करता यावेत, यासाठी रुग्णवाहिकांमधून `सनातनचे प्रथामोपचार पथक' भ्रमण करत होते. त्याच वेळी या रुग्णवाहिकांवर बसवण्यात आलेल्या ध्वनीक्षेपकावरून `मद्यपान करून उत्सव साजरा करणे ही संस्कृती नसून विकृती आहे', `रासायनिक रंगांचा वापर करणे आरोग्यास अपायकाराक आहे', `उत्सवाचे पावित्र्य राखा', `गैरप्रकारांच्या विरोधात निर्भयपणे पोलिसांत तक्रार करा', अशा प्रकारच्या उद्घोषणा करून आवाहन करण्यात येत होते.
दादर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी
सांगितले, ``या आवाहनामुळे नागरिक तक्रारी करत आहेत.'' सनातनची
रुग्णवाहिका फिरत होती, तेथील तरुण प्रबोधनपर संदेश एकून गैरप्रकार करणे
थांबवत असल्याचे लक्षात आले. अनेक जण अपराधीपणे माना खाली घालत होते, तर
काही तरुण रुग्णवाहिकेला पाहून हात जोडून नमस्कार करत होते. काही नागरिक
रुग्णवाहिकेकडे येऊन `आमच्याही भागात येऊन प्रबोधन करा', अशी विनंती करत
होते.
ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांनी सनातनच्या साधकांचे कौतुक करून `सनातनने ही मोहीम राबवून पोलिसांना मदत केली आहे', अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या. भोईवाडा व दादर येथील पोलीस ठाण्यांनी या मोहिमेसाठी पोलीस ठाण्याची चारचाकी गाडी उपलब्ध करून दिली. या वेळी भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वर्मा यांनी पोलिसांना ``सनातनला संपूर्ण सहकार्य करा'', असे आदेश दिले. वरळी येथे काही तरुण मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीला जबरदस्तीने चिखलात लोळवत होते, तेव्हा सनातनचे साधक व पोलीस घटनास्थळी जाताच तेथील तरुणांनी तेथून पोबारा केला. यावर पोलिसांनी `आता शासनाने उत्सवामध्ये मद्यविक्री करणारी दुकाने बंद करण्यासाठी कायदा करावा', असे मत व्यक्त केले. दादर परिमंडळ सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री. बाळकृष्ण भांगे यांनी सनातनचे कार्य जाणून घेतले व लगेचच `दैनिक सनातन प्रभात'चे वर्गणीदार झाले.
लालबाग व परळ येथे रुग्णवाहिका फिरत असतांना लालबागचा राजा सार्वजनिक गणशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व इतर मंडळांच्या पदाधिकार्यांनी सनातनच्या साधकांना भेटून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या मोहिमेसाठी ट्रॉम्बे-मानखुर्द भागातील नगरसेवक श्री. राहुल शेवाळे यांनी यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, तर ठाणे येथील प्रसिद्ध डॉक्टर महेश दीक्षित यांनीही रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिली, तसेच ते सनातनच्या प्रथमोपचार पथकात सहभागी झाले. याचप्रकारे पश्चिम मुंबईतील अंधेरी, बोरीवली, मीरा-रोड या भागांतही रुग्णवाहिका फिरवण्यात आली व लोकांचे गैरप्रकारांच्या विरोधात प्रबोधन करण्यात आले. मीरा-रोड येथे डॉ. सौमाल यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. भांडुप येथे एका दुचाकीस्वाराला अपघात होऊन डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला होता. त्या भागातील प्रथमोपचार पथकाने उपचार केले.
