धनगरांचे सुंबरान Vs आदिवासी उलगुलान
¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶
धनगरांचा केविलवाणा पण तितकाच ताकदीनिशी आदिवासी होण्याचा प्रयास...
आरक्षणाचे सुंबरान
म्हणून आज ते उपोषणालाही बसलेत...
मा.पिचड साहेब यांनी आदिवासी होण्याचा घटनात्मक मार्ग स्पष्ट करताना आदिवासींचे मोठेपणही दाखविले.
धनगरांच्या स्वतंत्र आरक्षणास पाठिंबा दिला.
परन्तु असे करताना आदिवासी होण्याच्या मार्गास प्रखर विरोध केला.
जो विरोध करील त्याचा काटा काढायचा असा त्यांचा प्रयत्न उघड दिसला...
पिचड साहेबांची जमात महादेव कोळी असल्याने ही जमातच आदिवासी नसल्याचा बचाव हनुमंत सुळ यांनी केला.
या चर्चेतून माझ्या मनात चर्चेचे जे काहुर माजले ते मला गप्प बसून देईल ते विद्रोही कसे...?
●धनगरांना आरक्षण हवय कारण ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. म्हणून की काय त्यांनी या हव्यासापोटी बारामती गाठली. याने आदिवासी म्हणून यांना घोषित करावे का? असे असेल तर उद्यापासून देशभरातुन दिंड्या बारामतिला येतील का?
●प्रदर्शन जोरदार केले....बड़े बड़े स्टेज सजवून आक्रमक झाले की आदिवासी होता येते का? असे जर शक्य असेल तर हा स्टेज कायमस्वरूपी ठेवा...कारण उद्यापासून याचे बुकिंग सुरु होईल.
●कायद्याने की हटवादाने धनगरांना आरक्षण हवे आहे ? कायद्याने तर त्यांना 3.5% आरक्षण दिले आहे. मग हटवादाने त्यांना आदिवासी होता येईल का? असे असेल तर पाठ्यपुस्तकांत शकुनीमामा, पाकिस्तानी घुसखोरी यांचे आदर्श धड़े समाविष्ट करावे का?
●शिक्षण, आर्थिक प्रगतीसाठी यांना आदिवासी कोट्यातुन आरक्षण हवे आहे. मग NT चे आरक्षण त्यांना शिक्षण घेवु देत नाही का? असे असेल तर मेंढरांना का आदिवासी करू नये? ते तर धनगरांपेक्षा अधिक निरक्षर आहेत.
●कायद्यातील कोणत्याच बाबी यांना मान्य नाहित. मग काय मतदार संघान्तिल मतदारांची संख्या पाहून यांना आरक्षण द्यावे? तसे असेल तर उद्या पासून आदिवासी होण्यासाठी लोकसंख्या वाढवा असा फतवा इतर समाज का काढणार नाही?
●ऊर बडवून आरक्षण मिळत असेल तर उद्या संपूर्ण राज्यात ऊर बडविण्याचा महोत्सव राज्यसरकारने सुरु करावा का? त्यासाठी स्वतंत्र निधि परत केन्द्राकडे जाणा-या आदिवासी निधितुन का उभारू नये?
धनगरांच्या सुम्बरानला आदिवासी उलगुलान जोरदार विरोध दर्शविण्यास सज्ज...!!!
दि.24/07/2014 पुणे (शनिवारवाडा)
दि.27/07/2014 नाशिक
#Ibn लोकमत
8:30pm
22/07/2014
©विद्रोही
आदिवासी संघर्ष...!!!
आज कोणी ही याव आणि आदिवासी सांगव हीच आपली कमतरता आहे आता नाहीं तर कधीच नाहीं । जागा हो आदिवासी बाधंवा ही वेळ नाहीं विचार करायची।
--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1167b6cb-2768-46b2-88f7-7a6f4cf38feb%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c271197d-33b4-4af0-89ad-498e4de56868%40googlegroups.com.
Yes we to fights for our space......
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuEiCirb%3DSR_MRPzj4Z9g_Y5VLpc3B%2BxjF4Ay9w%3D9EQUw%40mail.gmail.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c271197d-33b4-4af0-89ad-498e4de56868%40googlegroups.com.
--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
आदिवासी समाज बांधव हित संवर्धनार्थ भव्य निषेध मोर्चा
आदिवासिन्नी पोटाचा प्रश्न सोडवायचा की आता मोर्चे काढून हित राखायचे?
सरकार आपली भूमिका स्पष्ट का करत नाही?
कदाचित सरकारलाही खेळ पहायला मजा येतीय वाटते...
visit all pics at : https://www.facebook.com/media/set/?set=a.571462489546159.150501.100000472403313&type=1
आदिवासिंच्या सुसंस्कृत घरात घुसून त्यांच्या सुविधा लाटण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.
आता इतर जाती आपण किती गरीब आहोत हे सिध्द करण्यास सरसावले आहेत.
धनाचे आगर म्हणजे धनगर असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते या स्पर्धेत राजकीय खेळी करून आपला हा डाव साधत आहेत.
घुसखोर आता अगदी आदिवासिंच्या दारात उभे आहेत. पण दुर्दैव त्यांना दरवाजात रोखण्यास आदिवासी बांधव दुबळा ठरतोय.
