आदिवासी एकजुटिचा विजय असो .....

152 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 15, 2016, 10:56:32 AM2/15/16
to AYUSH google group

आदिवासी एकजुटिचा विजय असो ......

किनवट व राज्यातील बोगस विरोधी आंदोलन पेटल्याशिवाय रहानार नाही ..आज सकाळ पासुनच सर्वत्र या बोगस विरोधी आंदोलन  छेडन्याचे ठरवत आहेत ...उद्या पासुन नाशिक ,जळगाव ,परभणी .जालना ,बिड ,येथिल आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असुन त्यानी निवेदन देन्याचे ठरवले आहेत ..तसेच इतर जिल्ह्यातुन निवेदन देण्याबाबत तय्यारी चालु आहे ...किनवट्च्या धरर्तिवर सर्वत्र बोगस लोकांवर गुनहे दाखल झाले पाहिजे ...आज शिक्षण घेवुन सुद्धा आदिवासी तरुण बेरोजगार आहे ...या बद्द्ल सर्व आदिवासी विद्यार्थी संघटना निवेदन देनार आहेत ...राज्यात सर्वत्र बोगस असुन त्यांच्या विरुद्ध फक्त आदिवासी IAS अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड साहेब कार्यवाही करतात ...10 लोकांवर गुनहे दाखल करतात ...या निडर अधिकारी यांची बदली करन्यासाठी बोगस आंदोलन करणार आहेत ..अश्या कर्तव्य दक्ष अधिकार्यासाठी सर्व समाजाने पुढे येणे महत्वाचे आहे ..आज सकाळ वर्तमान पत्रात डॉ . भारुड साहेबानी इतर समाजाला आव्हान केले असुन .आदिवासी समाजाला विकासापासुन वंचित फक्त बोगस लोकान्मुळे रहावे लागले त्या मुळे सर्व समाजाने सहकार्य करा ..असे सांगितले ...सर्व समाजबांधव सहकार्य करत आहेत पन आपण खरे आदिवासी  म्हनुन आपल्याला पुढे यावे लागेल ...शासनाला डोळे उघडुन पहावेच लागेल ..खरया आदिवासींची दखल घ्यावीच लागेल ..अन्यथा येनार्या काळात सर्व आदिवासी संघटना योग्य ती दखल घेतीलच ..राज्यभर निवेदन द्या व व्हाट्स अप वर , फेसबुक , वर्तमान पत्रात प्रेकाशित करा ...आपली संख्या तरी कळु द्या ....सर्व संघटनांचे प्रेतिनिधीनी तय्यारीला लागलेले बघुन बरे वाटत आहे ..हि  आदिवासी एकजुटिची ताकत आहे ...जय आदिवासी ...डॉ .सतिश पाचपुते .

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 15, 2016, 12:52:58 PM2/15/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in
जय आदिवासी। किनवट तहसील व नांदेड़ जिल्हयात  कोळी महादेव व मन्नेवारलु समाजाचे बोगस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तयार करून वापरणारे व बनविणा-या रँकेटचा पर्दाफाश करुन ख-या व गरजु आदिवासींना न्याय मिळवुन देण्यासाठी बोगसांच्या विरोधात सडेतोड कारवाई करणारे अल्पशा कारकीर्दीतच आपल्या कार्याचा आदिवासींच्या मनावर ठसा उमटविणारे तरुण तडफदार आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड सो. यांनी शुरू केलेली बोगसांविरोधातील कारवाई शासनाने  महाराष्ट्रभर अधिक जोमाने सुरु करावी, त्यांना संरक्षण द्यावे व ख-या आदिवासींना न्याय मिळवुन द्यावा या बाबतचे मा. राज्यपाल महोदयांना लिहिलेले निवेदन मार्फत मा. जिल्हाधिकारी, नासिक यांना देतांना आदिवासी बचाव अभियानचे अध्यक्ष प्रा. अशोक बागुल, उत्तर विभाग प्रमुख मुनाफ तडवी, अँड.दत्तु पाडवी, राम चौरे, किसन ठाकरे, चिंतामण गायकवाड, रमेश भोये यांचेसह इतर सदस्य.







