आयुष्य फार सुंदर आहे ..

12 views
Skip to first unread message

Kirat Sawant

unread,
Oct 21, 2012, 3:24:53 AM10/21/12
to dny-m...@googlegroups.com

आयुष्य फार सुंदर आहे! ..

एकदा लग्न झालं कीआपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... 
असं वाटण्याची जागा
मूल झालं की... 
मोठं घर झालं की... 
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . 
दरम्यानच्या काळातआपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो . 
मुलांच्या वाढत्या वयातत्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतोमुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल,असं आपल्याला वाटत असतं
आपला नवरा बायको जरा नीट वागायला लागला लागली की... 
आपल्या दाराशी एक गाडी आली की ... 
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ... 
निवृत्त झालो की ... 
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईलअसं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.

खरं असंकी आनंदात असण्यासाठीसुखात असण्यासाठी आत्ताच्या  

वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतचती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का?

जगायला खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये असंच बराच काळ वाटत राहतं . 
पणमध्ये बरेच अडथळे असतातकाही आश्वासनं पाळायची असतातकोणाला वेळ द्यायचा असतोकाही ऋण फेडायचं असतं.... 
आणि अगदी शेवटी कळतंकी ते अडथळे म्हणजेच जीवन होतं. या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही
आनंद हाच एक महामार्ग आहे.   
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा . 
शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ...कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतोएकदाचा तो टप्पा पार पडला कीसारं काही मनासारखं होईल,अशी आपणच आपली समजूत घातलेली असतेपणअसं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा . 


आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या पाहू -   
 - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू
 - गेल्या पाच वर्षांत विश्वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत
 - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील
 - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का
हंकाहितरीच काय विचारतायअसं तर वाटलं नाही ना तुम्हालापण , असं वाटलं नसलं तरीया प्रश्नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीचनाही का ? 
टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो . 
पदकं आणि चषक धूळ खात पडतात
जेत्यांचाही लवकरच विसर पडतो


आता या चार प्रश्नांची उत्तरं द्या पाहू - 
 - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं
 तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील
 - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोतअसं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला
 - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं

क्षणभर विचार करा . 
आयुष्य अगदी छोटं आहे.   
तुम्ही कोणत्या यादीत असाल ? काही अंदाज लागतोय ? 
मी सांगतो
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहियेपण , हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं , त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे.... 
आता एक गोष्ट
काही वर्षांपूर्वीची सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होतेही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती
पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झालीसाऱ्यांनाच पळता येत होतं असं नाहीपणप्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं
धावता धावता एकाचा तोल गेलाकाही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला
त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले
सारे मागे फिरले... सारे जण... 
डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसलीतिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?'' 
मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले
ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले . उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता... 
त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात
का
कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते
आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणंत्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते
शक्य तितक्या लोकांना हे सांगात्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईलकदाचित इतरांचंही...

मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाहीनाही का ?

जर आपणास हे विचार आवडले असतील तर इतरांना पाठवून विचार करावयास प्रवृत्त  करा.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages