जिल्हा परिषदेच्याही लवकरच निवडणुका

7 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Sep 20, 2014, 11:38:30 PM9/20/14
to adi...@googlegroups.com

पालघर जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकी पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याची जय्यत तयारी चालू आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्हा परिषदेत एकूण ५७ सदस्य असतील. तसेच आठ पंचायत समित्यांमध्ये ११४ सदस्य असणार आहेत. पालघर जिल्हा परिषद ३१ जानेवारीपर्यंत अस्तित्वात येणार आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून राज्य सरकारने ६६ सदस्य असलेली ठाणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १३ पंचायत समित्या बरखास्त केल्या. बरखास्तीनंतर सहा महिन्याच्या आत पुन्हा निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्यानुसार ३१ जानेवारीच्या आत दोन्ही जिल्हा परिषदा व १३ पंचायत समितीच्या निवडणुका कायद्याने घेणे बंधनकारक आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या महिनाभराच्या आत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार असून त्यासाठी लागलीच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

राज्याच्या निवडणूक विभागाने पालघर जिल्हा परिषद स्थापन करण्याच्या दृप्टीने निवडणुकीसाठी निर्वाचित विभाग तसेच पंचायत समिती गण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले असून त्यादृप्टीने जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने पालघर जिल्हा परिषद व पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, वसई या आठ पंचायत समित्यांचे गण तयार करण्याच्या कामाचा अंतिम टप्पा पूर्ण केला आहे. आत्ता केवळ गावाचा नकाशा व राखीव जागांचे आरक्षण जाहीर करावयाचे शिल्लक राहिले आहे.

पालघर जिल्ह्यातील नगर पालिका व महानगर पालिकेचे क्षेत्र वगळता ग्रामीण जिल्ह्यात १६ लाख २४ हजार लोकसंख्या असून त्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे निर्वाचित विभाग तसेच पंचायत समितीच्या निर्वाचित गणांची निवडणूक विभागाने आखणी केली

आहे. पालघर तालुक्यात सर्वाधिक जिल्हा परिषदेचे १७ निर्वाचित विभाग तर मोखाडा तालुक्यात सर्वात कमी ३ निर्वाचित जिल्हा परिषद विभाग तयार करण्यात आले आहेत. तसेच पंचायत समितीमध्ये देखील पालघर पंचायत समितीत सर्वाअधिक ३४ गण असून सर्वात कमी ६ गण मोखाडा पंचायत समितीत ठेवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचा एक निर्वाचित विभाग १४ हजार लोकसंख्येचा तर पंचायत समितीचा एक निर्वाचित गण ७ हजार लोकसंख्येचा तयार करण्यात आले आहेत.

लोकसंख्येच्या आधारे जागा

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील लोकसंख्येच्या आधारे जिल्हा परिषद निर्वाचित विभाग व पचायत समिती निर्वाचित गण तयार करण्यात आले आहेत. पालघर तालुक्यात ४ लाख ८१ हजार लोकसंख्या असून त्या ठिकाणी १७ जागा जिल्हा परिषदेच्या तर पंचायत समितीच्या ३४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या खालोखाल डहाणू तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ५१ हजार असून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या १२ जागा असून पचांयत समितीच्या २४ जागा आहेत. वाडा तालुक्यात ६ जागा जिल्हा परिषदेच्या तर १२ जागा पंचयात समितीच्या आहेत. तलासरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ जागा तर पंचायत समितीच्या १० जागा निर्माण करण्यात आल्या आहेत. विक्रमगड तालुक्यात ५ जागा जिल्हा परिषदेच्या तर १० जागा पंचायत समितीच्या आहेत. जव्हार तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ जागा तर पंचायत समितीच्या १० जागा अस्तित्वात येणार आहेत. वसई तालुक्यात ४ जागा जिल्हा परिषदेच्या तर ८ जागा पंचायत समितीच्या आहेत. मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३ जागा असून पंचायत समितीच्या ६ जागा आहेत.


------------------

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/zp-election/articleshow/42850998.cms
 
 
We need to make sure these new leaders  are  well informed, educated (not just traditional schooling) about different challenges facing Adivasis & what is the correct way forward of development in keeping, preserving environment, traditions,  at the same time improving standard of living  & achieving higher human development indices. - Dr Satish Salvi
Reply all
Reply to author
Forward
0 new messages