आदिवासी एकता जिंदाबाद ...परभणी ,हिंगोली ,नाशिक ,पुसद ,किनवट  व इतर ठिकाणी निवेदन दिले असुन जालना ,बिड ,लातुर ,नांदेड या ठिकानी उद्या निवेदन देन्याचे ठरविण्यात आले आहे ..तसेच पालघर , पुण्याचे विद्यार्थी उद्या निवेदन देणार आहेत ...बांधवानो अब नही सहेंगे ...अगर हमे न्याय नही मिला तो तुफान आयेंगा ..सम्पुर्ण कर्मचारी एकजुट झाला आहे ..उर्वरीत जिल्ह्यातुन निवेदन देण्याबाबत आपण सर्वानी कळवावे ,माहिती द्यावे ...आपला डॉ . सतिश पाचपुते .



AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 15, 2016, 12:55:50 PM2/15/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in


AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 15, 2016, 1:03:05 PM2/15/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in




AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 15, 2016, 1:18:58 PM2/15/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in



1b412277-a872-40c7-828e-0d3f896fe72d.jpg
73b59eee-05f6-47f8-9f37-0ee15bf7568e.jpg

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 15, 2016, 1:21:48 PM2/15/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in
_____बोगस कीड़े___


मुडद्यासारखे पडू नका
करा ज़रा वळवळ
तुमच्यापेक्षा बोगस किडेच
करतात जास्त वळवळल...

आता तरी उठा तुम्ही
एकिचा हात हातात घ्या
सर्व आदिवासी एक होउन
भारुड साहेबांना साथ द्या

बोगस कीड़े करतात वळवळ
चिरडुन टाका पायाखाली
तरच टिकतील आपल्या सुविधा
ज्या चाललेत त्यांच्या ताटाखाली

आसेल थोड़ी लाज तर
उतरा आता रस्त्यावर
बोगासांची बोगसगिरी
आना आता रस्त्यावर

फ़क्त आम्हाला मिळालेय नोकरी
म्हणून गाफिल तुम्ही बासु नका
आराक्षनामुळे मिळालेय नोकरी
बंगल्यात स्वस्त झोपू नका

आराक्षनाने मोठा झालास
याचं ज़रा भान ठेव
तेच आरक्षण टिकवन्यासाठी
बोगसांच्या छातीवर पाय ठेव

भारुड साहेबानी केलेय सुरुवात
त्यांना तू साथ दे
त्यांच्यापाठी उभा राहून
उलगुलानची हाक दे


         सिताराम कांबळे

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 16, 2016, 11:07:48 AM2/16/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in

बोगस आदिवसीना कुणी लाडवले ? - Madhav Sarkunde


किनवटमध्ये बोगस आदिवासींच्या विरोधात मोर्चा निघाल्यानंतर वाटस अप्पावर ते प्रकरण वायरल झाले आणी कालपासून अनेक पोस्ट येणे सुरु झाले. हे सारे बघून फार बरे वाटले कि आता आदिवासी तरुण जागा झालाय.त्याला त्याच्या हक्काची जाणीव झाली त्याला.आपला हितशत्रू कोण आहे ह्याची पुसटशी जाणीव झाली.म्हणून मी या तरुणांचे अभिनंदन करतो तसेच किनवट येथील उप-जिल्हा अधिकारी डॉ भारुड साहेबांचे विशेष आभार मानतो

कॉंग्रेसच जबाबदार :

खरे म्हणजे हा मन्नेरवार्लूचा हा प्रश्न जुनाच आहे. त्याला कॉंग्रेस फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. हे सरकार येण्या पूर्वी महारष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार होते. त्यांच्या काळात मराठवाड्याबरोबर अनेक विभागात बोगस आदिवासींनी जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले माझ्या माहितीनुसार एकट्या मराठवाड्यात मन्नेरवार्लू या जातीने २४ हजार वैधत प्रमाणपत्र मिळवून घेतले. आणि तेसुद्धा तिकडली कॉंग्रेसच्या कृपेनीच.म्हणून आता आदिवासींनी एका मोर्चा मा.अशोकराव चव्हाण ह्यांच्या घरावरसुद्धा काढाल पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे कि ते ख-या आदिवासींची बाजू घेणार कि नाही ? कारण सुरवातीपासून आदिवसी कॉंग्रेसची बाजू घेत आलाआहे.आणि कॉंग्रसचे नेते खोट्या आदिवासींची बाजू घेत आले.ही या प्रकरणातली खरी गोम आहे.

