महाराष्ट्राचे आदिवासी कल्याण मंत्री आदरणीय विष्णू सावराजी आपण सविनयपने, सादर करण्यात येते की आपण ३ आक्टो २०१५ रोजी अखिल भारतीय कल्याण आश्रमच्या संमेलन नागपूर येथे आदिवासी समाजाचा अक्षम्य अपमान केला त्याचा मी निषेध करतो ....
१] आपण आदिवासी समाजाला ''वनवासी'' म्हटले, आदिवासीला वनवासी बनविण्याचे कोणी अधिकार दिले ? तुमच्यात हिम्मत असेल तर आदिवासींना मूळनिवासी बनवा आणि आपली सत्प्रवृती जाहीर करा. आम्हाला वनवासी बनवून आदिवासी संस्कृतीचा अवहेलना करीत आहात. तुम्ही आम्हाला विकासाच्या नावाच्या पैशांनी, वनवासी बनवून आमची संस्कृती नीलम करीत आहात.मंत्री महोदयजी कमीत कमी आमच्या भावनाची तर कदर करा.
२] आदिवासी हे भारतीय संविधानाच्या कलम क्र. २५ नुसार हिंदू नाही, त्याना हिंदूचे कायदे लागू होत नाही. आपण आदिवासीना हिंदू बनवून, हिंदू व्यवस्थेचे गुलाम बनवू पाहत आहात. पेसा कायद्यानुसार आदिवासीचे पारंपारिक [अहिंदू ] कायदे, स्वशासन व्यवस्था उभी करावयाची आहे. परंतु आपण आदिवासींना वनवासी व हिंदू बनवून, पेसा कायद्याचाही अवमान करून भारतीय घटनेला नकार देत आहात, ही बाब आपणास समाजातील कोणताही समजदार माणूस क्षमा करावी अशी नाही.तुम्ही आदिवासी मंत्री बनून जे करीत आहात ते आजपर्यंत कोणत्याही मंत्र्यांनी अश्या प्रकारचा Stigma आपल्या मस्तकावर लावला नाही. असे केल्याने आपणास मोक्ष मिळेल असे कदाचित वाटत असेल तो भ्रम आपण काढून टाकल तर बरे होईल .आता आदिवासी माणूस जागृत होत आहे. मंत्री महोदायजी आपल्या वरील वक्तव्यावर PIL फाइल होऊ शकते, काल आपण माझा पेट्रोल पंपावर येवून चर्चा करणार होता, पण तुम्हाचा निरोप उशिरा मिळाला. अन्यत: मी आपण समोरच आपला निषेध केला असता.
Latari Madavi ..Nagpur