पालघर मतदार संघातील आदिवासी मतदार बंधु-भगिनींना निवडणुकीसाठी आवाहन
कारखानदार,भांडवलदार,बिल्डर यांचे पक्ष,आदिवासींच्या जमीनी लुबाडुन विकासाच्या बाता करणारे पक्ष,धर्मांध जातियवादी पक्ष यांना नाकारा,झटपट विकासाच्या मृगजलाच्या पाठी धावलो तर हातात असलेल्या गोष्ठी म्हणजे जमीन,पाणी,जंगल या गोष्टिसुद्धा हे लोक राष्ट्रनिर्माण च्या नावाखाली लुबाडतील. आदिवासींची स्थिति ना घर का ना घाट अशी होईल त्या आधी सावध होउ या,ताबडतोब विकास फसवा आहे,उमेदवारा बरोबरच पक्षाची ध्येय - धोरणे पहा.कारण आजपर्यतचा अनुभव हेच सांगतो की उमेदवार फक्त बाहुला असतो धागे दोरे,ध्येय धोरणे पक्षश्रेष्ठिच ठरवत असतात. जे पक्ष आदिवासींना आदिवासी न म्हणता वनवासी,मुलनिवासी,गिरीवासी अश्या पर्यायी शब्दांनी ओळखत असतील ते आदिवासींसाठि काही करतिल याची अपेक्षा करणेच चुकिचे आहे !ते आदिवासींना आदिवासी सुद्धा म्हणायला तयार नाहित !जो पक्ष आदिवासी हिताची ,आदिवासी जमीनी,पाणी,जंगल वाचवुन ह्या गोष्टिवर फक्त आदिवासींचा हक्क आहे,धरणे,प्रकल्प हे आदिवासी भागात नकोत असे ज्या पक्षाच्या जाहिरनाम्यात असेल व ज्या पक्षाची भूमिका आजपर्यत अशीच राहिली असेल त्यांनाच मत दया.आदिवासी जमीनी टिकल्या तर आदिवासी टिकेल,तात्काल विकासाच्या भुलथापांना बळी पडलो तर समजा संपलोच . स्वायत्त आदिवासी जिल्हा,सुसरी धरण,भुक-तहानेने मरणा-या आदिवासींना मराण्यासाठी सोडुन शहराकडे वळवले जाणारे पाणी अडवायचे असेल तर आदिवासी सुशिक्षीतांनी सावध होउन विचार केला पाहिजे , पूर्वग्रह सोडुन पुढे टिकुन राहण्यासाठी जोग्य उमेदवार निवडला पाहिजे .खरी लढाई विकासाची नव्हे तर टिकुन राहण्याची आहे . जव्हार मोखाड्याला कुपोषण निर्मुलनाच्या नावाखाली कारखानदारांच्या औद्योगिक वसाहती उभारण्याची स्वप्ने पाहिली जात आहेत,म्हणजे आता भुकेने फक्त मुलच मरत आहेत औद्योगिक वसाहती आल्यावर प्रदुषनाने सर्वच आदिवासी हळुहळु मरतील म्हणजे कुपोषणाचे रडगाणेच जाईल,जमीनी गेल्यामुळे निराधार झालेला आदिवासी स्वस्त मजुर म्हणुन सहज उपलब्ध होईल.हाच विचार दापचरी प्रकल्पाच्या जमीनी विषयीही चालु आहे,गुजरात-मुंबई जोडुन व्यापा-रांची सोय करणा-या सुपरफास्ट हायवे,तिन-चार गॅस पाईपलाइन सर्व्हे होउन निवडणुका होताच बांधकाम सुरु होणार आहेत."हमारी जमीन जानवाली है - अच्छे दिन आनेवाले हैं ।" सर्वात महत्वाचे आदिवासी मतविभाजन टाळा !! ज्यांच्या नावानाचे आदिवासींच्या जमीनी लुटणा-यांना सु-सु सुटेल ,ज्याच्या एरियात जायला सावकाराकडे वाघाचे काळिज लागते,जिथे 7/12 च्या कागदावर सावकार असेलही पण जमिनीवर आदिवासी राजा आहे," सरकार - सावकार कागदावर आदिवासी जमीनीवर " असा पक्ष निवडा ! विकासासाठी नव्हे तर या जमीनीवर टिकायचे,फलायचे,फुलायचे असेल तर !! लढाई अस्तित्वाची आहे मित्रांनो फाजिल अपेक्षा ठेवु नका ! सर सलामत तो पगड़ी पचास । " जायेंगे तो और भी लडेंगे " जय आदिवासी !!