ऐन भादव्यागत निवडणुकिंच्या तोंडावर कोण कोणावर आपली भूक भागवत आहे हे सामान्य आदिवासींना काही समजत नाही.
एक नक्की सरकारने तटस्थ भूमिका घेवुन आदिवासिंच्या हिताचा विचार राखला जावा असे आदिवासी म्हणणार हे नक्कीच....परंतू एका बाजुला धनगर आम्हीच धनवार....आम्हीच धनगड असा कांगावा करणार हे पण सत्य...!!!
भाजपाला राज्यात सत्ता मिळवायची आहे म्हनून ते यात आपली पोळी भाजणार म्हणून त्यांनी लागलीच धनगरान्ना पाठिंबा दिला.
आदिवासिंच्या बाबतीत अगदी नकारात्मक भूमिका असणारा शिवसेना आदिवासिंच्या विरोधात जाणार हे माहीत होतेच....
ज्या मनसेच्या प्रमुखान्नी काही वर्षांपूर्वी आपल्या सभेत पिचड या आदिवासी आडनावाचा चिपाड म्हणून अवमान केला होता. आज तर त्यांच्या बाळाने धनगर आरक्षनास पाठिंबा दिला.
ज्यांनी शेतक-यांच्या नावाखाली नेहमीच लाचारीपणा केला असे शेट्टी आज नेहमीप्रमाणे आदिवासींना अक्कल शिकवू लागला.
नुकत्याच झालेल्या निवडणुकितिल आपल्या पराभवाची पुनरावृत्ति होवू नये म्हणून कॉंग्रेस धनगर समाजाला आश्वासन देणार हे नक्की.....तसेही अजित बाबांना मधुकर पिचड यांचे खच्चीकरण करणे अपेक्षित होते.
काका-पुतण्यान्नि मतान्साठी धुळफेक करायचा नेहमीचा शब्द पाळला.
राजकीय व्यक्ति आपली पोळी भाजणार हे नक्की...पण खरा आदिवासी आवाज कुठे आहे? पिचड, वळवी, पुरके हेच आदिवासी आहेत का? बाकीचे बगळे कुठे गेलेत....?
विद्रोही
आदिवासी संघर्ष....
www.adiyuva.in
...To view this discussion on the web visit <a href="https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c271197d-33b4-4af0-89ad-498e4de56868%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer" target="_blank" onmousedown="this.href='https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c271197d-33b4-4af0-89ad-498e4de56868%40googlegroups.com?utm_medium\75email\46utm_source\75footer';return true;" onclick="this.href='https://groups.go
...
...
...<span style="display:inlin
आता खरा लढाईचा डंका झडाया लागला .
आज सकाळी पुन्हा ना वसंतराव पुरके सरांसोबत आमची बैठक झाली. उद्या ते राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जात आहेत.मंगळवारी आदिवासी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीला मला सुद्धा निमंत्रित केले आहे. त्या बैठकीत धनगर नेत्यांच्या मुद्याचे मी खंडन करणार आहे. अनेक संदर्भ या साठी मी संकलित केले आहेत. धनगर कसे आदिवसी नाहीत ; हे आता आपलाला शासनाला पटवून सांगावे लागेल. कुणाकडे काही मुद्दे / तर्क असतील तर ; कृपया पाठवा. त्याच बरोबर आपल्या शुभेछाची सुद्धा मला गरज आहे . जय बिरसा !
सडून मरण्यापेक्षा लढून मरू !!
काही राजकीय लोक आम्हा आदिवासींना गर्भितइशारा देत आहेत कि आम्ही अडचणीत येऊ शकतो. आमच्या काही लोकांना वाट्याला गोवा-यासारखी स्टमपिडचे मरण येवू शकते, अरे स्वार्थी राज्य कार्त्यानो ! जर सुद्धीवर या ! आदिवासी कधी मरणाला घाबरत नाही. ज्यांनी आमच्या हक्काला हात लावला आम्ही त्याच्या नरडीला हात लावू. या देशात घटनेचे राज्य आहे. कायद्याचे राजे आहे. कुणी पुंडशाहाचे राज्य नाही. म्हणून कुणी राजकीय हेतूने अराजकता माजवू नये. असे जर कुणी केले तर आदिवासीच कायमहाराष्ट्राची जनता सुद्धा जनात सुद्धा त्यान माफ करणार आणि. जय बिरसा.
मित्रहो , ज्या देशातल्या संकृतीला
सार्वत्रिक स्वातंत्र्याचे वावडे असते
त्या देशातले युद्ध कधीच संपत नसते
फरक इतकाच ते कडी शत्राचे तर
शत्राचे असते ..........
उद्या आम्ही शात्राचे युद्ध लढण्यासाठी दिल्ली आणि मुबईला जात आहोत. आता पर्यंत खूप उपेक्ष झाली दारिद्र्यात खूप भरडल्या गेलो. विवंचनेच्या वणव्यात भाजल्या गेलो. खूप शोसन झाले. खूप शोसने झाले. एक अमेरिकन क्रांतीकारक बाई नेहमी म्हणत असे कि शरीराने थकली नाही परंतु अन्याय सहन करू थकली आहे. १ लाख ७५ हजार बोगस आदिवासींनी आमच्या नोक-या हिसकावल्या.आता या नष्टचर्येत आम्ही सडणार नाही. उपेक्षेत सडून मरण्यापेक्षा लढून मारून.