राजीव सातव झोपलेत का ?

खरेच बोगस आदिवासींची घुसखोरी ख-या आदिवासिंवरचे फार मोठे संकट आहे.या संकटाशी आज आदिवासी तरुण लढत आहेत. परंतु ज्या आदिवसींचे मत घेऊन जे सातव निवडून आले ते मात्र मुग गिळून बसले आहेत.असे का? त्यांनी ख-या आदिवासींच्या बाजूने उभे राहून बोगस आदिवासींना आव्हान केला पाहीजेत.परंतु ते मात्र तसे करत नाहीत.त्यांना फक्त आदिवासीचे मत हवीत. त्यांच्या सुखादुखाबद्दल काही सूतक नाही. अशी आहे इथली राजनीती.सातव आदिवासिना मुर्ख तर समजत नाहीत? खासदार सातवाना आदिवासींनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. म्हणून त्यांनी प्राधाण्याक्रमाने आदिवासींच्या बाजूने राहिले पाहिजे. मागच्या वेळीसुद्धा राजीव सातव धनगरांची बाजू घेवून राज्य मंत्री मंडळात गेले होते. राजीव सातव ह्यांच्याही घरावर मोर्चा नेला पाहिजे.

डॉ टाराफे तुम्ही नेतृत्व करा

अशा वेळी आमदार डॉ टाराफे ह्यांनी रान उठवायला हवे. या आंदोलनात ते कुठे दिसत नाहीत. कुणी म्हणतात ते विदेशात गेलेत. ते खरे आहे का ? किमान सोसलं मेडिया अथवा प्रिंट मेडियामध्ये आपले मतं तर मांडा.कारण असेच काही क्षणं असतात कि जे तुम्हाला इतिहासात कायमचे स्थान देत असतात.संतोषराव संधी गमावू नका. समाज आणि राजसत्ता या पैकी समाजाची निवड करणारेच खरे नेते असतात ,बाकी सारे मतलबी राजकारणी !

.आदिवासी प्रश्नांचे खेळणे करू नका.

आज आदिवासीच्या हक्कावर चारी बाजूने हल्ले हमले होता आहे. विषमतावादी शक्ती - मग ते कॉंग्रेसची असो कि बीजेपी - आदिवासींना पार नेस्तानाबूत करण्यासाठी तत्पर आहे. म्हणून आदिवासीचा लढा लढतांना विचारपूर्वक व गंभीरपणे लढला पाहिजे.केवळ वाटस अप्पवर बकवाजबाजी करू नये. प्रसिद्धीसाठी लढाई लढणारे आपल्या शत्रुपेक्षाही भयानक असत्तात.अशा मूर्खाना वेळीच फटकारले पाहिजे. आदिवासी हक्काचा लढा हा आदिवासींच्या जीवन मरणाचा लढा. त्याचे खेळणे करून मनोरंजन करू नका !  - Madhav Sarkunde



AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 20, 2016, 12:01:49 PM2/20/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in
बोगस आदिवासींना प्रमापात्र मिळवून देणाऱ्या टोळीचा विशेष चौकशी पथक स्थापन करून आदिवासी हिता साठी स्पष्ट भुमिके बद्दल कौतुक आणि आग्रही भुमिके साठी 
डॉ. राजेंद्र भारुड (सहायक जिल्हाधिकारी) यांच्या पाठीशी अवघा आदिवासी समाज आहे.

