---------- Forwarded message ----------
From:
Ravindra Talpe <ravi...@gmail.com>
Date: 2013/9/16
Subject: Ashram School Death PIL News & Apeal
To:
ay...@adiyuva.inनम्र निवेदन
आश्रमशाळा सुधारणेबाबत उपाययोजना सुचविणेबाबत
राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये अत्यंत अपु-या वैद्यकिय सोईसुविधा
असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपटटी काढली. या
संदर्भात अर्जदार रवींद्र उमाकांत तळपे यांनीच उपाययोजनांबद्यल सूचना
कराव्यात, असेही न्या. पी.व्ही हरदार व न्या. पी. व्ही देशमुख यांच्या
खंडपीठाने सांगितले आहे.
राज्यातील ५५२ शासकीय आश्रमशाळांमध्ये २०४१४७ तर खाजगी अनुदानित ५५६
आश्रमशाळांमध्ये २४४५१० आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या दहा
वर्षात या आश्रमशाळांमध्ये ७९३ मुलांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला
आहे. यामध्ये अपघातात ६२, सर्पदंशाने ५५, आजारपणाने ४३४, पाण्यात बुडून
५६, नैसर्गिक मृत्यू १२९ व इतर कारणांनी ५७ विद्यार्थी दगावले आहेत.
त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणारी
याचिका पुण्याचे रवींद्र उमाकांत तळपे यांनी उच्च न्यायालयात सादर केली
आहे.
याबाबत समाजातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी, सामाजिक
कार्यकर्ते, संघटना व इतर घटकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. आपण
आपल्या सूचना / अभिप्राय संतोष वालकोळी, आदिवासी समाज कृती समिती, ५३/१
ब, विनायकनगर, पिंपळे गुरव, पुणे-४११ ०६१ येथे किंवा
santosh...@gmail.com or
ay...@adiyuva.in येथे २५ सप्टेंबर २०१३
पर्यंत पाठवाव्यात. तसेच
९००४४८८७३२/९७६३४५६७९३ येथे एसएमएस कराव्यात.
Thanks & Regards,
Ravindra U Talpe
==============================
Cell: 98227 65531
==============================