...
--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/76a5a8c8-1a2a-4ea9-951e-e66db3c64845%40googlegroups.com.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
आदिवासी होण्याची कुटिल स्पर्धा...
निवडणुका आल्यावरच आदिवासी होण्याची आत्यंतिक स्पर्धा राज्यात सुरु झाली आहे.
एक....नव्हे....दोन.....नव्हे तब्बल पन्नास जाती आज या स्पर्धेत जिंकण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत आहेत.
भारतीय कायदा जणु काही गुदमरतोय असेच चित्र येथे आहे.
पावसाचा कहर झेलत असताना जगण्यासाठी लढावं की आरक्षणाच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर येवून आन्दोलन करावं असा अस्मानी पेच येथे आहे.
राजकीय नेत्यांनी तटस्थ राहून आपला योग्य तो निर्णय देवून या बंडाळीवर पूर्णविराम देणे अपेक्षित असताना मतांच्या राजकारणासाठी त्यांनी आश्वासने देवून विष कालवले.
आदिवासी जमाती 47 असताना यात अजुन 50 जाती घुसखोरी करण्याची बळजबरी करत आहेत. यात जर चुकुन या जाती यशस्वी झाल्या तर आदिवासी संस्कृती भविष्यात आपणास फक्त पुस्तकातून समजावून घ्यावी लागेल.
जगाच्या अनेक धर्मांचे तत्त्वज्ञान आदिवासी संस्कृतीतुन उदयास आले आहे. ही संस्कृती आणि या संस्कृतीचे पाईक असणारे हे आदिवासी जपणे जसे घटनेने बंधनकारक केले आहे...तसेच ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु असताना आज निव्वळ सरकारी मलिदा लाटन्याचा एक सोपा सहज मार्ग म्हणजे आदिवासी आरक्षण असा कुविचार अनेकजण जपताना दिसत आहेत.
सर्वसामान्य आदिवासी भोळा भाबडा, अबोल, त्रयस्थाबरोबर शक्यतो बोलण्याचे टाळनारा, प्रामाणिक, पापभीरु, दैववादी, परम्परागत जीवनदृष्टिचा, निसर्गात रमणारा, निसर्गावर प्रेम करणारा व जीवनाचा स्वछंदतेने उपभोग घेणारा असतो. तो नेहमी हसतमुख, आनंदी असतो. तो मूलनिवासी असला तरी त्याची राहणी त्याच्या निर्मळ अंत:करणाप्रमाणे साधी व स्वच्छ असते. त्याच्यातील आत्मीयता व सचोटी हे गुण लक्षात घेण्यासारखे आहेत. त्याची जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे. त्याच्या जीवनात पैशाला फार स्थान नाही. जमिन, गुरेढोरे, बक-या, कोम्बड्या, मासे, खेकडे व श्रम यासाठी मजबूत हातपाय हीच त्याची संपत्ति आहे. आपणास हवे ते निसर्गातुन व सभोवतालच्या साधनान्तुन मिळविण्याचि शक्यता असेल तर आदिवासी स्वताला अत्यंत सुखी मानतो. असा हा निसर्गाच्या कुशीत सदाफूलीसारखा आपले जीवन जगणारा आदिवासी माळीनसारख्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच धनगर, बंजारा, हटकर, कोळी यांच्या घुसखोरिच्या चक्रव्युहात अड़कला आहे.
मी विद्रोही आदिवासी जेव्हा या जंगल द-यांत फिरतो तेव्हा मला जाणवते की आरक्षण म्हणजे नेमके काय? त्याचा आपणास नेमका कसा फ़ायदा आहे? त्याच्यातुन आपण कशी प्रगती करू शकतो? अशा अगदी साध्या प्रश्नांची जाण नसलेला हा आदिवासी आज रस्त्यावर उतरून जोरदार निषेध करताना दिसत आहे.
गेल्या 60-65 वर्षात आदिवासींमध्ये एकाही जातीचा समावेश केला नाही. स्वातंत्र्यानंतर प्रगतीची पावले ब-यापैकी लोकांपर्यंत पोहचलेली असताना ऐन निवडनुकांच्या तोंडावर आदिवासी करण्याचे गाजर अनेक राजकीय पुढारी करताना दिसत आहेत. खरच महाराष्ट्र पुरोगामी आहे अशी लायकी तरी यातून आपणास दिसते का? असा प्रश्न सहज पडल्याशिवाय राहत नाही.
मतांच्या तीन पत्ती खेळात काय कायद्याचे हुकमी पत्ते आदिवासिंच्या बाजूने पडतील ?
काय जाती-पातीचे राजकारण करणारे भगवे पक्ष सत्तेत येवून आदिवासिंच्या मुळावर घाव घालतील?
आदिवासी घटनेच्या बळावर आपले रक्षण करू शकतील काय?
खरच महाराष्ट्र योग्य विचारांनी आपली प्रगतीची पावले टाकत आहे का?
निसर्गाची पूजा करणारा आदिवासी जर आपण नियोजनबध्द संपुष्टात आणला तर निसर्ग आपणास माफ करील का?
बघुयात निवडणुकिच्या आखाडयात निसर्गरूपी जिंकतो की धनाच्या जोरावर न्याय आपल्या पदरात पाडून घेणा-या कुटिल वृत्ती जिंकतात?
विद्रोही
आदिवासी संघर्ष
Mr AYUSH, I will like to share something. The revolt we fight against Dhanagar I think no media is covering our repot the are only covering n showing whatever related to dhangar. So I wil request you to send necessary data proof. To the editor so that they must cover our story also why we opposing, they only showing related to dhangar but without knowing what is our motive of opposing. You must inform all news channel about our revolt n also tel where we are going take rally. As a organisation member you do this fever.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6ca6fc3b-40b9-426d-8113-44fee34ed11c%40googlegroups.com.
Very well argued Rahul !
Can you send ur no. on 8275069556.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/4d026f48-7a9e-4da3-9fcc-65c9186f7955%40googlegroups.com.
धनगर समाजाची दिशाभूल करणारे स्वार्थी धनगर नेत्ये महादेव जानकर............
धनगर समाजाच सामाजिक आंदोलन आणि संघटन खरोखर कौतुकास्पद आहे.
मी तर धनगर समाजाचे जाहीर आभार मानतो की त्यानी दिलेला लढा ,त्यासाठीच नियोजन ,धनगर समाजाच संघटन यातून आदिवासी समाजाने काही गोष्टी शिकल्या पाहिजे.धनगर समाजाने उभारलेल्या आरक्षण लढ्या मुळे आपल्या आदिवासी समाजाचा चड्या सुटायची वेळ आली त्याव्हा आदिवासी समाज मोठ्या ताकदीने आपल्यातील सर्व राजकिय-सामाजिक भेद विसरून निर्णायक लढाई साठी संघटित झाला.यापुढे ही अशीच संघटन आदिवासी समाजाचे राहो......!!
प्रत्येक आंदोलन हे त्याव्हच यशस्वी होत्ये जेव्हा स्वार्थ बाजूला ठेवला जातो. धनगर समाजाचा सामाजिक आंदोलनाला राजकिया वळण दिले त्ये महादेव जनकर यानी त्याना त्यांचा पक्षाला राज्याव्यापी पक्ष करायचे आहे. स्वताचा राजकिय स्वार्थासाठी त्यानी धनगर समाजाला वेठीला धरले आहे.त्याना चांगले माहित आहे की घटनेतील प्रक्रिया पुर्ण केल्या शिवाय धनगर समाजाला आरक्षण मिळू शकत नाही परंतु धनगर समाजाला पेटत ठेवल म्हणजे महायुती मधे आपल वजन वाढेल आपल्याला महत्व प्राप्त होईल आणि आपला राजकिय स्वार्थ साधता येईल.
काल-परवा महादेव जानकर कोळी महासंघ जो मागणी करतो की आम्ही आदिवासी अहोत त्यानी मुंबई मधे काढलेल्या मोर्चात सामील झाले आणि नांमदार मधुकर पिचड साहेब आणि आदिवासी समाजाला शिवीगाळ करीत होत्ये.महादेव जाणकराची स्वार्थापोटी घेतलेली भूमिका ही धनगर समाज आणि आदिवासी समाजाला संघर्षा कडे घेउन जाणारी आहे आणि धनगर समाजात आणि आदिवासी समाजात तेढ निर्माण करणारी आहे यामुळे महादेव जानकर हे दोन्ही समाजाच एकप्रकारे नुकसान करीत आहे.महादेव जानकर स्वताचा राजकिय स्वार्था पोटी आदिवासी समाजाला खड्यात घालायला निघाले आहेत.
धनगर समाज दिशाहीन व नेतृत्व हिन झाला आहे.महादेव जानकर सारखी लोक गरीब भोळ्या-भाबड्या लोकांना मुर्ख बनवत आहे.आणि स्वताची सुध्धा फसवणूक करून घेत आहेत.महादेव जानकर यानी ठरवल आसत तर त्ये धनगर समाजाल आदिवासी समाजाचा आरक्षण धक्का न लावता ७ % इतक् आरक्षण नकीच्च मिळवू शकले आसते परंतु महादेव जाणकाराना राजकारण करायचे होते.
महायुती कडे कोणी एक नेता नव्हता जो पीचड साहेब आणि त्यांचा आदिवासी ताकदीला आव्हान देईल आसा त्यामुळे महायूती सुध्धा महादेव जानकर यांचा पध्दत शीर वापर करून घेत आहे.
नामदार पिचड साहेब यांचा पाठीमागे सर्व पक्षीय आदिवासी समाज आदिवासी संघटना एकत्र झाल्या आहेत.महाराष्ट्रातील ४ आदिवासी खासदार २५ आदिवासी आमदार धनगर आरक्षण मुद्यावर एकत्र आहेत. महादेव जानकर यानी एक लक्षात ठेवावे त्यांची भक्कम् पणे बाजू मांडू शकेल असा धनगर समजातील एक सुध्धा खासदार दिल्ली दरबारी नाही.....!!
पुढील लढा दिल्लीत लढण्यासाठी आम्ही देश व्यापी सर्व आदिवासी संघटनाना लवकरच एकत्र करू याची महादेव जाणकाराना आम्ही खात्रीशीर ग्वाही देतो...आता पुढील लढाही ही दिल्ली दरबारी..........!!
आपकी जय - जय आदिवासी....!!
Started 824km journey on earth to participate world indigenious people day and adivasi bachavo andolan at palghar.(tommorow 11 am)... will join dahanu rally at 9am and then palghar event.... excieted to see you all.