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 20, 2016, 12:57:13 PM2/20/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in
प्रिय विद्यार्थी मित्रांनो निवेदनाचे गांभीर्य लक्षात घ्यावे . 
1)बोगस जातीच्या विरोधातला लढा तीव्र करवा 
2)आपल्या तालुक्यातील , तहसीलदार , जिल्हाधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी सुध्दा संपूर्ण राज्यात एकाच दिवशी दिनांक 22/फेब्रुवारी /2016 रोजी सकाळी 11:00वाजता निवेदन द्यावेत . 
4)स्थानिक व्रुत प्रत्रात प्रसिध्दी द्यावीत. तसेच निवेदन दिल्याचे छायाचित्र काढून whatsup वर सर्व Maharastra मधील ग्रूप वर पाठवावे . 
5)निवेदन देतांना, संबधित छायाचित्र घ्यावा व खालील व्हाट्सअप मोबाइल नंबर वर पाठवावेत. 
1)9860377328
2)9623110518
3)8975646099
4)9766832570
5)9422167718
6)9881852809
7)9922346217
8)7774840537
9)8308292289
10)9422023097
6)बोगस जातीच्या लोकांचे दिनांक 24/फेब्रुवारी /2016 पासून आमरण उपोषण असून 26/फेब्रुवारी /2016 किनवट येथे त्यांचा राज्यव्यापी मोर्चा आहे . म्हणून पूर्व तयारी साठी दिनांक 22/फेब्रुवारी /2016 ला निवेदन देने आवश्यक आहे पोलीस परवानगी घ्यावी . 
7)बोगसा च्या आंदोलना नंतर आपले राज्यव्यापी , तालुका , जिल्हा , विभाग आणि आयुक्त कार्यालया वर प्रचंड मोर्चे व आंदोलन करावयाचे आहे . 
8)ह्या बोगसाच्या बाबत भरपुर पुरावे व रेकॉर्ड गेल्या 20-25 वर्षा पासून जमा केले आहे. आपल्या संघटित , असंघटित असुरक्षित , अद्यन्यात व गरीबीमुळे आणि योग्य पाठबळ न मिळाल्याने न्याय मिळणे विलंब जाले. आता मागे हटू नका. कारण हा तुमच्या - आमच्या हकाचा लढा असून, आपल्या वरीष्ठ अधिकारी व नेत्यांच्या पाठीशी रहा शेवटी याच आरक्षनातुण आपणंच उद्याचे प्रशासक वरीष्ठ अधिकारी , नेते होणार आहात . वेळेला महत्व दया . कमाला लागा . आपल्या नेत्रुत्व व समाज हिताच्या विधायक कार्याला माज्या कोटी कोटी शुभेच्छा . 
पुढील आंदोलनाची तारीख कळवन्यात येयील 

                 आपला 
         भीमराव रा.केराम 
      माजी आमदार,किनवट      

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 26, 2016, 1:36:08 PM2/26/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in
*जातीच्या नावात बदल करण्याची बोगस जातींनी  वापरलेली
     विशिष्ठ  कार्यपद्धती* (Modus  Operandi) व त्या  निमित्ताने 
                                 आवाहन 
                      -------------------------------
1. कोलाम, मन्नेरवारलू :
                        मुन्नूरवार,मुन्नूर, तेलगु मुन्नूर,मुन्नेरवर,  मुन्नेरवार तेलगू,तेलगू कापेवार, मुन्नूरवाड, तेलगी फूलमाळी  इत्यादी  जातीच्या लोकांनी सरकरी अभिलेखात   (महसुली, शालेय)त्यांच्या  जातीच्या नावात बदल किंवा  नावाच्या पुढे किंवा मागे काना,मात्रा ,वेलांटी,उकार इ.चा वापर करून मन्नेर वारलू या जमातीची नोंद  केली आहे व अवैद्य  /(false ) प्रमाणपत्र मिळविविले आहेत. तसेच   मन्नेर वारलू जमातीचे   forged -बोगस  प्रमाणपत्र  देणारे रॅकेट  कार्यरत असल्याचे  समोर आले आहे .
2.मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी व मल्हार कोळी: 
                    कोळी व तत्सम कोळी जाती  विशेष मागास प्रवर्गात  समाविष्ट केल्या आहेत.  केवळ कोळी या शब्दाच्या नामसादृश्याचा फायदा घेऊन   मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी वा महादेव कोळी अशी नोंद त्यांनी सरकारी अभिलेखात करून घेतली आहे . 
     श्री. इ.जी. भालेराव,सह आयुक्त व श्री. गोवर्धनजी मुंडे आणि  त्यांच्या  सहकाऱ्यांनी  1950 व त्याअगोदरचे महसुली व शालेय अभिलेख यांची 
 अभ्यासपूर्ण  तपासणी केली व हि modus operandi  उजेडात आणली आणि  त्यावर  डॉ .श्री.भारुड,सह जिल्हाधिकारी आणि  श्री. सरकुंडे आयुक्त यांनी  शिक्कामोर्तब  करून  बोगसावर गुन्हे दाखल केले. Supreme कोर्टाने अनेक केसेस मध्ये   fradulent caste  certificate विषयी   जे प्रश्न चिन्ह निर्माण केले होते त्यास या प्रकरना मुळे  वाट सापडली आहे .
      राज्य घटनेनेतील आरक्षित जागांवर अवैद्य प्रमाणपत्राद्वारे  नोकरीचा लाभ घेणे हा राज्यघटनेवर झालेला fraud आहे. तरीही निर्ढावलेले बोगस लोक मोर्चा काढून व निवेदने देऊन या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची   निलंबनाची मागणी करतात .सरकारने त्यांना शिक्षा न करता  सोडून दिले तर घटनेवर   rape करण्यास परवानगी देण्यासारखे होईल हे सरकारच्या  लक्ष्यात लोकप्रतीनीधींनी  आनून देणे गरजेचे आहे. 
     खऱ्या आदिवासी समाजाने जागरुकता दाखविण्याची व एकजूट होऊन शक्ती प्रदर्शन  करण्याची आलेली   4 मार्च 2016 ची वेळ  साधली नाही तर   आदिवासींच्या इतिहासातील तो काळा दिवस ठरेल. मोर्चासाठी  उपस्थिती व आर्थिक साहाय्य  करने ही  वैयक्तिक पण अनिवार्य जबाब दारी पाळण्याचे आवाहन  सर्वाना आहे. 
एकनाथ भोये.