पुण्यातील बिबवेवाडी येथील `गंगाधाम संकुल' (फेज २) येथे काल धर्मशास्त्रानुसार आदर्श होळी साजरी करण्यात आली. आदर्श होळी साजरी करण्याविषयीची माहिती `दैनिक सनातन प्रभात'च्या २ मार्च रोजीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार `गंगाधाम संकुल'मधील रहिवाशांनी धर्मशास्त्रानुसार आदर्श होळी साजरी केली. (धर्मशास्त्रानुसार आदर्श होळी साजरी करणार्या `गंगाधाम संकुल'वासियांचे अभिनंदन ! अशा प्रकारे सर्वांनीच जर होळी साजरी केली, तर हिंदूंच्या सणांचे अनन्यसाधारण असणारे महत्त्व कळण्याबरोबरच त्याचा आध्यात्मिक स्तरावर खूप फायदा होईल ! - संपादक) सुरुवातीस सर्वांनी सामूहिक श्लोक म्हटला. होळीला नमस्कार केला. शेणाच्या गोवर्यांनी, तसेच मोडक्या लाकडांनी बनवलेल्या होळीभोवती सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. यांनतर संकुलामधील सर्व महिलांनी होळीची पूजा केली. शेवटी उपस्थितांना होळीत भाजलेल्या नारळाचा प्रसाद वाटण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत सुंदर झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. याबरोबरच येणारा गुढापाडवा हा सण असाच धर्मशास्त्राप्रमाणे साजरा करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. (अन्य नागरिकांनीही `गंगाधाम संकुलवासियां'च्या कृतीतून बोध घ्यावा ! - संपादक)
सिंधुदुर्ग - धर्मशास्त्रानुसार सण व उत्सव साजरे केले जावेत. या उत्सवांचा आध्यात्मिक लाभ सर्वांना व्हावा व प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत व्हावा, या उद्देशाने वेंगुर्ले येथे सलग ६व्या वर्षी, तर कणकवली येथे ५थ्या वर्षी आदर्श होळी साजरी करण्यात आली. येथील हिंदु जनजागृती समित्या, वेंगुर्ले तालुका जनजागरण कृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काल सायंकाळी हा उपक्रम राबवण्यात आला. (`आदर्श होळी' साजरी करून समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या वेंगुर्ले तालुका जनजागरण कृती समिती व हिंदु जनजागृती समिती यांचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा ! - संपादक) वंेगुर्ले येथील दाभोली नाका येथेही `आदर्श होळी' साजरी करण्यात आली. श्री. पुुरुषोत्तम भगत गुरुजी यांनी होळीचे विधिवत पूजन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सदस्य श्री. संदीप गावडे यांनी `आदर्श होळी म्हणजे काय' व `होळी मागील अध्यात्मशास्त्र आणि करावयाच्या पद्धती' यांबाबत माहिती दिली. कणकवली येथे ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात सनातनचे साधक श्री. संदीप कदम यांच्या हस्ते होळीचे विधीवत पूजन करण्यात आले.
पनवेल - काही समाजकंटक सण साजरा करण्याच्या नावाखाली गुंडगिरी करणे, महिलांची छेडछाड करणे, जबरदस्तीने वर्गणी वसूल करणे असे गैरप्रकार करतांना आढळले. अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी पनवेल शहर पोलिसांच्या सहकार्याने होळी व धुलीवंदन या सणांच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था यांनी मोठ्या प्रमाणात जनप्रबोधनचा उपक्रम हाती घेतला होता. या वेळी वाहनावर ध्वनीक्षेपक लावून जनतेला गैरप्रकार रोखण्यासाठी आवाहन करण्यात आले, तसेच `सण योग्य पद्धतीने कसा साजरा करावा', याबाबतही प्रबोधन करण्यात आले. जनप्रबोधनाच्या बरोबरच डॉ. चंद्रशेखर प्रसादी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमोपचार सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी पनवेलचे माजी नगराध्यक्ष श्री. सुनील घरत यांनी पूर्ण दिवसासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. या उपक्रमास शहरातील तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभला.
मुंबई, १३ मार्च (वार्ता.) - धुलिवंदनाच्या पवित्र दिनी सनातन संस्थेतर्फे मुंबईत अनेक ठिकाणी प्रथमोपचार पथकांचे आयोजन करण्यात आले आहे. या पथकांसोबतच अनेक ठिकाणी होळी व धुलिवंदन शास्त्रीय व आनंददायी पद्धतीने कशी साजरी करावी, याबाबत व्यापक जनप्रबोधन करण्यात येणार आहे. दादर (पूर्व), घोडपदेव, काळाचौकी, चिंचपोकळी, लालबाग, भांडुप, तसेच उपनगरांत या ठिकाणी फिरत्या पथकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत मुंबई शहर व उपनगरे येथे तज्ञ डॉक्टरांसह ही पथके जनतेची सेवा करतील. या वेळी जनतेला होळी व धुलिवंदनाचे महत्त्व सांगून प्रबोधनही करण्यात येणार आहे. धुलिवंदन हा हिंदूंचा पवित्र व रंगांनी सजलेला सण आहे. या सणात शिरलेल्या अपप्रवृत्तींना जनतेने थारा देऊ नये. नागरिकांनी धुलिवंदन करतांना रासायनिक रंगांचा वापर करणे, पाण्याचे फुगे अथवा पिशव्या वापरणे टाळावे. याशिवाय धुलिवंदनाच्या सणाची पवित्रता जपतांना वाटमारी, मद्यपान तसेच मुलींची छेडछाड, अशा गैरप्रकारांना विरोध करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. संस्थेच्या प्रथमोपचार पथकांशी संपर्क साधण्यासाठी डॉ. उदय धुरी यांना ९३२४२०३१५६ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.
ठाणे - सनातन संस्थेतर्फे शहरात धुलीवंदनातील गैरप्रकार रोखण्यासाठी व
लोकांना प्रथमोपचार सेवा पुरवण्यासाठी `प्रथमोपचार पथकाची गाडी' पुरवण्यात
आली. त्या वेळी ध्वनीक्षेपकावरून उद्घोषणा करून लोकांचे प्रबोधन करण्यात
आले. लोकांना नैर्सर्गिक रंग वापरा, फुगे व पिशव्या लोकांवर मारू नका व
रंग लावण्यासाठी जबरदस्ती करू नका, असे आवाहन करण्यात आले. या पथकास
लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर दोन ठिकाणी पथकावर फुगे टाकण्यात आले
व पथकातील साधकांवर रंग फेकण्यात आला.
सनातन इतर समविचारी संघटना व व्यक्ती यांच्या सहकार्याने गेली चार वर्षे
धार्मिक उत्सवांतील गैरप्रकारांच्या विरोधात जनजागृती मोहिमा राबवत आहे.
या अंतर्गत गेल्या ६ वर्षांत सनातनला होळीतील गैरप्रकारांबाबत जनजागृती
मोहीम राबवतांना नागरिकांनी या मोहिमेस आमची सहमती आहे, अशी प्रतिक्रिया
व्यक्त केली होती; परंतु आता केवळ अशी प्रतिक्रिया पुरेशी नाही, तर हे
गैरप्रकार पूर्णत: बंद होण्यासाठी तुमचा कृतीसह सहभाग अपेक्षित आहे.
यासाठी आपण पुढील प्रकारे सहभागी होऊ शकता.
मोहिमेच्या संदर्भातील आवाहनपत्रके विविध शासकीय अधिकारी व इतर संबंधित यांना सादर करणे व त्यांना मोहिमेचा उद्देश समजावून सांगणे.
प्रशासकीय व पोलीस अधिकार्यांना त्यांच्या अधिकारांचा वापर करून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आवाहन करणे.
इतरांना मोहिमेविषयी सांगणे व कृतीशील करणे.
वकिलांनी कायदेविषयक मदत देणे. पोलीस व सरकारी अधिकारी यांना पत्र पाठवून वा दूरध्वनी करून गैरप्रकारांबाबत कळवणे.
गैरप्रकारांवर नजर ठेवणार्या निरीक्षण पथकात सहभागी होणे.
समविचारींना संघटित करणे.
निधीसंकलनाच्या वेळी जबरदस्ती करण्यात येत असल्यास पोलिसांकडे तक्रार करणे.
गैरप्रकार होणार्या ठिकाणांची माहिती पोलिसांना कळवणे.
ध्वनीप्रदूषण होत असल्यास दूरध्वनीद्वारे पोलिसांकडे तक्रार दाखल करणे. त्यासाठी तुम्ही तुमचे नाव सांगायची आवश्यकता नाही.
सार्वजनिक परिसरात जुगार अथवा मद्यपान होतांना आढळल्यास पोलिसांकडे
दूरध्वनीद्वारे तक्रार दाखल करणे. यासाठी पुराव्याची आवश्यकता नाही.