(Tribal boli)
Apale samajala vachavayacha hova ta sagalyahi apalya parine jamal tasa kahi karay pahaj.. kavha lavha rastyavar utarun ardaya ho pahaj... akha maharashtra rastuavar devla ta mi kya hafisat jaav... ghetali 2dis sutti na ninghalu iya gava kad. Undya bhetu na palghar la....
(Marathi)
Ata adivasi astitvacha ladhayi sathi avagha maharashtra rastyavar utarla asata apan kase mage rahayche naa.. adivasi dinache mahatv sadhun paghar aani dahanula asalelya nishedh morchyat samil honya sathi mi pan 2divas raja gheun 824km cha pravasala lagalo aahe... udy bhetuy.
Jai adivasi
AYUSH | adivasi yuva shakti
www.adiyuva.in
सध्या धनगर आरक्षणाचा विषय गाजतोय. धनगर समाजाचं म्हणणं आम्ही आदिवासी आहोत, पण त्यांची ही मागणी पूर्णतः॒चुकीची आहे. वारंवार मागणी करूनही त्यांना आदिवासींचा दर्जा मिळालेला नाही. कारण त्यात काहीच तथ्य नाही. धनगर समाजाला अपुर्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे वेठीला धरलं जातंय. जे मान्यच होणार नाही त्यासाठी लढवलं जातंय. यात निव्वळ राजकीय स्वार्थ आहे. काही धनगर नेते स्वतःच्या राजकीय कारकिर्दीसाठी समाजाला फसवतायत, असंच चित्र सध्या आहे. तसंच सर्वच पक्षांचे राजकारणी धनगरांना॒आश्वासनं देत सुटलेत की, आम्ही सत्तेवर आल्यावर तुम्हाला आरक्षण देऊ…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी॒आश्वासनांची खैरात वाटणं सुरू केलंय. त्यातूनच आज हा आरक्षणाचा विषय अजेंड्यावर आणला गेलाय. मराठ्यांना आरक्षण दिलं. आता धनगर सरसावलेत. त्यांनी तर थेट आदिवासींच्या ७ टक्के आरक्षणातच वाटा मागितलाय.॒धनगर समाजाची ही मागणी पूर्णतः चुकीची आहे. आरक्षणासाठी दांडगाई करून, मंत्र्यांची अडवणूक करून, शाईसम रसायन मंत्र्यांच्या अंगावर टाकायलाही कमी केलं गेलं नाही. ही कृत्य करणारा समाज आदिवासी असूच शकत नाही. मुळात आदिवासी कसा आणि कोण आहे? आदिम काळापासून वास्तव्यास असलेला तो आदिवासी अशी व्याख्या आदिवासींची केली जाते. अतिदुर्गम भागात आदिवासींचं वास्तव्य असतं. शहरी जीवनाशी त्याचा लवकर संपर्क न आल्यामुळे तो मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही. त्याच्यात कोणताही बदल झाला नाही. इंग्रजीत ‘अॅम्बॉरिजिनीझ्’ हा आदिवासीसाठी पर्यायी शब्द आहे. आदिवासी हा निसर्गपूजक आहे. झाडं, पशू यांची तो पूजा करत असतो. आदिवासींच्या प्रत्येक गावात वाघोबाचं मंदिर (ठाणे, पुणे जिल्ह्यात)॒असतं. त्याची पूजा केली जाते. आदिवासी तसा आत्ममग्न समाज म्हणावा लागेल. कोणाच्या वाटेला न जाणं. निसर्गात जे मिळेल त्यावर गुजराण करणं, अशी त्याची जीवनपद्धती… आदिवासी समाजात शेती केली जाते पण ती फारच थोडी असते. त्या त्या भौगोलिक प्रदेशानुसार छोटे उद्योग केले जातात. उदाहरणार्थ, जंगलातून वनौषधी गोळा करून विकणं, पण यात गोम अशी आहे की, आदिवासीला गंडवून कमीतकमी किमतीत त्याच्याकडून या मौल्यवान वनौषधी खरेदी करायच्या आणि त्या जास्तीतजास्त किमतीला विकून॒आपल्या तुंबड्या भरायच्या असा दलालांचा उद्योग वर्षानुवर्षं सुरू आहे. आपण फसवलं जातोय याचं आदिवासीला भानच नाही. किंबहुना तो आत्मसंतुष्ट असतो. जेवढं मिळालंय तेवढं घ्या, याच त्याच्या स्वभावाचा फायदा धनदांडगे आजवर घेत आलेले आहेत. जंगलतोडीचा दोष बर्याचदा आदिवासींवर लावला जातो. खरंतर हा आदिवासी वनविभागाच्या माळ्याला (वनकर्मचारी) जितका घाबरतो तितका तो वाघालाही घाबरत नसेल, हे वास्तव आहे. मग हा नाहक दोष त्याच्या माथी का मारला जातो? ज्या सागाच्या पानाचा उपयोग करून तो घर बांधतो, त्याची मनोभावे पूजासुद्धा करतो असं असताना त्यालाच दोषी ठरवून आपले गुन्हे शाबूत ठेवण्याचं काम बदमाश लोकांकडून होत आहे. विकासाच्या नावाखाली जंगलतोड होत आहे. आदिवासींच्या डोळ्यांसमोर त्यांचं विश्व उद्ध्वस्त होतंय आणि मूकपणे पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नाही…
रूढीपरंपरा जपणारा हा समाज… त्याची संस्कृती त्यामुळेच भिन्न आहे. आदिवासी समाजात परंपरेला महत्त्वाचं स्थान आहे. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे या परंपरा सोपवल्या जातात. त्यात नृत्य, गायन, कथा, काव्य या कलांचाही समावेश आहे. यामुळे त्यांच्यामध्ये एकजीनसीपणा आढळतो. आदिवासींमध्ये॒अंधश्रद्धेचं प्रमाणही खूप आहे. मांत्रिक, भगत, जादूटोणा यांच्या विळख्यात तो अजूनही अडकून पडलेला आहे. त्यांच्या या अंधश्रद्धेचा फायदाही घेतला जातो, त्याला नागवलं जातं. या अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहातून आदिवासीला बाहेर काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे. नाही म्हणायला काही समाजसुधारकांनी तसे प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ, बाबा आमटे दाम्पत्य आणि संपूर्ण आमटे कुटुंबीय, डॉ. रवींद्र-स्मिता कोल्हे, डॉ. अभय-राणी बंग… डॉ. अभय बंग यांनी तर त्यांचं संशोधन सरकारला सादर केलंय. पण काही उपाययोजना सुचवून सरकार ढिम्म… काहीही केलेलं नाही यावर सरकारने… ‘कोवळी पानगळ’ गळतेच आहे. मेधा पाटकरांनी नर्मदा खोर्यातील आदिवासींसाठी काम केलं. त्या सरदार सरोवराची उंची वाढवू नये म्हणून आदिवासींना घेऊन पाण्यात उभ्या राहत असत… पण काय झालं? मोदींनी त्यांना हवं ते करून घेतलं आणि आदिवासींना लावलं देशोधडीला… ज्या डोंगराळ भागात आदिवासी राहतो, त्याच भागात शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणं बांधली जातात. मग त्याला विस्थापित व्हावं लागतं. आपलं गाव सोडून जावं लागतं. किती यातना होत असतील त्याच्या मनाला… हा आदिवासी इतर बंधू-भगिनींना पाणी मिळावं म्हणून स्वतःच्या मातृभूमीचा त्याग करतो. पण कोणी ठेवतं का त्याच्या त्यागाची जाणीव? उलट आदिवासी म्हटलं की लोकांच्या डोळ्यांसमोर उघडा-वागडा,॒रापलेला चेहरा येतो, कधी तर कुचेष्टेनेही पाहिलं जातं त्याच्याकडे… बुजरेपणामुळेही तो इतर समाजापासून तुटलेला आहे. मात्र आताशा काही प्रमाणात हा आदिवासी समाज शिकू लागला आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत याचं प्रमाण अधिक म्हणता येईल, पण गडचिरोली, चंद्रपूर इथे आजही भयानक परिस्थिती आहे. नक्षलवादाच्या विळख्यात आदिवासी सापडलेला आहे. सुरुवातीला सरकारच्या अन्यायी॒वागणुकीच्या विरोधात आदिवासीला नक्षलवादी बनवलं आणि आता वार्यावर सोडून दिलंय. किती निष्पाप आदिवासी मारले गेले आहेत.॒सरकार आणि नक्षलवाद्यांच्या धुमश्चक्रीत॒त्याची काही मोजदादच नाही. उपजिविकेसाठी आदिवासी शेती करतो ती अतिशय तुटपुंजी असते.॒त्यावरच त्याची वर्षभराची गुजराण होते. आदिवासी तसा काटक, मेहनती पण बुजरा… त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या कलेचं, मेहनतीचं चीज होत नाही. त्याची कला कड्याकपारीत गोठून राहिलीय. ती जगापुढे आली नाही. शिक्षणाच्याबाबतीतही या वर्गाच्या बाबतीत खूप औदासीन्य आहे. ते जिथे राहतात तिथे शाळा असल्या तरी त्यांची गुणवत्ता काय असेल हे वेगळं सांगायला नको. आश्रमशाळा असतात त्यांच्या मुलांसाठी पण त्यांची गत जगजाहीर आहेच…
तसं पाहिलं तर आदिवासींना चांगल्याप्रकारे संविधानिक संरक्षण आहे. त्यात शिक्षण, राजकीय आरक्षण तसंच अन्यही अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. सोयीसवलती आहेत… आणि याच गोष्टींवर डोळा ठेवून धनगर आणि आता बंजारा समाजही आरक्षणासारखी मागणी करू लागले आहेत.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ (१) नुसार संसदेने अनुसूचित जमातींची (Scheduled Tribes) यादी अधिसूचित केली आहे. महाराष्ट्रातील एकूण ४७ जमाती आणि त्यांच्या तत्सम जमाती किंवा गट यांचा समावेश करण्यात आला आहे यात…
१) आंध
२) बैगा
३) बरडा
४) बावचा, बामेचा
५) भेना
६) भारिआ भुमिआ, भुईनहर भमिआ पांडो
७) भात्तरा
८) भिल्ल, भिल्ल गरासिआ, मेवासी भिल्ल, धोली भिल्ल, डुंगरी भिल्ल, डुंगरी गरासिआ, रावळ भिल्ल, तडवी भिल्ल, भगलिआ, भिलाला, पावरा, वसावा, वसावे
९) भुंजिआ
१०) बिन्शवार
११) बिरहूल, बिरहोर
१२) चौघरा
१३) धनका, तडवी, तेटारीआ, वळवी
१४) धानवार
१५) धोडिआ
१६) दुबळा, तलावीआ, हतपती
१७) गामीत, गामता, गापीड, मावची, पाडवी