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 27, 2016, 5:45:43 AM2/27/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 27, 2016, 12:16:38 PM2/27/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in
💥....राज्यव्यापी आदिवासी महामोर्चा... 💥.
                       बिरसा ने पुकारा है...बोगस को भगाना है...!!!               
               .    .     ++++++++++++++++.           .       जय आदिवासी.....✊✊.            

   .         मन्नेवार, मन्नेरकाप, कापेवार, मुन्नेर, मन्नेरवाड, तेलगु फुलमाळी या OBC मधील जातीनी आपल्या खऱ्या आदिवासी जमातीच्या सवलती सामुहीकपणेे नामसार्ध्यम्याचा फायदा घेऊन लुटल्या ...बोगस कागदपत्रे बनवून आदिवासी बनण्याचा सोंग केला...येवडच नाही हा बुरखा मा.डॉ भारूडेसाहेबांनी फाडला तर त्यांनाच बोगस ठरवू लागले...त्यांच्यावर कारवाही करण्यासाठी शासकिय, राजकिय पातळीवर दबाबआण्यास मोर्चे , काय उपोषण करू लागले....याला प्रतिउत्तर देण्यास आपण समर्थ आहोत....ज्या बोगसांमुळे आपल्या आदिवासी जमातीतील १.३० लाख युवक बेरोजगार जालेत...MPSC पासून ते सरळसेवा पर्यंत बोगस आदिवासी दिसतोय...हे थाबवण्यासाठी...भविष्यातील ह्या बोगसांनी धडा शिकवण्यासाठी... आता समाजाने एकत्र यायलाच हव... त्यादृष्टीने राज्यव्यापी मोर्चा च नियोजन करण्यात आले आहे..           .     .    .×××××××××××××× .     .                .        🔥नेतृत्व :- मा.ना.मधुकरजी पिचडसाहेब( जेष्ठ आदिवासी नेते) मा.ना. वंसतरावजी पुरकेसाहेब (जेष्ठ आदिवासी नेते) मा.ना अॅड. शिवाजीराव मोघे( जेष्ठ आदिवासी नेते) मा.अॅड.पद्माकरजी वळवीसाहेब (आदिवासी नेते) मा.आ. विजयकुमारजी गावित                    .        🔥विशेष सहकार्य व खंबीर साथ :- माजी आमदार. भीमरावदादा केराम, मा.आ.राजुदादा तोडसाम.                           .                 🔥प्रमुख उपस्थिती - मा.खा.हिनाताई गावित, मा.खा.हरिश्चंद्र चव्हाण, मा.खा.अशोक नेताम, मा.खा.चिंतामण वनगा                .    .      🔥प्रमुख मार्गदर्शन- मा.आ.अॅड.के.सी पाडवी, मा.आ.निर्मलाताई गावित,          मा.आ.संजयदादा पुराम, मा.आ. संतोषदादा टारपे, मा.आ. नरहरी झिरवळ, मा.आ. वैभवभाऊ पिचड, मा.आ. डि.एस्.आहिरे, मा.आ.पास्कल धनारे, मा.आ.डॉ.देवराव होळी, मा.आ.प्रा.डॉ अशोक उईके, मा.आ.शांताराम मोरे, मा.आ. उदयसिंग पाडवी,मा.आ.प्रभुदास भिलावेेकर , मा.डॉ.आरतीताई फुपाटे (अध्यक्ष,जि.प.यवतमाळ)मा.श्री.सतिश उईके (अध्यक्ष,जि.प.अमरावती) मा.शंकुतलाताताई धराडे (महापौर, पिंपरी-चिंचवड मनपा)              .                                   .                                   -----------------------------------------                 📅 दिनांक :- ४ मार्च २०१६ , शुक्रवार.                                     ⏰वेळ - ११:०० स.                           .          ⛳स्थळ :- गोंडराजे रघुनाथशहा मडावी स्टेडियम,    किनवट ता.किनवट जि.नांदेड.  ▶             🏨 सहा.जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, किनवट ता.किनवट येथे मोर्चाचे सभेत रूपांतर        .                                     .              -------------------------------------        .          महाराष्ट्रातील सर्व सन्मानिय आदिवासी जि.प.सदस्य, पं.स.सभापती, नगरसेवक, सरपंच, ग्रा.प.सदस्य...सर्व आदिवासी समाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी, सेवाव्रत व सेवा निवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटना.... व सर्व आदिवासी बांधवाना कळकळीचे आव्हान हा लढा आपला आहे...कोणी आपल्यासाठी आपल्या हक्कासाठी भांडणार नाही, आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल..तरी जास्तीत जास्त बांधवानी मोर्चात सामिल व्हावे...व आदिवासी जमातीची ताकत दाखवावी...   

       आदिवासी एकजुटीचा .....विजय असो....लढेंगे....जिंतेंगें...!!!!       
        जय आदिवासी....   जय बिरसा... जय सेवा...जय राघोजी... आप कि जय..!!!!

Adivasi Ekta Parishad

unread,
Feb 28, 2016, 10:47:13 AM2/28/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in
चलो पालघर
.....चलो पालघर....चलो पालघर....💥 भव्य मोर्चा💥4 मार्च शुक्रवारी💥💥
।।।जोहार।।।।
आदिवासी आया बहिणी..काका, मामा, दादा...विद्यार्थी....सुशिक्षित बेरोजगार.....मजूर, नोकरदार, साहेब, मुलाजिम......सर्वाना जाहीर आवाहन......आपल्या आदिवासी मुलांच्या तोंड चा घास वाचवायचा असेल.... आपली भावी पिढ्यांना सुरक्षितता द्यायची असेल.... आपल्या सुशिक्षित बेरोजगाराना दिवसातून दोन वेळेस पोटाची खळगी भरायची असेल.....तर चला पालघरला....आएपचा संपूर्ण महाराष्ट्र भर एकाच दिवशी बोगस आदिवासी विरुद्ध भव्य मोर्चा....!
आपली आदिवासी जमात वाचवायचा प्रयत्न करणारे आदिवासी विकास आयूक्त श्री सरकुन्डे साहेब व सहाय्यक जिल्हाघिकारी राजेन्द्र भारूड ह्यांची नोकरी घालवण्याचा , त्यांची बदली करण्याचा प्रयत्न करणारे बोगस आदिवासी हजारोच्या संख्येने मोर्चा काढून आपल्या आदिवासीना वेठीस धरत आहेत.... आपले हक्क, आपल्या नोकर्या, आपले अघिकार, आपले जल, जंगल, जमिनीवर हक्क सान्गत आहेत हे बोगस आदिवासी...आपल्या मुलांचा घास हिराऊन घेत आहेत हे बोगस आदिवासी...आपण आज त्यांना विरोध नाही केला तर उरावर बसणार आहेत आपल्या...त्यांना वेळीच ठेचले नाही तर मग आपल्या आदिवासी भावी पिढ्यांना काहीच मिळणार नाही...म्हणून आपल्याला , आपल्या आदिवासी समाजाला जे वाचवायचा प्रयत्न करताहेत त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे....।घराघरातून, पाड्यातून, प्रत्येक गावातून ,तलासरी ते वसई, मोखाडा ते डहाणू,पालघर ...सर्व कडे msg पसरवून, संपर्क साधून ..आपल्याच साठी येत्या 4 मार्च 2016, शूक्रवारी पालघर ला ...बिगर आदिवासी विरोधात मोर्चात सहभागी व्हावेच लागेल....!
आप आपल्या गृपवर हा  msg पसरवून मोठ्या प्रमाणात प्रचार करा....

