News- पालघर विकासाच्या डृष्टीने सक्षम नगराध्यक्ष कोण होणार यांकडे लक्ष लागलेय!

98 views
Skip to first unread message

AYUSH activities

unread,
Mar 24, 2014, 2:19:23 PM3/24/14
to adi...@googlegroups.com

Shared by Santosh Patil on fb

पालघर नगर परिषद पुन्हा केली सेनेने काबीज , बहुजन विकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही

डहाणू वार्ताहर [संतोष पाटील] 


पालघर नगर परिषदेचा अंतिम निकाल हाती आला असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्राप्त करून सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यश मिळवले आहे .महायुतीने २८ पैकी १७ जागांवर यश प्राप्त केले आहे . पालघर नगर परिषदेच्या निवडणुकी कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच दि. २३/३/२०१४ रोजी झालेल्या मतदानासाठी एकूण ७ प्रभागातून २८ जागांसाठी १२२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना आज मतमोजणी दरम्यान अंतिम निकाल हाती आले असून शिवसेनेने १७ राष्ट्रवादी १० तर काँगेसला फक्त १ जागेवर समाधान मानावे लागले या निकाला दरम्यान मतमोजणीचा कौल ऐकण्यासाठी आलेल्या जनतेने गर्दी करून गोंधळ घातल्यानेपोलिसांनी अचानक लाठीमार केला या दरम्यान ६ महिला जखमी झाल्या असून [१.वासन्ति वसंत म्हात्रे वय ६० ,२. तन्वी परेश पाटील वय १४ ,३ज़ायदा गुलाब शेख ४. बबिता यादव म्हात्रे वय ४७ ५. जानवी जयेश पाटील वय ३० ] त्यांनाग्रामीण रुग्णालय पालघर येथे दाखल केले . मात्र बहुजन विकास आघाडीला मतदार राजाने या निवडणुकीत घरीच बसायला लावले असून त्यांच्यावर आत्म परिक्षनाचि वेळ आणली आहे. या निवडणुकी मध्ये उमेदवारांना मिळालेले मताधिक्य पुढील प्रमाणेशिवसेना ;१] प्रियांका प्रवीण पाटील १६८० २अ ,२] सुनिता मधुकर पाटील१४६२ २ब ,३] जितेंद्र धर्मराज पामाळे१५६९ २ड ४] जयश्री महेश भानुशाली १३८६ ३ब ५] लीना हेमंत पाटील १८९८ ३क ६] श्री रहीस मोबीन शेख १६५६ ३ ड ७} संजय पांडुरंग गायकवाड २४१९ ४ अ 8) उत्तम मोरेश्वर घरत २६०५ 4 ब ९} रेशमा सुदाम गडग २५७६ ४ क. १०} स्वाती सुरेश मोरे २४६५ ४ ड . ११}प्राजक्ता नंदकुमार वर्दे ९९१ ५ अ . १२} प्रलय शरदचंद्र पटेल १०३७ ५ ब. १३} उत्तम रमेश पिंपळे १२४५ ५ ड. १४}कश्मीरा केतन पाटील १७२९ ७ अ. १५. सागर चिमन दुबळा १६७६ ७ ब. १६} अंजली परेश पाटील १६३३ ७ क. १७. अतुल जनार्दन पाठक – १५१७ ७ ड. राष्ट्रवादी:- 1.रेश्मा रविंद्र म्हात्रे १०६५ १ अ. २. बिंदीया संतोष दिक्षीत ११०२ १ ब. ३. प्रविण मधुकर मोरे ९७५ १ क, ४. सुरेश किसन दुबळा १०४३ १ ड. ५. प्रितम विश्वनाथ राउत – १२७९ २ क, ६. मकरंद सिताराम पाटील १७७७ ३अ, ७.श्वेता मकरंद पाटील -९९१ ५ क . ८. नंदकुमार वामन पाटील -१२०६ ६ अ,९.सचिन बाबूराव पाटील १३०१ ६ क, १०. वनिता प्रफुल्ल प्रजापती – ११२३ ६ ड.काँग्रेस- उज्ज्वला केदार काळे- १३२९ ६ ब.आता पालघर विकासाच्या डृष्टीने सक्षम नगराध्यक्ष कोण होणार यांकडे पालघर वासीयांचे लक्ष लागलेय.

AYUSH activities

unread,
Mar 25, 2014, 2:56:49 PM3/25/14
to adi...@googlegroups.com
Photo






मी पालघर चा आदिवासी ! 
आपल्या लोकप्रतिनिधींसाठी माझ्या मनात आलेले प्रश्न... 

१) आदिवासी विद्यार्थ्याना सामोरे जावे लागणार्या विविध समस्याना सोडवणार का?  आदिवासी संस्कृती आणि अस्मिता शालेय अभ्यास क्रमातून जपली जावी या साठी प्रयत्न करणार का ?
२) या परिसरात असलेल्या गुणवत्तेने पण श्रेष्ट असलेल्य स्थानिक आदिवासी तरुणाना डावलून इत्तर जिल्ह्यातून ठराविक पणे आयात थांबवणार का ? स्थानिक आदिवासीना रोजगार मिळावा या साठी प्रयत्न करणार का?
३) परिसरात पाण्याच्या वेगाने वाढत असलेली दारूची दुकाने बंद करणार का? आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर पणे जमिनी हस्तांतरण थांबवणार का? 
४) आदिवासींसाठी असलेल्या कायद्याचा अभ्यास करून आदिवासी हिता साठी रस्त्यावर उतरणार का ? (पेसा, वन हक्क, इत्यादी )
५) सुसरी, पिंजाळ, सूर्या, दापचारी, राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पा मुळे उध्वस्त होणारया आदिवासी समाजाचे आवाज बनणार का ?
६) आपल्या देशात डहाणु ला पर्यावरण विषयक ठराविक कायदा असताना परिसरात विविध लोह, रासायनिक प्रकल्पना विरोध करून पर्यावरण आणि समाजाचे रक्षण करणा का?
७) स्थानिक आदिवासी नेतृत्वाला संधी मिळून आदिवासी युवकना सामाजिक जबादारीची जाणीव करून देणार का ?
८) सामान्य माणसाला आपले प्रश्न घेउन आपल्याना भेटून समस्या सुटल्याचा आनंद घेता येईल का? 
९) ज्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची जबादारी आहे ती योग्य आणि प्रामाणिक पणे पार पडेल का? 
१०) आदिवासी समाजाच्या विकासा साठी राजकारण आणि वयक्तिक स्वार्थ या पलिकडे जाउन विचार करणार का? 

AYUSH activities

unread,
Mar 25, 2014, 3:06:07 PM3/25/14
to adi...@googlegroups.com








ramesh gupta

unread,
Mar 26, 2014, 8:32:53 AM3/26/14
to adi...@googlegroups.com
Royal Study ..................... wow 

ase R&D Far kami vachata yete


--
-----------------------------------------------------------------------
Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/2f5f4e79-9f32-40af-8cac-ecbb52d97434%40googlegroups.com.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
Ramesh

AYUSH activities

unread,
Mar 29, 2014, 1:13:53 AM3/29/14
to adi...@googlegroups.com

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.



--
Ramesh

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Apr 3, 2014, 11:31:08 AM4/3/14
to adi...@googlegroups.com

Adi karyakram

unread,
Apr 5, 2014, 9:12:32 AM4/5/14
to AYUSH google group

News for your reference... 


Inline image 3


Inline image 2


पाठिंबा कोणाला?

Apr 4, 2014, 12.51AM IST
मयुरेश वाघ, वसई

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत श्रमजीवी संघटना व वसई जनआंदोलन समिती यांचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला असणार हे रविवारी जाहीर होणार आहे. जनआंदोलन समितीमध्ये भाजप किंवा काँग्रेसला पाठिंबा द्यावा याबाबत दोन मतप्रवाह असून आता कोणता निर्णय जाहीर होतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. खासदाराच्या विजयाचे गणित आम्हीच ठरविणार असा दावा श्रमजीवी व जनआंदोलनने केला असून बविआचा पराभव करणाऱ्याला पाठिंबा देणार, असे त्यांनी म्हटले आहे.

पालघर मतदारसंघातील दुर्गम आदिवासी भागात तसेच वसईच्या पूर्वपट्ट्यात श्रमजीवीचे संघटन व ताकद आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा मागितला आहे. बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रमजीवी संघटनेच्या विद्युल्लता पंडित, बाळाराम भोईर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून महायुतीला पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यावर बोईसर, भिवंडी ग्रामीण हे विधानसभेचे मतदारसंघ शिवसेनेने श्रमजीवीला सोडावेत अशी मागणी श्रमजीवीने केली असली तरी त्यावर पुढे निर्णय होईल, असे उद्धव यांनी सांगितल्याचे कळते. श्रमजीवी संघटनेचे कामकाज वेगळे चालते असे दिसत असले तरी श्रमजीवी व जनआंदोलन समिती या दोन्हींचे निर्णय आमदार विवेक पंडित हेच घेतात. वसईच्या ग्रामीण भागात पालिकेला विरोध करून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सहभागाने स्थापन झालेल्या जनआंदोलन समितीमध्ये सर्वपक्षांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यात भाजपला पाठिंबा द्यावा, असे काहींचे म्हणणे आहे. तर काँग्रेसला पाठिंबा द्यावा, अशी मागणी ख्रिस्ती पट्ट्यातील जनआंदोलन कार्यकर्त्यांकडून होत आहे. जनआंदोलनाने कुणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पंडित यांना कोअर कमिटीने दिले असून आता ते कार्यकर्त्यांची मते आजमावून घेत आहेत. जनआंदोलन ठरवेल त्याचे काम करू, अशी भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

रविवारी बैठक

रविवार ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता वसई रोड साईनगर येथील मैदानात श्रमजीवी, जनआंदोलनच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा होणार असून त्यात या दोन्ही संघटनांची भूमिका जाहीर होणार आहे. श्रमजीवी, जनआंदोलन या शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा देतील असे सध्या तरी दिसत आहे. एक तर काँग्रेस किंवा भाजपला पाठिंबा देणे किंवा कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार काम करू देणे, असे पर्याय जनआंदोलनसमोर आहेत. 'बहुसंख्य कार्यकर्त्यांचा कल कुठे आहे हे पाहून निर्णय घेणार आहोत. गावांवर पालिका लादणाऱ्या बहुजन विकास आघाडीचा पराभव करणे हे आमच्या कार्यकर्त्यांचे लक्ष्य असून त्यांचा पराभव करू शकेल अशा उमेदवाराला पाठिंबा देऊ', असे पंडित यांनी सांगितले. रविवारच्या मेळाव्यात ते सविस्तरपणे आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे काय निर्णय जाहीर होतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. श्रमजीवी-जनआंदोलनने पाठिंबा दिल्यास किमान ५५ ते ६० हजार मते त्या उमेदवाराच्या पारड्यात पडू शकतात, असा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती व जनआंदोलन समितीचे नेते विजय पाटील यांचे राजेंद्र गावितांशी चांगले संबंध आहेत. सांडोर येथील काँग्रेस कार्यालयाचे उदघाटन बुधवारी झाले त्यावेळी विजय पाटील हे काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थित होते. आपण वसईत त्या परिसरात होतो व मुझफ्फर हुसेन यांची भेट घ्यायची असल्याने आपण तिथे गेलो होतो, असे पाटील यांनी सांगितले.

गावित यांचा आज अर्ज

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनीही वसईत येऊन मच्छिमार तसेच इतर संस्था, संघटनांच्या पदाधिकार्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. गावित आज १२ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल करताना काँग्रेस-राष्ट्रवादीही शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता असून ३ ते ४ हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले. गुरूवारी सीपीएमचे उमेदवार खरपडे यांनी आपला अर्ज दाखल केला.


राज्यमंत्री गावित यांच्यावर टीका


नरेंद्र पाटील, पालघर

डहाणू तालुक्यातील आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री राजेंद्र गावितांच्या कार्यपध्दतीवर खडे बोल सुनावले.

पालघर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा डहाणू येथील श्यामराव पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डहाणूचे माजी आमदार कृष्णा घोडा यांनी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या कार्यपध्दतीवर टीका करीत सांगितले की, आदिवासीसाठी असलेल्या अनेक योजना डहाणू, तलासरी तालुक्यात पोहोचल्या नाहीत. आदिवासी विभागाकडे नागरिकांचे प्रश्न तसेच विकास कामे मंजुरीसाठी नेली असता तेथील अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत राज्यमंत्री गावितांनी सांगितल्यावरच मंजुरी देऊ, अशी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

पालघर विधानसभा मतदारसंघात पालघर प्रमाणेच डहाणू तालुक्याचाही काही भाग येत असून हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने आम्ही आघाडीचा उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांना प्रचंड मेहनत करून निवडून आणले. मात्र निवडून आल्यानंतर गावित मतदारांपासून दूर गेलेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांपासून देखील खूपच लांब निघून गेले, असे कृष्णा घोडा यांनी सुनावले. आदिवासी विभागामार्फत तसेच राज्याच्या अनेक योजनामधील विकासकामासाठी निधी आणल्याचा डांगोरा राजेंद्र गावित दररोज पिटत आहेत. मात्र हा निधी कुठे खर्च केला व गेला कुठे ते दिसत नसल्याने त्याचे नेमक काय झाले, याचा खुलासा गावितांनी करावा, अशी भूमिका कृष्णा घोडा यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य व ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आनंद ठाकूर यांनी या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आघाडीतील कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद विसरून लोकशाही बळकट करण्यासाठी आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी झटले पाहिजे, असे आवाहन केले.

गावितांचे आश्वासन

आघाडीचे उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी साडेचार वर्षांत आपल्याकडून झालेल्या चुकांची कबुली देत आपण निवडून आल्यानंतर यापुढे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेहमी संवाद साधू व खासदार निधीतील विकास कामे केली जातील, असे आश्वासन दिले.

या मेळाव्यास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दामू शिंगडा, आमदार आनंद ठाकूर, एनसीपी तालुका अध्यक्ष राजेश पारेख, काँग्रेस तालुका अध्यक्ष भरत राजपूत, डहाणू नगराध्यक्ष मिहीर शहा, एनसीपी प्रदेश सदस्य प्रभाकर राऊळ माजी नगरसेवक शशीकांत बारी, माजी जिप सदस्य विवके कोरे व पांडुरंग बेलकर, सुरेंद्र पाटील, मुकुंद चव्हाण, बाबा जोशी तसेच जिल्हा परिषद व पंचायत सिमती सदस्य, नगर सेवक, सरपंच उपस्थित होते.





Inline image 1


To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH activities

unread,
Apr 7, 2014, 10:55:05 AM4/7/14
to adi...@googlegroups.com
shared on fb.... 


एक एल्गार..मफियांना संपवण्याचा.!!

मित्रहो.! 
आज रविवार दि.०६एप्रिल२०१४ रोजी वसई साईनगर येथे वसई-जन आंदोलन समिती व श्रमजीवी संघटना यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठिंबा जाहिर करण्यासाठी वसई चे आमदार मा.श्री.विवेक(भाऊ) पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित श्रमजीवी संघटनेच्या च्या संस्थापिका अध्यक्षा श्रीम.विद्द्युलता पंडित,जिल्हा परिषद ठाणे कृषी,दुग्ध व पशुसंवर्धन सभापती श्री.विजय पाटील, व.वि.म.पालिकेचे विरोधी पक्षनेते श्री.विनायक निकम,श्रीम.डॉमिनिका डाबरे,श्री.फ्रान्सिस लोपीस,वसई-विरार ब्लाँक काँग्रेस च्या अध्यक्षा श्रीम.वेरणेकर, वसई जन आंदोलन समितीचे समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.!!
सदरच्या मेळाव्यात "महायुती"च्या उमेदवारास पाठिंबा जाहिर.!!
महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,लालबहादुर शास्त्री यांच्या कल्पनेतला काँग्रेस पक्ष आता वसई-विरार मध्ये राहिला नसून..काँग्रेसने अखेर विरारच्या माफियागिरी समोर नांगी टेकत आपले घाणेरडे राजकारण दाखवले..!!
काँग्रेसच्या नेत्यांनी विरारच्या माफिया धनशक्तिस शरण जात श्री.राजेंद्र गावितां सारख्या राज्यमंत्र्यांचा आपमान करत..त्यांना खासदारकिचे गाजर दाखवत फसवून विरारच्या माफियांना पाठिंबा देवून..पुन्हा विकावु,गलिच्छ राजकारण केले..!! टाडाचे आरोपी,गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या विरारच्या माफिया शक्तीस काँग्रेस ने पाठिंबा जाहिर केल्यामुळे..काँग्रेसचे नाराज पक्षनिष्ठ कार्यकर्तेही आता विरारच्या मफियांची "दहशत" मोडून काढण्यासाठी वसई जन आंदोलन समिती समवेत महायुती बरोबरच जातील..!! 
आता नक्कीच अब की बार.. महायुती का सरकार.!!


shared on fb


Rajesh Dagala वडराई ला आदिवासीवर अमानुष अत्याचार करणारे ,
त्यांची शीटी वाजवणार 
अबकी बार , वनगा खासदार

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Apr 11, 2014, 10:07:21 AM4/11/14
to adi...@googlegroups.com
News






Suresh Renjad Nitin bhau aata kasaala ha melava congrees ni shepti ghalun hajoro karyakartyaanche mane dukhavli

Nitin Bombade Gavitanchi athavan yete

Suresh Renjad Bhau eka ministachi hiy haalat tar karyakartyaache kay vasi madhe nivdnuk karyaalaye ughadli aani band keli vichar kara kay man saangat asel tyaanche

Sunil Parhad konache kay ani konache kay ..ithalya adivasila swabhimanach nay....murdad  ahet..sagle...laj watali pahije adivasi netyana...apala fakt vapar 
chalalay ...kon kuthun ... satta gajavto adivasi tari swatala manhu naka.. to shabad  nahi ti takad ahe...


Adivasi Yuva Shakti Ayush 60 varsha nantar pan adivasina jar rajkarnat, samaj karnat, vikasat, nettuuutvat swatahache sthan/pratinidhitv/swabhiman... banavata yet nasel tar adivasinche bhavishya nakkich dhokyat aahe. Adivasi ata tari jaga ho.... nahi tar asach bhusalvun takatil ye.


Sunil Parhad tech ahe na adivasi khatyacha cab.ministr. adivasi hovu sakt nahi. Adivasi var nivdun gelele sagle amdar kay ...karta.

Sunil Parhad adivasincha samityavar ekhi siklela adivasi milu naye. he shadyantra kadhi .kalnar.


AYUSH activities

unread,
Apr 11, 2014, 10:48:28 AM4/11/14
to adi...@googlegroups.com
News collection for your information....

(Salam rajkaranala.... ek rajya mantryala velevar thenga, tar samnya karyakarntyanche kaay honar dev jaane....) adivasinche rajkarant pan kahi astitv nahi, TSP area madhe adivasincha avaj nahi..... 60 varshanchya lokshahicha pamanach mhanava lagel.... jaago adivasi jaago!

पालघरचा तिढा कायम 
- सकाळ वृत्तसेवा
विरार - पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीला पाठिंबा द्यायचा की निवडणूक लढवायची, अशी आतापर्यंत कॉंग्रेसची द्विधा मनःस्थिती होती, परंतु काल (ता. 12) रात्री झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत कॉंग्रेसनेच निवडणूक लढविण्यावर एकमत झाल्याचे समजते; मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील तिढा अद्याप तरी कायम आहे. 

ठाणे जिल्ह्यात एका बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विस्तारत असताना दुसरीकडे कॉंग्रेसचा तितकासा प्रसार होताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेते व पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपले वर्चस्व स्थापन केले असून त्यांच्याकडे खासदार, दोन आमदार आणि नवी मुंबईसारखी महानगरपालिका आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास गणेश नाईकांमुळे राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहणार आहे. कॉंग्रेसकडे राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या रूपाने एकमेव आमदार आहे; तर बहुजन विकास आघाडीने हितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी देऊन लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा विभाजन झाल्यास त्या ठिकाणी आपले प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे वसई तालुक्‍यासह ग्रामीण भागातही बहुजन विकास आघाडीने हातपाय पसरले आहेत. एकूणच कॉंग्रेसची बाजू काहीशी दुबळी आहे. त्यामुळे ताकद वाढविण्यासाठी ही जागा बहुजन विकास आघाडीला सोडण्याऐवजी कॉंग्रेसनेच लढविण्याची मागणी येथील कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. उमेदवारीचा हा तिढा सोडविण्याबरोबरच कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पालघरमध्ये येणार असल्याचे कॉंग्रेसच्या सूत्रांकडून समजते. 

भाजपची प्रचारात आघाडी 
कॉंग्रेस आणि बहुजन विकास आघाडीमध्ये निवडणुकीसाठी उमेदवार ठरत नसतानाच भारतीय जनता पक्षाने मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे. ऍड. चिंतामण वनगा वसईमध्ये प्रचारासाठी ठिकठिकाणी फिरत आहेत. त्यांच्याबरोबर ठाण्यातील भाजपचे काही वरिष्ठ नेतेही दिसत आहेत. दुसरीकडे नमो, नमोचा जप जपत संघाचे कार्यकर्तेही भाजपच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. कॉंग्रेसने उमेदवारीबाबत लवकर निर्णय न घेतल्यास त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

--------------------------


कॉंग्रेस, गावितांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न
- भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा

पालघर लोकसभा मतदारसंघातून माघारीचा कॉंग्रेसचा निर्णय राष्ट्रीय राजकारणासाठी महत्त्वाचा असला, तरी तो घेताना वेळीच जी मुत्सद्देगिरी दाखवायला हवी होती, ती न दाखविल्याने राज्यमंत्री असलेल्या राजेंद्र गावित यांच्या पदाचा आब राखला गेला नाही, आघाडीतील पक्ष-संघटना अस्वस्थ झाल्या आणि पक्षाच्या भवितव्याबद्दल प्रश्‍न उभे राहिले, ते वेगळे... 

कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीपुढे झुकत मंत्रिपदावर असलेल्या आपल्या उमेदवाराला आकस्मिक माघार घ्यायला लावल्याने त्याचा फायदा ठाकूर यांना मिळणार असला, तरी यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आधीच अस्तित्व धोक्‍यात आलेल्या कॉंग्रेस पक्षाबरोबरच राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे. बहुजन आघाडीला पाठिंबा द्यायचा होता, तर मग हा निर्णय पक्षाने आधी घ्यायला हवा होता. राजेंद्र गावित यांची उमेदवारी घोषित करून त्यांना वाजतगाजत शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरायला लावून नंतर आयत्या वेळी एबी फॉर्म रोखून धरत त्यांना या प्रक्रियेतून बाहेर काढल्याने ना त्यांचा- त्यांच्या पदाचा आब राखला गेला ना पक्षाच्या अस्मितेचा, अशी कडवट प्रतिक्रिया उमटत आहे. 

ठाणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आणि पक्षाच्या वाढीसाठी मंत्रिपद दिलेल्या गावित यांनी ज्या बहुजन आघाडीविरोधात सतत संघर्ष केला, त्यांचाच प्रचार "आघाडीधर्म' म्हणून करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, त्यामुळे ते मंत्रिपद सोडतील अशी चर्चा होती; पण खुद्द गावितांनीच त्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्याच वेळी एकंदर घटनाक्रमावर ते कमालीचे नाराज असल्याचेही दिसून येत आहे. 

बहुजन आघाडी कॉंग्रेसमध्ये विलीन करा किंवा कॉंग्रेसच्या तिकिटावर लढा, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्र्यांनी हितेंद्र ठाकूर यांना दिला होता, तो त्यांनी न मानल्याने मागील वेळेप्रमाणे आपला उमेदवारही जाहीर केला; पण आयत्या वेळी गुप्तचरांच्या अहवालाचे कारण देत अर्ज भरल्यानंतर त्यांना माघार घ्यायला लावली. नव्हे, त्यांना एबी फॉर्म न देता त्यांची शेवटपर्यंत कोंडी केली आणि माघारीची घोषणा मुंबईतून केली गेली. कॉंग्रेसमधील या घडामोडींमुळे आघाडीधर्मात सोबत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कोंडी झाली. 
ठाणे जिल्ह्यात पूर्वापार कॉंग्रेसचे वर्चस्व होते, त्यातही जिल्ह्यातील आदिवासी भागात घराघरांत पक्ष पोचलेला होता. पूर्वीच्या डहाणू लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या दामू शिंगडा यांनी हॅटट्रिकही साधली होती. त्यानंतर 2009 मध्ये मतदारसंघातील पुनर्रचनेमुळे पालघर लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रात वर्चस्व असलेल्या हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीने अनपेक्षित मुसंडी मारत बळिराम जाधव यांना खासदार म्हणून निवडून आणले आणि या आघाडीचा विस्तार सुरू झाला आणि नंतर ठाणे जिल्ह्यात कॉंग्रेसला विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. जिल्ह्यात कॉंग्रेसचे राजेंद्र गावित हे एकमेव आमदार निवडून आले. एकंदर परिस्थिती पाहून गावितांना आदिवासी विकास खात्याचे राज्यमंत्रिपद देण्यात आले. 

मंत्रिपदामुळे गावित जिल्ह्यात कॉंग्रेसला सुगीचे दिवस आणतील, पक्ष वाढवून बळकटी आणतील आणि कार्यकर्त्यांबरोबरच आदिवासी समाजालाही पुन्हा कॉंग्रेसकडे वळवतील, ही अपेक्षा होती. तशी गावितांनी मंत्री म्हणून भरपूर कामे केली; पण कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण करण्यात त्यांना फारसे यश आले नाही. सहयोगी राष्ट्रवादी कॉंग्रेसला ते कधी विश्‍वासात घेऊ शकले नाहीत. परिणामी, पक्ष हवा तसा वाढला नाही. त्याचा परिणाम नगरपालिकांच्या निवडणुकीत दिसून आला. महत्त्वाची बाब म्हणजे गावित येथील आदिवासी समाजाशी पुरेसे एकरूप होऊ शकले नाहीत. एवढे रामायण घडूनही गावितांनाच उमेदवारी मिळावी, म्हणून त्यांच्या पाठीशी कोणी उभे ठाकले नाही. गावितांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जव्हार, डहाणू आणि पालघर या तीन नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यात डहाणूला पाच, जव्हारला एक आणि पालघरला एक एवढ्याच जागा पक्षाच्या वाट्याला आल्या. पक्षाची पीछेहाट झाल्याचे चित्र उभे राहिले, त्याला खिळखिळ्या संघटनेसह कारणे अनेक असली, तरी खापर गावितांवरच फोडले गेले. 

एकेकाळी भरभक्कम आणि कॉंग्रेसशिवाय दुसरा पर्याय नसलेल्या ठाणे जिल्ह्यात कॉंग्रेसची वाटचाल अस्ताकडे सुरू आहे. मोठी परंपरा असलेल्या या पक्षाला हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसारख्या स्थानिक पक्षापुढे झुकावे लागल्याची महाराष्ट्रातील ही एकमेव घटना म्हणायला हवी. ही निवडणूक लोकसभेची असल्याने आणि आपल्याच मंत्र्याला बाजूला काढल्याने या घटनेची राष्ट्रीय पातळीवर बातमी झाली. त्याच वेळी एवढ्या मोठ्या पक्षाला झुकविणारा नेता म्हणून हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय ताकदीचीही चर्चा झाली. 
बहुजन विकास आघाडीचा खासदार निवडून आला, तर तो मागील वेळेप्रमाणेच कॉंग्रेसच्याच पाठीशी उभा राहील; पण हा पाठिंबा मिळवण्याच्या धोरणात मुत्सद्देगिरी नसल्याने त्याचा परिणाम पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीतही भोगावा लागेल. अचानक माघारीमुळे कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर जसा परिणाम झाला, तसेच मित्रपक्षांसह अन्य स्थानिक समाजगटांनाही धक्का बसला. स्थानिक पातळीवर परस्परांविरोधात काम करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांना आता बहुजन विकास आघाडीचे काम कसे करायचे, असा प्रश्‍न पडला आहे.


--------------------

राजेंद्र गावितांचा पत्ता कट
- - सकाळ वृत्तसेवा

पालघर - पालघर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेले राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना पक्षाने ऐनवेळी ए-बी फॉर्म नाकारला. त्याऐवजी बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी केलेली विनंती लक्षात घेऊन कॉंग्रेसने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटनेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 

पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ऍड. चिंतामण वनगा यांच्याविरुद्ध "बविआ'चे बळिराम जाधव यांच्यात आता खरी लढत होईल. पालघरच्या माजी आमदार मनीषा निमकर या ऐनवेळी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. 

याबाबत वसईचे आमदार विवेक पंडित यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, श्रमजीवी संघटना आणि आपल्या कार्यकर्त्यांशी उद्या (ता.6) होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ. 

2009 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या आघाडी सरकारला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या "बविआ'साठी पालघरची जागा सोडावी, याकरिता प्रयत्न सुरू होते. मात्र, "बविआ'ने कॉंग्रेसच्या चिन्हावर ही निवडणूक लढवावी वा कॉंग्रेस पक्षात विलीन व्हावे, अशा अटी टाकल्या होत्या. "बविआ'ने त्या धुडकावून लावल्या. कॉंग्रेस उमेदवारांच्या तिसऱ्या यादीत गावित यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर "बविआ'ने विद्यमान खासदार बळिराम जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार केला होता. 

4 एप्रिलला जव्हार येथे कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आघाडीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, फॉर्म भरताना पक्षाची अधिकृत उमेदवारी दर्शविणाऱ्या ए-बी फॉर्म सोबत नसल्याचे दिसून आले; तसेच याआधी घोषित केल्याप्रमाणे पालकमंत्री गणेश नाईक आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे गैरहजर राहिले. तेव्हापासून अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आज सकाळी पक्षाकडून ए-बी फॉर्म मिळतील, असे आश्‍वासन गावित यांना मिळाले होते. 

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गावित यांनी मुख्यमंत्र्यांसह दिल्लीत जाऊन पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी ते पुन्हा मुंबईत दाखल झाले. 

प्रदेश कार्यालयाचा विश्‍वासू अधिकारी सकाळी फॉर्म घेऊन निघाला आणि जव्हार येथे दुपारी 2.30 च्या सुमारास पोहोचला. मात्र, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याशिवाय ते फॉर्म जमा न करण्याचे त्यांना आदेश असल्याने ते तसेच पडून राहिले. अखेर दुपारी तीनच्या सुमारास पालघरची उमेदवारी मागे घेतल्याचा निरोप आला. 

आपण पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. 
- राजेंद्र गावित, आदिवासी विकास, राज्यमंत्री 

"बविआ'चा दबाव यशस्वी 
आज सकाळी हितेंद्र ठाकूर; तसेच आमदार क्षितिज ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी झालेल्या चर्चेत बळिराम जाधव यांच्या विजयाची खात्री असल्याचे त्यांना पटवून दिले. पक्ष 20 वर्षांपासून कॉंग्रेससोबत असल्याचे सांगून "बविआ'ला मदत करण्याची विनंती केली. जर कॉंग्रेसने पाठिंबा दिला नाही आणि अन्य काही निकाल लागला तर भविष्यात आपल्या मदतीची कॉंग्रेसने अपेक्षा ठेवू नये. शिवाय आपली भिवंडी आणि मुंबईतील इतर मतदारसंघांतून उमेदवार जाहीर करू. तशी तयारी आम्ही केली आहे, असे मुख्यमंत्र्यांना कळविले होते. 

