रस्त्यावर चणे शेंगदाणे विकणारा एक मराठी मुलगा
भविष्यात चार हजार कोटींचं औद्योगिक साम्राज्य उभं करील असं भविष्य
सांगायचं धाडस तेव्हा कुठल्याही ज्योतिषाने केलं नसतं. भविष्य तळहातावरच्या
रेषांनी घडत नाही तर ते बंद मुठीतल्या निर्धाराने घडवलं जातं.
पुण्यातल्या लकडी पुलाच्याजवळ, अलका टोकिजच्या बाहेर चणे शेंगदाणे
विकणाऱ्या डीएसकेच्या डी.एस.कुलकर्णीनी ते साऱ्या जगाला दाखवून दिलं.
त्यांच्या त्या जिद्दीला, त्यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला माझा त्रिवार
सलाम !
मित्रानो, श्रीमंतीची वाट हि नेहमी गरीबीतूनच वर जाते.
कुठलाही मध्यम वर्गीय आपल्या कर्तुत्वाने अफाट श्रीमंत झालेला तुम्हाला
सहसा दिसणार नाही. कारण तो आपल्यापेक्षा अफाट श्रीमंताकडे न बघता
आपल्यापेक्षा गरीब असलेल्या करोडो लोकांकडे पाहून स्वतःला श्रीमंत समजत
असतो. त्यामुळे जगातील शेकडो अब्जाधीश हे गरिबीतून वर आलेलेच दिसतील, मध्यम
वर्गातून नव्हे.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डी एस
कुलकर्णींची कथाही वेगळी नाही. ३२ वर्षापूर्वी १९८० मद्धे त्यांनी डीएसके
ग्रुपची स्थापना केली तेव्हा त्यांच्याकडे होतं एक भव्य स्वप्नं. ते साकार
करण्यासाठी त्यांनी अफाट परिश्रम घेतले. दिवसरात्र एक केला. असंख्य
अडचणींना ते सामोरे गेले पण त्यांनी कधीही सकारात्मक दृष्टीकोन सोडला नाही.
मेहनत, कष्टाला पर्याय नाही पण मन संतुलित आणि प्रसन्न ठेवणं आणि आपलं काम
नेमाने करणं अन चांगल्या अनुभवांना गाठीशी बांधत नाविन्यपूर्ण प्रत्यक्षात
आणायचा प्रयत्न करून सतत काहीतरी नव शिकण्यात त्यांनी आनंद मानला.
त्यामुळे अडी अडचणी कधी त्यांना रोखू शकल्या नाहीत.
आज डीएसके
ग्रुप बांधकाम, रिअल इस्टेट, वाहन उद्योग, डिजिटल प्रोडक्ट, शिक्षण
क्षेत्र, गुंतवणूक, औषधे आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात कार्यरत आहे.
पुणे, नाशिक, मुंबई, बेंगळूरू आणि अमेरिकेतील न्यू जर्सी इत्यादी ठिकाणी
त्यांनी बांधकाम क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. २०१० मद्धे जपानच्या
टोयोटा कंपनीची डीलरशिप मिळवून त्यांनी वाहन उद्योगात घट्ट पाय रोवलेत.
व्यवसायाबरोबरच कला, क्रीडा, संस्कृती, सामाजिक बांधिलकी अशा महत्वपूर्ण
क्षेत्रातही आपला अमिट ठसा उमटवून डीएसके ग्रुपने अक्षरशः शेकडो
पुरस्कार मिळवले आहेत.
मित्रानो, दर आठवड्याला सोमवारकडे पाहत
काम करतो तो मालक होतो. आणि दर आठवड्याला शुक्रवारकडे पाहात ( शनिवार,
रविवार सुट्टीकडे लक्ष ठेऊन ) काम करतो तो नोकरच राहतो. वेळेअगोदर कामावर
येऊन उशिरापर्यंत काम करतो तो मालक होतो आणि उशिरा येउन वेळेअगोदर कामातून
बाहेर पडतो तो नोकरच राहतो. काम चुकार माणस कधी श्रीमंत होत नाहीत आणि
श्रीमंत माणस कधी कामचुकार असत नाहीत.