१८) गोंड, राजगोंड, अरख, अराख, अगारिआ, असूर, बदी, भरिआ, बडा मारिआ, भटोला, भिम्मा, भुटा, कोईलाभुटा, कोईलाभुटी, भार, मारिआ, छोटामारिआ, दंडामी, धुरूधुरवा, धोबा, धुलिआ, दोरला, गैकी, गट्टा, गट्टी, गैता, गौड गोवारी, हील, कांद्रा, कालंगा, खटोला, कोईतर, कोया, खिरवार, कुचा, कुचकी, माडिआ, माना, मन्नेवार, मोघ्या, मोगीआ, मुडिआ, मुरिआ, नागरची, नाईकमोड, नागवंशी, ओझा, राज, शरेका, थाटिआ, थोट्या, वाडे, वडेमारिआ
१९) हलबा, हलबी
२०) कमार
२१) कामोठी, कातकरी, ढोर काठोडी, ढोर कातकरी, सोन काठोडी, सोन कातकरी,
२२) कवारस, कनवार, कौर, चेरवा, राठीआ, तनवार, छत्री
२३) खैरवार
२४) खारिआ
२५) कोकणा, कोकणी, कुकणा
२६) कोल
२७) कोलम, मन्नेवारलू
२८) कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलघा.
२९) कोळी महादेव, डोंगर कोळी
३०) कोळी मल्हार
३१) कोंध, खोंड, कांध
३२) बोरकु, बोपची, मौआशी, निहाल, नाहूर, बोंधी, बोदेआ
३३) कोया, भिने कोया, राज कोया
३४) नागेशिआ, नागिशीआ
३५) नाईकडा, नायका, चोलीवाला नायका, कपाडिआ नायका, मोटा नायका, नाना नायका,
३६) ओरान, धांगड
३७) परधाम, पाथरी, सारोटी
३८) पारधी, अडवी चिंचेर, फणस पारधी, फासे पारधी, लांगोली पारधी, बहेलीआ, चिता पारधी, शिकारी, टाकनर, टाकीआ
३९) पारजा
४०) पटेलिआ
४१) पोमला
४२) राठवा
४३) सवार, सवारा
४४) ठाकूर, ठाकर, का ठाकूर, मा ठाकूर, का ठाकर, मा ठाकर
४५) थोटी
४६) वारली
४७) विटालीआ, कोतवालिआ, बरेडिआ
उपरोक्त आदिवासींच्या जातिंमध्ये कुठेही धनगर जातिचा उल्लेख नाही. ज्या धांगड जमातिचा दाखला धनगर समाजाचे नेते देत आहेत ती ओरान या जमातीची उपजमात आहे. नाम साधर्म्याचा फायदा घेऊन आंदोलनं मोर्चे काढले जातायत. जेव्हा एखाद्या जमातीला आदिवासीचा दर्जा दिला जातो तेव्हा त्या जमातीच्या सांस्कृतिक आणि व्यक्ती वैशिष्ट्यांची दखल घेतली जाते आणि ही वैशिष्ट्यं आदिवासी संशोधन समिती आणि मानववंश सर्वेक्षण यांचेकडून सप्रमाण सिद्ध झाल्याशिवाय आणि जनजाती सल्लगार समितीने (T A C) तिला मान्यता दिल्याशिवाय असा बदल संविधान स्वीकारू शकत नाही. याच कारणास्तव धनगरांनी केंद्र सरकारकडे केलेले आदिवासींमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठीचे प्रस्ताव स्वीकारले गेलेले नाहीत. तरीही आताची आंदोलनं आणि बाकीच्या कुरापती सुरूच आहेत. अनुसूचित जमातीच्या यादीत नवीन अनुसूचित जमातींचा/गटांचा किंवा उपगट यांचा अंतर्भाव करणं, त्यात दुरुस्ती करणं किंवा एखाद्या गटास/उपगटास वगळण्याचा अधिकार हा राज्यघटनेने संसदेला दिला आहे. कोणत्याही राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला तो अधिकार नाही. राष्ट्रपती संसदेच्या मान्यतेशिवाय अधिसूचना जाहीर करू शकत नाही. या गोष्टींचा अभ्यास न करता एखाद्या समाजाला कसं गंडवलं जातं याचंच हे उदाहरण आहे. आधी ओबीसींमध्ये नंतर एन टी प्रवर्गात समावेश असताना अजून एस टी या प्रवर्गातच यांना कशाला घुसायचं आहे. तर त्यालाही कारण आहेच… आदिवासींमध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे अनुशेष राहतो. त्या अनुशेषावर या धनगर समाजाच्या नेत्यांचा डोळा आहे. त्यासाठीच हा एवढा सगळा खटाटोप चाललेला आहे. पण आता आदिवासी जागा होतोय. तो हे सर्व होऊ देणार नाही. आपल्याला महाभारतातील अंगठा कापून देणारा एकलव्य, भिल्ल माहीत असेल, इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारा तंट्या भिल्ल पण माहीत असेल. मात्र शांत समजला जाणारा हा समाज एकदा पेटून उठला की त्याला आवरणं कठीण जाईल हेही तितकंच खरंय… जे आदिवासींचं आहे ते त्यांचंच राहावं, त्यात वाटेकरी होऊ नये. आधीच त्यांच्याकडचं, त्याचं असलेलं येनकेनप्रकारे ओरबाडलं गेलंय. त्यात अजून धनगर समाजाची भर नको. धनगर समाजाची मागणी घटनाबाह्यच आहे. त्यामुळे त्यांनी दुसर्या कुठल्या मार्गाकडे जावं, आदिवासींच्या ताटातला घास हिसकावून घेऊ नये, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता आदिवासींमधून उमटू लागल्या आहेत. ही या दोन्ही समाजातील वादंगाची नांदी ठरू नये, एवढीच अपेक्षा…!
