।। *स्थानिक भरती* : ३री सुनावणी बैठक ।।
_*अनुसूचित क्षेत्रात, नवीन भरतीत १७ संवर्गात १००% स्थानिक आदिवासींना आरक्षण असा राज्यपालांच्या अध्यादेश आहे*._
या संदर्भात साध्यापर्यंत भरलेली, सध्या रिक्त, भविष्यात लागणाऱ्या पदांची माहिती RTI ने न मिळाल्याने सगळ्या विभागात प्रथम अपील केले आहे. आपल्या माहिती साठी विभागवार राखीव संवर्ग व सद्य स्तिथी.
*०) सामान्य प्रशासन विभाग, मुख्यमंत्री कार्यालय, आदिवासी विकास विभाग* :
(अध्यदेशातील सगळ्या १७ संवर्गातील पदांविषयी माहिती, महाराष्ट्र आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार)
RTI स्थिती : *संबंधित विभागाला संपर्क करावा असे प्रथम अपील बैठकीत सांगण्यात आले*
🏷विभागावर अर्ज केल्यावर ची सद्यस्थिती :
*१) ग्राम विकास विभाग* :
(शिक्षक, ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक, सहायक परिचारिका, बहू उद्देशीय परिचारिका, बहू उद्देशीय आरोग्य कर्मचारी, परिचारिका)
#RTI स्थिती : *माहिती मिळाली नाही*
*२) महसूल व वनविभाग* :
(तलाठी, सर्वेक्षक, वनरक्षक, कोतवाल, वननिरीक्षक)
#RTI स्थिती : *माहिती मिळाली नाही*
*३) सार्वजनिक आरोग्य विभाग* :
(बहू उद्देशीय आरोग्य कर्मचारी)
# RTI स्थिती : *माहिती मिळाली नाही*
*४) महिला व बाल विकास विभाग* :
(अंगणवाडी पर्यवेक्षक)
# RTI स्थिती : *माहिती मिळाली नाही*
*५) शालेय शिक्षण विभाग* :
(शिक्षक)
# RTI स्थिती : *माहिती मिळाली नाही*
*६) कृषी व पदुम विभाग* :
(कृषी सहायक)
# RTI स्थिती : *प्रथम अपील बैठक झाली, माहिती मिळाली नाही*
*७) आदिवासी विकास विभाग* :
(शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर, कामाठी)
# RTI स्थिती : *अपेक्षित माहिती मिळाली नाही*
*८) गृह विभाग* :
(पोलीस पाटील)
# RTI स्थिती : *माहिती मिळाली नाही*
…………………………………………………
२८/१२/२०१८ रोजी मंत्रालयात *महिला व बाल विकास विभाग चे उपसचिव यांच्या सोबत प्रथम अपील सुनावणी बैठक आहे.*
_वाईट याचे वाटतेय कि २०१४ पासून च्या अध्यादेशाने नक्की *किती आदिवासींना नोकरी मिळाली/मिळेल याची माहिती कोणत्याच विभागाकडे नाही*. आणि आदिवासींच्या जल जंगल जमिनी अधिग्रहणासाठी मात्र तत्परतेने वेग दाखवला जातोय. अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी हिताचे निर्णय बदलण्यात वेग मात्र दिसतोय. *आदिवासींचे संवैधानिक अधिकार नियमा नूसार मिळावे एव्हडी प्रामाणिक इच्छा.*_
*हे विषय दुर्लक्ष करण्यासारखा नक्कीच नाही, कारण जर युवकांना हाताला काम/नोकरी/उद्योग नसेल तर समाजाच्या भविष्याची कल्पना करू शकत नाही. अनुसूचित क्षेत्रात आपल्या डोळ्यासमोर अनेक नोकऱ्या/उद्योग/व्यवसाय/जमिनी जाऊन इत्तर लोकसंख्या झपाट्याने वाढताना बघून डोक्यात घालमेल होतोय*.
उपाय सुचवा .... मार्गदर्शन अपेक्षित...
जोहार !
__________________________________
आयुश । आदिवासी युवा शक्ती । ९२४६३६१२४९