यावरून एक छोटी कथा ऐकवतो.
माझे गुरुजी श्री नारायण जोशी यांनी अहमद जान थिरकवा यांची 15 वर्षे शागीर्दी केली. परंतु तबला हा विषय काय हाती लागला नाही. त्यांचे वडील गजाननराव जोशी थोर गवई होते.
नारायण जोशी यांना मी प्रश्न केला की गजाननराव जोशी विद्यार्थ्याला प्रथम काय शिकवीत? स रे ग म असे त्यानी उत्तर दिले. तुला अ आ इ ई कोणी शिकवली आईनी, शाळा मास्तराने की तुझ्या गुरुजींने? उत्तर अर्थातच होते शाळा मास्तराने. मग ती बाराखडी तबल्याचे बोल जी एक कला आहे ती म्हणण्यासाठी काय उपयोगाची. बाराखडी नीट म्हणता येत नसेल तर तबल्याचे बोल तरी कसेकाय नीट म्हणता येतील आणि तबला तरी कसाकाय नीट वाजवता येईल?
संस्कृतची बाराखडी आपण शाळेत शिकतो ती आहे की महेश्वर सूत्र. (संस्कृतसुद्धा एक कला भाषा आहे म्हणूनच शिष्ठांची भाषा म्हणवली जाते) मराठी लिहिता वाचता आलं म्हणजे संस्कृतसुद्धा लिहिता वाचता आणि बोलता येते हाच तर मोठा भ्रम आहे.
तबल्याचे बोल नीट म्हणता येण्यासाठी मला सुद्धा महेश्वर सूत्रच कामी आले. शाळेत शिकलेली बाराखडी न्हवे. करण हे आहे की महेश्वर सूत्र नीट म्हटल्याने लघु गुरू उदात्त अनुदात्त वगैरे मध्ये असलेला प्रयत्न भेद उमगायला लागतो.
Manage करता आलं म्हणजे आलं अस नाही. पतंजली म्हणतात निःसंशय होण्यासाठी व्याकरणाचा अभ्यास करावा. व्याकरण शिकून आणि अभ्यासून व्यक्ती संशय रहित होत नसेल तर त्याचे कारण काय असावे बरे?
Revolutions took place over cups of tea in tea houses.
माझं सांगणं एवढंच आहे की संस्कृत ही इतर भाषांप्रमाणे आहे असे न समजता महेश्वर सूत्र आधारित प्रयोग अपेक्षित आहे. दुर्दैव हे आहे की प्रत्यहाराच्या पलीकडे जाऊन महेश्वर सूत्रांचा विचार कोठे झालेला दिसत नाही आणि मग इंग्लिश संस्कृत, मराठी संस्कृत, कन्नड संस्कृत इत्यादी असे अपभ्रंश बोलण्यात आणि स्वाभाविक लेखनात दिसून यायला लागतील.
माझे म्हणणे समजत नाही असे वाटणे स्वाभाविक आहे कारण महेश्वर सूत्रे शिक्षेचा भाग समजला जात नाही आणि थेट अ,आ,इ,ई, ... क,ख,ग, ..... क,का,कि,की .... शिकवली जातात. मी केलेले लेखन हे महेश्वर सुत्रांना प्रमाण समजून केले आहे. यात ही सूत्रबद्ध बाराखडी बनवली आहे जेणे करून अ, आ, इ .... शिकवण्याची गरज भासणार नाही.
तुमचा स्नेही,