Groups
Groups
Sign in
Groups
Groups
Marathi Material
Conversations
About
Send feedback
Help
मनोधैर्य'मधून बलात्कार पीडितांना तीन लाखांपर्यंतचे अर्थसहाय्य
2 views
Skip to first unread message
http://marathiasmita.info/
unread,
Sep 11, 2013, 10:17:21 AM
9/11/13
Reply to author
Sign in to reply to author
Forward
Sign in to forward
Delete
You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to marathi-...@googlegroups.com
बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य करणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी 'मनोधैर्य' ही नवीन योजना राज्यात सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. ही योजना राज्यात दोन ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येईल. निर्णयाचा लाभ -१. या योजनेंतर्गत बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान दोन लाख रुपये व विशेष प्रकरणांमध्ये कमाल तीन लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. २. त्याचप्रमाणे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकास त्याचा चेहरा विद्रूप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास रुपये तीन लाख आणि इतर जखमांसाठी रुपये पन्नास हजार इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. ३. या अर्थसहाय्याशिवाय अशा पीडित महिला व बालक यांना किंवा त्यांच्या वारसदारांना गरजेनुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण यासारख्या आधारसेवा उपलब्ध करून देण्यात येतील. ४. याशिवाय, प्रत्येक प्रकरणात पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, वैद्यकीय उपचार, प्रवास व इतर अनुषंगीक तातडीच्या खर्चासाठी देण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरील जिल्हा क्षति सहाय्य व पुनर्वसन मंडळामार्फत करण्यात येईल. सद्य:स्थितीत या योजनेतंर्गत येणारा खर्च राज्य शासनामार्फत भागविण्यात येणार आहे. केंद्र शासनाची योजना अंमलात आल्यावर त्याप्रमाणे योजनेची अंमलबजावणी करण्यास व निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages