जोहार !
परवा UNDRIPs ला दहा वर्ष झाले या बद्दल, दिल्ली येथे आदिवासी समन्वय मंच तर्फे आदिवासींच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन आदिवासीं समस्या बद्दल लक्ष वेधले. त्या बद्दल सगळ्यांचे अभिनंदन, या निमित्ताने आदिवासींच्या हक्का बद्दल पुन्हा राष्ट्रीय पातळीवर चळवळ मजबूत करण्यास हातभार लागेल.
*आज आदिवासी*
एका बाजूने देश वेग वेगळ्या स्वरूपात विकासाची फळे चाखतो आहे, आदिवासी समाज मात्र दिवसेंदिवस त्याचे स्वावलंबन/स्वायत्तता/स्वाभिमान/अस्मिता यांच्या समोर आव्हानाना तोंड देत आहे. हे होताना जल जंगल जमीन जीव तर गमावतो आहेच सोबत प्राथमिक गरजा पण सहज पूर्ण करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. (समस्यांची यादी सुरवात केली तर येथे जागा पण अपुरी पडेल). आज अशिक्षित/उच्च शिक्षित, बेरोजगार/नोकरदार, शेतकरी/उद्योजग, बालके/वयोवृद्ध, राजकीय नेते/अधिकारी, विद्यार्थी/युवा, इत्यादी प्रत्येक आदिवासीला विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. बहुतेक जण आपली वयक्तिक/कौटुंबिक जबाबदारी आणि महत्वकांक्षा पूर्ण करण्यात व्यापलेले आहेत. पण हे सगळे करताना समाजा समोरील आव्हाने आणि संकटे या साठी मुळापासून कायमची उपाय योजना करण्या साठी समाजातून एकत्रित पण प्रयत्न होणे आवश्यक आहेत.
*गरज आहे*
देश भरातील आदिवासी संघटनांना सोबत आणून आदिवासी समन्वय मंचाने आदर्श उभा केला आहे. आदिवासी हित हे ध्येय ठेवून अभ्यासपूर्ण सर्वसमावेशक स्वावलंबी/स्वायत्त/पारदर्शी/आक्रमक असेच प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रणालींचे संघटन करून अशीच जागरूकता समाजा साठी कार्य करणाऱ्या प्रत्येक संस्था/संघटना/ग्रुप/कार्यकर्ते/नेते/समर्थक यात करूया. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हे करण्यात सहभाग घेतला तर नक्कीच आपल्या समाजा साठी तसेच पर्यावरण/निसर्ग याना चांगले भविष्य देऊ शकू. स्थानिक/राज्य/देश/आंतराष्ट्रीय पातळीवर असलेले विविध आदिवासी हक्क या बद्दल जागरूकता करून समाज हित प्रथमिकता पुढे आणूया. सध्या जल जंगल जमीन जीव रक्षणा साठी या हक्कांच्या आधारे आपल्याना आपला आवाज व्यवस्थेत मांडण्यासाठी सर्वदूर प्रयत्न आवश्यक आहेत.
*जिवंत उदाहरण*
सध्या मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई - दिल्ली इंडस्ट्रियल कोरिओडोर, मुंबई वडोदरा, वाढवण बंदर, मुंबई/ठाणे/वसई/विरार साठी धरणे, कार्गो लोह मार्ग, विस्तारित महामार्ग, इत्यादी अंदाजे १६ मेगा प्रोजेक्ट मध्ये अक्षरशः महाराष्ट्रातील उत्तर सह्याद्री/दक्षिण गुजरात परिसरातील आदिवासी समाज अस्तित्वाच्या उंबरठ्यावर आहे. माहिती साठी जिल्हा विभाजन पूर्वी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला हा परिसर आहे, सध्या अल्पसंख्यांक होऊन आपले सगळे जल जंगल जमीन अस्तित्व गमावतो आहे. (दुर्दैवाने या विषयी जागरूकता कमी आहे, कारण पद्धतशीरपणे काही दशका पासून येथे विविध पंथ/सांस्कृतिक/मानसिक प्रदूषण करून, व्यसनात गुंतवून तसेच व्यसन सोडवून पण समाजाला भूल दिली आहे असे संगीतीतले जाते आहे. खास करून युवा वर्गाला या गोष्टींचे गांभीर्य कसे कळणार नाही यासाठी प्रचंड व्यवस्था आहे).
येथील जल जंगल जमीन अस्तित्व, स्वायत्त अर्थव्यवस्था आणि संस्ककृतिक ओळख, पारंपरिक ज्ञान याचे जतन करण्या साठी UNDRIPs नक्कीच खूप मोलाची भूमिका पार पडू शकेल यात शंका नाही.
*सोबत प्रयत्न करूया*
या सगळ्यांविषयी आपण योग्य ती जागरूकता करून आपली प्रत्येक चळवळ एकमेकांना पूरक आणि मजबूत करूया. आपल्या समाजाचे भविष्य आपल्या हातात आहे याची जाणीव मजबूत करूया. ग्रामसभा, पेसा, पाचवी अनुसूची, अनुसूचित क्षेत्र, UNDRIPs इत्यादी असलेल्या आदिवासी हक्क यांचा अभ्यास करून प्रशासनावर विविध पातळीवर आपला आवाज पोचवून व्यवस्था अधिक प्रभावी करूया.
*आपल्या माहिती साठी UNDRIPs* चे हिंदी/इंग्रजी तुन माहिती पाठवतो आहोत या विषयी अभ्यास करून आपल्या संपर्कात जागरूकता करूया. Lets do it together!
हि फाईल येथून डाऊनलोड करू शकता : https://drive.google.com/file/d/0B9DGQz4oA43gYkVGQ05nQXdlZEE/view?usp=sharing
Jago Adivasi!
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/aed100e0-b4a4-4a12-864f-804322bb8aa7%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvoTw%2BQ25V1m1_bLz4k%3Dv_W7WnU%3Djtr9HQrk7mb78UUmA%40mail.gmail.com.
संयुक्त राष्ट्रसंघ घोषित मुलानिवासी अधिकार जाहिनाम्यात दिलेले असे कोणते अधीकार आहेत ज्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राने कायदे केले आहेत . या अधिकारांची उपयोगिता तेव्हांच असेल जेव्हां राज्य त्याससंबधी कायदे करेल.
कृपया माहिती देण्याची कृपा करावी .
एकनाथ भोये
8975439134.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFF9zxmOEoR%2Bt9ZvpeUrKt_MMXrN8JyGJwjDSF_oWrEbOHx40Q%40mail.gmail.com.