आधी टीका... आता प्रचार! 
जव्हार येथे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विद्यमान खासदारांनी या भागाला भेट दिली नाही. खासदारांना साधे शिफारस पत्र देण्याचे अधिकार नाहीत. ते रिमोटवर चालतात आणि त्यांचा पक्ष (बविआ) हा निवडणूक काळात पैसे वाटतो आणि नंतर पाच वर्षे तोंड दाखवत नाही, अशी घणाघाती टीका राजेंद्र गावित यांनी केली होती. आता मात्र त्यांना "बविआ'चाच प्रचार करावा लागणार आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देणार का, असे विचारले असता, त्याबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊ, असे सांगितले.
...

AYUSH activities

unread,
Apr 11, 2014, 2:28:46 PM4/11/14
to adi...@googlegroups.com






...

AYUSH activities

unread,
Apr 11, 2014, 2:51:03 PM4/11/14
to adi...@googlegroups.com

शेवटपर्यत टिकले ते ' मावळे ',आणि अर्ध्यावर उडाले ते ' कावळे ' 


राजकारण,पार्टी,खुर्ची हे सर्व अळवाच्या पानावरच पाणी असते हे आदिवासी विकास मंत्री गावित यांना जबरदस्ती माघार घ्यायला लावण्याच्या काँग्रेस पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे . पक्षश्रेष्ठीच्या एका फतव्याच्या फटका-याने हे मंत्री,नेते वाफ होउन उडुन जातात .निवडणुकीच्या आधी सामाजिक लढ्यातील ब-याच कार्यकर्त्यांना पक्ष-पार्ट्याची आमंत्रणे येत असतात,राजकारणातील सोनेरी आश्वासनांना आणि स्वप्नांना भुलून बरेच उथळ कार्यकर्ते सामाजिक लढा,संघटना सोडुन पक्षांच्या भाऊगर्दित सामील होतात.काय असते की " शेवटपर्यत टिकले ते ' मावळे ',आणि अर्ध्यावर उडाले ते ' कावळे ' ! तर आपली सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे की "कावळे होउन राजकारणात जाण्यापेक्षा आदिवासी समाजाच्या लढ्यात टिकुन राहा आणि आदिवासी मावळे म्हणुन अभिमानाने मिरवा.राजकीय पक्ष आदिवासी जनता किंवा नेता कोणाचाही विचार करत नाहीं हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .वसई-विरार पासुन अगदी डहाणु-तलासरी पर्यंत बिल्डर लाँबीचा एकछत्री अंमल राहावा व आदिवासींच्या जमीनी बिनबोभाट लुटता याव्यात म्हणुन कसा डाव खेळले बघा ! तिकडे दुसरे डाँ.गावित वैद्यकिय शिक्षणमंत्री मुलगी भाजपातुन उभी राहीली म्हणुन मंत्रीपद गेलं वरुन आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात गुंतवले.आदिवासी मंत्र्यांना ही वागणुक पण पक्षश्रेष्ठिचे पहा,सोनिया गांधी कांग्रेस अध्यक्ष आणि मनेका गांधी,प्रियंका गांधी मात्र भाजपात .त्यांनी केलं तर वाह वाह आणि आम्हि केलं तर गंदी बात ?? सावध व्हा आणि ह्या मृगजलाच्या मागे लागण्यापेक्षा चला कंबर कसा स्वायत्ततेसाठी लढा,स्वतचा जिल्हा मिळवुन घेउ. त्यासाठी सर्व आदिवासी बांधवापर्यंत पोहचा त्यांना जागृत करा,एकत्र करा त्यानंतर राजकारणाचा विचार करा जेव्हा सत्ता व निर्णय प्रक्रिया आदिवासींच्या हातात असेल.आता ती परकियांच्या हातात आहे म्हणुन सद्या पक्षांसाठी लढण्यापेक्षा प्रथम सत्ता व निर्णय प्रक्रिया आदिवासींच्या हातात येण्यासाठी लढा . आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली एक होउ या,प्रथम समाजासाठी लढु या !! आदिवासी एकता-जिंदाबाद !! स्वयत्त जिल्हा आदिवासींच्या हक्काचा-नाहीं कोनणाच्या बापाचा !! जय आदिवासी!!








</
...

AYUSH activities

unread,
Apr 27, 2014, 1:04:11 PM4/27/14
to adi...@googlegroups.com






<table
...
Reply all
Reply to author
Forward
0 new messages