- कुसूम भोईर
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
धनगर समाजाच्या २३.३.२०१५ च्या विराट मोर्चा निमित्ताने
श्री.देवेन्द्र फडणविस,मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.याना उध्धेशून
विषय: धनगर समाजाचा अ.ज.यादीत समावेश करण्या बाबत.
------–-------------------------
आदिवासींच्या (S.T) ७ % आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला अ.जमाती चे (S.T) आरक्षण देण्याचे राज्याचे प्रमुख --मुख्यमंत्री या नात्याने आपण अनेकवेला आश्वासन दिले आहे. त्यासाठी प्रथम धनगर समाजाला अ.जमातीच्या यादित घटनेच्या अनुच्छेद ३४२(२) प्रमाणे समाविष्ट करावे लागेल.त्या शिवाय त्याना आदिवासींना असलेले आरक्षण मिळणार नाही.या संदर्भात घोषीत आदिवासीना खलील माहिती देणे जरुरीचे वाटते म्हणून हा प्रपंच
एखाध्या जातीचा एस.टी. मध्ये समावेश ,वगलणे किंवा दुरूस्ती या संबधी केंद्रसरकारने जुन १९६६ ला कार्यपद्धति विहीत केलेली आहे व त्यानंतर २००२ साली त्यात दुरूस्ती केली आहे. या कार्यपद्धति प्रमाणे जे दावे राज्यसरकार , रजिस्ट्रार जनरल आणि राष्ट्रीय एस.टी आयोग या तिघानी शिफारस केलेले असतात असे दावेच फक्त मसुदा विधेयक स्वरूपात संसदेत सम्मतीसाठी मांडले जातात.संसदेने विधेयक पारीत केल्याशिवाय एस.टी.च्या यादित समावेश ,वगलणी किंवा दुरूस्ती होउ शकत नाही . राज्य सरकार किंवा रजिस्टार जनरल यानी शिफारस केलेले दावे राष्ट्रीय एस.टी आयेग फेटाळू शकतात जर शिफारस निकषाना धरून नसेल तर.
धनगर आणि इतर ४ जाती, आदिवासीं मध्ये समाविष्ठ करण्यासाठी केलेले निकष पूर्ण करीत नाही म्हणून संसदेने २००२ साली एक विधेयक -फेटाळले आहे. तसेच संसदेने धनगड व धनगर वेगले असल्याचे मानून एस.टी.च्या यादीत २००२ साली दुरूस्ती करण्याला समत्ती दिलेली नाही. राज्य सरकारने धनगर समाजाचा अ.जमातीच्या यादीत समावेश करण्यासाठी १९६६ व १९७८ साली प्रस्ताव पाठविले होते .मात्र धनगर जात आदिवासींसाठी असलेले निकष पुर्ण करीत नाही म्हणून राज्य सरकारने दोन्ही प्रस्ताव १९८१ साली मागे घेतले आहेत. १९८५ साली राज्य सरकारने परीपत्रक काढून धनगड हे धनगर नसल्याचे स्पस्टीकरण दिले आहे.
एखाद्या जातीचा S.T च्या यादित समावेश करण्याचे अधिकार घटनेने मूख्यमंत्र्यांना दिलेले नाहीत. राज्य प्रमुख म्हणून फक्त ते ST च्या यादित समावेश करण्यासाठी शिफारस करू शकतात , त्यासाठी त्याना एखादी जात आदिवासींचे निकषात कशी बसते याचा अहवाल ध्यावा लागेल. संसदेचे आधिकार मूख्यंत्र्याना आहेत अशा थाटात ते बोलत असतील व अश्वासन देत असतील तर ते जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत.
The official Hindi translation of the 1950 order as amended by the 1976 Amendment Act, has been published and it is useful to note that the official translation of caste "Oraon, Dhangad" appearing at entry no 36 in the S T list of Maharashtra is " ओरांव, धनगड "
राज्य सरकार पून्हा धनगर समाजाला अ.ज. यादीत समावेश करण्यासाठी शिफारस करत असेल तर ती महाराष्ट्राच्या इतिहासातील राज्याच्या पुरोगामीपणाला काळीमा फासणारी घटना असेल.
मा. मूख्यमंत्री आणि त्याना पाठिंबा देणारे सर्वच जनतेची दिशाभूल करीत आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागत आहे.
--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c3d98511-0c8c-4fbf-80f3-860b9c3080bd%40googlegroups.com.