Adivasi Ekta Parishad

unread,
Feb 28, 2016, 11:40:25 AM2/28/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in
खऱ्या आदिवासिनों ह्याचे उत्तर दयायचे आहे.....!! डॉ.राजेंद्र भारुंड ( सहायक जिल्हा अधिकारी ) आणि संभाजी सरकुंडे (आयुक्त ) यांनी बोगस आदिवासींवर कायदेशीर करवाई सुरु केली म्हणून यांच्यावर बडतर्फ,निलंबन कारवाई करण्यासाठी वैयक्तिक आकस व राग ठेवून  बोगस आदिवासींनी दबाव तंत्राचा वापर सुरु केला आहे.  भारुंड सर आणि सरकुंडे सर यांच्या समर्थनासाठी
04 / 03/2016  खऱ्या  आदिवासींनी किनवट नांदेड येथे भव्य मोर्चा ठेवला आहे. 
आपण सर्व आदिवासींच्या संघटना मिळुन पालघर -जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन   04/03/16 केले आहे. मोर्च्यासाठी  दुपारी 1:30 वाजता ठिकाण---- सरकारी विश्रामगृह (डाक बंगला) जवळ पालघर पूर्व. एकत्र यायचे आहे.... जोहार ! जिंदाबाद !उलगुलान करेंगे! संयोजक ---आदिवासी एकता परिषद् मुख्य कार्यालय दामखिण्ड  पो .कोंढाण ता.जि.पालघर

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Mar 4, 2016, 3:59:44 PM3/4/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in
उलगुलान ! आजचा ४/३/२०१६ बोगस आदिवासी विरोधात आदिवासींचा जन सागर उसळला 


Palghar



Kinwat 




 

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Mar 11, 2016, 11:54:43 AM3/11/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in, Gajanan...@gmail.com
प्रिय मुल आदिवासी समाज बांधव 
आम्ही न्यायलयीन लढाई लढलो ! तुम्ही पण लढा ! कारण नांदेड जिल्हयामध्ये जे 20 लोक बोगस होते त्यांना नांदेड जिल्हा व सञ न्यायलयाने जामीन नाकारली त्यामुळे पहिली लढाई जिंकलो आता दुसरी लढाई म्हणजे हाई कोट्र औरंगाबाद (high court) मध्ये न्यायलयीन लढाई लढायची आहे त्यामुळे सव्रानी सहकाय्र करावे .सव्र प्रथम आपण बोगस लोकाची माहिती मागवा व ती माहिती यावर Gajanan Khude 8...@gmail.com वर पाठवा.बोगस बद्दल जे जे परावे आहेत ते ते लवकरात लवकर पाठवा हि कळकळीची विंनती.नांदेड ची लढाई आपल्या सव्रामुळे 
झाली आपला आभारी आहे.
आपला गजानन खुडे ९७६७५७७१२४ 
एकनाथ बुरकूले

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Mar 16, 2016, 3:22:11 PM3/16/16
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in, Gajanan...@gmail.com
आज आपले आदिवासी आमदार मा.आमदार मंडळी किनवट विषयी S I T स्थापन करण्याच्या मागणी साठी मा.राज्यपाल महोदय यांची राज़भवन मुबंई येथे भेट घेऊन निवेदन दिले.





Reply all
Reply to author
Forward
0 new messages